गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. मंटोंबद्दल मराठी साहित्यिक राजन खान यांची लोकसत्ताने छापलेली ही मुलाखत वाचली, माझ्या जुन्या पेपरमध्ये आमचे 'न्यूजरूम इंचार्ज' असलेल्या, अजित वडनेरकर या भोपाली बाबूंचा मूळ हिंदीत लिहिलेला, पण अनुवादकाच्या शब्दकृपेकरुन अंमळ असह्य मराठीत अनुवादित केलेला हा लेख वाचला - असं बरंच काही वाचलं (अर्थात ऑफिसची बॅण्डविड्थ जाळून
).
आणि सप्ताहांत होता जुन्या इंदूरमध्ये फिरत असताना एका जुन्यापुराण्या पुस्तकांच्या दुकानात मंटोंच्या आठ कथा असलेल्या 'गर्भ बीज' या संग्रहावर अचानक नजर पडली तेव्हा वाटलं - हे खरोखर मस्त झालं ! मकबूल फिदा हुसेन यांनी बोधचिन्ह काढून दिलेल्या 'वाणी प्रकाशन' ने काढलेला हा संग्रह मस्त आहे. म्हणजे वाणी प्रकाशनचा लोगो मकबूल फिदा हुसेन यांनी काढलाय हे मला माहित नव्हतंच. पुस्तकाच्या लोगोखाली एक विशेष ओळ आहे : वाणी प्रकाशन का लोगो विख्यात चित्रकार मकबूल फिदा हुसेन की कूची से - म्हटलं बरंय च्यायला - लोगो मकबूल फिदा हुसेनने काढून दिला नसता आणि दुसर्याच अविख्यात चित्रकाराने काढला असता तर या लोकांनी त्याचं नाव लोगोखाली टाकलं असतं का? हा एक जोकच झाला. असो.
उर्दू-हिंदी शब्द देवनागरी लिपित कोणा जनाब मुशर्रफ आलम जौकींनी लिहिलेली प्रस्तावना वाचली तेव्हा वाटलं आज चार पाच १२०/३०० पाने आणावी लागणार - मंटो या लेखकाचं एवढं खानदानी, रसरशीत उर्दू नुसते आवंढे गिळत वाचत पडण्यात काय मजा? पुरेशी रसनिष्पत्ती झाली तेव्हा वाचायला जी सुरुवात केली ती संग्रहातली आठवी कथा संपली तेव्हाच पुस्तक खाली ठेवलं - आणि आज आत्ता हा निवांत पुस्तक परिचयः
![]() |
है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे
कहते है की गालिब का है अंदाजे-बयां और
गालिब का अंदाजे - बयां और था, सब जानते है. लेकीन सच पूछें, तो यही बात मंटो पर भी लागू होती है. दुनिया में सुखनवरों की कमी नहीं है. एक से बढकर एक. लेकीन मंटो का अंदाजे-बयां शायद सब से अलग. मंटो इंसानी कमजोरियों से वाकिफ है. छोटी-सी उम्र में मर जाने बावजूद जो दुनिया मंटो ने अपने मुशाहिदे से देखी थी, वो शायद कम लोगों ने देखी थी. इंसानी मनोविज्ञान की जो पकड मंटो में थी, शायद अभी भी ये पकड बडे-बडे कथाकारों में नजर नहीं आयेगी. जैसे मंटो की 'पटाने' या 'फंसाने' के बारे में आम राय - 'निनावे प्रतिशत लडकियां मर्दानी-शराफत से नहीं काबू में आतीं. उन्हें बेढब बाते ज्यादा पसंद है.' या फिर 'काली औरतों के मुकाबले आप गोरी सुंदर महिलाओं को ज्यादा आसानी से 'फांस' सकते है.'
लेकीन प्रत्येक कहानी के साथ एक चीज 'कॉमन' है. मंटो शरीफ आदमी था. इसलिये जब भी, कहीं भी मंटो अपना चरित्र रचने की कोशिश करता है, हम एक बेहद शरीफ आदमी से रु-ब-रु होते हैं. क्या यह मंटो की कमी थी? जहां उसके चरित्र एक से बढकर एक आवार्गियां, शरारतें, बदमाशियां या 'हरामीपन' करते है, वहां मंटो का अपने चरित्र के बारे में यह शरीफाना रवैया कुछ ज्यादा 'हजम' नहीं होता. किसी तवायफ को वह बहन कह रहा है. वह अपनी लेखनी या 'स्क्रिप्ट राईटिंग' में व्यस्त रहता है और दुसरे कमरे में, बकौल इस्मत, लिहाफ में हाथी फुदक रहा है. लेकीन मंटो की शराफत यह... कि बस, सारा कुछ कहानी लिखने तक सिमित. लेकिन यही शरीफ मंटो जब अपने नायाब चरित्रों के कपडे उतारता है तो अक्ल हैरान रह जाती है. मंटो के बाद से आज तक शायद किसी भी भारतीय साहित्य में इकठ्ठे इतने चरित्र नहीं आयें होंगे, जितने मंटो ने रचे. हर कहानी में एक नया चरित्र. नया मनोविज्ञान, नयी औरत और मंटो की नई भाषा.. कभी-कभी मंटो मुझे चेखव, मोपासां जैसे रचनाकारों से भी मीलों आगे नजर आता है. क्योंकी कहानी कहने की जो कला या चरित्रों को कमाल के साथ तहरीर में उतारने का जो फन मंटो के पास था, वो शायद न चेखव में था, न मोपासां में. मंटो चरित्रों के मनोविज्ञान से गुजरते हुए जब कसाई की तरह बकरे (कहानी) की 'बोटी-बोटी' अलग करता है तो आंखे हैरान रह जाती है. शायद अपने चरित्र को इतनी इमानदारी से देखने और निभाने की कला विदेशी कथाकारों में भी नहीं. जरुरत इस बात की भी है कि मंटो का समूचा साहित्य अंग्रेजी में अनुवाद होकर विश्व-बाजार में पहुंचे, जहां उसका सही मूल्यांकन हो सके.
इस संगृह की कहानियां पाठकों को 'निर्ममता' ही हद तक रुलायेंगी, चौकायेंगी. इन कहानियों का अनुवाद नबी अहमद ने किया है.
- मुशर्रफ आलम जौकी
(प्रस्तावनेतून)
'बाबू गोपीनाथ', 'मेरा नाम राधा है', ' गर्भ-बीज', 'पीरन', 'खूरशीट, 'बासित', 'शारदा' या एकूण आठ कथा संग्रहात आहेत - त्यापैकी पहिल्या 'बाबू गोपीनाथ' या कथेत मंटोंनी बाबू गोपीनाथ हे जगावेगळे व्यक्तिचित्र रंगवले आहे. कथाकार मंटोंकडे या बाबू गोपीनाथला घेऊन येणारे अब्दुर्रहीम सैंडो हे मंटोंचेच पात्र बाबू गोपीनाथ आणि मंटोंची एकमेकांना अशी ओळख करुन देते - 'मंटो साहब! बाबू गोपिनाथ से मिलिये. बाबू गोपीनाथ तुम हिन्दुस्तान के नंबर वन राईटर से हाथ मिला रहे हो. लिखता है तो धडन तख्ता हो जाता है. लोगों को ऐसी-ऐसी 'कंटिन्यूटली' मिलाता है की तबीयत साफ हो जाती है - हे मंटोंबद्दल. आणि बाबू गोपिनाथची ओळख म्हणजे - 'आप है बाबू गोपिनाथ. बडे खाना खराब. लाहोर से झक मारते-मारते बम्बई तशरीफ लाए है. साथ कश्मीर की एक कबूतरी है. नंबर वन बेवकूफ हो सकता है तो वो आप है. लोग उनको मस्का लगाकर रुपया बटोरते है. मै सिर्फ बाते कर के उन से हर रोज पोल्सन बटर के दो पैकेट वसूल करता हूं.'
बापजाद्याची दहा लाख रुपयांची दौलत गाठीशी आहे म्हणून श्रीमंत असलेला हा बाबू गोपीनाथ लाहोरमधल्या कंजूस बनियाचा मुलगा आहे - तो त्याचे अंगवस्त्र लाहोरहून सोबत घेऊन मुंबईत आला आहे. याचा मूळ स्वभाव 'पीर का मजार' आणि 'रंडी का कोठा' या दोन जागी मन रमणारा आहे. बाबू गोपीनाथच्या 'दिल को सुकून' देणार्या या दोनच जागा आहेत, तो म्हणतो - 'मुझे उनसे (पीर का मजार आणि रंडी का कोठा) कुछ मुहब्बत सी हो गई है. मै उनके बिना नहीं रह सकता. मैने सोच रखा है कि जब मेरी दौलत बिल्कुल खत्म हो जायेगी तो किसी तकिये में जा बैठूंगा. रंडी का कोठा और पीर का मजार. ये दो जगहें हैं जहां मेरे दिल को सुकून मिलता है. रंडी का कोठा तो छूट जायेगा. इसलिये की जेब खाली होनेवाली है. लेकीन हिन्दुस्तान में हजारों पीर है. किसी एक की मजार में चला जाऊंगा.'
हा बाबू गोपीनाथ जेव्हा पूर्ण वाचून संपला तेव्हा 'प्रेमाची परमावधी' काय असते हे मंटोंच्या लेखणीतून उतरलेल्या या बाबू गोपीनाथने मला शिकवलं. हा बाबू गोपीनाथ, त्याने जिच्यावर (जीनत ) प्रेम केलं तिची, स्वत: च्या उधळ्या, बेवकूफ, नालायक स्वभावामुळे कंगाल, फकीर झाल्यानंतर परवड होऊ नये यासाठी तिला एक चांगला आश्रयदाता स्वतः शोधून देण्यासाठी मुंबईपर्यंत आला आहे.
या बाबू गोपीनाथबद्दल शब्दांत काहीही लिहिलं तरी ते फिकं ठरेल. हा बाबू गोपीनाथ नाहीच, बाबू गोपीनाथच्या पात्रातून 'प्रेम' हे मूल्य in all its extremities वाहात आलेलं आहे - त्याबद्दल काहीच लिहिता येणारं नाही, ते स्वतः जगण्याची गोष्ट आहे.
'मेरा नाम राधा है' या कथेत 'राधा' या फिल्मी दुनियेतील अदाकाराचं 'राजकिशोर' या त्याकाळच्या सुपरस्टार, विवाहित, गांधीवादी, दानशूर, फिल्मी दुनियेत असूनही 'लंगोट का पक्का' असलेल्या या नटावर प्रेम जडलं आहे. ही राधा सादिकची ( स्वतः मंटोच ! दुसरं कोण) सुद्धा मैत्रिण आहे. पण व्यक्तिगत मंटोंना का कोण जाणे, नजरेत न आलेल्या गोष्टीमुळं हा राजकिशोर उगाच आवडत नाही. ही नवागत अभिनेत्री राधा मात्र त्याच्यावर प्रेम करते, ती राजकिशोरला 'तु मला बहिण मानू नकोस' असं सगळ्या पब्लिक समोर म्हणते. राजकिशोरवर फिदा असलेली ही राधा आजारी पडते तेव्हा राजकिशोर त्याच्या बायकोला घेऊन राधाकडे येऊन तिच्याकडून राखी बांधून घेतो, पण परत जाताना त्याची पिशवी राधाकडेच विसरते. राखी बांधून झाल्यानंतर ती विसरलेली पिशवी घेण्यासाठी परत आल्यानंतर राजकिशोरला राखी बांधून झाल्यानंतरही त्याच्या 'लंगोट का पक्का' असण्याची सत्वपरिक्षा घेते, आणि त्या दोघात जे घडतं ते मंटोंनी 'कंटिन्यूटली';-) कसं रंगवलंय ते स्वतः वाचून पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही.
'गर्भ- बीज' या कथेत मंटोंनी पुन्हा एकदा 'बाबू गोपीनाथ, आणि ' मेरा नाम राधा है' मधल्या 'सादिक' च्याच भाव-भावना, त्यांच्या जगण्याचा in their all extremities असा काही आडवातिडवा पट उभा केला आहे की 'बाबू गोपीनाथ', 'सादिक' हे सगळं मंटोंच्याच लेखन गर्भातून उद्भवलेलं बीज आहे, ती वेगळी माणसं नाहीत, पण केवळ 'मंटो या लेखकाची कल्पना' असं म्हणावं एवढीही लेचीपेची दिसतील अशी मंटोंनी रंगवलेली नाहीत. गर्भ बीज या कथेत सादिक या मंटोंच्याच पात्राने मंटोंशी संवाद साधला आहे आणि आणखी बरीच पात्रे त्यात उभी केली आहेत, ज्यांना मी तरी 'कंटिन्यूटली' पाहू शकलेलो नाही, एखाद्या गोष्टीचं बीज समजलं असेल तर, फार तपशीलात शिरून समजून घेण्याची मला गरज वाटली नाही, म्हणून मी या कथेबद्दल इथं तपशीलवार लिहू शकत नाही.
'पीरन' या कथेत मंटोंनी बृजमोहन आणि त्याची प्रेयसी पीरन यांच्यातील मजेदार संबंधाचा पट उभा केला आहे. बृजमोहन मंटोंकडून पैसे उसने घेऊन दर रविवारी पीरनला भेटायला जातो. हा बृजमोहन पीरनचा प्रियकर असला तरी पीरनच्या मते 'निकम्मा' आहे, आणि बृजमोहनच्या मते पीरन 'मनहूस' आहे - कारण बृजमोहनने कितीही चांगली नोकरी मिळवली आणि पुढच्या रविवारी पीरनची भेट घेतली रे घेतली की सोमवारी त्याला कामावरून काढून टाकण्यात येतं. हे असं अनेकदा झाल्यानं बृजमोहन पीरनला 'मनहूस औरत' म्हणतो, पण तो तिच्या भेटीला जाणं टाळू शकत नाही. बृजमोहनला एक चांगल्या पगाराची नोकरी मिळते तेव्हा अचानक पीरनचं पत्र येऊन धडकतं की 'रविवारी भेटायला ये, फार महत्वाचं काम आहे.' ह्या बलेची भेट घेतल्यानंतर नेहमीच नोकरी जाण्याच्या ' सिलसिल्यामुळं' बृजमोहन कावतो आणि पीरनची टाळताच न येणारी भेट घेतल्यानंतर नोकरी जाणारच, त्यापेक्षा स्वतःच राजीनामा द्यावा हे ठरवून पीरनची भेट घेऊन आल्यानंतर त्याच्या सेठकडे स्वतः होऊन राजीनामा सोपवतो त्यानंतर काय होतं हे वाचण्यासारखं आहे. मंटोंची नेहमीची खास ब्रॅण्डेड आतिषबाजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाक्यावाक्यात झालेली आहेच हे वेगळे सांगणे नको.
