Fix Text in firefox!
 

खूप मस्त वाटत आहे. काय सांगू, खरच नाचावस वाटत आहे. आज मी तिच्याशी बोललो. आणि सकाळी ‘हाय’ सुद्धा म्हटलं. सकाळी खर तर डोक खूप दुखत होत. पण तिला पाहिलं आणि कमी झाल दुखायचं. काल असंच, रात्री उपास झाला. सर्दी, खोकला त्यामुळे आणखीन डोकेदुखी वाढली. आज सकाळी कंपनीत यायला मग उशीर झाला. आलो तर शेंड्या तिच्या डेस्कवर पहिला. मग काल प्रमाणे. पण हिम्मत केली. आणि बोललो. यार आता माझ्या डेस्कच्या बाजूने ...

पुढे वाचा

Posted by हेमंत आठल्ये on September 02, 2010 10:03 AM · permalink

 

आज महाराष्ट्रात किमान ३ ते ४ शिवसुष्टी उभारल्या गेल्या आहेत. आता पुण्यात सुद्दा शिवसुष्टी उभी राहत आहे.खरच शिवसुष्टी साठी कोट्यावधी रुपये खर्च करणे कितपत योग्य आहे. त्या पेक्शा तोच खर्च जर मोडकळीस आलेल्ल्या अनेक गड आहेत त्यांना करुन हे गड सुधारता येणार नाहीत का. महाराष्ट्राची शान कशात आहे.

Posted by टग्या टवाळ on September 02, 2010 09:51 AM · permalink

 

॥ श्री स्वामी समर्थ॥लोकहो,
नुकतीच काही मिनिटांपूर्वी घेतलेली आमच्या गल्लीतील दहीहंडीची छायाचित्रे.
कॅमेरा - ऑलिंपस - एफ ई - २६  
गोविंदाचे आगमन

पुढे वाचा

Posted by धोंडोपंत on September 02, 2010 09:35 AM · permalink

 

एक जेमतेम तीन महिन्यांचे मूल - तेही दुसर्‍याचे - एखाद्याच्या जीवनात किती बदल घडवू शकते? एखादा क्रूर, पाषाण्हृदयी गुन्हेगार एका चिमुरड्याच्या सानिध्यात, अवघ्या तीन-चार दिवसात किती आरपार बदलतो, याचे फार सुरेख चित्रण आहे, गेविन हूड दिग्दर्शित "त्सोत्सी" ह्या इंग्रजीमिश्रित झुलू भाषिक चित्रपटात.

झुलू भाषेत "त्सोत्सी" म्हणजे ठग.

लहानगा डेविड. रागीट बाप मृत्युशय्येवर पडलेल्या आईलादेखिल भेटू देत नाही. शेवटी तो घर सोडून पळून जातो. जोहान्सबर्गमधील एका झोपडपट्टीत लहानाचा मोठा होतो. चार जणांचे टोळके जमवून चोर्‍या-मार्‍या करायला लागतो.

असेच एकदा गाडीबाहेर पडलेल्या एका बाईच्या गाडीत शिरून गाडी पळवायचा प्रयत्न करतो. पकडायला आलेल्या त्या बाईला चालत्या गाडीतून लोटतो आणि गाडी घेऊन पसार होतो. काही अंतर गेल्यावर त्याला मागच्या सीटवरून रडण्याचा आवाज ऐकू येतो. मागे बेबी सीटवर असते एक लहान मूल!

मग सुरू होतो एक वेगळाच प्रवास!

सार्वजनिक नळावर पाणी भरायला आलेल्या, एक लहान मूल पाठुंगळीला बांधलेल्या विधवा तरुणीचा पाठलाग करून तिच्या घरात घुसणे. बंदुकीच्या जोरावर तिला धमकावून तिला त्या लहानग्याला पाजायला लावणे, मग त्या मुलाचे नैसर्गिक विधीने बरबटलेले कपडे बदलणे आणि ह्या सर्व प्रसंगातून स्वतःचे हरवलेले बालपण आठवणे.

शेवटी, तिच्याच आग्रहावरून ते मूल पुन्हा त्या दांपत्याला देण्यासाठी तो त्यांच्या घरी जातो तो प्रसंग तर खूपच छान आहे. घराच्या दरवाजाशी उभा असलेला त्या मुलाचा बाप आणि व्हीलचेअरमधील आई (जीला त्याने कारमधून ढकलून दिलेले असते) आपल्या हरवलेले मूल परत घेण्यासाठी आसूसलेले असतात. अवघ्या तीन-चार दिवसात लळा लावलेल्या लहानग्याची ताटातूट होणार म्हणून हा कासावीस झालेला असतो. सर्व बाजूंनी संगिनी रोखलेल्या पोलीसांचा गराडा पडलेला असतो. आणि तो ते मूल त्याच्या मूळ बापाला परत देतो आणि स्वतःला पोलीसांच्या हवाली करतो. ह्या संपूर्ण दहा-पंधरा मिनिटांच्या प्रसंगात डेविड उर्फ त्सोत्सी याची भूमिका वठवलेल्या प्रेस्ली च्वेनेयागी (Presley Chweneyagae) ह्याच्या तोंडी एकही संवाद नाही. आहे केवळ अप्रतिम अभिनय. केवळ ह्या प्रसंगासाठी चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा असा!

अर्थात, चित्रपटात "मसाला" नाहीच असे नाही! धमकावले गेल्यामुळे एका अनोळखी लहानग्याला पाजायला लागले असले तरी, प्रत्यक्ष पाजताना कॅमेर्‍याकडे पाठ करून पाजणे अशक्य नसावे! पण असे प्रसंग अगदीच अपवादात्मक!

२००५ चे उत्कृष्ठ परदेशी चित्रपटासाठी अकादमी अवार्ड मिळालेला हा चित्रपट, संधी आल्यास जरूर पहावा.

Posted by सुनील on September 02, 2010 09:24 AM · permalink

 

जाळ नाही, धूर नाही, तरी काहीतरी जळतंय
एकूण एक हिरवं पान पिकल्यासारखं गळतंय
काय चुकलं, कळत नाही, इतकं मात्र कळतंय, ..... की
नको त्याच वाटेवर चाललंय भ्रमण!

कधी असं, कधी तसं, वाट्टेल तसं वागलंय,
स्वप्नांमागे धावून धावून मन थकलंय, भागलंय
कोण ...

पुढे वाचा

Posted by क्रान्ति on September 02, 2010 09:16 AM · permalink

 

आपले वय जसजसे वाढत जाते ना, तसतसे काहीतरी नवीन नवीनच प्रश्न आपल्या समोर येऊन उभे रहायला लागतात. या प्रश्नांची, अडचणींची आपल्याला माहितीच नसते असे काही नसते. आपल्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या कोणी ना कोणी व्यक्तीने मागे, आपण तरूण असताना, या प्रश्नांचा सामना केलेलाच असतो. परंतु परदु:ख शीतल असते असे म्हणतात. त्यामुळे कदाचित असा काही प्रश्न आपल्या स्वत:च्याच आयुष्यात येऊन पुढे ...

पुढे वाचा

Posted by chandrashekhara on September 02, 2010 09:09 AM · permalink

 

राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन।

श्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली!
जोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,
खड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन !

वही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन!
एक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन!
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन

जमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया!
मुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया!
नाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन!
राधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.

- पँडित नरेन्द्र शर्मा

radha

काहीतरी शोधताना अचानक वरील रचना दिसली व नकळत ब्रिजभूमी, वृँदावन, गोवर्धन नजरेसमोर आकार घेऊ लागले व अनेक दिवसापासून मनात सुप्त इच्छा होती की राधाकृष्ण ह्यांच्यावर आपण कधीतरी लिहावे म्हणून हा लेखन प्रपंच.

राधाकृष्ण ! जय राधे राधे, हरियाणामध्ये राम राम जेवढे प्रिय आहे तेवढेच हे दोन्ही शब्द देखील. आज ही जेव्हा कधी हे शब्द कानावर पडत तेव्हा एक वेगळीच अनुभुती होत असे. एकदा मनात असेच आले की नाही एवढे जवळ आहोत तर मथुरा-वृंदावन-गोवर्धन करु येऊ एकदा. भटकंती झाली, फिर फिर फिरलो सगळा भाग. जेवढा कृष्ण माहित होता तो महाभारतामुळे व थोडेफार गुणीजणांचा सत्संग हरिद्वारमध्ये लाभल्यामुळे. पण ह्या मथुरा-वृंदावन-गोवर्धनवारी नंतर कृष्ण जाणून घेण्याची व त्यापेक्षा आधिक राधिकाराणी ला समजून घेण्याची ललक मनामध्ये येऊ लागली व त्यांनतर शोध घेत, वाचन करत, थोरामोठ्यांना विचारलेल्या प्रश्नातून व आलेल्या उत्तरातून कृष्ण-राधिका मला समजतील का ह्याचे विवेंचन करु लागलो.

राधा !

एक अदभुत व्यक्तीरेखा. श्री कृष्णाच्या जिवनकथेतील एक महत्वाचा भाग. जीच्या शिवाय श्री कृष्ण पुर्ण होत नाही ना कृष्णकथा. प्रेमस्वरुप राधा, कृष्णाची सखी, प्रेमिका राधा, रायाण पत्नी राधा, ब्रीजची राधारानी. राधा राधा.. यत्र सर्वत्र राधा ! कृष्ण जीवन कथा राधामय होतं. सर्वात आधी कृष्ण म्हणजे देव हा विचार बाजूला ठेऊन मी लिहतो आहे माझ्या मते कृष्ण देवत्वाला पोहचलेला एक कसलेला राजकारणी, योध्दा व राजा होता जो आपल्या गुणामुळे, बुध्दी चातुर्यामुळे व डावपेचामुळे जिवनात यशस्वी झाला त्याच्या कथेतील एक भाग म्हणा अथवा जीने त्यांचे जीवन व्यापुन टाकले अशी राधा म्हणा. ही एक कल्पना आहे असे ही समजले जाते कारण जेथे साक्षात कॄष्णाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले नाहीत तेथे राधाचे कोठून मिळणार. त्यामुळे ह्या लेखाला काही इतिहास संदर्भ नाही आहे ना त्याचा मी कुठे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता महाभारतात कुठेच राधेचा संदर्भ येत नाही की उल्लेख पण जनसामान्यात राधेचा उल्लेख हा कृष्णाआधी येतो हे देखील नवलच नाही का ?

राधेकृष्ण...

राधा कोण हा प्रश्न महत्वाचा नाही आहे पण कृष्णावर तीची असिम भक्ती होती व ती कृष्णमय झाली. कृष्णाची बासरीची धुन जेव्हा जेव्हा परमसीमेवर पोहचत असे तसे तसे राधिकाराणी आपोआप कृष्णाजवळ खेचली जात असे. प्रेम भावना, कृष्णाला भेटण्याची अतिव इच्छामुळे अथवा प्रेमाचे अदभुत संगीतामुळे म्हणा पण ती मंत्रमुग्ध होऊन कृष्णमय होत असे. राधा शिवाय कृष्ण नाही व कृष्णाशिवाय राधा नाही ! कदंबाचे झाड कृष्णला अतीप्रिय तो नेहमी आपली बासुरी कदंब वृक्षाखाली बसून वाजवत असे. कृष्ण बासुरी वाजवतो आहे व राधा हलकेच डोके त्याच्या खांद्यावर ठेऊन मंत्रमुग्धपणे ते स्वर आपल्या हदयामध्ये जपून ठेवत आहे हे तर प्रसिध्द चित्र.

2

राधाकृष्ण ह्यांच्या नात्याची फोड करणे हे अत्यंत किल्ष्ट आहे, पुढील अनेक युगामध्ये ही प्रेमगाथा कधी कथेतून कधी बोली भाषेच्या गाण्यातून, संताच्या शब्दातून समोर येत गेली पण त्याचे सौंदर्य तसेच टिकून राहीले. तसे पाहता त्यांची कथा ही जगावेगळी प्रेमकथा आहे, सामजिक बंधन आहे, वयामध्ये खुप मोठे अंतर आहे, निर्मळ असे प्रेम आहे व वर्षानूवर्ष सहन करावा लागणारा विरह आहे व अनेक वर्षाच्या विरहानंतर फक्त काही क्षणाची भेट आहे ती ही दुरुन. पांडवांनी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञकर्म केले होते त्यासाठी अन्य गोकुळवासीच्या बरोबर राधा देखील तेथे गेली होती अनेक वर्षाच्या ताटातूटीनंतरची ही अंतःकरणाला वेदना देणारी भेट, काही क्षणाची. काय वाटले असेल तेव्हा राधेला ? कृष्णाचे काय तो तोपर्यंत देवत्वाला पोहचला होता त्याच्या शिरावर भारतभूमीच्या उध्दाराचे अगणित काम होते व तोच त्याचा ध्यास होता, जी गीता त्याने अर्जूनाला सांगितली होती तीच त्याला रोज मनन करावी लागत होती, युध्दातून, राजकारणातून, डावपेचातून एखाद क्षण दिवसभरात त्याला कधी तरी मिळत असेल तेव्हा तो एकांतामध्ये राधा बरोबर असताना व्यतीत केले क्षण आठवत असेल, पण राधा ? घरातील कामे आवरली, गायी-म्हशींचे चारापाणी निपटले व त्यानंतर पुर्ण दिवसरात्र ती कृष्णमय होऊन जात असे. त्या बिचारीला ह्या शिवाय काय काम असणार ? ना ती शस्त्र हातीधरून सत्यभामे सारखे कृष्णाबरोबर जाऊ शकत होती अथवा ना ती कृष्णाएवढी प्रगाढ पंडित होती की उभ्या उभ्या जगाला गीतेचे अमृत पाजेल. ती तर साधीभोळी निरागस राधा. कृष्ण कृष्ण कृष्ण जपाशिवाय तिला दुसरे काही जमलेच नाही.

