Fix Text in firefox!
 

In Search of a Poem

In search of a poem
I left the stream
Will it continue until my end!
O prudent, how you appeared
On the horizon
At noon time
By many names
In many moments!
This wilderness is too noisy, o dear;
The meanings slip through my fingers.
Beholding in your eyes,
My boat
In the middle of ocean
In search of destination
The distant land moves away every moment:
an effort infinite.
In search for water of life and culture
The mirage moves farther.
Noon time infinite.

(Trandlation from Ooriginal Marathi by the Author, January 1984)
-------
कवितेच्या शोधात

एक कवीता शोधीत गेलो
प्रवाहाच्या बाहेर
माहीत नाही हां शोध का चालणार
माझ्या ...

पुढे वाचा

Posted on August 28, 2008 07:48 AM · permalink

 

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

विभा विमला आपटे प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौरचैत्रीची कशास जुनी येती
रेशमाची पोलकी छीटे लेती

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का ...

पुढे वाचा

Posted by अमित on August 28, 2008 07:19 AM · permalink

 

"मिथ्या' हे नाव सर्वांना कळण्याइतकं किंवा त्याहूनही अधिक म्हणजे जवळचं वाटण्याइतकं सोपं किंवा आकर्षक नाही. मात्र, इथं दिसणाऱ्या आशयाला चपखल बसणारं जरूर आहे. इथला नायक व्ही. के. (रणवीर शौरी) ज्या दुनियेत राहतो, तिचा आभासीपणा, खोटेपणा दिग्दर्शक रजत कपूर आपल्याला पहिल्या शॉटपासूनच दाखवतो. मात्र, या खोटेपणाची व्याख्या ही कथेच्या चढत्या आलेखाबरोबर अधिकाधिक गहिरी होत जाते. 15 वर्षं ...

पुढे वाचा

Posted by सिनेमा पॅरेडेसो on August 28, 2008 06:41 AM · permalink

 

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड ...

पुढे वाचा

Posted by Soumitra on August 28, 2008 06:35 AM · permalink

 

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार

पुढे वाचा

Posted by Raviraj on August 28, 2008 05:10 AM · permalink

 

१) टॅऱो रिडिंग ब्लॉग १
२) टॅरो लायब्ररी
३) ऍनजल पाथ टॅरो
४) उपयुक्त माहिती
5) एलीमेंटरी टॅऱो
६) बिड्डी टॅरो
७) टॅरो डेक
८) कॅनेडिअन टॅऱो
९) उपयुक्त माहिती २
१०) फूल मुन ड्रीम टॅरो
११) मेजर कार्डांचा ...

पुढे वाचा

Posted on August 28, 2008 04:59 AM · permalink

 

शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गैरसमाजाचे जणु गेल्या काही वर्षात पीक आलेले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा जो तो हवा तसा वापर करतो आणि वैयक्तिक फायद्यासाठी शिवाजींनी केलेल्या महान कार्याचा हवा तसा अर्थ लावतो. या भानगडीत मराठी लोकांचा मोठा हिस्सा आहे. याचा परिणाम असा झाला की ही महान व्यक्ति केवळ महाराष्ट्रापुर्तीच सिमित राहिली. या ...

पुढे वाचा

Posted by Chinmay 'भारद्वाज' on August 28, 2008 04:20 AM · permalink

 

काल घर सोडायला हवं होतं. म्हणजे सांगितलं तसंच होतं की बुधवारी निघायचं. सोमवारपासून जोरदार तयारी चालू होती. खरेदी तर दिल्लीहून परतल्यापासून थांबतच नाहीये. त्यात परदेशी कामाला जायचं असल्याने कंपनीने काही जास्त अलावन्स दिलाय. कुणी खरेदी करायला असेच पैसे दिले तर कोण सोडेल. अगदी शेवटच्या पैपर्यंत तो अलावन्स मी संपवला. त्याची बिलंही पाठवून दिली.

पुढचा प्रोजेक्ट ट्रेनिंगचा ...