'खूरशीट' या कथेत खूरशीट आणि सरदार जोरावरसिंगमधील प्रणयसंबंधांचा पट आहे. ही कथा बहुतेक मंटोंच्या दिल्लीतील वास्तव्यात घडलेली असावी. या कथेत मंटोंचा नेहमीचा दारूगोळा, शैलीचा नंगानाच नेहमीप्रमाणे असला तरी extreme म्हणता येईल असं मला काही आढळलं नाही - मला ही आपली नेहमीसारखीच एक साधी कथा वाटली. एक विवाहित बाई, तिचा नवरा, खुरशीटचं गायन आवडतं म्हणून तिच्या गाण्यावर (आणि खूरशीटवरही हे ओघानं आलंच
) फिदा असणारा त्याचा एक सरदार दोस्त - शेवटी खूरशीट आणि हा सरदार लग्न करुन मुंबईत हनिमूनला येऊन मुंबईत स्थलांतरित झालेल्या मंटो पती- पत्नीला 'ताजमहल' हॉटेलमध्ये भेटायला बोलावतो. आणि ती दिल्लीची विवाहीत खूरशीटच सरदाराची आता बायको झाल्याचं मंटो पती-पत्नींना कळतं तेव्हा खूरशीट आणि सरदार जोरावरची 'रुख्सत' (निरोप) न घेताही मंटो पती-पत्नी ताजमधील खोलीबाहेर पडतात. This is not Manto!
'बासित' या कथेत लग्नाला राजी नसणारा, पण आईच्या आग्रहामुळे एकदाचे चिडून लग्न उरकून टाकणारा एक बासित रंगवला आहे. बासित लग्नाला तयार होतो तर तिकडे त्याची होणारी सासू लग्न थोडे पुढे ढकलण्याच्या मनःस्थितीत असते. शेवटी बासीतची आई अल्टीमेटम देते तेव्हा बासित आणि सईदा यांचं लग्न होतं. बासितची नई दुल्हन सईदा मात्र लग्न होऊन आल्यानंतर सतत कुठल्यातरी गोष्टीला घाबरलेली असते. बासित तिला मोकळेपणाने सगळ्या गोष्टी विचारतो पण ती काहीही स्पष्ट सांगत नाही. शेवटी सईदा बाथरूम मध्ये गेलेली असताना नालीतून रक्ताचा ओघळ बाहेर येताना दिसतो. बासितला लग्नासाठी बाध्य करुन सईदाशी लग्न लाऊन दिलेल्या बासीतच्या आईला थेट सईदाचं अर्भक पडलेलं दिसतं आणि ती खलास होते - बासितला समजदार व्हावे लागते. अर्थात कथा मुळातून वाचण्यासारखीच.
'शारदा' या कथेत नजीर हे रंडीबाज पात्र आणि त्याची शारदा या परिस्थितीनं नाडलेल्या, विवाहित पण नवर्यानं टाकलेल्या बाईची कुंटणखान्यावर भेट होते. ही शारदा तिच्या 'शकुंतला' या कुंटणखान्यापर्यंत पोहोचलेल्या तिच्या बहिणीला परत घेऊन जाण्यासाठी आलेली आहे. ही शकुंतलाच कुंटणखान्यावर नजीरला 'पेश' केलेली असते पण ती या प्रकारात अगदी आश्रमहरिणी असते. नजीर तिला काही करु शकत नाही. पण बहिणीला कुंटणखान्यातून परत न्यायला आलेल्या, विवाहित तरीही पती सोडून गेलेल्या शारदाचं आणि नजीरचं भलतं म्हणजे भलतंच जमतं. पण पुढे शारदा तिच्या शकुंतला या बहिणीला त्या नरकातून काढून रीतीप्रमाणे विवाह वगैर लाऊन देण्यासाठी परत जयपूरला घेऊन जाते. नजीर शारदाच्या मनातून जात नाही. ती जयपूरवरून त्याला पत्रे पाठवते. फाळणीच्या वेळी नजीरची बायको पाकिस्तानात पुढे निघून जाते तेव्हा नजीर आणि शारदाचा एकत्र रहाण्याचा मार्ग मोकळा होतो. ते महिनाभर एकत्र रहातातही. पण नजीरच्या मनावर त्या कुंटणखान्यात दर्शन झालेल्या शारदाचं चित्र पक्कं आहे - तो तिला या आत्ताच्या घरी सोबत रहाणार्या शारदाला बायकोच्या स्थानी पाहू शकत नाही - कंटाळतो. पण नजीरच्या प्रेमात पूरेपूर रंगलेली शारदा मात्र नजीरच्या बायकोचीच भूमिका निभावत रहाते. आणि नजीर खरोखर कंटाळल्याचं तिच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या आवडत्या सिगारेटचा ब्रॅण्ड टेबलावर ठेऊन, नजीरकडून दमडीही न घेता, शब्दाचाही निरोप न ठेवता त्याच्या आयुष्यातून निघून जाते...
कथासंग्रह संपला पण या आठ कथांतून अंगावर आलेल्या मंटो या व्यक्तीनंच मात्र झपाटलंय. कथांचं सोडा, मूळ मंटोबद्दलच खूप लिहावं वाटतंय, पण पुन्हा कधीतरी..
गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी सआदत हसन मंटोया अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. मंटोंबद्दल मराठी साहित्यिक राजन खान यांची लोकसत्ताने छापलेली ही मुलाखत वाचली, माझ्या जुन्या पेपरमध्ये आमचे 'न्यूजरूम इंचार्ज' असलेल्या, अजित वडनेरकर या भोपाली बाबूंचा ...
Strolling through the piazzas of Rome is an experience you don’t want to miss. These historic city squares of Rome serve as a place to meet, dine, watch people and chat. So if you truly want to ‘do as the Romans do' when in Rome, you want to indulge in this simplest of pleasures.


It can actually be fun to get lost in Trastavere! This Roman neighborhood beyond the Tiber retains its character since the medieval times. Narrow, winding cobblestones streets lined with old houses and several tiny pubs and restaurants, Trastavere was easily my favorite haunt in Rome, especially during lunch-time.
(अमेरिकेतील आमिश समाजातील चालीरितीवर आधारित कथा)
मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात एमाने खिडकीवरचा गडद रंगाचा हिरवा पडदा थोडासा सरकवला आणि ती शहारली. रस्त्यापलीकडे घरासमोरच्या पडवीत जेकब वाचत असल्याचा बहाणा करत खिडकीच्या दिशेने रोखून पाहत होता. एमाने घाईघाईत पडदा सरकवला. लाजेने लाल झालेले गाल तिने खसाखसा पुसले. धाडधाड जिना उतरत ती स्वयंपाकघरात डोकावली. तमाम ...
लोका: कोङ्कणमित्याहुस्त्वपरान्तं पुराविद: ||
बहिस्तु कण्टकैर्युक्ता अन्त: स्वादुरसान्विता; |
गृहे गृहेऽत्र दृश्यन्ते पुरुषा: पनसा इव ||
अर्थ
दक्षिणोत्तर पसरलेल्या; समुद्र व सह्याद्री ...
मी आजच्या सूर्यग्रहणा विषयी खाली केलेल्या भाकिताचा पुन्हा एकदा पडताळा आला आहे. मी खाली मोठ्या भूकंपाचे भाकित केले होते. रिश्टर स्केल्वर ६ इतक्या तीव्रतेचा इटलीत असा भूकंप झाल्याची बातमी आहे. पाच जण दगावल्याचा बातमीत उल्लेख असून अनेक ...
"Satisfaction lies in the effort, not in the attainment. Full effort is full victory."
परवाच एका मित्राशी chat करत असताना तो म्हणाला की "nothing is permanant , मित्र - मैत्रिणी, नाती, त्यांचे संदर्भ सगळच बदलतं जातं, गरजेच्या वेळी आपले आपले म्हणशील ते मित्र-मैत्रिणी जवळ असतीलच असे नाही. म्हणजे ते स्वार्थी आहेत असेही माझे म्हणणे नाही, पण... वेळ, काळ, busy schedule या सगळ्यात ते तुझ्या बरोबरच असतीलच असेही नाही." मी म्हटले, " असे कसे ? माझे मित्र मैत्रिणी आहेत ते, त्यांना नाही जमले touch मध्ये राहायला तर मी राहीन, my friends are special 4 me, i know we all will be in touch" तर म्हणाला, " contacts नाही राहत बये, कळेल तुलाही कळेल 'कालाय तस्मै नमः !', थोडा विचार कर, असे होतेच.जुने जातात, नवीन येतात ..this is life dear
"
मी सुरुवतीला त्याच्याशी अजिबातच सहमत नव्हते. पण मग विचार केला, लहानपणी माझा एक मित्र होता एकदम best friend आता तो कुठे असतो? काय करतो ? माहीत नाही. एक खूप छान मैत्रीण होती आजीकडे यायची ती तिच्या, मे महिन्याच्या सुट्टीत मीही तिथेच असायचे मग काय छानच गट्टी जमलेली आमची, पण आज ती job करते आणि कधीतरी २-३ वर्षांनी एकदा भेटते. माला तिची आठवण येते का? ohh उत्तर नको असतानाही हेच मिळतेय "नाही " do i miss him or her??? ohh OMG, no,’ खरच नाही !! strange but truth" मग? किती सहज स्विकारतो ना आपण आयुष्यातले बदल!! खूप जण भेटतात, त्यांची आणि आपली life connect होते, कधी कधी नेहमी साठी तर कधी काही क्षणांसाठी! वय वाढते, विषय बदलतात तसे आजूबाजूचे लोक, मित्र -मैत्रिणीही बदलतात, जशी त्यांच्या असण्याची सवय झालेली असते तशी नसण्याचीही जडते (?) किती वरवरची नाती असतात सगळी???
ह्या गतीमान आयुश्यात आपण खरच नाती जगतो का? जपतो का? की, आपले इगोच आपल्याला जास्ती प्रिय असतात??? आपल्या माणसांपेक्षा इगो महत्वाचे कसे आणि कधी होतात? तिने फोन नाही केल मग मी का करायचा? नाही तर नाही, गेली उडत. वेळ आहे कोणाकदे इथे गुंतुन पडायला. का विचर असे बदलत जातात?? समोरच्याला प्रोब्लेम असू शकतात हे समजत नसते का आपल्याला? की समजूनच घ्यायचे नसते?? लग्ना आधी सुंदर सुंदर, घट्ट असणारी मैत्री एकीचे लग्न झाले की लगेच ढिली का पडत जाते??? आपल्या मैत्रिणीची सुख-दुखः आधी आपल्याला हसवतात रडवतात मग नंतर असे काय होते की ते हातातले हात न कळत सुटत जातात ?? कधी सहजपणे तर कधी EGO मुळे, कारण काहीही असले तरी परीणाम एकाच होतो तो म्हणजे, एक नात संपत ... का? कसे? कधी, कोणाचे चुकले? हे न कळताच नात्यात दुरावा येतो ,,, आधी खूप खूप विषय असतात तुझ्या-माझ्यात पण नंतर hi .. , hows u ?? whats up ? ok .. keep in touch और be in touch ... यावर संभाषण संपते. आधी आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा, मग काही महिन्यातून एकदा, या वेगात बोलण्यातले अंतर वाढत जाते. त्या बोलण्यात संवाद मात्र हरवलेला असतो; शिल्लक असते ती औपचारीकता! फक्त चौकशी, मैत्री अजून शिल्लक आहे हे दाखवायची धडपड. हे समजत असते दोघींना, तरीही पाउल पुढे कोणी टाकायचे? हा पश्न उरतो आणि एक अस्पष्ट पडदा तयार होतो दोघीत, नात्याची वीणच सैल होत जाते हळूहळू .
असे कसे? का ? खरच?? ह्या विचित्र मनस्थितीत आणि भरकटलेल्या विचारात असतानाच एक ब्लोग काल वाचण्यात आला त्यातल्या एका ओळीने मनाची मरगळ हे अस्वथपण, उदासीनता सगळेच दूर केले. जाणवले की आयुष्यात प्रत्येकाची एक जागा असते, कोणी दुसरी वक्ती त्याला परीयाय असुच शकत नाही. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही शिकवण्यासाठी , घडवण्यासाठीच येत असतो.
ते वाक्य होते ....
"माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं." ......
वाह खरच, आज जरी "त्या" दोघी एकमेकींपासून लांब असतील काहीश्या अलिप्त असतील तरी, त्यांच्या रेषा जेव्हा एक-मेकीना छेदल्या तेव्हा एक सुंदर चित्र निर्माण झालेच असेल ना? एका नात्याने तेव्हा आकार घेतलेलाच होता की ! मग त्या क्षणांना जपायचे आणि आजचाच्या अस्वस्थ 'क्षणांत' अडकून रहायचे? ते सुंदर क्षण जपायचे आणि हा अस्वस्थ क्षण .. तोही स्विकारायचा, कारण तोही त्याच नात्याचा एक आकार आहे. काहीसा बोचरा, खुप खूप नकोसा पण आकार आहे, त्याच रेषांतून निर्माण झालेला. हा आकार नीट बघायचा आणि स्विकारायचा, तो सृष्ठीचा एक नियम म्हणुन! ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच. गोड किंवा कडू पण शेवट नक्कीच आहे,
मग ठरवले गोड आठवणींना मनात ठेवायचे आणि कडू क्षणांना तिलांजली द्यायची. मग द्रुश्तिकोनच बदलून गेला. मन आणि नजर दोन्हि मोकळे झाले, आणि मग काय एकदम लक्शात आले ... अरे, जो गोड नाही, तो तर शेवटच नाही.
नाही का???
:)
:) so " पिच्चर अभी बाकी ही मेरे दोस्त ..." काय माहीत उद्या परत त्याच रेषा एक-मेकींना अजून एकदा छेदून जाईल, त्याच, नाहीतर वेगळ्या नात्याने पुन्हा एकदा सामोरी येतील !
अश्या बर्याच रेषा अजून "रेघोटी"ला छेदून जायच्यात, काही "छेद" देतील, तर काही चित्र बनवतील, काही नेहमीच समांतर चालत राहातील, खूप जवळ असून भेटणार कधीच नाहीत, किंवा काही दिशा बदलून "रेघोटी"ला छेदून जातील कायमच्या आठवणी मागे ठेऊन जातील जेव्हा त्या रेषा आठवतील एक स्मित नक्कीच फुलेल ओठी ... काही रेषा अश्याच कालप्रवाहात हरवून जातील out of sight out of mind सारख्या 
पण एक चित्र दर वेळी साकारेल, एक आकार दर वेळी बनत जाईल, बनलेला आकार बदलत जाईल, आणि "रेघोटी" स्वतःचा प्रवास सुरूच ठेवेल
:) तो final आकार बघण्यासाठी वेग-वेगळ्या रस्त्यावर झोकदार वळणे घेत.