आता थोडे कळले आधी राधा का ते.. राधेकृष्ण......

( क्रमशः )

आधी येथे प्रकाशित झालेले आहे.

Posted by दशानन on September 02, 2010 09:05 AM · permalink

 

सौंदर्याचा चाहता नाही असा माणूस दुर्मिळच आणि म्हणूनच Beauty is an object of joy foreverअशी इंग्रजीत म्हण आहे. आपल्याला लाभलेल्या निसर्गदत्त रुपरंगाला प्रसाधनांच्या सहाय्याने खुलविण्याचा मानवी अट्टाहासही पुरातन आहे.
स्त्रियांचा तर हा खास आवडीचा आणि जिव्हाळ्याचा प्रांत.
एका तत्ववेत्त्याने असे म्हटले आहे ,There is no ugly woman ,but there are women who do not know how to look beautiful .
याचा मतितार्थ एवढाच की सुयोग्य काळजी घेतल्यास व विषयाची जाण वाढविल्यास प्रत्येक स्त्री सुंदर दिसू शकते.

ज्योतिषशास्त्राचा संशोधक व २५-३० वर्षाचा अभ्यासक या नात्याने पत्रिकेच्या माध्यमातून सौंदर्यवृध्दीला सहाय्यभूत घटक शोधून काढणे ,सौंदर्यविषयक निदान आणि उपाय यांचा ज्योतिषशास्त्रीय परामर्श घेणे ,मला आव्हानात्मक वाटले व म्हणून इतर अनेक प्रांतांमध्ये संशोधन पूर्ण केल्यानंतर मी सौंदर्य व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घालणारा "रुपांगी ज्योतिष " हा विषय निवडला.
संशोधनाला सुरुवात झाली तीच मुळात विषयाच्या नावापासून .
ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून रुपवर्धन चिकीत्सा करणारा म्हणून रुपांगी = रुप +अंग(रुप ज्याने अंगी भिनते) ज्योतिष असे शिर्षक दिले. अंगलक्षण होराशास्त्र , देहबोली, (बॉडी लॅंग्वेज) मेडीकल पामीस्ट्री अशा संलग्न विषयांच्या आधारे संशोधनाला अधिक आखीव ,रेखीव व उपयुक्त करण्याची प्रक्रिया अव्याहत चालू आहे.
रुपांगी ज्योतिषाची तोंडओळख तुम्हा जिज्ञासू वाचकांना व्हावी ,ज्ञानाची काही नवी क्षितीजे पाहण्यास तुम्ही उद्युक्त व्हावे एवढाच या लेखाचा माफक उद्देश आहे.
सौंदर्याचे तीन प्रमुख घटक (असे की ज्यात बदल घडवणे शक्य असते.) म्हणजे सतेज कांती-नितळ कांती.तजेलदार काळेभोर केस ,व सुडौल बांधा.
आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून याचा वेध घेऊ या.
सतेज कांती:
कातडीचे दोन स्तर असतात . बाह्य व अंतर्गत.
बाह्य कातडी शुक्र या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. तर अंतर्गत कातडी बुध हा ग्रह दर्शवितो.
हे दोन ग्रह पत्रिकेत कोणत्या राशीत व कोणत्या भागात आहेत यावरून व्यक्तीच्या कांतीचे स्वरुप ठरते.
जलतत्वाच्या राशी (कर्क ,वृश्चिक ,मीन ) आर्द्रतादर्शक (high moisture)
तर अग्नितत्वाच्या राशी (मेष,सिंह, कन्या )शुष्कतादर्शक आहेत.
पृथ्वीतत्वाच्या राशी (वृषभ ,कन्या ,मकर )कांतीचा घोटीवपणा (tenacity) दर्शवितात,
तर वायुतत्वाच्या राशी (मिथून तूळ ,कुंभ) शुष्क व निबर कांती देतात.
पत्रिकेतील लग्न (प्रथम स्थान ) व चतुर्थ स्थानी असलेल्या राशींचा व ग्रहांचा प्रभाव कांतीवर पडतो हे लक्षात घ्यावे.
कांतीचा तलमपणा (smoothnes.) छिद्रे (porasity) चिवटपणा (elasticity), घोटीवता (tenacity) तापमान (heat level )आर्द्रता (moisture level) या सहा घटकांचा अभ्यास पत्रिकेवरून व अन्य परिक्षण निरीक्षणातून करता येतो व त्यातील असंतुलन झालेले घटक योग ध्यानधारणा घरगुती उपाय व विशिष्ट प्रसाधनांच्या सहाय्याने संतुलीत करता येतात.
चेहेर्‍यावर उठणार्‍या तारुण्यपिटीकांचे कारणही अनेक वेळा पचन प्रक्रिया ,मासिक धर्म, अथवा त्वचेच्या छिद्रांचा मोकळेपणा यांच्याशी निगडीत असतो. व त्याचा अचूक वेध पत्रिकेतून घेता येतो.
चंद्र हा मासिक धर्माचा कारक
गुरु यकृताचा (लिव्हरचा ) कारक.
केतू हा त्वेचेवरील छिद्रांचा कारक.
चेहर्‍यावरची अती तैलता (ऑयली फेस) बुध व शनीच्या कुयोगामुळेसंभवते.
तर जीवाणू संसर्गामुळे कांतीची होणारी हानी हा 'राहू' चा त्रास आहे.धूळ आणि प्रदूषक घटक यामुळे संसर्गाला वाव मिळतो.
अडथळ्यांचे कारण व निराकरण
सतेज कांती प्राप्त होण्यासाठी आड येणार्‍या गोष्टींमध्ये काही शरीरांतर्गत आहेत ,तर काही बाह्य घटक आहेत.
मानसिक तणाव (चंद्र )
कोठासाफ नसणे (गुरु)
रक्त दोष आणि सदोष मासिक धर्म (शनी )
अष्टम स्थान ही चार प्रमुख कारणे आहेत.
बाह्य घटकांमध्ये चेहेर्‍याची व सर्वांगाची अस्वच्छता ,उन ,धूळीचे कण व प्रदूषक घटकांचा प्रभाव प्रसाधनांची अ‍ॅलर्जी कातडीला होणार्‍या जखमा ही प्रमुख कारणे आहेत .या कारणांचे निराकरण करण्यासाठी अष्टौ प्रहर जागरुकता लागते.
आहार -विहार - निद्रा यांचाही कांतीवर प्रभाव पडतो.
सौम्य संतुलीत आहार ,योग निद्रा, मसाज , कमरेचे व्यायाम ,सुयोग्य साबणाचा वापर ,गरम पाण्याचे स्नान (एकवीस मिनीटे) ,कृत्रीम रंग आणि घटकांचा वापर टाळणे,बाहेरून घरी आल्यावर चेहेरा गरम -गार पाण्याने धुणे असे साधे सोपे उपायही सतेज मुलायम व दोषविरहीत कांती बहाल करतात.
पुढच्या भागात आपण केशसंभाराचा विचार करू आणि त्यापुढील भागाचा विषय आहे सुडौल बांधा .
तोपर्यंत हा भाग वाचा आणि प्रश्न विचारा.

Posted by प्रा.विद्याधर घैसास on September 02, 2010 08:39 AM · permalink

 

सरकारची मान्यता लागते
पण ते नियंत्रण ठेऊ शकत नाही.
फि वाढीचे वाढते गणित
कुणाच्या ध्यानात येऊ शकत नाही.

शैक्षणिक ...

पुढे वाचा

Posted by सूर्यकांत डोळसे,पाटोदा on September 02, 2010 08:25 AM · permalink

 

मलेरिया निर्मूलनासाठी लसीकरण का शक्य नाही?

read more

Posted by प्रभाकर नानावटी on September 02, 2010 08:16 AM · permalink

 

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
अनेक अडथळे पार करत, स्वामीकृपेने आणि सांगितलेल्या तोडग्यांमुळे,  ज्या कंपनीत काम करणे हीच एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट आहे, अशा एका जगप्रसिद्ध कंपनीत प्रसादरावांना जॉब मिळाला. तुम्ही कुठे जॉब करता? असे कुणी विचारल्यावर, त्या कंपनीचे नुसतं नाव घेणं ही सुद्धा एक सुखावणारी गोष्ट आहे. पुढे काही बोलायलाच नको.
गेले ...

पुढे वाचा

Posted by धोंडोपंत on September 02, 2010 07:54 AM · permalink

 

नमस्कार. ्पहिला इंडियन आयडॉल, अभिजीत सावंतने आमच्या आगामी अल्बमकरता माझं गाणं गाण्याचा योग नुकताच आला. गॊड मुलगा आणि खूप मेहनती सुद्धा. मी त्याचं वर्णन एका ओळीत करेन... milky boy with a silky voice.
चार तास आम्ही न कंटाळता एका गाण्याचं रेकॉर्डींग करत होतो. आणि आम्हाला ’मॅनेज’ करत होते आमचे संगीतकार, श्री. सैयद अली. ...

पुढे वाचा

Posted by namrata on September 02, 2010 07:43 AM · permalink

 

ही फोटोची लिंक.

तर काय आहे कि आज मी भेंडीच्या भाजीचा एक छोटासा प्रयोग करून पहिला...कुरकुरीत..

साहित्य : १) भेंडी २) लसूण ३) लाल मिरच्या (वाळलेल्या) ४) दाण्याचा कुट ५) मीठ

फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद

कृती : भेंडी धुवून बर्यापैकी पातळ गोल काप करून घ्या.

एक मोठे पसरट फ्राय पॅन घेऊन त्यात फोडणीसाठी तेल टाका...तुम्हाला जर भाजीच्या अंदाजानुसार फोडणीसाठी तेल ठरवता येत नसेल कृपा करून स्वैपाकाच्या भानगडीत न पडता हाटेलात खा

तर फोडणीच्या तेलात मोहरी तडतडली कि जिरे टाका मग लगेच थोडा हिंग अन हळद टाकून त्यात लाल मिरच्या टाका..या पण तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे

२०-३० सेकंद त्या परतून घ्या अन मग काप केलेली भेंडी टाका...मिश्रण हलवा..

झाकण अजिबात ठेवू नका नाहीतर भाजी चिकट होईल

गॅस मध्यम आचेवर ठेवून भाजी हलवत राहा...मीठ टाका..अन भाजी अजून २-३ मिनिटे परतून घ्या...मग त्यात एक दीड चमचा (भाजीच्या प्रमाणात) दाण्याचा कुट घाला अन भाजी अजून परतून परतून घ्या...चांगली कुरकुरीत होईपर्यंत परता अन मग पोळीबरोबर खा...पोळी नसेल वरण भाताबरोबर खा. पण खा.

फोटो टाकताना काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणुन लिंक दिली आहे.

Posted by शिल्पा ब on September 02, 2010 07:17 AM · permalink

 

पुलंच्या कुठच्यातरी लेखात/भाषणात 'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं, या वाक्याचं इंग्रजीमध्ये कसं भाषांतर करणार?' असा प्रश्न विचारला होता. पुलंना मराठी मनाची जाण होती, व 'खमंग, थालिपीठ' ह्या खास मराठी गोष्टी आहेत. त्यामुळे हे वाचकांना/श्रोत्यांना पटायला फारसा वेळ लागत नाही.

पण या वाक्याचा नक्की अर्थ काय? इंग्रजांकडे इतर गोष्टी आहेत पण त्यांना बिचाऱ्यांना थालिपीठाचा खमंगपणा माहीत नाही असं म्हणून स्वतःलाच हुरळवण्याचा तो प्रकार आहे का? अर्थात इंग्लिश पाकपद्धतीला जे सगळेच जण हसतात व जोडे हाणतात, त्यामुळे तेवढा भाग खराही असेल. विनोदाचा भाग सोडला तरी भाषा, संस्कृती व त्यांना जोडली गेलेली, त्यांतून घडणारी अनुभूती याबाबतचा व्यापक प्रश्न शिल्लक राहातोच. थत्तेंनी १९८४ ची ओळख करून देणाऱ्या लेखात न्यूस्पीकविषयी लिहिलं, व इतरत्र धनंजय यांनी एका माहितीपूर्ण लेखाचा दुवा दिला. त्यावरून हे विचार मनात आले.