पुढे वाचा

Posted by संवादिनी on August 28, 2008 04:15 AM · permalink

 

 

आज पुन्हा आमचे दोस्त श्रीयुत.”मी,माझं,मला”,
एका कार्यक्रमात भेटले.कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो.वाटेत इतर काही गप्पा झाल्यावर मी त्यांनासहज विचारलं,
“सध्या कसला विषय डोक्यात घोळत आहे.?”
माझा प्रश्न संपतो न संपतो तोच मला हे आमचे दोस्त म्हणाले,
“आता विचारलंत तर चला मी काय ते सांगतो.जवळच्या गुरूप्रसाद रेस्टॉरंट मधे बसून गप्पा मारुया.”
मनात म्हणालो,
“कुठली झकमारली आणि ह्या गृहस्थाना हा प्रश्न केला”
आता काय करणार स्वभाव भिडस्त पडला, नाही म्हणता येई ना.म्हटलं चला.
कॉफीची ऑर्डर देऊन झाल्यावर कसला ही विलंब न लावता ते म्हाणाले,
“ज्यावेळी माझं मलाच समजलं,की मला अजून तेव्हडं बुद्धिचातुर्य-विसडम- आलेला नाही त्यावेळी मी माझा मार्ग उघडा करून ज्याना ते आहे त्यांच्याकडून शिकाण्याचं ठरवलं.मला मीच आणखी एका प्रयत्नात टाकण्याचा चान्स दिला.
एखाद्दाला श्रद्धा असते ह्या विचारा बद्दल माझ्या मनात नेहमीच संभ्रम असायचा. माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ एक तर मी कुठल्याही घटनेच्या निश्चीततेबद्दल मनात खोल इच्छा रूतून ठेवतो. नाही तर तितकीच ती निश्चीतता असंभवनीय ही असावी ह्या ही समजूतीवर भर देऊन राहतो. अशा ह्या दोन्ही विचाराच्या कात्रीत माझं मन मी द्विधा करून घेतलं आहे.
कधी कधी माझं मलाच समजूत घालून घेण्याच्या माझ्यात असलेल्या क्षमतेमुळे ह्या सिद्ध न होवू शकणार्‍या घटना काहीशा मानसिक धीर देणार्‍या ठरायच्या. परंतु ही सोय तात्पुरतीच असायची.जगात सुखापेक्षा दुःखंच जास्त असतात ही एक विचारस्रणी आणि जे काय घडतंय ते अर्थशून्य,जरूरी शिवाय आणि शुन्यकिमतीचं असतं ही दुसरी विचारसरणी ह्या दोन विचारसरणी मधे समझोता आणणं म्हणजे ही एक दोर्‍यावरची कसरतच होईल असं मला वाटतं.

एका टोका पासून दुसर्‍या टोकापर्यंत विचार करायला गेल्यावर माझ्या व्यवहारी जगात वावरताना ह्यातला वाद परावर्तीत होऊन कधी कधी अंतःकरणापासून जवळ वाटणार्‍या चमत्कारीक आध्यात्माची ओढ असायची आणि कधी कधी अलीकडे दिसणार्‍या त्या छंदीफंदी रात्रीच्या क्लबातल्या संगीताच्या धमाल वातावरणाची ओढ असायची.

श्रद्धा जोपासण्याचा मी आटोटोकाट प्रयत्न केला पण म्हणताना “श्रद्धे वर श्रद्धा” ठेवणं, तसं व्हायचं. सत्य शोधून काढणं कठीण व्हायचं.छोटी छोटी सुंदर प्रोत्साहीत करणारी देवावरची स्तुती करणारी कवनं हळू हळू वैतागी आणि दुःखी वातावरणात विरून जायची.

मला एक धक्का दायक शोध लागला की माझ्या आध्यात्मा वरील समजल्या गेलेल्या अडचणी ह्या आजूबाजूच्या वातावरणाशी संबंधीत नव्हत्या तर त्या माझ्याच आपमतलबी वृत्तीं मुळे होत्या.माझ्या जवळच्याना जे मी  दुखवलं आणि दुःख दिलं ते मी माझ्या मतलबी राहण्याच्या स्टाईलमुळे झालं.
अनुभव हाच उत्तम शिक्षक आहे ह्याचा पडताळा मला माझ्याच कर्माचे भोग उपभोगून मिळाला. काहीना अनुभवातून मार्ग दिसतो, मला मात्र हे सहज शिकायला मिळालं नाही. मला कठीण मार्गातून हे शिकायला मिळालं. काही वर्ष मी मलाच हरूवून बसलो होतो.ऐहिक सुखं म्हणजे आनंदीआनंद असं वाटायचं. पण जर का ह्या  वातावरणाकडे रेंगाळलेल्या पश्चातापी दृष्टीने लक्षात घेऊन पाहिलं नाही तर त्याची परिणीती एकाकीपणा आणि नैराश्यामधे होऊन ते एक दुष्ट चक्रच व्हायचं.
एकतर आपल्यात बदलाव करावा किंवा मरून जावं अशा पराकोटीच्या स्थितीला माझी मनस्थिती आली.मुलतः मी माझं मनच गमावून बसलो.माझ्या लक्षात आलं की ज्याला मी पूर्वी फूकाचे बोल समजत होतो ते बोल प्रत्यक्षात सत्यच सांगत होते.
“कुणाकडून घेण्यापेक्षा कुणाला तरी द्दावं”
असं कुणी तरी म्हटलंय.पण आता माझ्या लक्षात आलंय की अश्या गोष्टीवर श्रद्धेने न पाहता अनुभव म्हणून पाहणं जास्त संयुक्तिक ठरेल.
 हा मार्ग मी तंतोतंत पाळतो असं नाही पण मनापासून सांगू शकतो की भारतीय कवयित्री-तत्वज्ञानी शांतीदेवीच्या उक्ति प्रमाणे
“जगात भरलेला सर्व आनंद दुसर्‍याला शुभ चिंतूनच  अस्तित्वात आहे.उलट जगात भरलेलं सर्व दुःख स्वतःचच सुख पाहिल्यामुळे अस्तित्वात आहे.