थोडक्यात काय yet more to come !!!!!!! .......
१९ मे की २० मे यावर यथासांग काथ्याकूट होऊन १९ मे रोजी कट्टा (एकदाचा) ठरला. ठाणे मुंबईत आहे का नाही इ. इ. प्रश्न उद्भवू नयेत याची खबरदारी म्हणून परळ (हुच्चभ्रूंनी "अप्पर वरळी" असे वाचावे) येथील "व्हेज ऑलवेज" ही जागा ठरवण्यात आली (धन्स टू प्रासभौ). नेमके याच नावाचे एक हॉटेल के.ई.एम.समोर (परळ - ईस्ट) येथे असल्याने माझा गोंधळ झालाच. मग अमोल खरे, वि.मे. यांच्या 'मार्ग'दर्शनानंतर योग्य जागी पोहोचलो. मी येईपर्यंत हॉटेलच्या आवारात खुर्च्या मांडून अमोल खरे, स्पा, चचा, सौरभ उप्स, जयपाल, प्रास, पुष्कर, विमे यांची गप्पांची मैफल रंगली होतीच.
थोड्याच वेळात मस्त कलंदर - निखिल देशपांडे जोडीचेही आगमन झाले. अनेक सदस्य प्रथमच भेटत असल्याने पहिली ओळख परेड झाली. ७ वाजत आल्याने सर्वजण हॉटेलात प्रवेशकर्ते होऊन नव्याने गप्पांचे फड रंगले. हास्य-विनोदाचा स्वर इतका टिपेला पोचला की तिथल्या कॅप्टनने अगदी क्रिप्टीक शैलीत आवाज कमी करायला सांगितले. त्याच्या सूचनेचा अर्थ लावण्यात कमीत कमी १० मिनिटे गेली. ११ मिपाकरांना एका वाक्यात बुचकळ्यात टाकणार्या त्या कॅप्टनचे मला खरोखरच कौतुक वाटले. नवमिपाकर मी-कस्तुरीचेही तेवढ्यात आगमन झाल्याने पुन्हा एक ओळख परेड झाली.
तिघात एक या हिशेबाने टेबलवर ४ मेनुकार्डे, नव्हे, मेनुबुक्स येऊन पडली. त्या पुस्तकांचा आकार बघूनच अनेकांनी मेनु ठरवण्याच्या जबाबदारीतून आपले अंग काढून घेतले. अभ्यासू प्रासभौनाच ही जबाबदारी सोपवण्यात आली. इकडे विमे व मक यांनी 'शाळा' व 'गमभन' या कलाकृतींचा तौलनिक अभ्यास अन्य सदस्यांपुढे मांडला. महाविद्यालयीन एकांकिकांचे कमर्शियल नाटकात रुपांतर करताना येणार्या अडचणी इतक्या प्रभावी शैलीत सांगितल्या की "हा माणूस टीसीएसमध्ये का मरतोय?" असा प्रश्न कुणालाही पडावा. दुसर्या बाजूला प्रास-पुष्कर-जयपाल कायद्याचा किस पाडत होते.
समोर आलेल्या स्टार्टर्सचा फडशा पाडत असतानाच दोन गहन प्रश्न समोर आले ते म्हणजे- १] नि.दे.- म.क. यांतील खरा संपादक कोण? व २] स्पाचा/ची 'सत्या' कोण? दोन्ही प्रश्नांना ज्या तर्हेने बगल देण्यात आली त्यावरुन तिघेही मुरलेले मिपाकर आहेत याची (पुन्हा) खात्री पटली.
प्रासभौंच्या बाजूला बसलेल्या कस्तुरीचा आवाज क्वचित का होईना, पण येत होता. मग तिने (कंटाळून की वैतागून?) जागा बदलली व मकतैपाशी बसली. मक व कस्तुरीचे बोलणे हे जॉब इंटरव्ह्यु किंवा वायवा एक्झामपेक्षा वेगळे वाटतच नव्हते. चचा व सौरभ उप्स श्रवणभक्तीत दंग होते.
मेन कोर्स येईपर्यंत पूर्वनियोजित कामांसाठी प्रास व कस्तुरी यांनी कल्टी घेतली होती. मग मिपावरील सिझलिंग आयडींबद्दल चर्चा करत सिझलर्स संपले देखील. बाहेर बरेच लोक उभे असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर थोडे उपकार करत बिल देऊन बाहेर आलो. निदे - मक यांना काही कारणाने लवकर निघायचे असल्याने आपसूकच सर्वजण पांगलो. तीन-साडेतीन तास चाललेल्या गप्पाही कमीच असतात. निदे-मक-विमे यांना निरोप देऊन मी, जयपाल, स्पा, सौरभ उप्स, चचा व अमोल खरे परळ स्टेशनकडे मार्गस्थ झालो. तिथे अमोलला निरोप दिला व टिटवाळा गाडीत गप्पांचा सिलसिला पुन्हा चालू झाला. स.प.रा. यांनी इथे सूक्ष्मलहरीरुपात अवतीर्ण होऊन संवाद साधला. शेवटपर्यंत चचाने एकही कविता ऐकवली नाही याबद्दल त्याचा निषेध करत सर्वजण तृप्त मनाने सुखरुप घरी पोचले.
स्वर- सुहास सावंत, ललित शर्मा, क्षितीज वाघ, श्रेया घोशाल, अमृता नातू, शंकर महादेवन, पंकज पुष्कर, डीजे अखिल तलरेजा
संगीत- क्षितीज वाघ
गीत- गुरु ठाकूर
वर्ष -२०१२
१. येड्यांची जत्रा डाऊनलोड
स्वर- सुहास सावंत, ललित शर्मा, क्षितीज वाघ
२. काटा रुतला ...
We had rented an apartment on Via die Serpenti, a quaint little street that sloped gently down from the towering ramparts of the Colosseum, lined with tiny shops and graffiti-adorned wooden doors. An old fountain gurgled in the middle of a small cobble-stoned piazza. Wrought-iron chairs and checkered table-cloths spilled out of trattorias around the piazza. Micro-cars, scooters and bikes lined both sides of the tiny streets. The late-April morning in Rome was refreshing cold as I looked out of my window, a full ten degrees lower than the hot Pune summer I had left behind!

अगुणज्ञोऽसि नितरां रत्नं रत्नं तृणं तृणम् ||
अर्थ
रत्नांना खाली [तळाशी जागा] देतोस; आणि शेवाळाला [डोक्या]वर घेतोस [अरे सागरा] अगदी ...
सोऽपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महतामुदारता ||
अर्थ
तहानल्यामुळे चातक [अगदी थोडेसे] चार पाच थेंब पाणी मेघाकडे ...
श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथ मूर्तं सुमनसां सुधासौन्दर्यं ते सलिलमशिवं न: शमयतु || गङ्गालहरी पण्डितराज जगन्नाथ
अर्थ
सर्व पृथ्वीचे अवर्णनीय सौंदर्य असलेले; विशाल जग सहजपणे निर्माण करणाऱ्या शंकराचे मोठे ऐश्वर्य असलेले; वेदांचे सर्व सारच; देवांचे मूर्तिमंत पुण्यच; अमृताप्रमाणे मधुर असणारे तुझे पाणी आमचे अकल्याण दूर करो.
[पण्डितराजांनी लवंगीकेला पत्नी म्हणून ...
अथवा सुखं शयीथा निकटे जागर्ति जाह्नवीजननी || अप्पय दीक्षित
अर्थ
[पण्डितराज जगन्नाथ यवनी पत्नी बरोबर गंगेच्या तीरावर झोपले असता त्यांना उद्देशून अप्पय दीक्षितांनी असे म्हटले मग पण्डित राजांना फार दु:ख झालं आणि त्या तळमळीत त्यांनी ...
किरकिरत्या गजराने चिडचिडतच उठलो..
आन्हिकं उरकली..
नाश्ता झाला, ज्यूस झालं,.. कॉफीही पिऊन झाली.
कपडे करून तयार झालो आणि हापीसला जायला निघालो.
काय माहित पण असं फ्रेश्श नव्हतं वाटत आज............ !!
ट्रेन ...
या कथा देण्यामागचा उद्देश केवळ मनोरंजन एवढाच नाही. ते पाहिजेच, पण या कथांचा वर्तमान कालाशी काय संबंध येतो, हे तपासणे महत्वाचे. मागील कथेत आपण पाहिले की मांडव्याने वयोमर्यादा १२ वरून १४ केली. माझी अपेक्षा होती की मिपा वाचक आज ती १६ वरून १४ वर न्यावी का यावर मते देतील. या हजारो वर्षांत सामाजिक बदल नक्कीच घडले आहेत. त्याचे प्रतिबिंब प्रतिसादात दिसले पाहिजे. असो. चुक माझी, मी स्पष्टपणे तसे विचारले नव्हते. आज प्रश्न सरळ विचारणार आहे व आपला प्रतिसाद अपेक्षित आहे.
युधिष्ठिर भीष्मांना प्रश्न विचारतो " पितामह, स्त्रीपुरुषांच्या संयोगात वैषयिक सुख अधिक कोणाच्या ठिकाणी आहे ? " गंमत पहा, पुरुषाने किंवा स्त्रीने कुणीही, काहीही उत्तर दिले तरी ते अपूर्णच, एकतर्फीच राहणार. जरा विचार करा, आपले मत ठरवा व मगच भीष्मांनी सांगितलेले उत्तर वाचा. भीष्म म्हणाले, " या विषयी एक गोष्ट सांगतात "
प्राचिन काळी अंगारवन नावाचा एक राजर्षि होता. त्याला पुत्र नसल्याने त्याने पुत्रप्राप्तीसाठी "अग्निष्टुत" नावाचा यज्ञ केला. त्याने त्याला शंभर पुत्रांची प्राप्ती झाली. पण या यज्ञाची एक गोची होती. या यागात फ्क्त अग्नीचे हवन असते. इंद्राला काहीच भाग मिळत नाही. त्यामुळे इंद्र असा यज्ञ करणार्यावर रागावलेला असतो. इंद्राने अंगारवनाचे व्यंग शोधावयाचा प्रयत्न केला पण इंद्रियनिग्रही राजाकडे तसे काही दिसेना. एके दिवशी राजा रानात मृगयेकरिता गेला असतांना त्याची व सेवकांची चुकामुक झाली. त्याला तेथे एक मनोहर सरोवर दिसले. त्यात स्नान करून तो बाहेर आला तर त्याला आपण स्त्री झालो आहोत असे दिसून आले. हा इंद्राच्या कोपाचा प्रभाव. आपणास स्त्रीरूप प्राप्त झाले आहे असे पाहून त्यास मोठी लज्जा उत्पन्न झाली.त्याची इंद्रिये व्याकुळ झाली व तो मोठ्या चिंतेत पडला. आपल्या शंभर बलवान पुत्रांसमोर जाऊन आता काय सांगावयाचे ? शेवटी तो राजधानीत गेला व विस्मयात पडलेल्या सर्वांना घडलेली हकिगत सांगून म्हणाला " मी आता वनात जातो. मुलांनो ,तुम्ही धर्माने राज्यकारभार चालवा."
तो वनात एका आश्रमात गेला व तेथील एका तपस्व्याबरोबर त्याने विवाह केला. त्याला (किंवा तिला म्हणा) शंभर मुले झाली. मग ती त्या शंभर पुत्रांना घेऊन राजधानीत गेली व पहिल्या पुत्रांना म्हणाली की तुम्ही एकमेकांचे भ्राते आहात हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी एकोप्याने राज्याचा उपभोग घ्या. ती परत वनात गेली. इंद्र वैतागला. तो म्हणाला, मी अंगारवनावर अपकार केला की उपकार ? मग त्याने ब्राह्मणाचे रूप घेतले व तो राजधानीत गेला. तिथे त्याने मुलांत फूट पाडली. पहिल्या मुलांना तो म्हणाला " तुम्ही राजपुत्र. ही दुसरी यतीची मुले. तुम्ही कसले भ्राते ? यांचा राज्यावर काहीच हक्क नाही." असा कलह लावून दिल्यावर त्या सर्वांत भांडणे सुरू झाली व एकमेकाशी लढून सर्वजण मृत्युमुखी पडले. ही बातमी कळल्यावर ती तपस्विनी सारखी रडू लागली. तेव्हा तेथे ब्राह्मणाचे रूप घेऊन इंद्र आला व त्याने ती का रडते ते विचारले. तिने आपली दोनशे मुले मेल्यामुळे मी रडते असे सांगितले. मग कठोर शब्दात इंद्र म्हणाला " मी इंद्र आहे. तुझ्या यज्ञात मला हवन नसल्याने मी रागावून हे भांडण घडवून आणले." हा ब्राह्मण देवाधिदेव इंद्र आहे हे कळल्यावर त्याला साष्टांग नमस्कार घालून राजर्षि म्हणाला " कृपा कर. मी यज्ञ केला तो पुत्र मिळवण्याकरिता. मला तुला दुखवावयाचे नव्हते. " तेव्हा इंद्र संतुष्ट झाला व तिला म्हणाला " मी तुझे शंभर पुत्र जिवंत करतो, कोणते ते सांग. तू पुरुष असतांना झालेले की स्त्री असतांना झालेले ?" तपस्वनीने हात जोडून सांगितले " मी स्त्री असतांना झाले ते." इंद्राने कारण विचारल्यावर ती म्हणाली " इंद्रा, स्त्रीच्या ठिकाणी स्वभावत: अधिक प्रेम असते, तसे पुरुषांच्या ठिकाणी असत नाही : ह्यास्तव मी स्त्रीरूप असल्यावर मला जे पुत्र झाले त्यांनाच तू जिवंत कर." इंद्र प्रेमळपणे म्हाणाला " मी तुझे दोनशेही पुत्र जिवंत करतो. आता तुला आणखी काय मागावयाचे आहे ? तुला स्त्री रहावयाचे आहे की पुरुष व्हावयाचे आह ? स्त्री म्हणाली " मी स्त्री रूपच पसंत करते. मला पुरुषरूपाची इच्छा नाही " इड्राने का म्हणून विचारल्यावर ती म्हणाली "देवाधिदेवा, स्त्रीया किंवा पुरुष ह्यांच्या संयोगामध्ये नित्य स्त्रीयांच्या ठिकाणी अधिक प्रेम वसत असते, ह्यास्तव, इंद्रा, मी स्त्रीरूपच अधिक मानते. इंद्राला नमस्कार करून ती वनात निघून गेली.