'आमच्या हिनं केलेलं खमंग थालिपीठ' यामध्ये थालिपीठाची चव, खमंगपणा, घरात शिरताना त्या वासाने तोंडाला सुटलेलं पाणी, चाळवलेली भूक, आणि ते खाऊन झालेली तृप्ती तर आहेच. पण शिवाय ओळखीच्या, प्रेमाच्या हातची चव व त्यामागची आपुलकीही आहे. इतकं सगळं, किंवा बरोब्बर हेच शब्दाला शब्द ठेवून दुसऱ्या भाषेत कदाचित सांगता येईलही, पण तशी शब्दशः भाषांतराच्या क्षमतेची अपेक्षा अतिरेकी वाटते. पण याचा अर्थ इतर संस्कृतींमध्ये चवदार पदार्थ, तोंडाला पाणी सुटणं, भूक, तृप्ती व आपुलकी या गोष्टी नाहीतच का? आपण जेव्हा इतरांपेक्षा वेगळे असं म्हणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच मूलभूत बाबतीत साम्यं असतात हे खरं का?

एखादा समूह वापरत असलेली भाषा व तद्जन्य अनुभूती हे कितपत जोडलेले असतात? (दुव्यात विशिष्ट भाषेत डावं, उजवं, मागे, पुढे ऐवजी कायम पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर वापरणाऱ्या समूहाविषयी छान उदाहरण आहे) व्यापक दृष्टीने एखाद्या समाजाची संस्कृती (भाषा हे केवळ एक अंग झालं) ही त्या समाजाच्या, त्यातील सर्वसाधारण व्यक्तीच्या अनुभूतींना घडवते का? (थालिपीठाला, किंवा खमंगला नक्की प्रतिशब्द काय हे तितकंसं महत्त्वाचं नाही) तसं असल्यास नक्की कुठच्या पातळीला दोन समूहांमध्ये हे संस्कृतीजन्य अनुभूतीतले फरक असतात/दिसतात, व कुठच्या पातळीला साम्यं असतात? (न्यूरॉन्सच्या पातळीवर संस्कृतीजन्य फरक नगण्य असावेत...पण त्या पातळीला अनुभूतीही नसते.)

Posted by राजेश घासकडवी on September 02, 2010 07:16 AM · permalink

 

जलदुर्गाचे आकर्षण लहान पणापासुन होते. लांब समुद्रात एखादा किल्ला बांधणे म्हणजे जिकरीचे काम असते. त्याकाळात असणारे जुणे तंत्र वापरुन किल्ला बांधणे म्हणजे अजुनच कठीण काम असे.
असा जलदुर्गाचा राजा असणारा हा जंजिरा,अनेक परकियाना ही ज्याचे आकर्षण होते व लढाईने जिंकता न आलेला असा हा अभेद्य किल्ला म्हणजे जंजिरा, राम पाटील ह्या कोळ्याने समुद्री चाच्यापासुन रक्षण व्हावे ...

पुढे वाचा

Posted by प्रशांत भोसले on September 02, 2010 07:15 AM · permalink

 

दहीभात..!

इथे शब्द संपातात!

हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!

कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!

पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..

थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. Smile

दहीभात कधीही खावा..

छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात.. रासायनिक प्रक्रियेचा इतका चांगला आउटपुट जगात इतरत्र पाहायला मिळणार नाही.. Smile

एखाद्या लाहनग्याच्या निरागस हास्यात जो गोडवा, तोच गोडवा दहीभाताचा!

'दहीभाताचा अमृतकाला' असं गदिमांनी (चूभूदेघे) कुठेसं म्हटलंय ते खरंच आहे..

मंडळी, आज गोपाळकाला. म्हणूनच या छोटेखानी लेखांच्या मालिकेची सुरवात दहीभाताच्या या अमृतकाल्याचा नैवेद्य दाखवून करत आहे..

वाचकांनीही दहीभाताबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्या व या अमृतकाल्याचे अंशत: ऋण फेडावे, ही विनंती..

तात्या.

Posted by विसोबा खेचर on September 02, 2010 06:44 AM · permalink

 

पुलंच्या कुठच्यातरी लेखात/भाषणात 'आता, आमच्या हिनं काय खमंग थालिपीठ बनवलं होतं, या वाक्याचं इंग्रजीमध्ये कसं भाषांतर करणार?' असा प्रश्न विचारला होता. पुलंना मराठी मनाची जाण होती, व 'खमंग, थालिपीठ' ह्या खास मराठी गोष्टी आहेत.

read more

Posted by राजेशघासकडवी on September 02, 2010 06:36 AM · permalink

 

सर्व मिपाकरांना गोविंदाच्या शुभेच्छा..! Smile

जाता जाता - हरिहरनने गायलेलं 'कृष्णा नी बेगने..' ऐका.. फार सुरेख गायलं आहे..

<object height="385" width="480"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/SVys6V3919s?fs=1&amp;hl=en_US"><param name="allowFullScreen" value="true"><param name="allowscriptaccess" value="always"><embed allowfullscreen="true" allowscriptaccess="always" height="385" src="http://www.youtube.com/v/SVys6V3919s?fs=1&amp;hl=en_US" type="application/x-shockwave-flash" width="480"></embed></object>

(यमनप्रेमी) तात्या.

Posted by विसोबा खेचर on September 02, 2010 06:10 AM · permalink

 

भेटेन नव्याने पुन्हा
माहित नाही कसे अन केव्हा
कधी बनेन एक मुग्ध कल्पना अन उतरेन चित्रात तुझिया
चित्रामधील बनून रेषा साठवीत राहीन नजरेत तुजला
भेटेन पुन्हा ...नव्याने पुन्हा

बनून कोवळ्या किरणाचा कवडसा
विरघलेन तुझिया हर एक रंगा
रंगेन मी चित्रात तुझिया
भेटेन पुन्हा एकदा पुन्हा एकदा
माहीत नाही कशी अन केव्हा
परी भेटेन पुन्हा एकदा नव्याने एकदा

किवा बनून थेंबांचा शीतल शिडकावा
उसळून उधळेन तुझ्यावरी स्वत:ला
मिटवेन धग अन दाह मनाचा
थंड शिरशिरी अन धुंद गारवा
बनून भेटेन पुन्हा एकदा ..पुन्हा एकदा

इतकं नक्की ठाउक आहे मला
या जन्मी तू राहशील माझा.. फक्त माझा
म्हणतात की सोडता या नश्वर शरीरा
सारेच संपते अन अंततात जाणीवा
तरीही उरतात नभी या
निरंतर चेतना... निरंतर चेतना
सावरून नाभीच्या एकेक चेतना
गुंफून विणेन एक रेशीमधागा
अन भेटेन नव्याने पुन्हा ..पुन्हा एकदा..

मुळ कविता : अमृता प्रीतम

Posted by जाई अस्सल कोल्हापुरी on September 02, 2010 06:01 AM · permalink

 

साहीत्य : अळुची पाने ५ - ६
डाळीचे पीठ - २ वाट्या
तांदळाचे पीठ - २ चमचे
हिरव्या मिरचीचे वाटण
लाल तिखट
तीळ - २ चमचे
मीठ
चिंचेचा कोळ - २-३ चमचे
गुळ

अळुच्या पानांची देठे आणी जाड शीरा कापुन घ्याव्यात.
डाळीचे पीठ , तांदळाचे पीठ , मिरचीचे वाटण , लाल तिखट , मीठ ,तीळ , गुळ व चिंचेचा कोळ एकत्र करावे. त्यात थोडे पाणी घालुन जाडसर असे पीठ भिजवावे.
अळुच्या पानाला मागच्या बाजुने हे पीठ लावावे. त्यावर दुसरे पान ठेवुन पुन्हा पीठ लावावे. अश्याप्रकारे ३-४ पाने झाल्यावर एका बाजुने गुंडाळी करत त्याचा रोल ( उंडा ) तयार करावा. हा रोल कुकर अथवा स्टीमर मध्ये १५ मिनीटे वाफवुन घ्यावा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापुन शॅलो फ्राय कराव्यात.

Posted by प्राजक्ता पवार on September 02, 2010 05:45 AM · permalink

 

॥ श्री स्वामी समर्थ॥
लोकहो,
कृतज्ञतेची अशी पत्रे आली की कार्यसाफल्याच्या अवर्णनीय आनंद लाभतो. माणसाच्या जीवनात पुढे घडणार्‍या घटनांचा वेध घेऊन, कुठे खणलं की पाणी लागेल, हे सांगणे म्हणजे भविष्य सांगणे. 
"तुमच्या ग्रहदशा वाईट आहेत म्हणून तुम्हाला त्रास होतोय", हे सांगणे म्हणजे ज्योतिष नव्हे. ते सांगायला ज्योतिषी कशाला हवा? ते तर त्यालाही माहीत ...

पुढे वाचा

Posted by धोंडोपंत on September 02, 2010 05:27 AM · permalink

 

6) Ventilated Container :हा कंटेनर साध्या कंटेनर सारखाच दिसतो पण फरक हा आहे की याला हवा खेळती राहण्यासाठी झरोके असतात.मुख्यत्वे करून कॉफी च्या बिया आयात -निर्यात करण्यासाठी याचा उपयोग होतो.म्हणून याला कॉफी कंटेनर असेही म्हणतात.

पुढे वाचा

Posted by स्वप्ना on September 02, 2010 05:24 AM · permalink

 

पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १

एकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.

read more

Posted by नितिन थत्ते on September 01, 2010 05:04 PM · permalink

 

दोन दिवसा पासून वर्तमानपत्रात TV वर आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन ह्यांनी मुंबईच्या विकासात अडथळा करण्यास सुरवात केली आहे .स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन यांनीही मुंबईतील पायाभूत विकासाच्य

read more

Posted by thanthanpal on September 01, 2010 01:47 PM · permalink

 

बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा. त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे.

read more

Posted by डॉ.श्रीराम दिवटे on September 01, 2010 01:28 PM · permalink

 

४)Flatrack: नेहेमीच्या कंटेनर पेक्षा हा वेगळा आहे.कंटेनर प्रकारात मोडत असला तरी वेगळ्या प्रकारचा हा कंटेनर असून ह्यात फक्त दोन बाजूनी बंद असतो.floor आणि दोन side wall चा मिळून हा कंटेनर बनलेला आहे.आणि एकावर एक कार्गो व्यवस्थित बांधून ठेवता यावा यासाठी व्यवस्था केलेली असते.२० आणि ४० फुट या दोन्ही प्रकारात flatrack कंटेनर उपलब्ध आहे.
साधारण या प्रकारचा हा कंटेनर असतो.
या मध्ये कार्गो ...

पुढे वाचा

Posted by स्वप्ना on September 01, 2010 10:28 AM · permalink

 

एकानं दुसर्‍याला मारलं
मारणं हे चूकच म्हणणार
अरे पण, का मारलं ते मुळीच नाही विचारणार
आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

एखादा झोपडीत रहातो
त्याला वाईटच म्हणणारं
स्वत:च्या पोरांचे दिवे नाही बघणारं
झोपडीवरनं माणूस ठरवणारं
आम्ही चुकीला चूक नी बरोबरला बरोबर म्हणणार..

धर्माचे, संस्कारांचे दिंडोरे ...

पुढे वाचा

Posted by pallavikelkar on September 01, 2010 09:58 AM · permalink

 

नमस्कार मंडळी.
आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते ते मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल? कदाचित नाही, किंवा माहित नाही.

गप्पांमधे तर्क वितर्क लढवणे एक वेळ जमेल पण एकट्यात स्वतःला हा प्रश्न विचारला तर उत्तर देणे कठीण होवुन बसते, अर्थात आज सगळं सुरळीतपणे चालु आहे म्हणुन असे प्रश्न पडतात, एखाद्या गरीबाला/मागच्या पिढीला (पुन्हा व्याख्या व्यक्तीसापेक्ष Wink ) हा प्रश्न विचारला तर कदाचित त्याला हा प्रश्न समजणार सुद्धा नाही. असो..

खरं तर किती मध्यमवर्गीय लोकांना हा प्रश्न पडतो? किंवा पर्याय निवडायला वाव असतो/वेळ मिळतो?. भारतात बहुतांशी प्रत्येक जण शिक्षण घेतो केवळ चांगली नोकरी मिळवण्याकरता, मला काय करायला आवडतं हे जाणण्यासाठी पुरेशी साधनं/ज्ञान आजुबाजुला असायलाही हवीत ना, आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ हातातुन निसटुन गेलेली असते, अर्थात पॅशन (मराठी शब्द?) साठी वयाची मर्यादा नसते पण मग कंफर्ट झोनचे काय? बायको मुलं आहेत, जबाबदारी आहे, सन्यास नाही घेऊ शकत. मग काय करावं बरं? अशा वेळी लोकं तथाकथित प्रगत देशांकडे बघतात, चुक की बरोबर हेही माहित नाही.