माझे हे दोस्त,श्रीयुत.”मी,माझे,मला” स्वतःला काय वाटत असतं ह्याचं आख्यान भिडभाड न ठेवता दुसर्‍याला सांगण्यात आनंद घेतात.
बाहेर बराचसा काळोख झाला होता.मीच त्याना म्हणालो,
“आपण पुन्हा कधीतरी बोलूया.”
ते कबूल झाल्याचं पाहून सुटकेचा निश्वास टाकून मी त्यांचा निरोप घेतला.
आमचा भिडस्त स्वभाव आम्हाला असा नडतो.

 

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोर्नीया)
shrikrishnas@gmail.com

Posted by shrikrishnasamant on August 27, 2008 04:43 PM · permalink

 

दिसलीस वाऱ्यामध्ये आपुल्याच तोऱ्यामध्ये
निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यामध्ये
वेड लागलं...
वेड लागलं मला वेड लागलं मला वेड लागलं

काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
आता रण रण माळावर घालतो मी ...

पुढे वाचा

Posted by तुमचा आनंद on August 27, 2008 09:16 AM · permalink

 

एक अजरामर गझल....

गझल म्हणजे रडत बसणं ही माझी आधीची समजूत. त्यामुळे आणि उर्दू समजण्याचा ताण वाटल्यामुळे मी गझलचे शब्द पूर्ण ignore करून त्यातल्या गायकीसाठी गझल ऐकायचो. त्यामुळे माझे आवडते गझल गायक पण मेहंदी हसन आणि बेगम अख्तर आहेत. ६-७ वर्षांपूर्वी रंजिश ऐकण्यात आली आणि खूपच आवडली पण अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. IIT मध्ये असताना अनिकेतने एकदा त्याचा अर्थ असलेली link forward ...

पुढे वाचा

Posted by Dhananjay on August 27, 2008 08:43 AM · permalink

 

तू लिही
लिही ना.. कविता ..
लिहिलंस की बरं वाटेल
काहीही लिही.. लिहीत सूट
लपवू नकोस ठसठसती मूठ

कुठे तरी हरवून काही तरी सापडेल,
काय माहित तीच वाट मनाला ...

पुढे वाचा

Posted by Veerendra on August 27, 2008 07:36 AM · permalink

 

एक छोटासा मुलगा.

नखशिखान्त भिजलेला. दिवस पावसाचे आहेत, पाऊस अधून मधून आपलं अस्तित्व दाखवून देतोय. पावसाच्या पाण्याने तर तो भिजलाच आहे, पण दोन्ही बाजूंनी अंगणात भरभरून पडणाऱ्या पाण्याने जास्त भिजलाय. ...

पुढे वाचा

Posted by कोहम on August 27, 2008 07:08 AM · permalink

 

प्रत्येक नाशवंत गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जाते. ब्रम्हा, विष्णू आणि महेश ही परमेश्वराची तीन रूपे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे संपूर्ण नियंत्रण करतात अशी हिंदू धर्मीयांची मान्यता आहे. यातील स्थिती म्हणजेच सांभाळ करणे हे महत्वाचे कार्य विष्णूभगवान एरवी आपल्या वैकुंठामधील निवासस्थानी राहूनच करीत असतात. ते कार्य आपल्याआपणच व्यवस्थितपणे ...

पुढे वाचा

Posted by Anand Ghare on August 27, 2008 06:58 AM · permalink

 

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;

पुढे वाचा

Posted by अमित on August 27, 2008 06:44 AM · permalink

 

ग्नानेश्वराच्या मनांत सर्वाभुती अपार करुणा, अथांग माया ...

पुढे वाचा

Posted by Ulhasdada Mohile on August 27, 2008 06:12 AM · permalink

.