म. व्यासांनी आपले मत दिले. तुमचे मत काय ?
शरद
लहानपणी एकट्याने हिंडायची मर्यादा म्हणजे वाड्याचे दार. पुढेच रस्ता असल्याने आम्हा बारक्या पोरांना कोणी बरोबर असल्याशिवाय बाहेर पडायला सक्त मनाई होती. त्यामुळेच की काय, वाड्यालगतच्या दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन येणे हाही पराक्रम वाटायचा. मोकळ्या वेळात आमचा मुक्काम दारालगतच्या पायऱ्यांवर असायचा. रस्त्याचा तो पट्टा जणू पाठ झाला होता.
"बालभारती - आठवणीतील कविता"
'बालभारती' मधील स्मरणरंजनात घेऊन जाणार्या आठवणीतल्या जुन्या कवितांचा खजिना पुन्हा एकदा ई-पुस्तक स्वरूपात ...
१. अबोली परी डाऊनलोड चित्रपट - बाळा गाऊ कशी अंगाई
दिग्दर्शक - कमलाकर तोरणे
कलाकार - आशा काळे, विक्रम गोखले, नयनतारा
संगीतकार - एन्. दत्ता
गीतकार - मधुसूदन कालेलकर
वर्ष - १९७७
निंबोणीच्या झाडामागे
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या ...
हंऽऽऽऽ म्हणजे तू पोलिसांकडे जाणारच नव्हती तर……” मी म्हणालो.
वॅनिटा खाली बघत गप्प राहिली.
“इथे न्याय मिळेल असे वाटले होते मला.” वॅनिटा म्हनाली.
त्याच क्षणी मला मिलानचा न्यायालयाचा हा नवीन प्रयोग किती गुंतागुंतीचा आणि अवघड आहे ते कळून चुकले……..
पुढे……………
८
“विलफ्रेड अर्ना, लार्क थाईन्सचा तू विचारपूर्वक आणि शांत डोक्याने हत्या केली हा आरोप तुला मान्य आहे का ? “ मी जरा जादाचा शहाणपणा दाखवून म्हटले ज्याची नंतर मलाच लाज वाटली.
खटला चालू होऊन आता चार तास उलटून गेले होते. आम्ही तो गुन्हा, आरोपी आणि आम्हाला समजेल तसा कायदा या सगळ्यावर साधक बाधक चर्चा केली होती. सिला सॅंडर्स अजूनही आमच्या बरोबर होती. तिचे वय बघता तिचे कौतूक करावे तेवढे कमीच होते. रेग्गी निघाला होता व त्याला या प्रयोगाबद्दल अनेक शंका होत्या तरीपण तो थांबला होता. मिलो स्टोनला या वस्तीची लाज वाटायची तरीही तो थांबला होता. काय कारण असावे बरे ?……..
या खटल्याच्या पहिल्या भागाचा शेवट आता आमच्या दृष्टिक्षेपात होता.
“हो ! मला मान्य आहे” विलफ्रेड ताठ होत आणि त्या न्यायाधिशांच्या वर्तूळाकडे बघत म्हणाला. हा खटला या प्रयोगाचा पहिला खटला होता. गंमत म्हणजे या नंतर जे अनेक खटले चालवले गेले त्यात भाग घेणार्या न्यायाधीशांच्या चमूला “न्यायवर्तूळ” असेच नाव पडले.
“मला आरोप मान्य आहे. मी त्याला त्याच्या खोलीत ठार केले. मी या मुलीलाही ठार मारणार होतो. मी चिडलो होतो पण मी काय करतो आहे याची मला पूर्ण जाणीव होती. हो ! मी मारले त्याला. तो मरेतोपर्यंत मीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या.”
“तुला जर गुन्हा मान्य असेल तर तुला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ, का आमचा न्याय तुला मान्य होईल ? हेही तुला सांगावे लागेल” मिलो म्हणाला.
“तुमचा न्याय !” विलफ्रेडने ठामपणे सांगितले. आत्तापर्यंत खाली मान घालून बसणारा विलफ्रेड, थरथर कापणारा विलफ्रेड, त्याच्या अंगात एवढी शक्ती कुठून आली कोणास ठाऊक !
“आम्ही तुला दोषी ठरवून शिक्षा ठोठवली तर ?” मी विचारले.
“चालेल”
“तुला त्यांनी मृत्यूदंड दिला तर ?” बेल्सने विचारले.
विलफ्रेडने ज्या माणसाने त्याच्या पुतणीला कोकेन विकले होते त्याच्याकडे रोखून बघितले पण तो काहीच बोलला नाही.
आता पहाटेचे दोन वाजले होते पण कोणाच्या चेहर्यावर दमल्याचा वा कंटाळल्याचा भाव दिसत नव्हता.
“चला मग आता मतदान घेऊ” मी म्हणालो.
“त्याच्या अगोदर मला हे मतदान कसे होणार हे समजावून सांगा. म्हणजे तो दोषी आहे हे कसे समजणार ?” मिलो म्हणाला.
“अरेच्च्या मते मोजली की कळेल ना ते ! “
“पण समजा कोणाला तो निर्दोष आहे असे वाटले तर ?”
“९ किंवा ९ पेक्षा जास्त मते तो दोषी आहे या बाजूने पडली तर तो दोषी आहे हे ठरवायला काहीच हरकत नाही. यात कोणाला काही शंका आणि वेगळे मत मांडायचे आहे ?”
मला वाटले होते की एंजेला काहीतरी मत मांडेल पण ती काही बोलली नाही. माझ्याकडे बघत तिने तिचा ओठ मुडपला पण गप्प बसली.
“सिला ?”
“दोषी”
“मिलो ?”
“दोषी”
टोनी…..रेग्गी…..केन्या…. एंजेला….. बेल्स…वॅनिटा….मिलान…. जिना….
“दोषी” ते सगळे एकदम म्हणाले.
“दोषी ! माझेही तेच मत आहे.” मी म्हणालो.
“विलफ्रेड दोषी आहे या बाबतीत सगळ्यांचे एकमत झाले आहे. आता या अपराधाची शिक्षा काय हे ठरवायचे काम बाकी आहे” मी म्हणालो.
“मला वाटते आता त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेले बरे. त्यांच्याकडे तुरूंग आणि इतर व्यवस्था आहेत. आपण काय त्याला त्याच्या खोलीत कोंडणार आहोत का ?” बेल्स ने विचारले.
त्याच्याकडे दुर्लक्ष करून मिलान म्हणाला
“वॅनिटा”
“काय ?”
या सगळ्याचा ताण तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. डोळ्याखालची वर्तुळे आता अधिक स्पष्ट दिसत होती. ती बिचारी इतकी मरगळून गेली होती की एंजेलाच्या मदतीशिवाय ती सरळ बसूही शकत नव्हती.
मी मात्र माझ्या या मित्राच्या मुलीत गुंतत चाललो होतो अशी मला शंका यायला लागली होती. मला ती पूर्वी लहान वाटायची पण आता मला ती माझ्याच वयोगटातील असल्याचा साक्षात्कार झाला. विशेषत: तिने ज्या प्रकारे पोलिसांना हाताळले होते त्यावरून तर निश्चितच. एका रात्रीत माझ्या मनातील तिची लहान मुलीची छबी मोठी होऊन तिची एक आकर्षक स्त्री झाली होती. कमाल आहे…..
“काय शिक्षा असावी असे तुला वाटते ? मी वॅनिटाला विचारले.
“मला नको विचारूस”
“पण तुला हे सगळे अगोदरच माहीत होते”
“तो दोषी आहे पण तो रागाने आतून पेटलाही होता. ते मला आत्ताच समजले आहे. तो आतून किती दुखावला गेला आहे हे मला कळतंय. लार्क कधी कधी कोकेनच्या आहारी जाऊन माझ्या आईलाही मारायचा. ममा जीना म्हणते आहे ते बरोबर आहे. त्याने माझ्या आईलाही धंद्याला लावले होते आणि जोसीलाही. मि अर्ना रागाने वेडा होईल नाहीतर काय. त्याने माझ्या होणार्या बाळाच्या वडिलांना मारले आहे पण त्याचा अर्थ त्यानेही मरायला पाहिजे असा होत नाही.” वॅनिटा म्हणाली. मी तिच्याकडे आश्चर्याने पहातच राहिलो.
“रेग्गी, तुझे काय मत आहे ?” मी त्या बिल्डरला विचारले. “तू येथे आलास, का आलास, आणि थांबलास हेच आश्चर्य आहे. तुझा निर्णय काय आहे ?”
“बॉबी, तू कॉलेजला गेला म्हणून स्वत:ला फार शहाणा समजू नकोस. तुला इथले XX काही माहीत नाही. सिम्स म्हणाला. “विलफ्रेडला मी शाळेपासून ओळखतोय. आम्ही बास्केटबॉल एकत्र खेळायचो. मी आणि त्याची बहीण, आम्ही एके काळी लग्न करणार होतो. त्यामुळे मिलान जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही. हे सगळे गैर आहे. खरे हे प्रकरण कायद्याने हाताळले पाहिजे. पण सिला म्हणतोय तेही बरोबर आहे. कायदा ते काम करत नाही हेही खरे आहे. माझे वेगळे मत मांडले आहे पण तुमची मते सामान्य माणसाहून वेगळी आहेत हे तुम्हाला कळावे म्हणून मी ते मांडले असे समजा”
“तू त्याचा एवढा जवळचा मित्र आहेस तर तू तो निर्दोष आहे असे का म्हणाला नाहीस ? टोनीने विचारले.
“आम्ही काही जिवलग मित्र नाही. आमची आपली तोंडओळख आहे. आम्ही कित्येक दिवसात एकामेकांशी बोललेलो पण नाही. मी त्याला दोषी ठरवले यावे मुख्य कारण आहे ते त्यानेच सांगितले म्हणून. दुसरे म्हणजे त्याच्याकडे लार्कला मारायला ठोस कारण होते, नाही असे नाही, पण त्यामुळे तो खुनाच्या आरोपात निर्दोष म्हणता येणार नाही”
केन्याचे बाळ आता तिच्या पायापाशी एका उशीवर मस्त झोपले होते.
“अजून कोणाला काही सांगायचे आहे ?”
“जशास तसे हाच न्याय मला वाटते ठीक राहिल” मिलो म्हणाला. सिला आणि जिनाने मान डोलावली.
विलफ्रेडने शुन्यात नजर लावली होती जणू काही त्याने हे ऐकलेच नव्हते. मला त्या विचारानेच मला गलबलून आले. एंजेलाने माझ्याकडे आव्हानात्मक नजरेने बघितले.
“नाही ! ते चुक आहे !” एंजेला एकदम ओरडली.
“का बरे ? त्यानेतर त्याचा गुन्हा कबूल केला आहे”. एंथनी म्हणाला. “त्याच्या हातून तो काही चुकून घडलेला नाही.”
“पण तुम्ही या अगोदरच लार्कवर खटला का नाही चालवला ते सांगा” तिने आपले मत मांडले.”ते केले असतेत तर लोसेट्टेचाही जीव वाचला असता आणि लार्कही मेला नसता आणि हा तिसरा माणूस मरणाच्या दारात उभा राहिला नसता”.
“आपण भुतकाळात घडलेल्या गोष्टींबाबत काही करू शकत नाही बेटा !” मिलान त्याच्या मुलीला म्हणाला. “आजचे बोल !”
“डॅडी हा अजून एक खून होईल”
“विलफ्रेड, तू या न्यायालयाचा निर्णय मानशील ?” मी त्याला विचारले.
“हो ! निश्चित !”
“ मग तुला मृत्यूदंड द्यायच्या ठरावाला मी अनुमोदन देत या टेबलावर मांडतोय.. कितीजणांना मान्य आहे हे ?”
सिला, मिलो, जिना, केन्या, मिलान आणि रेग्गीने माना डोलावल्या.
“विरोधी मत ?” मी विचारले.
“मी” एंजेला म्हणाली. उरलेल्यांनी गप्पच रहायचे पसंत केले.
मी तो ठराव परत मतदानाला टाकला पण निर्णय तोच आला.
“८ विरूद्ध १. त्याला मृत्यूदंड कसा द्यायचा हे आता ठरवावे लागेल” मी म्हणालो………………
९
“आणि त्या बाळाचे काय ?” एंजेलाने जमलेल्या सगळ्यांना विचारले.
“त्याचे काय ?” मिलान म्हणाला.
“मि. अर्नाने त्या बाळाच्या बापाला मारले. त्याचा काय गुन्हा ? त्याची जबाबदारी अर्नाची नाही का ?”
सगळे स्तब्ध झाले आणि आमच्यात एकदम शांतता पसरली.
मी जिच्या जवळ जवळ प्रेमात पडलो होतो तिच्याकडून आलेल्या या प्रश्नाने सगळ्यांची तारांबळ उडाली सगळेजण ताठ बसले आणि लक्ष देऊन एकू लागले.
“त्या बाळाचा हक्क ? त्याची भरपाई कोण करणार ?” मिलोने विचारले.
आरोपीने बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनात. त्याने त्याची मान हलवली पण नाही…. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता.
“त्याच्याकडे पैसा नाही तर तो काय भरपाई देणार ? रेग्गीने सत्य परिस्थिती सांगितली.
“त्याला जर आपण जिवंत ठेवले व काम करू दिले तर तो पैसे देऊ शकेल.” एंजेला म्हणाली. “त्याची शिक्षा आपण बदलू शकतो. त्याला मृत्यू ऐवजी आपण जन्मठेप देऊ शकतो आणि आयुष्यभर या बाळासाठी पैसे कमवायला सांगू शकतो”
“ही काय शिक्षा आहे ? त्याने एका माणसाला ठार मारले आहे आणि आपण त्याला सांगणार की तू परत कामावर जा ! व्वा !” बेल्स वैतागून म्हणाला.
“आपण येथे न्याय द्यायला जमलोय, सूड घेण्यासाठी नाही. पोर्टर म्हणाला. “ विचार केला तर आपण सगळे, पोलिसही दोषी आहोत. नाहीतर हे सगळे झालेच नसते. आता झालेच आहे तर सर्वांचा विचार करणेच बरोबर आहे. चूका दुरूस्त करायचा पयत्न करायला काय हरकत आहे”
बेल्स त्याच्याकडे डोळे फाडून बघायला लागला आणि शेवटी गप्प बसला.
त्याची ती अवस्था बघून माझ्याही चेहर्यावर स्मीत झळकून गेले असावे.