खुपच गुंतागुंतीचा हजारो डायनॅमिक व्हेरिएबल असलेला हा प्रश्न आहे खरा, पण याचं उत्तर शोधणं सुद्धा गरजेच आहे, नाही का? की नाही? जे चाल्लय ते गोड मानुन रहाव?

आपला,
(या सर्व प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असलेला)
मराठमोळा

Posted by मराठमोळा on September 01, 2010 09:45 AM · permalink

 

॥ जय श्री राम ॥

भिकाजी श्रीपत नांवाचे एक फौजदार होते. श्रीमहाराजांच्यावर त्यांची विशेष अशी निष्ठा होती. या भिकाजीपंताजवळ बत्ताशा नावाचा एक पांढरा शुभ्र, सुंदर पण थोडा मस्त असा घोडा होता. तो घोड भिकाजीपंतांनी श्रीमहाराजांना अर्पण केला. घोडा उमदा असला तरी अत्यंत खट्याळ होता. इतरांना तो अजीबात दाद देत नसे. उलट श्रीमहाराजांच्यावर त्याचे विलक्षण प्रेम असे. दर एक दोन दिवसांनी ...

पुढे वाचा

Posted by kulprasad on September 01, 2010 09:20 AM · permalink

 

टेक मराठीच्या पहिल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! या महिन्यात दुसरी सभा आयोजीत करण्याचा आमचा मानस आहे. यावेळीदेखील आपण सर्व चांगला प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे. सभेबद्दल ...

पुढे वाचा

Posted by Pallavi Kelkar on September 01, 2010 09:15 AM · permalink

 

वि.स. खांडेकरांची "अमॄतवलय" वाचून मला आता कमीतकमी पंधरा वर्षे झाली असतील.
कादंबरीत सुरवातीलाच एका नवयुवकाचा अपघाती मृत्यू होतो. जो एका विमानाचा वैमानिक असतो . त्याचे एका सुंदर मुलीशी लग्न ठरलेले असते जिच्यावर त्याचे खुप प्रेम असते. तो एका आईचा एकुलता एक पुत्र असतो.
ही आई एक देवभोळी साधी स्त्री असते. तिला संसारापलिकडचे कांही माहीत नसते. आपले लहानसे कुटूंब हेच तीचे जग असते. आणि ...

पुढे वाचा

Posted by प्रदीप on September 01, 2010 09:07 AM · permalink

 

सध्या टीव्ही वर बातम्या पहिल्या कि भेसळीची बातमी हटकून असतेच. प्रत्येक पदार्थात भेसळ करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवस सुरु होतो तोच भेसळीच्या चहाने, दुधाने… नायाहारीला सांजा, उपमा करण्याचे ठरवले तर रव्याच्या शुद्धतेची खात्री नाही. जेवणास भाजी हा तर अपरिहार्य घटक आहे. हीच भाजी रंगाच्या इंजेक्शन ने छान टवटवीत केलेली आहे का?? हाच संशय मनात येत राहतो. फळांची वाढ, ...

पुढे वाचा

Posted by anukshre on September 01, 2010 09:06 AM · permalink

 

चांदण्यात न्हालेलं ते रंगमंदिर आणि तो पूर्ण चंद्र
अत्तराचा सुवास फुलांचे रंग नि सनईचे सूर मंद्र
शिफॉन साड्या मलमली कुर्ते अभिजनांची गर्दी
तिला पाहायला आलेले प्रेक्षक चाहते आणि दर्दी

कोपर्‍यात तो उभा गुलाबांतल्या निवडुंगासारखा
दखल घ्यायला अपात्र नि एका नजरेसही पारखा
हातात एक पत्र अन् प्रतीक्षा त्या स्वप्नसुंदरीची
जरी स्थिर उभा तरी उघड व्याकुळता अंतरीची

स्मरतील का तिला दिवस मुग्ध किशोरवयातले
तासनतास गप्पा ती गाणी ते क्षण पावसातले
जरी आज ती श्रीमती अन् विख्यात अभिनेत्री
जपली असेल का तिने ती बालपणीची मैत्री

'आल्या आल्या'चा गलका अन चाहत्यांचा गराडा
धावला तोही ओढीने आणि घुसला तोडून वेढा
उभा क्षणभर तिच्यापुढे नजरेस नजर भेटली
हसला तो डोळ्यांत तिच्या ओळख ना उमटली

सरकला घोळका पुढे पण तो उभा तसाच खिळून
भंगलेले हृदय छातीत अन् स्वप्ने गेलेली जळून
सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही
हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही

(पूर्वप्रकाशित)

Posted by नगरीनिरंजन on September 01, 2010 08:45 AM · permalink

 

भारतातील न्यायव्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी खटल्यांचे अनावश्यक रेंगाळणे कमी करता आले तर लोकांचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास वाढण्यास मदत होईल. हे कसे करता येईल याचा विचार गेले कित्येक दिवस माझ्या डोक्यात रेगांळत आहेत. भारताबाहेर प्रगत देशांमध्ये हे रेंगाळणे किती प्रमाणात आहे याची मला कल्पना नाही. न्यायव्यवस्था सर्वात संथपणे नव्या पद्धती, तंत्रे यांचा स्वीकार करते असे माझे निरिक्षण आहे. या विषयावर जेव्हा सार्वजनिक चर्चा होते तेव्हा फक्त वकीलांच्या नैतिकतेला आवाहन केले जाते ( जे सर्वार्थाने निरर्थक असते ). जनतेच्या दबावाशिवाय यात कोणतीही सुधारणा होईल असे वाटत नाही. महागाई, कायद्याची अंमलबजावणी, निषेध या विषयांवर मोर्चे निघतात पण न्यायव्यवस्था सुधारावी म्हणुन कधी कुणी मोर्चा काढल्याचे ऐकिवात नाही आणि भविष्यात असे होईल असेही नाही.

दाव्याला विलंब होण्याचे मुख्य कारण दावा सुनावणी साठी आला की तारीख पुढे ढकलण्यासाठी एका पक्षाने अर्ज करणे किंवा दोन्ही पक्षांनी (किंवा त्यांच्या वकिलांनी) अनुपस्थित राहणे. यात कोर्टात खेपा मारणारा पक्ष जर परगावी रहात असेल तर त्याचे हाल कुत्रे खात नाही. दाव्याला होणारा विलंब कधी कधी खुद्द कोर्टाकडूनही होऊ शकतो ( उदा. न्यायाधीशाची बदली झाल्यामुळे). अशा विलंबाचे उत्तरदायित्व न्यायसंस्थेवर कधीच नसते.

प्रत्येक विलंबाला एक विशिष्ट आर्थिक किंमत असते. संबंधितांच्या जाण्या-येण्याचा खर्च (दावा परगावी असेल राहाण्याचा खर्च) हा मुख्य भाग. ज्यापक्षाने दाव्यासाठी विलंब केला आहे त्या पक्षाला प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई देणे अनिवार्य केल्यास खटले वेगाने पुढे सरकतील. मध्यंतरी चेक बाउन्स होण्याचे खटले वाढल्याने येणारा ताण कमी करण्यासाठी खटल्याचा खर्च चेक वरील रकमेशी निगडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे स्मरते.

’प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई’ ही कल्पना सरसकट अमलात आणता येणार नाही, याची मला कल्पना आहे. पण जेव्हा मोठा मासा छोट्या माशाला गिळायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला थोडे काबूत आणता आले तर न्याय मिळवणे हे कमी वेदनादायक कोईल.

’प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई’ ही कल्पना अमलात आणायची झाली तर दाव्यांच्या खाली दिलेल्या शक्यता निर्माण होतात.

१. आर्थिक सबळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक सबळ व्यक्ती
२. आर्थिक सबळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक दूर्बळ व्यक्ती
३. आर्थिक सबळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक सबळ संस्था
४. आर्थिक दूर्बळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक सबळ संस्था
५. आर्थिक सबळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक दूर्बळ संस्था
६. आर्थिक दूर्बळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक दूर्बळ संस्था

तत्त्वत: दाव्यांची वरील प्रमाणे प्रत ठरवता आली तर ’प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई’ हे तत्त्व अमलात आणण्यासाठी मार्गदर्शक नियम बनवता येणे सहज शक्य आहे. वरील
शक्यता संख्येने जास्त नसल्या मुळे मार्गदर्शक नियम बनविणे फार अवघड आहे असे वाटत नाही.

मी केलेल्या सूचनांची व्यवहार्यता तपासण्यासाठी मी त्या इथे चर्चेसाठी ठेवत आहे.

Posted by युयुत्सु on September 01, 2010 08:33 AM · permalink

 

संध्याकाळच्या सुमाराला आमचा खरेतर आमची चौथी सहकारी हजर झाली आणि तिला बघुन मला धक्काच बसला. गेले १५ वर्षे हॅकर्सच्या विश्वात जिचे नाव आदरानी आणि एक प्रकारच्या दरार्‍यानी घेतले जात असे ती 'ग्रॅनी' आमची सहकारी म्हणुन हजर झाली होती. 'ग्रॅनी' म्हणजे खरच ग्रॅनी होती, तिचे वय साधारण ६० च्या आसपास होते पण वागणे, बोलणे, सर्वांच्यात सहजरीत्या मिसळणे अगदी १८ वर्षाच्या मुलीला ...

पुढे वाचा

Posted by PrAsI on September 01, 2010 07:43 AM · permalink

 

भाग १

भाग २

संध्याकाळच्या सुमाराला आमचा खरेतर आमची चौथी सहकारी हजर झाली आणि तिला बघुन मला धक्काच बसला. गेले १५ वर्षे हॅकर्सच्या विश्वात जिचे नाव आदरानी आणि एक प्रकारच्या दरार्‍यानी घेतले जात असे ती 'ग्रॅनी' आमची सहकारी म्हणुन हजर झाली होती. 'ग्रॅनी' म्हणजे खरच ग्रॅनी होती, तिचे वय साधारण ६० च्या आसपास होते पण वागणे, बोलणे, सर्वांच्यात सहजरीत्या मिसळणे अगदी १८ वर्षाच्या मुलीला लाजवण्यासारखे होते. आल्या आल्याच ग्रॅनीने फ्लॅटचा आणि आमचा ताबा घेउन टाकला. ग्रॅनीशी तासभरच गप्पा मारल्या आम्ही सर्वांनी पण त्यामुळे आम्ही खुपच रिलॅक्स झालो आणि मुख्य म्हणजे 'द विच' ह्या भेटीसाठी अगदी तय्यार झालो.

साधारण आठच्या सुमाराला आम्हाला आमच्या मुंबईतल्या ऑफीसच्या जागेवर नेण्यात आले. टेंशन बर्‍यापैकी उतरलेले असल्याने 'द विच' बरोबरची भेट अगदी मनमोकळी आणि सहजपणे पार पडली. खुप शंका अशा काही न्हवत्याच पण ज्या काही थोड्याफार लहान मोठ्या शंका होत्या त्या तीने सहजपणे सोडवुन दिल्या. मुख्य म्हणजे 'द विच' च्या खालोखाल ग्रॅनीकडे अधिकार देण्यात आले. आणि ह्यापुढे कुठल्याही कामासाठी थेट 'द विच' कडे न जाता ग्रॅनी थ्रु ते काम तिथे जाईल हे ठरले.

साधारण आठवड्याभरातच आम्ही अगदी रुळुन गेलो. मुख्य म्हणजे ग्रॅनी सोबत असल्याने फ्लॅटवरची दारु, धिंगाणे अगदी लिमिटमध्येच होते. ह्या आठवड्याभरात कामाची पुर्ण रुपरेषा ठरवण्यात आली. आमचे पहिले टार्गेट रशियाच्या संरक्षण खात्यातील एका मोठ्या पदावरचा अधिकारी 'कार्पोल' हा होता. ऑपरेशन सॅटेलाईट डिस्ट्रॉयरची माहिती, संशोधनाची ठिकाणे ह्या सर्वांवर देखरेख ठेवणारे जे काही मोजके रशियन अधिकारी होते त्यात कार्पोलचा देखील सहभाग होता. कार्पोल सध्यातरी फक्त ३ महत्वाचे संगणक (स्वतःचा लॅपटॉप, त्याच्या केबीनमधील लॅपटॉप आणि जेथे मुळ संशोधन चालु होते त्या ३ लॅबपैकी एका लॅबमधील ज्युपिटर सर्व्हरला त्याला अ‍ॅसेस होता)हाताळत होता. कार्पोल स्वतःच्या वैयक्तिक वापराच्या लॅपटॉपमध्ये काही महत्वाची माहिती जतन करुन ठेवण्यायेवढा मुर्ख नक्कीच वाटत न्हवता, पण सध्यातरी त्याचा वैयक्तीक लॅपटॉप हे सर्वात सॉफ्ट टार्गेट असल्याने त्याच्यापासूनच सुरुवात करण्याचे आम्ही नक्की केले. ह्या लॅपटॉपसाठीचा बग बनवण्याचे काम स्कॉर्पीअन व माझ्याकडे सोपवण्यात आले तर हा बग इनप्लँट करण्याचे काम ग्रॅनी कडे सोपवण्यात आले. बुलडॉग गरज पडल्यास फिशींग पेज अथवा फेक वेब कॅमची तयारी करत होता. एकुण काय तर आता खेळाला चांगलाच रंग भरायला लागला होता.