“केन्या तुझे काय म्हणणे आहे ?” मी विचारले.
तिने विचार करून उत्तर दिले “त्याने त्या मुलाचा खून केला. कशावरून तो हे परत करणार नाही ? समजा त्याचे परत डोके फिरले आणि त्याने या बेल्सचा मुडदा पाडला तर ? आता त्याला बेल्सही जोस्सीला कोकेन विकत होता हे माहिती आहे”
“एक विसरू नकोस त्याने मरायचीही तयारी दाखवली आहे” जिना म्हणाली.
“पण समजा आता त्याला आपण सोडले आणि काही दिवस तो शांत राहिला आणि परत त्याचा राग उफाळून आला तर ?” केन्याने विचारले.
“मि. अर्ना, तुला मला मारयचंय का ?” बेल्सने विचारले.
“नाही” विलफ्रेड पुटपुटला. “ मी असले काहीही परत करणार नाही. माझे डोके फिरले होते त्यावेळी. बाकी काही नाही”
“तो जर वॅनच्या बाळासाठी कष्ट करणार असेल तर मी माझे मत त्याच्या परड्यात टाकतो. मी काही त्याला घाबरत नाही” बेल्स म्हणाला.
एक केन्या सोडून सगळ्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.
“बेल्स तू म्हणतोस ते आत्ता ठीक आहे. पण समजा तू परत कंगाल झालास आणि परत कोकेन विकायला लागलास आणि विलफ्रेडने तुला एखाद्या मुलीला धंद्याला लावताना बघितले तर तो काय करेल असे वाटते तुला ? केन्या म्हणाली. तिला अजून खात्री वाटत नव्हती
“मी बेल्सला नोकरी देतो. बस्स? बेल्स, करशील का माझ्याकडे नोकरी ?” रेग्गी म्हणाला.
सगळेजण बेल्सच्या उत्तराची वाट बघत त्याच्याकडे पाहू लागले. जणू काय या सगळ्यावर त्याची नोकरी हाच उपाय होता.
“हंऽऽऽऽऽ ठीक आहे जर मि. अर्नाचे प्राण आणि वॅनचे बाळ वाचणार असतील तर मी तुझ्याकडे नोकरी करेन” बेल्स म्हणाला.
“आणि वॅनीटा, तू माझ्याकडे येऊन रहा” जीना म्हणाली. माझ्याकडे एक छोटी खोली रिकामीच असते. तुझी आई बरी होऊन येईतोपर्यंत तू ती वापर.” जिना म्हणाली.
विलफ्रेड इकडे तिकडे बघत होता. त्याला काय चालले आहे हेच कळत नव्हते. अचानक सगळ्यांचे लक्ष त्याच्यावरून वॅनच्या बाळावर केंद्रीत झाले होते.
“थोडक्यात मला जगायचे असेल तर वॅनला पैसे द्यावे लागतील. बरोबर ना ?” त्याने विचारले.
“हो ! बरोबर ! मान्य आहे का तुला हे ?” मी विचारले.
माझ्याकडे बघत असतानाच त्याला कळाले की काय चालले आहे ते. दुसर्याच क्षणी त्याने मान डोलवली.
“यावर मतदान घेऊ या. ज्याला ही कल्पना मान्य आहे त्याने म्हणावे “येऽऽऽ !”
वॅनिटासकट सगळ्यांनीच त्याला प्रतिसाद दिला.
“चला !” पोर्टरने सुटकेचा निश्वास टाकला. मी पॅरोलवर असताना अशा खोलीत या प्रकरणार भाग घेतला हे जर बाहेर नुसते कळले तरी, विलफ्रेड तुला लार्कला मारायला जेवढा वेळ लागला ना त्यापेक्षा कमी वेळात मी परत तुरूंगात जाऊन पडेन. कळल का !
“हो ! बरोबर. कायदा, लार्क जेव्हा खुलेआम कोकेन विकत होता तेव्हा आंधळा होता. पोलिसांना तेथील वेश्या आणि कोकेनचे दलाल दिसत नाहीत पण त्यांना आपण मात्र लगेचच दिसू. येथे हजर असलेल्या स्त्री पुरूषांनी कायदा हातात घेतला हे त्यांना समजल्यावर आपल्याला अटक व्हायला काय वेळ ? त्या वेळी मात्र ते त्यांची कार्यक्षमता दाखवतील. जेथे त्यांनी काहीच हालचाल केली नाही त्या प्रकरणात आपण न्याय केला म्हणून आपल्याला ते तुरूंगात घालतील”. मिलान उद्वेगाने म्हणाला.
“म्हणून आज आपल्याला सर्वांना एक शपथ घ्यावी लागेल की आजच्या रात्री काही झालेच नाही”. मी म्हणालो.
“आपल्याला परत भेटायला लागले तर ? समजा जी ६ मधे परत एखादा कोकेनवाला रहायला आला तर ?” रेग्गीने रास्त शंका विचारली
“जर त्याने आपला निकाल मानला नाही तर आपल्याला एकजूटीने त्याच्या विरूद्ध उभे रहावे लागेल. खाली धोबीखन्यात आपण भेटू आणि ठरवू आपल्याला कायदा कुठे उपयोगी आहे आणि कुठे नाही. शेवटी कायदा आपल्यासाठी आहे.” मी म्हणालो.
“जर एखादा गुन्हेगार आपल्याकडे न्याय मागायला आला तर आपण तो त्याला देऊ. जर तो दयेची भीक मागायला आला तर आपण भेटून काय करायचे ते ठरवू”
“हे जरा अतीच होते आहे” मिलो म्हणाला.
पण कोणी त्याच्याशी वाद घातला नाही.
“वॅनचे काय करायचे ?” बेल्सने विचारले.
“मी ममा जीनाबरोबर राहेन. जोपर्यंत माझी आई बरी होऊन येत नाही तोपर्यंत तरी.”
“या पिस्तूलाचं काय करायचं” केन्याने विचारले.
“त्याचे काय करायचे ते आपण मिलानकडे सोपवू या आणि परत त्याचा विषय नको” मी म्हणालो.
बरोबर वेळ सांगायची झाली तर तेव्हा बरोबर पहाटेचे तीन वाजून सात मिनीटे झाली होती. सगळे आपापल्या घरी गेले आणि बहुदा झोपले असावेत. विलफ्रेड त्याच्या एकांतात परतला बहुदा त्याने काय केले याच्यावर तो विचार करत असावा. मिलोने सिलाला तिच्या घरी सोडले आणि टोनी आणि जीना नेहमीप्रमाणे बरोबर गेले तर मी केन्या आणि तिच्या बाळाला घरी सोडले आणि परत मिलानच्या घरी आलो.
एंजेलिना वाट बघत उभी होती. मी आत गेल्यावर ती मला बिलगली आणि तिने माझे एक ओझरते चुंबन घेतले. मी पण तेच करणार तेवढ्यात मिलानचा खाकरल्याचा आवाज आला आणि आम्ही बाजूला झालो. तो तेथेच विलफ्रेडचे पिस्तूल हातात घेऊन उभा होता.
मिलानने हसत ते भरलेले पिस्तूल माझ्यावर रोखले आणि मला त्या खटल्याच्या खोलीत जायची खूण केली.
“समजा आपल्याल त्याला मारावे लागले असते तर आपण काय केले असते ?” मिलोने विचारले.
“मला वाटते पहिल्यांदा आपण त्याला आत्महत्येची संधी दिली असती. समजा त्याला तो तयार झाला नसता तर आरोपीचा वकील म्हणून मी आणि फिर्यादीचा वकील म्हणून तू, असे आपल्या दोघांना ते करावे लागले असते”.
“मला वाटते केव्हा ना केव्हा तरी पोलिस आपल्याला पकडतीलच” मिलान म्हणाला.
मी ही त्याची नक्कल करत म्हणालो “पण तेच कायदेशीर आहे”
“पण ते पकडून काय करणार ?’ मिलान म्हणाला
“माझा एक मित्र आहे मार्क्विस नावाचा त्याला नवीन नवीन वाक्ये रचायचा छंद आहे. तो नेहमी म्हणतो ’ब्लॅक माणूस नेहमीच स्वत: बरोबर बेड्या वागवतो जणू काही त्या सोन्याच्याच आहेत. या बेड्या त्याने तोडल्या तर त्याला सरळ उभे रहात येईल असे तो नेहमी म्हणायचा. मग त्याच्या आयुष्यात काहीतरी फरक पडेल”.
“पडलाय का आपल्यात तो ?” मिलानने विचारले.
“वॅनीटाला घर मिळाले, बेल्सला नोकरी. विलफ्रेडचा जीव वाचला. कायदा आपले संरक्षण करतो या भमातून आपण बाहेर पडलो हे सगळ्यात महत्वाचे !”
मिलानने एक मंद स्मीत केले आणि ते पिस्तूल उचलले.
“आता एंजेलाबद्दल” मिलान म्हणाला. माझ्या छातीतील ह्रदयाची धडधड वाढलेली मला जाणवू लागली. मी माझ्या सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवली.
“”दोन महिन्यात ती १८ पूर्ण करेल” माझ्यावर पिस्तूल रोखून तो म्हणाला “आता तुला तिच्याशी लग्न करायचे असेल तर मी तुला गोळी मारणार नाही”…असे म्हणून त्याने ते पिस्तूल माझ्या हातात दिले आणि आम्ही दोघे मोठयाने हसलो.
१०
विलफ्रेडला अटक झाली पण त्याच्या विरूद्ध कसलाच पुरावा मिळाला नाही. वॅनिटाने शपथपूर्वक ती तेथे नव्हती हे सांगितले आणि ममा जीनाने ती त्या रात्री ती तिच्या बरोबर झोपली होती अशी साक्ष दिली. विलफ्रेड त्यांना भेटायला त्या रात्री त्यांच्याकडे आला होता हेही त्या दोघींनी शपथपूर्वक सांगितले.
ते पिस्तूल मी सिलाला दिले आणि जर विलफ्रेडने पुढे वॅनिटाच्या बाळाला पैसे नाकारले तर तिने ते पोलिसांना खुशाल द्यावे असे सांगितले.
त्या दिवसापासून आमच्या वस्तीत बरेच बदल घडत गेले. कुठल्याही कोकेनवाल्याला येथे बस्तान बसवता आलेले नाही आणि पोलिसांच्या आता धाडीही पूर्वीसारख्या पडत नाहीत अर्थात गुन्हेगारीचे प्रमाणही कमी झाले आहे.
एंजेलाने आणि मी काही काळ एकत्र रहायचा प्रयत्न केला पण आमचे काही जमले नाही. आम्ही अजूनही एक चांगले सच्चे मित्र आहोत. तीही पुढे शिक्षिका होण्यासाठी आक्राला गेली. मी तिच्या मुलाचा गॉडफादर आहे. मधे एकदा ती सिलाच्या अंत्यविधीच्या वेळी भेटली होती.
अर्थात कधी अधेमधे भेट होती जेव्हा मिलान तिला “न्यायवर्तुळात” न्याय द्यायला आमंत्रण देतो तेव्हा…
पण क्वचितच !
समाप्त.
हंऽऽऽऽ म्हणजे तू पोलिसांकडे जाणारच नव्हती तर……” मी म्हणालो.
वॅनिटा खाली बघत गप्प राहिली.
“इथे न्याय मिळेल असे वाटले होते मला.” वॅनिटा म्हनाली.
त्याच क्षणी मला मिलानचा न्यायालयाचा हा नवीन प्रयोग किती गुंतागुंतीचा आणि अवघड आहे ते कळून चुकले……..
पुढे……………
८
“विलफ्रेड अर्ना, लार्क थाईन्सचा तू विचारपूर्वक आणि शांत डोक्याने हत्या केली हा आरोप तुला मान्य आहे का ? “ मी ...
‘लिडकॉम’ (LIDCOM)ची 'मुदत कर्ज योजना'ही केंद्र पुरस्कृत योजना'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)'यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
मुदत कर्ज योजना उद्देश :महामंडळामार्फत, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC), नवी दिल्ली या महामंडळाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ अनुसूचित ...
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
शाळांतून बाद होतेय बाराखडी आणि अंकलिपी
औटकीसहित सगळे पाढे जातायत विस्मरणात
समोर येत नाहीत आता आधीसारखे
खाटीक, कसाई आणि पालखीचे भोई
हरवत चाललाय किराणा आणि भुसारा
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची ...
मुंबई, दि. 19 मे : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या 'माऊंट एव्हरेस्ट'वर यशाची पताका फडकविणाऱ्या महाराष्ट्राच्या गिर्यारोहकांचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.श्री. भुजबळ यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, पुण्याच्या टेकराज अधिकारी, कृष्णा ढोकळे, आनंद ...
मुंबई, दि. 19 मे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाश मोहाडीकर यांच्या निधनामुळे समाजवादी विचारसरणीचे एक कृतीशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रकाशभाई मोहाडीकर यांच्यावर साने ...
१. देवा तुला शोधू कुठं ? डाऊनलोड ‘लिडकॉम’ (LIDCOM)ची 'सुक्ष्म पत पुरवठा योजना'ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)'यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
सुक्ष्म पत पुरवठा योजना
उद्देश :या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना 5टक्के व्याज दराने रु.25,000/- पर्यंत अर्थ सहाय्य दिले जाते. या ...
कवितांची बंदुक करावी ,
त्यात वेग वेगळ्या भावनांच्या कविता,
गोळ्या म्हणून भराव्या ,,
शरीरापेक्षा जास्त त्या मनाला भिडाव्या ..
अन हवे तेव्हा हव्या तशा झाडाव्या..
एक गोळी झाडावी ,
हिच्या गोल गोब-या गालावर ..
खळीतुन घसरुन ती..
नथीत जाउन अडकावी..
आणि नथ उतरवुन ..
हिरव्या कच्च श्रुंगारात नहावी ..
त्यातुन मग वंशवेल बहरावी..
एक गोळी झाडावी तीच्या ...
सकाळी बोरिवलीहून वसईला निघालो. एकटाच असल्याने तयारी लवकर आटपली. सुदैवाने एक नंबरच्या फलाटावर वसई जलद लोकल गाडी मिळाली. सकाळची वेळ, मधल्या स्थानकांवर न थांबता सुसाट धावणारी लोकल, सारे काही प्रसन्न वाटत होते. नंतर मग जाणवले सर्वजण शांत विचारात गढून गेले आहेत. माणसाचं असंच असत, कधी अशी शांतता मिळाली की आपण सारे विचारात मग्न होतो. त्या डब्यात सर्वजण ...
माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या एका सर्वसाधारण शाळेमधून झाले. आमच्या वर्गात सधन म्हणता येतील अशी मुले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असावीत. बहुतेक मुले कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा गरीब घरांमधली होती.
अरे भाई ये सिवा कब हात आयेगा खुदा जाने. बहलोल खानच्या सैन्यातील माहूत एकमेकांशी बोलत गजराजाला पाणी पाजण्यास न्हेत होते. अचानक आजूबाजूच्या झाडाफांदीवरील पाखरे उडाली इकडे तिकडे नजर फिरवताच लक्षात आले की मराठ्यांनी चारही बाजूने आपणास मराठ्यांनी घेरल्याचे लक्षात आल्यावर ती माहूत मंडळी जोरजोरात बोंबलू लागली. साऱ्या सैन्याचे लक्ष वेधू लागली. ...
माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या एका सर्वसाधारण शाळेमधून झाले. आमच्या वर्गात सधन म्हणता येतील अशी मुले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असावीत. बहुतेक मुले कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा गरीब घरांमधली होती. माझ्यासारखी वरिष्ठ मध्यम वर्गातील मुलेही वर्गात थोडीच होती. बहुतेक मुले, पुणे शहरातील जुन्या वाड्यांमधील एक किंवा दोन खणांच्या बिर्हाडात भाड्याने ...
माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या एका सर्वसाधारण शाळेमधून झाले. आमच्या वर्गात सधन म्हणता येतील अशी मुले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असावीत. बहुतेक मुले कनिष्ठ मध्यम वर्ग किंवा गरीब घरांमधली होती. माझ्यासारखी वरिष्ठ मध्यम वर्गातील मुलेही वर्गात थोडीच होती. बहुतेक मुले, पुणे शहरातील जुन्या वाड्यांमधील एक किंवा दोन खणांच्या बिर्हाडात भाड्याने रहात असलेल्या कुटुंबातील होती. काही जण तर अगदी ग़ोठ्यांलगत असलेल्या एखाद्याच खोलीत रहाणार्या गरीब घरांतील सुद्धा होती. माझ्या एका मित्राची आई उदबत्या वळून कुटुंबाला हातभार लावत असल्याचे मला चांगले स्मरते आहे. वर्गात असलेल्या चाळीस पन्नास मुलांच्या पालकांच्या आर्थिक स्थिती मधली ही तफावत मला आज जाणवते आहे. त्या वेळेस ती कधीच जाणवली नव्हती. जुन्या वाड्यातील एका खणाच्या खोलीत रहाणार्या वर्गमित्राच्या घरी जाताना कधी संकोच वाटल्याचे मला आठवत नाही. घरच्या आर्थिक परिस्थिती मधला फरक शाळेत गेल्यावर कधी जाणवलाच नाही याला बहुदा दोन तीन कारणे असावीत.
एकतर शाळेचा गणवेश म्हणजे पांढरा हाफ शर्ट व खाकी चड्डी हा असे. शाळा मुलांची असल्याने फॅशन हा शब्दही आमच्या ज्ञान कोषात नव्हता. बहुतेकांच्या डोक्यावरचे केस अलीकडे क्रू कट म्हणतात त्या धर्तीवर कापलेले असत. असे केस कापल्याने केश कर्तनावरचा खर्च शक्य तेवढ्या लांबणीवर टाकता येईल हा विचार या कट मागे असावा. पायात पादत्राण म्हणजे चप्पल किंवा जास्तीत जास्त सॅन्डल. बूटांची वगैरे फॅशन त्या वेळेस फारशा कोणाला परवडण्यासारखी नव्हतीच. या शिवाय शाळेत न्यायच्या डब्यात पोळी-भाजी हाच मेन्यू सर्वांचा असे. ग्राऊंडवर सगळे खेळ अनवाणीच खेळले जात. आता या अशा सगळ्या परिस्थितीत हा गरिबाघरचा किंवा हा सधन कुटुंबातील असा काही भेद दिसतच नसे. त्याच प्रमाणे तेंव्हा अगदी टोकाची परिस्थिती असल्याशिवाय पालकांना शाळेत बोलावत नसत. त्यामुळे याचे वडील सायकल वरून आले, त्याचे फटफटी वरून, हे समजण्यासही वाव नसे. तसेच बडी असल्यामुळे एकाची आई फॅशन करते तर दुसर्याची अगदी साधी सुधी राहते असाही काही भेद-भाव नसे. थोडक्यात म्हणजे वर्गात अनेक प्रकारच्या आर्थिक स्थितीतील मुले असल्याची जाणीव आम्हाला तरी कधी शाळेत असताना झाली नाही.
हे सगळे भारूड आज मनात येते आहे ते नवीनच मंजूर झालेला शिक्षण हक्क कायदा व त्या कायद्याची सुलभ अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने, सरकारी मदत घेणार्या किंवा न घेणार्या अशा सर्व शाळांमध्ये 25टक्के तरी मुले ही समाजाच्या दुर्बल घटकातील असलीच पाहिजेत, या स्वरूपाच्या काढलेल्या एका आदेशामुळे. मी शाळेत असताना समाजाच्या सर्व स्तरांमधील मुले एकाच शाळेत जात. त्यामुळे 25काय, 50टक्के मुले सुद्धा समाजाच्या दुर्बल घटकांतीलच बहुदा शाळेत असण्याची शक्यता मला वाटते आहे. मग आताच असे काय झाले आहे की ज्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हा आदेश काढण्याची जरूरी भासते आहे?
याचे एक प्रमुख कारण म्हणजे समाजातील स्तरांचे आर्थिक परिस्थितीनुसार होत चाललेले, अधिक अधिक धृवीकरण, हे आहे असे मला वाटते. हे धृवीकरण तीव्र होत असण्याची कारणे तर इतकी भिन्न आणि परस्पराविरोधी आहेत की या विरोधी कारणांनी धृवीकरणाची प्रक्रिया मात्र अधिक तीव्रच कशी होत चालली आहे हे अभ्यासणे मला मोठे रोचक वाटते आहे.
समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून भारतातील मध्यवर्ती व राज्य शासनांनी आरक्षणाचे अनेक कायदे केले आहेत. दुर्बल किंवा वंचित घटकांना याचा फायदा जरूर मिळाला आहे पण या आरक्षणामुळे समाजातील सबळ घटकांपुढे असणार्या संधींमध्ये एकदम घट झाली आहे. उदाहरणार्थ आपण अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागांची परिस्थिती पाहू. या जागांवर आरक्षण आल्यामुळे सबळ घटकाला उपलब्ध असलेल्या जागा कमी झाल्या. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाला प्रचंड मागणी व शिक्षण देणार्या संस्था कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा फायदा घेत काही नेते मंडळींनी खाजगी अभियांत्रिकी कॉलेजे काढण्यास सुरूवात केली. या कॉलेजात विद्यार्थ्यांस द्यावे लागणारे शुल्क एवढे अफाट ठेवण्यात आले की या संस्था समाजातील फक्त सबळ घटकांच्यासाठीच आहेत असे दिसू लागले आहे. म्हणजे सरकारी अभियांत्रिकी संस्था आरक्षित घटकांसाठी, तर खाजगी संस्था सबळ घटकांसाठी, असे एक नवीन वर्गीकरणच झाले आहे. अभियांत्रिकी संस्थांमध्ये जे घडले आहे ते शिशू शाळांपासून सर्व शिक्षण संस्थांमध्ये घडते आहे.
माझ्या पिढीमध्ये शिक्षणाचे सर्वसाधारण माध्यम मराठी हेच होते. समाजाचे दुर्बल घटक, सबळ घटक हे सर्व मराठी माध्यमातूनच शिक्षण घेत. मराठीतून शिकलेल्या माझ्या परिचितांनी सर्व क्षेत्रांतील मानाची स्थाने भूषविली आहेत. परंतु 1970च्या नंतर परिस्थिती बदलली. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, यासारख्या कारणांनी, समाजातील सबळ घटकांना असे वाटू लागले की आपल्याला उज्वल भविष्य प्राप्त करून घ्यायचे असले तर यापुढे मराठी शिक्षण फारसे उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे सबळ घटकांमध्ये इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेणे ही गोष्ट अनिवार्य होत गेली. परिणामी समाजातील दुर्बल घटक मराठी शाळेत व आपले अलग अस्तित्व ठेवण्यास उत्सुक असलेल्या सबळ घटकातील मुले, इंग्रजी शाळेत असे वर्गीकरण सुरू झाले.
गेल्या काही वर्षात सबळ घटकांच्या या इंग्रजीमधून शिक्षण देणार्या संस्थात, पालकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणखीनच उप-वर्गीकरण झाले आहे. अती श्रीमंत मुलांसाठी असलेल्या शाळांपासून ते मध्यमवर्गीय मुलांसाठीच्या शाळा, अशा निरनिराळ्या प्रकारच्या इंग्रजी शाळा निर्माण झाल्या आहेत. या संस्थांचे, मुलांच्या आर्थिक परिस्थितीनुसार वर्गीकरण झालेले असल्याने, शाळांच्या शुल्कात असलेला आश्चर्यकारी फरक, या प्रत्येक शाळेतील व्यवस्थापन पद्धती, शालान्त परिक्षा घेणारी संस्था, शाळेतील वातावरण, सहलीची ठिकाणे यातही प्रचंड भिन्नता आली आहे. उदाहरण द्यायचे असले तर दर सहामाहीला या शाळा 6लक्ष रुपयांपासून ते 25000 रुपयांपर्यंत कोणतेही शुल्क आकारत आहेत. काही शाळा पंचतारांकित हॉटेलांसारख्या वातानुकुलित सुद्धा आहेत तर काहींमध्ये पंख्यांचाही अभाव आहे. काही शाळा परदेशात सुद्धा मुलांच्या सहली नेत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील या धृवीकरणाचा परिणाम म्हणजे श्रीमंतांसाठी असलेल्या इंग्रजी शाळा या अतिशय Elitist, अलग किंवा Exclusive होत चाललेल्या आहेत. त्या शाळेत शिकणार्या मुलांशी जर आर्थिक समता असली तरच या शाळेचा विचार करा असा स्पष्ट संदेश या शाळा इच्छुक पालकांना देत आहेत असे दिसते. मागच्या वर्षी आमच्या शाळेतील बॅचच्या मुलांचे एक माजी विद्यार्थी संमेलन आम्ही भरवले होते. त्या वेळेस शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापकांनी आता शाळेत असणारे विद्यार्थी फक्त समाजाच्या कनिष्ठ गटातूनच येत असल्याची खंत आम्हाला बोलून दाखवली होती. आमच्या शाळेने आता मराठी माध्यमाचीच पण सरकारी मदत न घेणारी अशी दुसरी समांतर शाळाच आता आर्थिक दृष्ट्या जास्त सबळ पण मराठीतून शिक्षण घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी काढली आहे. अर्थात असे विद्यार्थी फारच विरळा आहेत ही गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आर्थिक वर्गीकरण झालेल्या शिक्षण क्षेत्रातील या संस्थांची मोठीच पंचाईत होणार आहे याबाबत माझ्या मनात तरी काही शंका नाही. पुढे येणार्या अडचणींमध्ये, आर्थिक अडचण तर आहेच. प्रवेश दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे राज्य शासन या संस्थांना दहा ते पंधरा हजार एवढी रक्कम बहुदा देईल. परंतु या शाळा, विद्यार्थ्यांकडून घेत असलेले शुल्क व ही रक्कम यात असलेला फरक इतर विद्यार्थ्यांचे शुल्क वाढ्वून या संस्थांना बहुदा भरून काढावा लागेल.
आर्थिक अडचणीचे निराकरण जरी करता आले तरी या शाळांची सर्वात मोठी अडचण या दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिल्यावर या शाळांची अलगता ( Exclusivity or Elitist nature) कशी टिकवता येईल ही आहे. केवळ या अलगतेमुळे या शाळा एवढे भले थोरले शुल्क आज आकारू शकत आहेत. त्याच प्रमाणे या शाळेत शिकत असलेले इतर विद्यार्थी व दुर्बल घटकातील विद्यार्थी यात समता कशी राखली जाईल, वर्गात व शाळेत दोन गट पडणार नाहीत याची काळजी या शाळा कशा घेणार आहेत? हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पालकांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे शाळांचे झालेले वर्गीकरण सौम्य होऊन त्यांच्यातील भिन्नता जर कमी होऊ शकली तर या क्षेत्रात अतिशय आवश्यक अशी एक सुधारणा होऊ शकेल असे मला वाटते.
19 मे 2012
एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......'ए आपण असे कसे रेना रंग, ना रूप,नेहमीच चिडीचुप,आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,कोणीच कसे नाही थांबवत ...
कुमार गंधर्वांचा गाणं ऐकणं ही एक आनंददायी गोष्ट. अनेकदा त्यांनी लावलेला "सा" अंगावर काटा आणतो, रोमांचित करतो. एखादी पावसाळी संध्याकाळ. त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम, अगदी कमी उपस्थिती, पण तुमच्या सुदैवाने ते मात्र कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहचले आहेत. त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे कितीही कमी लोक असले तरी ते गाणं सुरु करणारच. बाहेर कोसळणारा वरुण आणि आत ही बरसात. अगदी ...
दहावी..
एस.एस.सी.,मेरीट, बोर्ड, परिक्षा, सराव, प्रश्नसंच, व्याकरण, सिद्धता, प्रमेये, समीकरणे, रासायनिक सूत्रे, पाठांतर आणि काय काय.. दहावीच्या वर्षाचा एक ही दिवस असा गेला नाही की या शब्दांशिवाय माझ्या कानावर दुसरं काही पडलं असेल.. माझ्या अभ्यासाच्या खोलीत पुस्तके, वह्या, अपेक्षित प्रश्नसंच, व्यवसाय यांचा अक्षरशः खच पडला होता. घरी येणारा जाणारा, पाहुणे, नातेवाईक जो ...
आजच्या महाराष्ट्र टाइम्सनुसार रामदेवबाबांच्या ट्रस्टला ITची नोटीस मिळालेली आहे.
बातमीत लिहिल्याप्रमाणे -
गेली ८-१० वर्षे महाराष्ट्रातील काही ‘मराठावादी’ घटक हिंदु समाजात दुफळी माजवण्याकरता निश्चित दिशेने आणि वाढत्या प्रमाणावर अन् अधिकाधिक तीव्रतेने काम करत आहेत. त्यांचे प्रयत्न बर्यापैकी सफल होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या या प्रयत्नांच्या किंवा त्यामागील हेतूंच्या गांभीर्याचे आकलन महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला किंवा संघटनेला ...