२२ दिवस आम्ही अक्षरश: राब राब राबलो, वेळेला एकेक पिझ्झावर दिवस काढले पण शेवटी झोन अर्लाम, इनबिल्ट फारवॉलवाले अँटिव्हायरस ह्या सर्वांच्या तडाख्यातुन सुटणारा कि-लॉगर आम्ही तयार करण्यात यशस्वी झालोच. (कि-लॉगर नक्की कसे काम करतो हे बर्‍याच जणांना ठाउक नसेल, त्याची माहिती इथे मिळु शकेल :- http://en.wikipedia.org/wiki/Keystroke_logging) किबोर्ड हॅक करण्यासाठी जो एक अतिशय साधा कोड खरेतर व्हायरस मी कधीकाळी तयार केला होता त्यात काही चेंजेस करुन आम्हाला हा लॉगर बनवता आला.
Code:
Set wshShell =*******("WScript.Shell")
do
wscript.sleep 100
wshshell.sendkeys "You are a fool."
****
हा कोड .VBS फाईल म्हणुन सेव्ह करुन एकदा एखाद्या संगणकावर लोड केला की तुम्ही कि-बोर्ड वरच्या कुठल्याही किज दाबल्यात तरी "You are a fool" हेच वाक्य उमटत जाते.
(हा कोड पुर्ण नसून महत्वाच्या ठिकाणच्या कमांडसच्या जागी **** चा वापर केलेला आहे, तरी उगाच वापरुन बघायचा प्रयत्न करु नये)

आम्ही आमचे काम पुर्ण केले होते, आता पुढचे लक्ष्य ग्रॅनी आणि द विच ला साधायचे होते. कार्पोलची संपुर्ण माहिती आमच्याकडे येउन पोचलीच होती. डेटिंग साईटसला सतत भेट देण्याची त्याची सवय हि आमच्यासाठी सुवर्णसंधी आहे हे आमच्या लक्षात आलेले होतेच. त्याच्या ह्याच सवयीचा फायदा उचलायचे आम्ही ठरवले आणि पुढच्या तयारीला लागलो. सगळ्यात आधी डेटिंग साईटवर रोझी ह्या मुलीच्या नावाने एक प्रोफाईल बनवण्यात आले. बुलडॉगनी फेक वेबकॅम तयार ठेवले होतेच आणि गरज लागली तर ह्या महाभागानी डेटिंग साईटचे फिशिंग पेज देखील बनवुन ठेवलेले होतेच. अगदीच गरज लागली आणि कार्पोलला फोन करुन भुलवावे लागले तर त्या तयारीसाठी म्हणुन कॉलींग-कार्डस देखील हजर झाली होती. आता फक्त मासा गळाला लागायची वाट बघत आम्ही गळ टाकुन बसलो होतो.

आम्हाला फार दिवस वाट पहावी लागली नाही, बरोब्बर सहाव्या दिवशी म्हणजे शनीवारी कार्पोल साहेबांनी रोझीच्या प्रोफाईलला व्हिजिट दिली आणि रविवारी दुपारी लाईव्ह वेबकॅमचा अ‍ॅसेस मागण्यासाठी पिंग केले. आता खर्‍या खेळाला सुरुवात झाली होती. कुठलिही शंका कार्पोलला न येउ देता हा खेळ रंगवायला लागणार होता. आपण संरक्षण खात्यातील एका हुषार अधिकार्‍याबरोबर भिडत आहोत हे लक्षात ठेवावे लागणारच होते. पहिल्या दिवशी थोडेफार कॅम बघणे आणि हाय-हॅलो मध्ये उरकले. दोन दिवसांनी कार्पोल साहेब पुन्हा ऑनलाईन अवतिर्ण झाले. ह्या वेळी मात्र गाडी आवडी-निवडी, साथीदार, सेक्स इत्यादीपर्यंत पुढे गेली. थोडेफार फ्लर्टिंग देखील करुन झाले. चारच दिवसात कार्पोल साहेबांनी रोझीकडे तिचे 'तसले' फोटो आहेत का ह्याची विचारणा केली आणि हो-नाही करत रोझीने आपला फोटो मेसेंजर-थ्रु कार्पोलला पाठवला. कार्पोलने अँटिव्हायरसचा ग्रीन सिग्नल मिळताच फोटो डाउनलोड केला आणि... संपला कार्पोलचा खेळ संपला.

हा फोटो म्हणजे खरेतर आम्ही तयार केलेला बग होता जो .jpeg एक्स्टेंशन मध्ये सेव्ह केलेला होता. हा बग तुम्ही फोटो म्हणुन डाउनलोड करुन घेतल्याबरोब्बर तुम्ही मेसेंजरवरुन डिसकनेक्ट होता. पुन्हा जेंव्हा तुम्ही रि लॉग-ईन होता तेंव्हा तुम्ही टाईप केलेला पासवर्ड हळूच आमच्या सर्व्हरच्या paasword.txt मध्ये येउन जमा होतो. याहु वरुन फोटो न आल्याने मग कार्पोलने AOL / MSN सुद्धा ट्राय केले आणि आमची चांदीच झाली. आनंदाचा बहर ओसरताच ग्रॅनीने 'द विच' ला काँटेक्ट केले. ताबडतोब तिथे येण्यासाठी निघत असल्याचे सांगत 'द विच' ने फोन ठेवुन दिला. आमच्या इतक्या दिवसाच्या परिश्रमाला आज यश आले होते. आज ग्रॅनीने स्वतः पुढे होउन सर्वांना फ्रिजमधले बिअरचे टिन वाटले. आम्ही सर्वजण सळसळत्या उत्साहात 'द विच' ची वाट बघु लागलो...

'द विच' आली तिच मुळी पडलेला चेहरा घेउन, तिच्या चेहर्‍यावर प्रचंड टेंशन आहे हे दुरुन देखील जाणवत होते. तीने आल्या आल्याच आम्हाला धक्का दिला. हॅकर्स अंडरग्राउंडच्या मेन ऑफीसमधील ४ संगणक कोणीतरी हॅक करुन आतली सगळी माहिती पळवली होती. मी आणि स्कॉर्पिअननी लंपास केलेले पैसे सुद्धा खात्यातुन दुसरीकडे वळवण्यात आले होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या प्लॅनशी संबंधीत माहिती देखील नष्ट करण्यात आली होती. आता घाई करणे महत्वाचे होते. आम्ही ताबडतोब कर्पोलच्या सर्व इ-मेल खात्यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मात्र आमच्यासाठी जबरदस्त धक्का म्हणजे आमच्याकडे येउन पोचलेल्या पासवर्डपैकी फक्त एक पासवर्ड बरोबर ठरला, पण त्या खात्यात देखील कार्पोलला डेटिंग साईटस वरुन आलेल्या अपडेट इ-मेल्स शिवाय काही हाताला लागले नाही. आम्ही सारेच सुन्न झालो. काय बोलावे हेच सुचेनासे झाले. अहोरात्र केलेल्या कष्टांवर एका क्षणात पाणी पडले होते.

"आपल्यामध्ये कोणीतरी एक बास्टर्ड हॅकर्स पॅरेडाइजसाठी काम करणारा डबल एजंट आहे" ग्रॅनी ताडकन बोलली. मान डोलवण्याशीवाय इतर कोणीच काही करु शकले नाही. सगळेच एकमेकांकडे संशयी डोळ्यांनी बघायला लागले.

"पण ग्रॅनी, हेड ऑफिसमधला देखील कोणी एक फितुर असु शकतो ना? आपले रोजचे अपडेटस आपण लहान मोठ्या माहितीसह तिथे जमा करत होतो !" मी माझी शंका बोलुन दाखवली. ह्यापुढे कुठलीच माहिती सुरक्षीत नाही, फार जपुन पावले टाकावी लागणार आहेत हे आमच्या लक्षात आले.

ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत फ्लॅट मधुन बाहेर न पडणे आणि आपापले सेलफोन्स ऑफिस जमा करणे ह्या सुचनांचे पालन करत आम्ही ऑफिस मधुन बाहेर पडलो. ह्यापुढे कुठलीच माहिती सुरक्षीत नाही हे आमच्या मेंदूत शिरले होतेच मात्र माहिती प्रमाणेच मुखवट्याआडुन बाहेर आलेले हॅकर्स देखील सुरक्षीत नाहीत हे आमच्या लक्षात यायला फार उशीर झाला होता. ऑफिसमधुन बाहेर पडत असतानाच समोरच्या व्हॅनमधुन सुटलेल्या गोळ्यांनी ग्रॅनी आणि बुलडॉगचा वेध घेतला तर माझ्या छातीत आणि हातात चार गोळ्या शिरल्या. स्कॉर्पिअन मागे राहिल्याने तर 'द विच' ऑफिसमध्ये असल्याने ह्यातुन बचावले होते. आता माझा जन्म आणि मृत्युच्या सि-सॉ वरचा खेळ सुरु झाला होता....

(क्रमशः)

Posted by परिकथेतील राजकुमार on September 01, 2010 07:38 AM · permalink

 

पुढे वाचा

Posted by रणजित चितळे on September 01, 2010 07:24 AM · permalink

 

प्रिय राहुल देशपांडे,

(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,

मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू ...

पुढे वाचा

Posted by तात्या अभ्यंकर. on September 01, 2010 07:15 AM · permalink

 

साहित्य-
२५० ग्राम बटर/मार्गारिन
२०० ग्राम साखर
४ अंडी
१५० ग्राम मैदा + १५० ग्राम स्पाइझं स्टेर्क/ आरारुट
३ चमचे बेकिंग पावडर
१ चमचा वॅनिला अर्क
४ चहाचे चमचे कॉफी
२ चहाचे चमचे कोको
२ चमचे रम (ऑप्शनल)
२ मोठे चमचे दूध
गार्निशिंगसाठी २ चमचे किसलेले व्हाइट चॉकलेट
हँडमिक्सी, केकमोल्ड व अवन

कृती-
बटर फेटून घेणे, साखर घालून भरपूर फेटणे. अंडी घालून भरपूर फेटणे. मैदा+ आरारुट+ बेकिंग पावडर घालणे व फेटणे.दूध घालून थोडेसे फेटून मिश्रण एकजीव होईल असे पाहणे.
ह्या मिश्रणाचे १/३ आणि २/३ असे दोन भाग करुन वेगवेगळ्या भांड्यात काढून घेणे.
१/३ भागात वॅनिला अर्क घालणे व ढवळणे . दुसर्‍या भागात म्हणजे २/३ भागात कोको+कॉफी +रम घालणे आणि ढवळणे .
केक मोल्डला बटर लावून घेणे. दोन-तीन चमचे वॅनिला घातलेले केकचे मिश्रण ,दोन-तीन चमचे कोकोवाले मिश्रण असे करत सर्व मिश्रण घालणे.
१८० अंश से ला ३० ते ३५ मिनिटे बेक करणे.केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी त्याच्या पोटात खुपसून पाहणे.
मिश्रण न चिकटता सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.साधारण ५ मिनिटे अवनमध्येच राहू देणे.
नंतर केक मोल्डमधून काढून जाळीवर घालणे. गार झाल्यावर गार्निशिंगसाठी व्हाईट चॉकलेट किसून घालणे.
कॉफीबरोबर आस्वाद घेणे.Smile

Posted by स्वाती दिनेश on September 01, 2010 07:14 AM · permalink

 

प्रिय राहुल देशपांडे,

(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,

मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही. स्वत:च्या बुद्धीने गातोस, कसदार गातोस, जमून गातोस.

तीनेक वर्षांपूर्वी प्रथमच तुझी संपूर्ण मैफल मी ऐकली होती आणि दाद देण्याकरता हा लेखही लिहिला होता.. असो.

अभिषेकीबुवा आणि वसंतराव यांनी अमर केलेलं, मराठी संगीत रंगभूमीला नवसंजिवन देणारं, नवचैतन्य देणारं 'कट्यार..' तू करायला घेतलंस तेव्हा तर मला तुझा अभिमान वाटला होता, आजही वाटतो.. 'कट्यारच्या..' एखाददोन तालमींनाही मी हजर होतो..

पण.......

दोनच दिसांपूर्वी मी सहज म्हणून मी झी मराठी सुरू केला आणि मला दु:खद धक्का बसला. मराठी झी सारेगमप मध्ये तू चक्क परिक्षक?? इतकी कशी काय तुझी अधोगती? आणि ती ही अशी अचानक?

मान्य करतो, तिथे जी मुलं गायला येतात ती आपापल्या परिने गुणी असतात. संगीतात काही एक प्रयत्न करणारी असतात, धडपडणारी असतात. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती असेलच नक्की) की तो केवळ एक संगीताचा बाजार आहे? तिथे परिक्षकांच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे प्रेक्षकांच्या/श्रोत्यांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने झी आणि आयडिया सेलच्या आर्थिक राजकारणाचं असतं..

सन्माननीय परिक्षक या नात्याने आणि न्यायाने तू तुझ्या सांगितिक ज्ञानानुसार, अनुभवानुसार एखाद्या स्पर्धकाची गुणवत्ता तपासणार.. परिक्षक या नात्याने जर तुला तो योग्य वाटला, तुझ्या पसंतीस उतरला तर तू त्याला 'क्ष' गुण देणार.. पण कुणीही चार आंडुपांडू श्रोते/प्रेक्षक दुस-याच एखाद्या स्पर्धकाला एसएमएस पाठवून '४क्ष' गुण देणार..!

मला सांग, यात काय राहिली तुझी किंमत? झी मराठी आणि आयडियाला त्या स्पर्धकांशी किंवा तुझ्या गुणग्राहकतेशी काहीही देणंघेणं नसून त्यांचा मतलब आहे तो त्या चार आंडुपांडूंनी पाठवलेल्या एसएमएसशी...!

राहुल देशपांडे म्हणजे नुसतं एक शोभेचं बाहुलं..?

अरे काय रे हे? केवळ एसएमएसच्या अर्थकारणाकरता जी स्पर्धा चालते किंवा जिचे निकाल मॅनिप्युलेट होऊ शकतात अश्या स्पर्धेचा तू एक परिक्षक?

कुणी म्हणेल - एसएमएस पाठवतो तो जनता जनार्दन..!

मान्य.. अगदी मान्य..! साक्षात नारायणराव बालगंधर्व त्यांचा उल्लेख 'मायबाप' असा करायचे..! पण जनता जनर्दनाचं काम दाद देण्याचं, कौतुक करण्याचं. गांभिर्याने जर एखादी सांगितिक स्पर्धा सुरू असेल तर स्पर्धकांना मार्क देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत, जाणकार परिक्षकांचा..! केवळ एक बटण दाबून एसएमएस पाठवून जनता जनार्दनाला तो अधिकार प्राप्त झाला आहे असं तुला खरोखरच वाटतं का? (तसं वाटत असेल तर या माझ्या पत्राचं काही प्रयोजनच नाही.. मी हे पत्र बिनशर्त मागे घेतो आणि तुझी क्षमा मागतो)

अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती?

तू कसा काय असा झी मराठी आणि आयडियाच्या बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास?

अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चं गाणं कर की.. खूप चांगला गातोस, अजूनही चांगला गाशील. वसंतराव, भीमण्णा, कुमार यांची नावं घेतली की संगीत म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.. कर की जरा चिंतनमनन. अजूनही कर की जरा मिळालेल्या तालमीचा वैचारिक आणि रियाजी रवंथ..!

दोन सूर धडपणे गाता आले नाही तर लगेच कालपरवाच्या पोरांची नसती कौतुकं, फजिल लाडावलेलं निवेदन, स्पर्धकांचे आणि त्यांच्या मायबापसांचे रुसवेफुगवे, सारी जाहिरातबाजी, शोबाजी असलेल्या आणि मुख्य म्हणजे एसएमएसच्या अर्थकारणाने बरबटलेल्या झीमराठी आणि आयडियाच्या वाममार्गाला कसा काय लागलास बाबा तू?!

तू एक उत्तम गवई आहेस, याचं कारण तू एक उत्तम शिष्य आहेस, गाणं टिपणारा आहेस..वसंतराव, कुमारजी, आणि अवलिया मुकुल शिवपुत्रांची परंपरा तुला लाभली आहे. मला सांग - वसंतराव, कुमारांनी केलं असतं का रे असं धेडगुजरी परिक्षकाचं काम? ज्यांना चिंतन-मनन करायला दिवसातले २४ तासही कमी पडत अश्या कुमारांचा वारसा ना तुझा?

मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!

असो..

जे काही वाटलं ते मोकळेपणी लिहिलं.. वरील सर्व मतं माझी व्यक्तिगत मतं आहेत तरीही ती तुला कळवाविशी वाटली.. एक सामान्य श्रोता म्हणून मी नेहमीच तुझा चाहता राहीन. तुझ्या 'मुख तेरो कारो..'च्या यमनकल्याणचा, 'दीप की ज्योत जले..' च्या धनबसंतीचा नेहमीच भुकेला राहीन.!

तुझा,
तात्या.

Posted by विसोबा खेचर on September 01, 2010 07:00 AM · permalink

 

भाग १

एकदा वाचुन झाल्यावर कधीही कुठुनही वाचता येतो, त्यातील कुठलेही पान काढून वाचता येते, त्यावर मनन वा चिंतन करता येते असा ग्रंथ म्हणजे दासबोध. दासबोधातील मराठी खुपच सुलभ आहे. फार कमी ठिकाणी शब्दकोशाचे सहाय्य घ्यावे लागते. रोजच्या जीवनातील घटनांमधे प्रचिती येणारे रोकडे पुस्तक असं म्हटलं तरी चालेल.

ब्रह्मचारी माणसाने प्रापंचिक माणसाला केलेला उपदेश असला तरी समर्थांच्या तळागाळातील लोकांना असलेल्या समस्यांचे भान थक्क करुन सोडते.

पहिल्याच दशकातील पहिला समास. ग्रंथारंभलक्षण. ग्रंथात काय काय माहिती दिलेली आहे याचे निरुपण करतांना पुर्ण ग्रंथ न वाचताच, त्यातले विचार समजुन न घेताच, अनाठायी त्याज्य कालबाह्य असे प्रतिपादन करुन दुषणे देणा-या आक्षेपकांबद्दल समर्थ म्हणतात....

पूर्णग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण |
तो दुरात्मा दुराभिमान| मत्सरें करी ||२२||
अभिमानें उठे मत्सर| मत्सरें ये तिरस्कार |
पुढें क्रोधाचा विकार| प्रबळे बळें ||२३||
ऐसा अंतरी नासला| कामक्रोधें खवळला |
अहंभावे पालटला| प्रत्यक्ष दिसे ||२४||
कामक्रोधें लिथाडिला| तो कैसा म्हणावा भला |
अमृत सेवितांच पावला| मृत्य राहो ||२५||
आतां असो हें बोलणें| अधिकारासारिखें घेणें |
परंतु अभिमान त्यागणें| हें उत्तमोत्तम ||२६||

अर्थ सरळ आणि सोपा आहे.

दासबोधातील अजुन काही समास असेच पुढे कधीतरी काही बाही कारणाने...

दासबोध लिंक - http://www.dasbodha.org/main.htm

Posted by अवलिया on September 01, 2010 06:04 AM · permalink

 

मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं
हा आपलातुपला गंमतनाच!

नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.

खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?

जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.

'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून

आता मी नाही लिहायचं
तुम्ही लिही ना म्हणायचं
माझी मान वर
तुम्ही परत लिही ना म्हणायचं
आता माझी कॉलरच ताठ!!

स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!!

-इतिश्री निर्जाबाई उवाच!!

Posted by नीधप on September 01, 2010 05:27 AM · permalink

 

कटरा येथील माता वैष्णोदेवी
महाराष्ट्रात जे महत्व साडेतीन शक्तीपीठांना आहे, तेच महत्व जम्मू-काश्मीरमधील कटरा जिल्ह्यात असलेल्या माता वैष्णोदेवीचे आहे. संपूर्ण भारतात असलेल्या निवडक देवी शक्तीपीठांमध्ये वैष्णोदेवीचा समावेश होतो. दरवर्षी लाखो भक्त ‘जय माता दी’ असा जयजयकार करत मोठय़ा श्रद्धेने वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असतात. वैष्णोदेवीच्या दर्शनाचा मुख्य उद्देश ...

पुढे वाचा

Posted by शेखर जोशी on September 01, 2010 05:25 AM · permalink

 

आज मी स्वप्नात आहे बहुतेक. खरंच स्वप्न की सत्य आहे हेच कळत नाही आहे. काय सकाळ आहे. जाम जबरदस्त. आज सकाळी सकाळी तिने ‘हाय’ केले. काय बोलू यार मी. काहीच सुचत नाही आहे. तीने स्वतःहून ‘हाय’. यार स्वप्नंच तर नाही ना. आणि हे तर काहीच नाही माझ्याशी येऊन गप्पा देखील मारल्या. किती छान आहे ती. सगळ स्वप्नंच वाटत आहे. अस कधी होईल, अशी इच्छा होत होती. सकाळी येतांना तो पडणारा पाऊस, ते थेंब. ते कंपनीच्या ...

पुढे वाचा

Posted by हेमंत आठल्ये on September 01, 2010 04:40 AM · permalink

 

मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रोग्रॅमर म्हणून काम करतो. तेथे माझ्या स्वतःच्याच बाबतीत घडलेली एक छोटीशी घटना. सुमारे २ वर्षांपूर्वी मी या कंपनीत पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून रुजू झालो. २००९ सालच्या जानेवारी महिन्यात कंपनीला एक अजस्त्र बजेट असलेले अमेरिकन प्रोजेक्ट मिळाले आणि एप्रिल २००९ मध्ये रीतसर इंटरव्ह्यू घेउन आधीच्या प्रोजेक्टवरुन या प्रोजेक्टवर मला रुजू करण्यात आले. या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य हे की एखाद्या माणसाच्या क्षमतेबद्दल जराशीसुद्धा शंका आली तरी त्या माणसाला ताबडतोब कामावरुन कमी करण्यात येत असे. त्यामुळे प्रोजेक्ट जरी खूप चांगले असले तरी ती सुळावरची पोळीच होती. ५० माणसांच्या प्रोजेक्ट्मधून जवळपास १५-२० माणसांना २ महिन्यांत अशा प्रकारे कमी करण्यात आले. रेसेशन संपायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबर ०९ पासून लोकांनी धडाधडा राजीनामे द्यायला सुरुवात केली. आणि मॅनेजमेंट्ची मस्ती उतरायला सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यापर्यंत लोकांची गयावया करण्यापर्यंत मजल गेली आणि जे सोडून गेले त्या जागी जे मिळतील ते लोक भरण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी हात सोडून बोलणी करणारे आता हात जोडून बोलणी करु लागले. मे २०१० मध्ये मला इन्क्रिमेंट लेटर देण्यात आले. इन्क्रिमेंट जूनपासून लागू होईल आणि विथ एफेक्ट फ्रॉम एप्रिल असेल असे लेटर मध्ये लिहिले होते. शिवाय हे इन्क्रिमेंट कोन्फिडेन्शियल असून कुठेही डिस्क्लोज करु नये असे सांगितले गेले. हे लपवाछपवीचे धंदे पाहून हे लोक विश्वासार्ह नाहीत अशी शंका त्याच वेळी माझ्या मनात डोकावून गेली होती. पण २८% इन्क्रिमेंटची नशा वास्तविकतेच्या जाणीवेपेक्षा जास्त प्रबळ असावी. २००९ मध्ये ४०% आणि २०१० मध्ये २८%. लॉटरी लागली आहे असंच मला वाटत होतं. जॉब चेंज करण्याचा विचार डोक्यात रेंगाळत होता तो सोडूनच दिला. जून गेला, जुलै गेला पण इन्क्रिमेंटचा पत्ता नाही. मॅनेजरला मेल टाकला तर स्पीड (या कंपनीत इन्क्रिमेंट साठी जी प्रोसेस आहे त्यास 'स्पीड' असे म्हणतात.) चालू आहे असे सांगण्यात आले.ऑगस्ट महिन्यात वैतागून मी समोरासमोर बसून काय ते रोखठोक विचारु असे ठरवले होते. पण त्याआधीच मॅनेजरने मला बोलावून घेतले. आणि गोड गोड शब्दांमध्ये तुला ४ आउट ऑफ ५ रेटिंग देण्यात येत आहे. तुझी या कंपनीला जरुरी आहे. कोणताही नविन निर्णय घेण्याआधी आमच्याशी बोलून घे. धिस इज अ‍ॅन ओपन वर्ल्ड वगैरे चर्पटपंजरी ऐकवली. त्यानंतर आमच्या कडून प्रोसेस संपायला उशिर झाला याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मीसुद्धा सलग दोन वर्षं चांगल्यापैकी रेटिंग मिळाल्याने थोडासा हवेतच होतो. शेवटी या महिन्याच्या सॅलरी मध्ये इन्क्रिमेंट रिफ्लेक्ट झाले ते १३% च्या कॅलक्युलेशने. लेखी कमिटमेंट देताना २८% आणि प्रत्यक्ष देताना १३%. तेसुद्धा इतक्या उशिरा. आणि तेदेखील विथ इफेक्ट फ्रॉम अप्रिल नाही तर गेल्या महिन्यापासून. वा! मी तर सर्दच झालो. कारण नसताना त्या लेटर वर अवलंबून राहिलो. लेखी कमिटमेंट आहे म्हणून अगदी निर्धास्तपणे विश्वास ठेवला. आता मॅनेजरला आणि एचआर ला एक खरमरीत इ-मेल पाठवणार आहे. पण त्याने काही फारसा फरक पडेल असं वाटत नाही. पण याहून अधिक काही करुही शकत नाही. आणि मर्यादेच्या बाहेर जाउन या लोकांशी पंगाही घेउ शकत नाही. आणि समजा या लेटरने फरक पडला तरी माझा काही या मॅनेजमेंटवर विश्वास राहिलेला नाही. असो. तुम्हाला असा अनुभव आला आहे का ?
- (नविन जॉबच्या शोधात) अप्पा

Posted by अप्पाजोगळेकर on September 01, 2010 04:12 AM · permalink

 

खान ऍकॅडमी, सलमान खान वगैरे नावे ऐकून पहिल्यांदा मला वाटले ही आपल्या सल्लूने काढलेली नविन टूम आहे की काय.

read more

Posted by कोलबेर on August 31, 2010 10:46 PM · permalink

 

मराठी पुस्तके खपतात (विक्री) नाही असे नाही.
पण हॅरी पॉटर सारखी इंग्रजीतील अनेक पुस्तके महाराष्ट्रात आणी देशात प्रचंड खपतात आणि "बेस्ट सेलर' ठरतात.
साहित्य संमेलनातून होणारी अनेक विषयावरील अनेक पुस्तकांची विक्री तर डोळे दिपवणारी असते.
मोठ्या संख्येने अनेक पुस्तके विकली जाणे वेगळे व एखादे पुस्तक रेकॉर्डब्रेक खपणे वेगळे.