देव-देवतांच्या आधारे—फलज्योतीष्याचे बळ सारे|दुकान थाटून बसले कोणी—स्वतःस श्रेष्ठत्तम जाणोनी|गुलाम होईल ऐशा ज्ञाना—जनतेमध्ये पसराविताना|लाज मुळी मानसी न काही—फक्त हित अपुलेच पाही| कशी रीत ती चला पाहण्या—ऐकून घेऊ सतर्क होण्या|
किती आजवर केले भाकीत—वेळ ती येता बसले झाकीत|
देव-देवतांच्या आधारे—फलज्योतीष्याचे बळ सारे|दुकान थाटून बसले कोणी—स्वतःस श्रेष्ठत्तम जाणोनी|गुलाम होईल ऐशा ज्ञाना—जनतेमध्ये पसराविताना|लाज मुळी मानसी न काही—फक्त हित अपुलेच पाही| कशी रीत ती चला पाहण्या—ऐकून घेऊ सतर्क होण्या|
किती आजवर केले भाकीत—वेळ ती येता बसले झाकीत|
Filed under: ...
छगनभुजबळयांचेअधिकाऱ्यांनानिर्देश
मुंबई,दि.18मे:आगामीपावसाळ्यातवाहनांचीकोंडीहोऊनये,यासाठीसार्वजनिकबांधकामविभागाच्याअखत्यारीतीलराज्यभरातीलसर्व ...
जगातील मोठ्या घोट्याळ्यांपैकी दोन नबंरच्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना पंधरा महिन्यांनंतर पहिल्यांदाच मोकळे आकाश दिसले म्हणून जो आनंद झाला असेल,त्याहीपेक्षा त्यांच्या सुटकेने त्यांच्या अनुयायांना झालेला हर्षवायू अधिक केविलवाणा होता.काल वृतपत्रातून ए.राजा याना ओवाळल्याचा फोटो प्रसिध्द झाला आहे.जसे काय हे ...
हे खेळ संचिताचे …..!
काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला
सर्वसाक्षी तू म्हणाला “सर्वमय आहेस तू”
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मुक्त पान्हा चोरला
तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला?
पाठराखा का मिळेना, का मिळेना ...
काल आरोंदा इथल्या लोटस
बॅकवॉटर रिसॉर्ट मध्ये आलो तेव्हाच विठ्ठल कामतांचं कौतूक वाटलं होतं. किरणपाणी
गावात, तिराकोल नदी किनारी, रम्य वातावरणात हे सुंदर रिसॉर्ट बांधलं आहे. इथे
आम्हाला गावचं हरवत ...
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “अ डे अॅट बीच”
पार्श्वभूमी:
उन्हाळ्याचा तडाखा वाढतो आहे, मस्त समुद्रकिनार्यावर जाऊन पाण्यात डुंबावेसे वाटते आहे. डुंबता डुंबता मध्येच घसा ओले करणे ओघाने येतेच. पण तुम्हाला समुद्रकिनारी जायला जमणार नसेल तर आजचे कॉ़कटेल तुम्हाला समुद्रकिनार्याची आभासी सफर घडवून आणेल त्याच्या नुसत्या नावानेच.
मालिबू बेस्ड हे ...
बळीराजाचे स्वप्न सारे
क्षणात धुळीला मिळत असते.
उठसूठ ‘बळी’जाण्याची सजा
राजा बळीला मिळत असते.
मनात आले तर हाती खुट्टॆ ...
“आम्ही त्यालाही बोलून देणार आहोत वॅन” मी म्हणालो.”त्याचीही बाजू ऐकून घ्यावीच लागेल. त्याचे बोलणे झाल्यावर तुलाही काय झाले हे सांगायची संधी मिळणारच आहे”.
एंजेलाने तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात तिचे हात टाकले आणि तिला शांत केले.
“विलफ्रेड बोल लवकर”
तो उठला आणि त्याने माझ्या डोळ्याला त्याची नजर भिडवली. त्याच्या पुढची कहाणी त्याने मलाच उद्देशून ...
“आम्ही त्यालाही बोलून देणार आहोत वॅन” मी म्हणालो.”त्याचीही बाजू ऐकून घ्यावीच लागेल. त्याचे बोलणे झाल्यावर तुलाही काय झाले हे सांगायची संधी मिळणारच आहे”.
एंजेलाने तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात तिचे हात टाकले आणि तिला शांत केले.
“विलफ्रेड बोल लवकर”
तो उठला आणि त्याने माझ्या डोळ्याला त्याची नजर भिडवली. त्याच्या पुढची कहाणी त्याने मलाच उद्देशून सांगितली……………
पुढे……..
“मागच्या गुरवारी मी घरी आलो तेव्हा कोणीतरी सांगितलं, कोणी तेही माझ्या लक्षात नाही, की माझ्या मेलेल्या भावाची मुलगी, जोसेट्टे छतावरून पडली. नंतर त्यांनी सांगितले की ती मेली. पोलिस आले होते, रुग्णवाहिका आली पण शेवटी राहिले काय तर त्या रस्त्यावरचा तो काळपट रक्ताचा सडा आणि शेवटी त्याचे वाळलेले डाग. तो ही त्या दिवाणजीने पाण्याने मगाशीच धुवून टाकला. माझ्या मेलेल्या भावाची मुलगीही मेली. तिला माझ्या आणि लिंडाबरोबर रहायचेच नव्हते. लिंडा गेल्यावर तर ती माझ्याशी शत्रू असल्यासारखीच वागायची. मी तिला त्या जी ६ मधे जाताना नेहमी बघायचो. झोकांड्या खात ती खाली यायची हेही बघायचो. नंतर तिला मी या वस्तीतल्या अंधार्या कोपर्यावर उभी असताना बघायचो आणि तिच्या मागे पॅंटच्या चेन लावत येणारे तरूणही बघायचो.
पोलिसांनी मला तीन दिवस काय झाले आहे याचा थांगपत्ता लागू दिला नाही. ती माझी नातेवाईक आहे हे त्यांनी मलाच सिद्ध करायला सांगितले. आता ते मी कसे करणार होतो ? शेवटी मी आपल्या मंत्र्यांना त्यांच्याशी बोलायला सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले की तिने आत्महत्या केली. कसे शक्य आहे ते ? मी त्यांना घसा खरवडून सांगितले की लार्क थाईन्सने आणि त्याच्या कोकेननेच माझ्या पुतणीचा खून केलाय. त्यानेच तिला धंद्याला लावली……..
क्षणभर वाटले तो आता रडतो की काय पण त्याने स्वत:ला सावरले आणि त्याने त्याची कहाणी पुढे चालू ठेवली….
“शेवटी मी एक पिस्तूल पैदा केले आणि माझ्या पुतणीने जे सांगितले तसेच केले. मी त्याचा दरवाजा ठोठावला आणि त्याला म्हणालो की मला थोडे क्रॅक कोकेन पाहिजे आहे. त्यांच्यात असेच म्हणतात. तो माझ्याकडे बघून हसला आणि तो मागे वळाला. त्याची पाठ दिसताच मी सरळ गोळ्या झाडायल सुरवात केली. तो एका बाजूला पळाला मी तेथेही त्याला गोळी घातली तो दुसर्या बाजूला पळाला तेथेही मी त्याला गोळी घातली. मी गोळ्या संपेतोपर्यंत ते पिस्तूल चालवले. पण तो अजून हलतच होता. मी ते पिस्तूल परत गोळ्यांनी भरले आणि ते त्याच्यावर रिकामे केले. त्याची हालचाल थांबल्यावर मी थांबलो. नंतर मी जिना उतरून खाली आलो आणि या अपार्टमेंटच्या समोर बसलो तेवढ्यात मि. मिलान ऑफिसला जायला निघाले.
तुला माहिती आहे मी थाईन्सची तक्रार घेऊन पोलिसांकडे कितितरी वेळा गेलो होतो. प्रत्येक वेळी ते त्याला अटक करायला जायचे आणि काहीच करायचे नाहीत. एक पोलिस तर म्हणाला की मीच ही वस्ती सोडावी.
मी सुधारगृहात जाऊन भेटलो, पण ते म्हणाले जोसेट्टे आता मोठी झाली आहे आणि तिला ताब्यात घेण्याचे सर्व सरकारी सोपस्कार होईपर्यंत ती १८ वर्षाची होईल.”
“तुला त्याला मारायचे होते का ?” मि विचारले.
“हो ! मला त्याला मारायचेच होते”
“जेव्हा तू त्याच्या घरी गेलास तेव्हा तू त्याला मारायचे हे ठरवून गेला होतास का ?”
“हो. ! मी तसेच ठरवले होते”
“त्याला मारल्यावर तुला बरे वाटले का ?” बेल्स पचकला.
एक क्षण विलफ्रेड गप्प बसला आणि मग त्याने मान हलवली.
“विलफ्रेड, तुला अजून काही सांगायचे आहे का ?” मी विचारले.
त्याने मान हलवून नकार दिला आणि तो खाली बसला. त्या खोलीतील सगळी माणसे त्या दु:खी माणसाकडे बघत होते. कोणी काहीच बोलत नव्हते. वॅनिटाही तिचा राग विसरून त्याच्याकडे दयार्द्र नजरेने बघत होती. ते बघून मला मोठी मौज वाटली.
६
“पण नालयका तू त्यांना सगळे सांगितलेले नाहीस. तू तिसर्यावेळी पिस्तूलात गोळ्या भरल्यास आणि ते माझ्यावर रोखलेस हे सांगितले नाहीस. सांगितलेस का ?” वॅनिटा म्हणाली.
मला आठवले की जेव्हा ते पिस्तूल माझ्या स्वाधीन केले तेव्हा ते भरलेले होते. त्या पिशवीत १४ रिकामी काडतुसेही होती. म्हणजे पोलिसांच्या हातात तो पुरावा लागू नये म्हणून ती गोळा करण्याइतका तो निश्चितच शहाणा होता म्हणायचा.
“हंऽऽ ते मी सांगायचे विसरलोच. पण ते मला एवढे महत्वाचे वाटले नाही”
“हो का ! पण तू ते भरलेस आणि माझ्या मागे आलास, खरे आहे की नाही ?”
“अरे देवा !” मिलोच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले. त्याने खेदाने मान हलवली.
“तुला त्यावेळी काही लागले तर नाही ? केन्याने विचारले.
“लार्कनंतर तो मलाही मारणार होता. त्याने माझा खालच्या मजल्यापर्यंत पाठलाग केला आणि माझ्या डोक्यावर पिस्तूल रोखले. तो चाप ओढणार तेव्हा मी मला बाळ होणार आहे हे सांगितल्यावर तो थांबला नाहीतर मेलेच होते मी” वॅनिटा म्हणाली.
ते सगळे आठवून ती परत रडायला लागली.
“तूला दिवस गेले आहेत ?मिलानने विचारले.
“हो डॅडी, तिला दिवस गेले आहेत. मागच्या बुधवारी मीच तिच्याबरोबर डॉक्टरकडे गेले होते.” मिलानची मुलगी म्हणाली.
“ती म्हणतेय ते खरे आहे का विलफ्रेड ?” मी विचारले.
“तिला दिवस गेले आहेत याचा याच्यात काही संबंध नाही. ती तेथे आत होती आणि ती कोकेन विकायला लार्कला मदत करत होती म्हणून मी तिलाही मारणार होतो. पण तिच्या डोळ्यातील अश्रू बघून मला जोसेट्टेची आठवण झाली आणि माझ्या लक्षात आले की मी ते करू शकणार नाही”
“हंऽऽऽऽ चला सगळ स्पष्टच आहे आता” असे म्हणून रेग्गी उठला देखील. “या मुलीने त्याला खून करताना बघितले आहे आणि यानेसुद्धा कबूली दिली आहे. आता कायद्याला त्याचे काम करू दे”
“रेग्गी खाली बस. अजून संपलेले नाही” मिलान म्हणाला.
“का ?” रेग्गीने चिडून विचारले.
“कारण आपण एक खटला चालवतोय आणि तू निर्णय घेणार्यांपैकी एक आहेस. तू आम्ही येथे आहोत तो पर्यंत थांबणार आहेस.” मिलानने ठामपणे सांगितले.
रेग्गी खाली बसल्याचे पाहून मलाच आश्चर्य वाटले. तो त्याच्या धंद्याच्या दृष्टीकोनातून कायद्याच्या बाहेर होता. या लोकांना सगळे कायदे त्यांच्या विरूद्धच केले आहेत असे वाटते. पण विलफ्रेडची गोष्ट वेगळी आहे. या खटल्यानंतर अनेक महिन्यानंतर विचार केल्यावर रेग्गी का थांबला त्याचे उत्तर मला वाटते मला मिळाले. मिलानने त्याला बोलावून त्यांच्या समाजात एक स्थान दिले होते एका समुहाचे नागरिकत्व दिले होते जो समूह काय चांगले आणि काय वाईट हे स्वत:च ठरवणार होता.
“पण त्याने स्वत:च गुन्ह्याची कबुली दिली आहे” बेल्स म्हणाला. हा बेल्स हळुहळु माझ्या डोक्यात जायला लागला होता. मी शांतपणे म्हटले
“तो या खटल्याचा फक्त पहिला भाग आहे. आणि विलफ्रेडने तो खून, त्याच्या पुतणीचा खून झाला, म्हणून केलाय, हे विसरता येणार नाही.”
“लार्कने तिला मारले नाही” वॅनिटा ओरडली.
“त्याने तिला व्यसनाची ओळख करून दिली हे खरे आहे का ?” सिलाने वॅनिटाला विचारले.
“नाही ! जोसी त्या घरात पार्ट्यांसाठी यायची आणि लार्क तिला जे हवे होते ते विकायचा”
“पण त्याने तिला धंद्याला लावले हे तरी खरे आहे ना?” केन्याने विचारले.
“त्याने तिला कशालाच लावले नाही. त्याने काही तिला बांधून ठेवले नव्हते ना कोणी तिच्यावर बलात्कार केला. तो तिचा स्वत:चा निर्णय होता. तुम्ही आम्हाला त्यासाठी दोष देऊ शकत नाही. लार्क एक व्यापारी होता मि. सिम्स सारखा.
“छे ! मी काय कोकेनचा एजंट वाटलो की काय तुला ? मी लोकांना मदत करतो.”
“पण समजा तुमच्या त्या मेक्सिकन कामागारांपैकी कोणी आजारी पडला तर तुमच्या वर खापर फुटतं का ? वॅनिटाने वाद घातला.
“ती वेगळी गोष्ट आहे”
“का बरे वेगळी ? समजा त्यातील एखादा येथे येताना किंवा तुमच्याबरोबर येताना पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल का ? हा प्रश्न आहे.” रेग्गीने उत्तर दिले नाही कारण त्याला माहीत होते की तसे काही झालेच तर त्याचेही तेच म्हणणे असणार.