मराठीत तर हजारो पुस्तके खपली तरी डोक्‍यावरून पाणी गेले अशी परिस्थिती असते. त्यामुळे नेहमी प्रश्‍न असा पडतो की,
मराठी भाषिकांच्या सुशिक्षित महाराष्ट्रात एखाद्या मराठी पुस्तकांचा विक्रमी खप का होत नाही? ती "बेस्ट सेलर' का ठरत नाहीत?
तुमचे यावर काय मत आहे ?

Posted by शेलार मामा मालुसरे on August 31, 2010 10:19 AM · permalink

 

चांगलं लेखन म्हणजे काय?

हा अत्यंत गहन प्रश्न आहे. चांगल्या लेखनाची व्याख्या करताना भल्याभल्यांची दमछाक होते. कारण काहीही व्याख्या केली, तरी उत्कृष्ट लेखन ती व्याख्या छेदून दशांगुळे वर उरतंच. मग ते सामावून घेण्यासाठी पुन्हा व्याख्या बदलायची आणि पुन्हा पुढची दहा अंगुळं पसरणारं काहीतरी सापडलं की ये रे माझ्या मागल्या सुरू होतं. पण कधी कधी चांगलं लेखन म्हणजे काय, याचं उत्तर अश्लील म्हणजे काय याला एकाने दिलेल्या उत्तराप्रमाणे होतं "चांगलं लेखन म्हणजे काय हे मला सांगता येणार नाही, but I will know it when I see it". आपल्यापैकी बहुतेकांना हा आतला आवाज असतो - जो चांगल्या लेखनाला दाद देतो. मग भले त्याचं विश्लेषण करून सांगता का येईना. पुरणपोळी तोंडात ठेवल्यावर विरघळली म्हणजे ती मस्त जमली - ती कशी करायची, ती कशामुळे विरघळते हे प्रत्येकाला सांगता येईलच असं नाही.

मला विशेष आवडणाऱ्या लेखनाची वैशिष्ट्य अशी - सरळसाधं, अनुभूतीतून आलेलं, मनाला भिडणारं, वाचकाला नव्या विश्वात अलगदपणे घेऊन जाणारं.... मला माहीत आहे, ही उत्तरं नाहीत. कारण यात पुन्हा मनाला भिडणारं म्हणजे काय असा प्रश्न विचारता येईल. त्याचं उत्तर द्यायचं मी अर्थातच टाळलेलं आहे. मला कविता आवडतात, त्याही अवडंबर न माजवणाऱ्या, सहजसुंदर, ओघवत्या. विनोदी लिखाण आवडतं - तेसुद्धा ओढाताण न करता सहजी फुललेल्या विनोदांचं. कधीकधी अतिशय क्लिष्ट, तांत्रिक, सुरचित लेखनही आवडतं. प्रचंड सोफिस्टिकेटेड विनोदही आवडतात. मला काय आवडतं हे लिहायला लागल्यावर माझ्याच लक्षात यायला लागलंय की चांगलं म्हणजे काय हे जाऊचदेत, मला चांगलं काय वाटतं याचं वर्णन करणंही अवघड आहे.

त्यामुळेच या लेखात मांडलेल्या 'चांगलं लेखन म्हणजे काय?' या प्रश्नाच्या रटाळ, तांत्रिक उत्तरापेक्षा वाचकांनी मिपावरची उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं द्यावीत असं मी आवाहन करतो आहे. यामागे अनेक उद्देश आहेत. एक म्हणजे गेले काही आठवडे मिपावर जे लेखन येतं आहे त्यात दुर्दैवाने फुटकळ कौल, चारोळींचे काथ्याकूट, भंपक व भडक लेखन यांची उदाहरणं मला नेहेमीपेक्षा जास्त दिसली आहेत. त्यात गेल्या काही महिन्यात मिपाची सदस्य संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. इतक्या मोठ्या (नवीन) वाचकवर्गाला मिपावर केवळ फालतू लेखन व टाईमपास होतो अशी कल्पना होणं व्यक्तिश: मला पसंत नाही. मिपावर मी अनेक चांगले लेख, कविता, चर्चा, विडंबनं वाचलेली आहेत. गेल्या काही दिवसांतलं लेखन हे नियम नसून अपवाद आहे हे दाखवण्यासाठी आधीचं चांगलं लेखन नवीन वाचकांना बघायला मिळालं तर बरं होईल असं मला वाटतं. दुसरा उद्देश असा की मी नवीन व जुना यांच्या कुठे तरी मध्ये आहे. त्यामुळे मी सदस्य व्हायच्या आधी मिपावर झालेल्या उत्तमोत्तम लेखनापैकी बरंच मीदेखील वाचलेलं नाही. जर जुन्या व जाणत्या सदस्यांनी आपल्या वाचनखुणा उघडून त्यातलं आवडतं लेखन सादर केलं तर मलाही अनेक चांगलं लिखाण वाचायला मिळेल. तिसरा हेतू असा की या चर्चेला मिळालेल्या प्रतिसादांतून मिपावरच्या उत्तम लेखनाची एक लायब्ररी तयार व्हावी. मग जेव्हा केव्हा त्याज्य लेखन दिसेल तेव्हा हा धागा उघडून त्यातल्या आपल्या आवडत्या लेखनाला प्रतिसाद देऊन चांगले धागे वर काढून गाळ तळात बसवण्याची क्षमता सदस्यांमध्येच येईल.

मी अशी विनंती करतो की प्रतिसाद देताना प्रथम आपल्याला आवडलेल्या लेखनाचे, कवितांचे, चर्चांचे (तीन ते चार) दुवे द्यावेत. जर कोणी एखाद्या लिखाणाचा दुवा दिला असेल तर तो परत देऊ नये - जितके अधिक दुवे मिळतील तितकं चांगलं. शक्यतो कविता, विडंबनं, लेख, कथा, चर्चा, पाककृती, कलादालन अशा वेगवेगळ्या विभागांमधला एक एक दुवा द्यावा. (दुवा ठळक व अधोरेखित करावा) मग त्याखाली अगदी मोजक्या वाक्यांत ते का आवडलं हे नोंदवावं.

सुरूवात मी करतो

कथा : शिंपिणीचे घरटे - रामदास
कविता : समर्थ - क्रान्ति
लेख/चर्चा : कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे - धनंजय

शिंपिणीचे घरटे या कथेत शिंपीण पक्षी धागा धागा जुळवून घरटं उभं करते त्याप्रमाणे जिद्दीने घर आपल्या पायांवर - शिवणयंत्राची पायपट्टी चालवत अक्षरश: - उभं करणाऱ्या आईची कहाणी आहे. ती पूर्ण वाचल्याशिवाय तिची धार जाणवत नाही.
समर्थ कवितेत अतिशय सहजपणे कवयित्रीने आपल्या कवितेचं मागणं, गाऱ्हाणं सांगितलं आहे. अशा फार थोड्या कवितांपैकी आहे की ज्या पहिल्या वाचनातच पाठ होतात, ओठावर रेंगाळतात.
कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे हा लेख म्हणून आलेला आहे. पण तो आत्मानुभव आहे. खूप खोलवर काही साठलेलं एकदम मोकळं केल्याचा प्रत्यय येतो. तो लेख असला तरी त्यावरची चर्चासुद्धा वाचण्याजोगी आहे.

Posted by राजेश घासकडवी on August 31, 2010 09:47 AM · permalink

 

घरातला कर्ता पुरूष जर अपयशी ठरला, त्याची नोकरी गेली, तो हताश झाला, त्याचा आत्मविश्वास ढळला तर सार्‍या घरासच अवकळा प्राप्त होते. इतर सदस्य मग आपापल्या परीने अर्थार्जन करून समस्येचे निराकरण ...

पुढे वाचा

Posted by नरेंद्र गोळे on August 31, 2010 09:43 AM · permalink

 

प्रशांतनं पाऊस-कवितांच्या खेळाची सुरुवात केली, आणि मला खो देऊन कल्पनाशक्तीला मस्त वाव दिला. या खेळाचे त्यानं सांगितलेले नियम वर दिले आहेत. आता मी माझी साखळी जोडते आणि पुढचा डाव प्राजु, राघव, जयवी आणि गोळे काका यांच्या हाती सोपवते.

पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -
१. ...

पुढे वाचा

Posted by क्रान्ति on August 31, 2010 09:05 AM · permalink

 

पुन्हा तेच. कस बोलू? यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का?’ तर ‘नाही’ बोलला. तीन वाजता पुन्हा जाग आली. त्यावेळी मग मी मित्राला फोन केला. तर माझ्याशी ते ...

पुढे वाचा

Posted by हेमंत आठल्ये on August 31, 2010 07:16 AM · permalink

 

 दि. ३० सप्टेंबर २०५०
 
काल (२९ सप्टेंबर २०५०) एनार्चीसचा मृत्यू झाला.   त्याच्या फेसबुकवर ही बातमी त्याची फेस-वाईफ  एनानघा हिने रिलीज केली आणि त्याच्या तीन लाख फेसमित्रांमध्ये शोकाची लहर पसरली.  फेसबुकच्या “डेथ-वेव्ह व्हर्शन २” एप्लीकेशनमध्ये एका दिवसात  सत्तर टक्के फेसमित्रांनी एनार्चीसच्या मृत्यूची सॅडनेस लेव्हल ५ किंवा अबॉव्ह दिली.
 
आधी या बातमीवर ...

पुढे वाचा

Posted by ngadre on August 31, 2010 07:04 AM · permalink

 

खरतर ही मिशन गेल्या रविवारी पुर्ण केली.नेहमीच्याच कं मुळे राहुन गेली.(हयावेळी माझ्या एकटयाचाच कं नाही तर मला अजुनही ट्रेकची छायाचित्र न पाठवणारया माझ्या ट्रेकमित्रांचा कं ही तेवढाच ...

पुढे वाचा

Posted by देवेंद्र चुरी on August 31, 2010 07:02 AM · permalink

 

“( अ ) द्वितिय ” प्रेम

प्रीतीत संगत तुझी,
मज कधी ना लाभली,
साथ संगत नव्हती कुणाची,
पण वेदनांनी मज दिली.

खेद नाही, राग नाही,
प्रेम तव जरी ला लाभले,
वेदनांशी “इश्क” माझे,
प्रेमांत तुझिया जाहले.

निरंजन वहाळेकर

Posted by निरन्जन वहालेकर on August 31, 2010 06:57 AM · permalink

 

सप्टेंबर २०१० मध्ये मराठी संकेतस्थळांवर खालील गोष्टींची चर्चा घडून येईल असे मला वाटते.

१. बाबरी मस्जिद
२. ब्लॅकबेरी आणि भारत सरकार.
३. राष्ट्रकूल स्पर्धा
४. पाक क्रिकेटपटू आणी बेटिंग
५. गणेशोत्सव

read more

Posted by राजकुमार on August 31, 2010 06:50 AM · permalink

 

वेळ : ३ तास
विषय : सगळे
गुण : १००

सूचना :

१. उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूस लिहावे.
२. प्रश्नाचे गुण समोर कंसात दिले आहेत.
३. उगाच शंभरपेक्षा जास्त गुणांचा पेपर लिहायचा प्रयत्न करू नये. असला आगाऊपणा तपासणं ही जबाबदारी मंडळाची नाही.
४. उत्तरपत्रिका लिहिलाना एकाच रंगाच्या शाईचा वापर करावा. ही परीक्षा आहे, रंगपंचमी नाही.
५. कॉपी करताना पकडले ...

पुढे वाचा

Posted by नॅकोबा on August 31, 2010 06:41 AM · permalink

 

आज खुप सुंदर मेल आला होता.
त्यात व.पु. चे काही निवडक व्याक्य होती.
मनापासुन आवडली व सगळ्यांना सांगाविसी वाटली……

किती सुंदर आहे…खरच…समोरच्या व्यक्तीनं तुमच्यासारखं ...

पुढे वाचा

Posted by Asmita Pawar Mendhe on August 31, 2010 06:39 AM · permalink

 

Read this recipes in English
सर्व्हिंग: २५ ते ३० पुर्‍या

साहित्य:
२ कप गव्हाचं पीठ
१ टेबलस्पून तेल (मोहन)
२ टीस्पून तीळ
१ टीस्पून ओवा
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे (अंदाजे १ १/२ टीस्पून )
पीठ मळायला पाणी
तळण्यासाठी तेल

कृती:१. एका मोठ्या थाळीत गव्हाचं पीठ घ्या.त्यात सगळे मसाले,मीठ आणि ...

पुढे वाचा

Posted by Kalyani on August 31, 2010 06:36 AM · permalink

 

जो मै को भुलादे वो मै क्या है
जो दिल को ना जला दे वो मै क्या है
जो हलक से उतर गयी एक बार
पूछोगे ए यार तुम के तू क्या है
पैमाने से मै को पीनेवाले हजार हुए
मै से महफील सजानेवाले हजार हुए
जो मीना के आँखों से पीकर नहीं होते बेहोश
तो उसने नहीं जाना की ये मै क्या है
जब मै साथ हो तो वक्त बेवक्त नहीं होता
रात का नहीं होता ...

पुढे वाचा

Posted by जेडी kaleidoscope on August 31, 2010 06:27 AM · permalink

 

एक खोली. मध्यम आकाराची. फार मोठी नाही, पण आठ टेबलं, अन् अर्थातच आठ खुर्च्या ठीकठाक राहतील अशी. इन्टीरिअर कॉर्पोरेट सेट अप मधे शोभण्याजोगं. अंतराअंतरावर पुढे आलेले खांब, त्यावर लॅम्प शेड्स. भिंतीवर आडव्या पट्ट्या. पूर्ण खोलीचा रंग करडा. छतावर स्प्रिन्कलर्स, खोलीच्या मध्यभागी जमिनीवरून जाणारा एक ड्रेन. खोलीतल्या आठ टेबलांवर कॅन्डीडेट १ ते ८ यांच्यासाठी ...

पुढे वाचा

Posted by सिनेमा पॅरेडेसो on August 31, 2010 05:51 AM · permalink

 
प्रत्येक वेळी इंटरनेट वर लॉगीन झाले की १
0% (0 votes)
प्रत्येक वेळी इंटरनेट वर लॉगीन झाले की ३
0% (0 votes)
प्रत्येक वेळी इंटरनेट वर लॉगीन झाले की ५
0% (0 votes)
जो पर्यंत संपादक कौल उडवत नाहीत तो पर्यंत कितीही
100% (3 votes)
Total votes: 3

Posted by येडबंबू on August 31, 2010 03:31 AM · permalink

 

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७
धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ८

काल सुट्टी होती. स्थानीक साथीदारांच्या मदतीनं भोजनशोध मोहिमेवर बाहेर पडलो. थोडी जुजबी माहिती जमा झाल्यावर टेंपल स्ट्रीट या रस्त्यावर येउन पोचलो. इथं पोहोचेपर्यंत काही ह्या नावातली खोच लक्षात आली नाही. शहराचं नाव दारेसलाम. बहुतांश लोकवस्ती मुस्लीम, उरलेली ख्रिश्चन अशा शहरात अगदी मध्यावर, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हा टेंपल स्ट्रीट आहे. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत सुंदर हिंदु देवदेवतांची मंदिरे. अगदी सुंदर प्रशस्त देवळं. कृष्ण, राम, शंकर, कालिमाता, हनुमान अगदी सगळ्या देवांनी अगदी ऐसपैस बस्तान बसवलंय. एकेक मंदेर म्हणजे एखाद्या तिर्थक्षेत्री असतं तेवढं सुबक नी प्रशस्त. प्रत्येक देवळात एक मोठा हॉल, प्रवचनासाठी. कृष्णाच्या देवळात चाललेलं एक गुजराती भाषेतलं लडिवाळ प्रवचनही ऐकल अर्धातास बसुन. कुठे पिंपळाचा मोठा पार, चिवचिवणार्‍या चिमण्या तर कुठे पांढर्‍या धाग्यांनी गुंडाळुन अदृष्य केलेला वडाचा बुंधा.

त्या रस्त्यावरुन जाणार्‍या तीनपैकी एक चेहेरा भारतीय. भारतीय लोक इथं इतकं वजन राखुन असतील याची कलपनाच नव्हती. देवळात बसल्यावर वाटुच नये आपण आपल्या देशापासुन हजारो मैल दूर येउन बसलोय. बजुलाच एक चक्क शुद्ध शाकाहारी हॉटेल आणि शेजारी अर्थातच एक मिठाइचं ऐसपैस दुकान. काचेच्या काउंटरमागे ढोकळा, फरसाण, फापडा,रसगुल्ला, जिलबी, गुलाबजाम वगैरे थाट आणि काउंटरला त्या दुग्धजन्य मिठाइचाच एक अविभाज्य भाग वाटणारा एक गोड गुज्जुभाय.

आजचं जेवण तर जोरकस झालं.. मस्त गरमगरम फुलके, बटाट्याची भाजी, वालाची उसळ, रसगुल्ला, दाल, भजी हे सगळं पचवायला दोन मोठे ग्लास मसाला ताक. आणि नंतर मुखशुद्धी म्हणुन चवीपुरता उगाच दोन-तीन प्लेट ढोकळा.. आहाहा क्या केहेने..

गुज्जु समाजाचं वर्चस्व इथे खुपच आहे, त्या बाजारपेठेतल्या काही प्रकारच्या व्यापाराचे अनभिषीक्त सम्राटच जणु. त्या रस्त्यावर इलेक्ट्रॉनीक वस्तंपासुन कापड दुकानापर्यंत सगळी दुकानं होती सगळ्याचे मालक गुज्जु. (मला बँकॉकच्या नाना स्ट्रीट ची आठवण झाली, त्या रस्त्यावर दुतर्फा शेकडो दुकानं टेलरची आणि सगळ्याचे मालक सरदारजी.) ह्या सगळ्या दुकानात कामगार स्थानीक आहेत आणि आमचे गुज्जुभाय आपल्या अस्खलीत स्वाहीली भाषेतुन सगळा कारभार चालवतात.

भाषा ऐकायला मस्त वाटते. अगदी आपल्या बंगालीसारखी मधुर नसली तरी प्रत्येक शब्दाचा शेवट स्वरानं होत असल्यामुळे प्र्त्येक शब्द हेल काढुनच उच्चारावा लागतो. ह्या स्वाहीली भाशेत व्यंजनानं शेवट होणारा शब्द ऐकु आला तर तो इंग्रजी किंवा इतर कुठल्यातरी परक्या भाषेतला आहे असं बेलाशक समजा. इतके दिवस ती भाषा कानावर पडुन सुधा माझं स्वाहीली भाषेचं ज्ञान काही मोजक्या शब्दांपलिकडे गेलं नाही म्हणा.

दुका म्हणजे दुकान. दवा म्हणजे औषध्. असांते म्हणजे धन्यवाद. खरीबू म्हणजे स्वागत. सींबा म्हणजे सींह, थिंबा म्हणजे हत्ती. साफ म्हणजे स्वच्छ. माझी म्हणजे पाणी. माझिवा म्हणजे दुध. 'चाय माझिवा' मागवायचा नाहितर काळा काढा प्यावा लागतो. मी आमच्या कॅटीनमधे एकदा त्या पोरीला कॉफी मागितली. माझ्याकडे बघुन ती हसतंच सुटली. मी बावरलो. माझी यथेच्छ कीव करुन आणि हसून झाल्यावर तिनं सांगितलं की कहाव्हॉ म्हणजे कॉफी.. आणि काफी म्हणजे कानफाटात.. मी चक्क तीला एक कानफाटात मागितली होती.. माझं स्वाहीलीचं ज्ञान एवढ्यावरच आटोपतं.

इथं एके ठिकाणी स्थानीक नृत्य बघायला मिळालं जास्त वर्णन करत बसत नाही पण पन्नास एक स्त्रीपुरुष हातात हात घालुन रिंगण करून पाय आपटंत आपापला पार्श्वभाग एका ठेक्यात हादरवण्याची ती कसरत करताना पाहिले की काहीतरी वेगळीच शंका येते ब्वॉ. साधरणतः आपल्याकडे अडीअडचणीच्या वेळी शौचालय रिकामे नसल्यास पोट आत घेउन स्वतःचं वजन उजव्या डाव्या टाचेवर करत पाच मिनीटाचा 'ग्रेस टाइम' मिळवण्यासाठी जे पदलालित्य केलं जातं त्याच्या बराचसा जवळपास जाणारा हा नाचाचा प्रकार आहे.

हाच नृत्यप्रकार सगळ्या स्थानीक कार्यक्रामांतुन केला जातो. अगदी आबालवृद्ध आनंदाने तो नाच करतात. बाकी तो नाच कसाही असुदेत पण असा सगळा समुदाय हसत गात हातात हात घालुन त्या तालावर धुंद होउन नाचताना पाहिला की त्या उत्स्फुर्त प्रसन्नतेची लागण आपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही.

हेच नृत्य निवडणुकीच्या प्रचारातही केलं जात असावं बहुतेक. आत्ताच्या सत्ताधारी राष्ट्राध्यक्षाचा गर्द हिरवा फोटो घेउन एक माणुस असाच नाचताना एका चौकात बघितल्याचं आठवतंय. जिकडेतिकडे त्याचे त्या एकाच हिरव्यागर्द शर्टातले फोटो बघुन हा हिरवा पोपट रस्तोरस्ती अजुन किती दिवस बघणं यांच्या नशिबी आहे असा एक विचार उगाचंच मनात येउन गेला. हा राष्ट्राध्यक्ष गेली दहा वर्षे सत्तेवर आहे. त्याचे हिरव्याकंच रंगाचे फोटो मोठमोठ्या बॅनर वर लावलेले दिसतात. संसदेत सगळे आपापल्या पक्षाच्या रंगाचा शर्ट घालुन येतात. आपले सगळे थोर्थोर नेते असे रंगीबेरंगी शर्ट घालुन लोकसभेत दंगा करतानाचं चित्र मनःचक्षुंपुढे उभं राहिलं आणि हसायलाच आलं एकदम.

देशाच्या बाकी परीस्थितीविषयी बोलायचं तर गरिबी भरपूर. देशात कुठंही नविन गाडी विकत मिळंत नाही, सगळ्या जपानी गाड्या सेकंडहँड आयात होतात इथे. सार्वजनीक वाहतुकीसाठी रिक्षांचा वापर सर्रास होतो, आपल्या बजाजच्या रिक्षांचा. वेगवेगळे रोग आहेत, महागाई आहे. गेला महिनाभर ह्या युनिवर्सीटीमधे एड्सविरोधी जनजागरण मोहीम चालू होती. गुन्हेगारी आहे. बेकारी आहे. पाण्याचा प्रश्न आहे. शहरीकरणाचा प्रश्न आहे. रस्ते रोज तीनचार तास तरी ट्रॅफीक जॅम मुळे बंद असतात. पण तरी लोक मजेत आहेत. हसताना दिसतात. मोठं मजेशीर समाजमन आहे हे. इथल्या कुठल्याही समस्येविषयी तुम्ही लोकांशी बोलायला गेलात तर इकंदरीत प्रतिक्रिया ऐकुन तुमच्या लक्षात येइल की आपण आफ्रिकन स्थितप्रज्ञ संतांच्या मेळाव्यात येउन पोहोचलेलो आहोत.

चला इथले दिवस संपत आलेत, गेले २५-३० दिवस इथलं जग पहात होतो. नविन माणसांना भेटत होतो. पण खरंच हे जग वेगळ होतं का?..का मला ते भासलं वेगळं?.. नविन ठिकाणे नक्की काय बदलतं तेच कळत नाहिये... केवळ जागा बदलते म्हणजे मी बदलतो का? राग, आनंद दु:ख घरी असताना जितक्या वेळेला वाटतं तितक्याच वेळेला इथंही वाटलं