“आणि बेल्स, तू तर लार्कसाठी पूर्वी काम केलेले आहेस. तू तर स्वत: जोसेट्टेला ती धंद्याला लागायच्या आधी ती घाण विकली आहेस.
विलफ्रेडने मान उचलून बेल्सकडे बघितले.
“मग ?” बेल्सने बेफिकिरीने विचारले.
“लार्कने जोसीला मारले असे जर यांचे म्हणणे असेल तर तूही तेवढाच खूनी आहेस.” वॅनिटाने एक मुद्दा पुढे ढकलला.
“वॅनिटा या सगळ्यांना तुझे वय सांगतेस का ?” जिना गोअर्सने विचारले.
“माझ्या वयाचा इथे काय संबंध ?”
“दोन महिन्यापूर्वी तिला १४वे लागले आहे. मला माहीत आहे. कारण मी तिची गॉडमदर आहे”.
वॅनिटाने ऐकले मात्र, तिने आपली नजर त्या वर्तूळाच्या बाहेर खिडकीकडे लावली.
“तिच्या वयाचा येथे काय संबंध ?’” मी चर्चा परत मार्गावर आणण्यासाठी विचारले.
“लार्कने जोसीला कोकेनची सवय लावली आणि मग धंद्याला लावली असे जर तुमचे म्हणणे असेल तर तो असे इतर कोणाशी वागला आहे का हे बघायला लागेल. जर हा लार्क एका १३ वर्षाच्या मुलीबरोबर रहात होता आणि त्याच्या पासून तिला दिवस गेले असतील तर आणि ते सुद्धा अशा ठिकाणी जेथे कोकेन सर्रास विकले जात होते, तर ते सगळे विचारात घेतले पाहिजे”
चर्चच्या माणसाने मान डोलवली आणि होकारार्थी हूंकार भरला.
बेल्स जरा घाबरल्यासारखा वाटला.
“ठीक आहे मग आपल्याला जी ६ मधील लार्कच्या आयुष्याबद्दल चर्चा करावी लागेल. काही हरकत नाही.” मी म्हणालो.
७
लार्कच्या आयुष्याची चर्चा तासभर चालली असेल. सगळ्यांकडे लार्कच्या दादागिरीच्या कहाण्या होत्या. कोणाला त्याने भोसकले, कोणाला मारले, कोणाला त्याने कोकेनचा जास्त डोसही दिला होता…त्या वस्तीत एकूण चार मुलींनी व दोन मुलांनी कोकेनसाठी त्याला पैसा देण्यासाठी वेश्याव्यवसाय स्विकारला होता.
गंमत म्हणजे यात जे तरूण होते ते काही तक्रार करत नव्हते. वॅनिटा बोलायचा काही प्रश्नच नव्हता. एंजला गप्प होती आणि बेल्स त्या मेलेल्या माणसाच्या कहाण्या आणि त्याच्यावरचे आरोप गंभीरपण ऐकत होता.
“तुला अजून काही सांगायचे आहे का ? मी बेल्सला विचारले.
“खटला माझ्यावर चाललेला नाही” त्याने फटकन उत्तर दिले.
“तुला लार्क बद्दल काही सांगायचे आहे का असे विचारले मी”. मी म्हणालो. कारण जे सांगत होते त्यांच्या कहाण्यात त्याच त्याच गोष्टी आता परत येऊ लागल्या होत्या.
“लार्क बद्दल ?” बेल्सने विचारले.
“हो”
“माहीत नाही. तो कोकेनची दुकानदारी करायचा हे मान्य पण हे जे सगळे झाले त्यासाठी त्याला तुम्ही कसे जबाबदार धरणार आहात हे काही कळत नाही. पोलिस तर दर आठवड्याला त्याच्या येथे भेट देत होते पण कोणालाही अटक न करता परत जात होते. अर्थात जाताना ते पाकीट घेऊन जायचे तेही खरे आहे म्हणा”.
“तो सगळ्या पोलिसांना लाच द्यायचा का ? “ सिलाने विचारले.
“काहींना तो देत असे. सगळ्यांचे माहीत नाही. पण मला एक कळत नाही, त्याच्या त्या धंद्यावर पालिकेत कोणी आक्षेप घेत नाही तर तुम्ही इथे बसून कसा काय घेऊ शकता”. बेल्स म्हणाला.
नकळत रेग्गीची मान हलली.
“आणि तुम्हाला जर खोल चौकशी करायची असेल तर वॅनिटाच्या आईची पण करा. कदाचित तीही यात दोषी असेल”
“गप्प बस ! पुढे बोलू नकोस” वॅनिटा जोरात ओरडली आणि खुर्चीतून जवळजवळ उठलीच ती. एंजलाने तिला बळजबरीने खाली बसवले. एंजेलाची आणि माझी काही क्षणच नजरानजर झाली. आवडली मला ती….
“मग जीना काय म्हणायचे आहे तुला ?” मी विचारले.
“मला या विषयावर काही बोलायचे नाही पण त्या पोराला गप्प बसायला सांगा”
“नाही ! या खोलीत कोणालाच गप्प बसवता येणार नाही. सगळ्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे.” मिलान म्हणाला.
मिलानच्या आवाजातील प्रामाणिकपणा आणि आश्वासन बहुदा बेल्सला भावले असावे. त्याने तोंड उघडले.
“वॅनची आईसुद्धा लार्कच्या पहिल्या गिर्हाईकांपैकी होती. मला आठवतंय तीच पहिल्यांदा जी.६ वर आली होती. खरं सांगायचे तर सुरवातीला ती मलाच जी ६ वर कोकेन आणायला पाठवायची. कित्येक वेळा तिचे १० डॉलर हातात फडकवत मी जी ६ गाठली आहे. अर्थात तेव्हा मी लहान होतो. मग मला हे काम न सांगता ती स्वत:च तेथे जाऊ लागली. मी लार्कलाही अनेक वेळा तिच्या घरात शिरताना बघितले आहे तर तिला त्याच्या. वॅनिटाची आणि त्याची त्यामुळेच ओळख झाली.”
वॅनिटाने तिचे तोंड शरमेने तिच्या ओंजळीत लपवले. एंजेला माझ्याकडे गोंधळून बघत होती.
“म्हणजे वॅनिटाच्या आईने तिला त्या लार्कला विकली असे म्हणायचे आहे का तुला ?”
“नाहीऽऽऽऽऽऽ“ वॅनिटाने किंचाळून एंजेलाच्या खांद्यात आपले तोंड लपवले.
“नाही ! मला असे म्हणायचे नाही पण वॅनिटा जी ६ वर जायला लागली आणि तिच्या आईला कोकेन स्वस्त मिळायला लगले हे सत्य आहे”. बेल्सने सत्य दुसर्या, डाग न देणार्या शब्दात मांडले. त्याचे त्या क्षणी मला कौतूक वाटले. कशाला खोटे बोलू ?
मिलानच्या कपाळावर आजतागायत अशा आठ्यांचे जाळे मी कधीच बघितले नव्हते. या तुटलेल्या मनांच्या आणि वचनांच्या गुंत्यात तो हरवून गेलेला वाटला मला.
“वॅनिटा !” मी म्हणालो.
“हं”.
“बेल्स म्हणतोय ते खरंय का ?”
“समजा आहे. मी लार्कवर प्रेम करत होते. तसाच तो माझ्या आईसाठी खूपच तरूण होता”.
“तुझ्यासाठी वयाने मोठा !” केन्या तुटकपणे म्हणाली.
“या इथे माझ्या पोटात त्याचे बाळ आहे. मी लहान नाही. लार्कचे माझ्यावर प्रेम होते आणि माझे त्याच्यावर आणि या डुकराने त्याला ठार मारले. बस्स ! एवढेच खरे आहे.”
“मग तू पोलिसात का नाही गेलीस ?” रेग्गीने विचारले. जायला निघणारा रेग्गी आता त्या खुर्चीच्या काठावर उत्तेजीत होऊन बसला होता आणि या खटल्यात पूर्णपणे विरघळून गेला होता.
त्या बांधकाम कंत्राटदाराकडे बघत वॅनिटा क्षणभर स्तब्ध झाली.
“मला भीती वाटली……”
“का ? पोलिसांकडे जायचा तुला पूर्ण हक्क होता आणि आहे. त्याने तुझ्या मित्राचा तुझ्या डोळ्यासमोरच खून केला….”
“तिची आई लार्कच्याच एका मित्राकडे काम करत होती. पोलिसांनी तिला कुठल्यातरी अनाथाश्रमात किंवा महिलाश्रमातच नेले असते.” जीना म्हणाली.
“हंऽऽऽऽ म्हणजे तू पोलिसांकडे जाणारच नव्हती तर……” मी म्हणालो.
वॅनिटा खाली बघत गप्प राहिली.
“इथे न्याय मिळेल असे वाटले होते मला.” वॅनिटा म्हनाली.
त्याच क्षणी मला मिलानचा न्यायालयाचा व न्यायदानाचा हा नवीन प्रयोग किती गुंतागुंतीचा आणि अवघड आहे ते कळून चुकले……..
क्रमश :……
जयंत कुलकर्णी.
मी जरा थांबलो तू ही मागे वळून बघशील का?
संधिकालच्या धुंद क्षणांना पाऊस देशील का?
का निसर्ग तरीही हिरवळतो
तू नसता आजूबाजू
फळाफुलांनी बहरू बहरू
तुलाच तो बोलवतो
धुकाळल्याशा पहाटे पुन्हा चोरपावली येशील का?
चोरपावली येताना मग श्वास जरासे चुकशील का?
का लळा लावलास तू इतका
ह्या हिरव्या कातरवेळी
संध्याकाळ ही तांबूस पिवळी
घुटमळते की दाहीदिशा
पौर्णिमराती ...
मी गोगलगायीला म्हणालो,
तुझे व्यंगचित्र काढले आहे.
ती संथपणे म्हणाली,
त्यात काय विशेष घडले आहे?
मी चिथावणी दिली
निषेध कर,मोर्चा काढ.
भावना दुखावल्या म्हणीत
आज सकाळपासून शाहरुख च्या बेजवाबदारपणाच्या वागण्याच्या बातम्या पाहतोय .काल रात्री कलकत्याने मुंबईवर मात केल्यावर उन्मादाने दारू पिऊन शाहरुख ने धिंगाणा घातला ,सुरक्षा रक्षकांना ,अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली .कारण काय तर शाहरुख ला खेळ संपल्यावर मैदानावर जाण्यापासून रोखले .सुरक्षा राक्षकांपासून विलासराव देशमुखांपर्यंत सर्वांना शाहरुख ने येथेच्छ घातलेल्या शिव्यांचा परिपक ...
पुण्यातून अलाहाबादला चालले होते. मी नेहमी एकटीच प्रवास करते. पण त्या वेळी कधी नाही ते सोबत टीम होती. गप्पांच्या नादात स्टेशन कधी आलं ते कळलंही नाही. तिथून पुढे प्रतापगढला पोचलो. दुस-या दिवसापासून होणा-या प्रशिक्षणाची चर्चा करायला बसलो तेव्हा लक्षात आलं की माझा चष्मा मी ट्रेनमध्येच विसरून आले आहे. माझ्याभोवती सगळे 'साक्षर' लोक असल्याने पुढचा आठवडाभर माझ काही अडलं नाही. ...
सर्वप्रथम मी सर्व वाचकांची आणि पंकज ची माफी मागतो कारण हा ब्लॉग खूप आधीच यायला पाहिजे होता कारण तो विषयच तसा होता “उंच माझा झोका “झी मराठीवरील मालिका .
एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध – पारतंत्र्यातला भारत – बालविवाहांची प्रथा – असाच एक बालविवाह पुण्यात झाला. – मुलाने स्वतःच्या बायकोला शिक्षित करण्याचा ध्यास घेतला. मुलीने मराठी, इंग्रजी आणि बंगाली या तीनही भाषा आत्मसात ...
तुझे नि माझे नको तेवढे करार झालेबुडलो आपण, नाते अन् सावकार झालेइतकी अडचण झाली प्रेमापायी त्यांचीकितीक होकारही शेवटी नकार झाले!तुला नकोसा आहे हे माहीत असुनहीखुळ्या मनाशी हवेहवेसे विचार झालेकरून झाले ...
तुझे तुलाच अर्पण !
तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी
उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी
वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो
सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी ...
पावभाजी प्राजक्ताची आवडती डिश आहे.पावभाजी आज तयार करुया!....
पावभाजी
साहित्य-२कांदे बारीक चिरलेले, आले,लसुण,मिरची पेस्ट,पावभाजी मसाला,अमुल बटर,बनपाव ,शिजवलेले मटार व बटाटे,गोबी,नंतर कोथिंबीर चिरलेली, मीठ चवीनुसार व २चमचे तिखट,
कॄती- प्रथम बटर टाका व नंतर जिरे,मोहरीत आले ...
कारचं दार उघडताक्षणी बाहेरचा रणरणता उकाडा झपकन आत शिरून कारमधला एसीचा गारवा खाऊन टाकायला लागला. मी चटकन दार लावून घेतलं. उरलेलं कोक संपवलं आणि कारमध्ये बसूनच बाहेरचा अंदाज घ्यायला लागलो. मी रस्ता ...
आजच्या अर्थ विषयक बातम्यांनुसार जागतिक चलन बाजारात रुपयाची किंमत ढासळून प्रति डॉलरला ५४-५५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. १ जानेवारी २०११ रोजी प्रति डॉलर ४४.६७ वर असलेला रुपया आज डॉलरमागे ५४-५५ अशा किमतीवर घोटाळातो आहे.
आर्थिक महासत्तेची स्वप्ने बघणार्या जनतेला त्या स्वनात राहू देण्याचे कौशल्य असलेल्या अर्थ मंत्रालयाला आता त्यांचे खरे कौशल्य दाखवायची वेळ आली आहे. प्रत्येक ...
खरं सांगायचं तर या उत्तराच्या शोधात मी सुद्धा आहे. त्यामुळेच हा प्रश्न विचारणार्या व्यक्तीबद्दल मला प्रचंड सहानभूती वाटते .आत्तापर्यंतच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम मी या सह्याद्रीवर केलं, त्याच्या अंगाखांद्यावर पहुडलेल्या किल्यांवर केलं. (मला खात्री आहे माझ्या या विधानाचं, माझ्या बायकोलाही वाईट वाटणार नाही. ती ही माझ्यासारखीच भटकी आहे !) गेल्या ...
एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत ...