Last updated by Venus on 4th July 2009 at 5:29 a.m. CDT on behalf of अमित चक्रदेव
[Languages: Marathi|
Hindi|
Gujarati|
Telugu|
Kannada|
Tamil|
Malayalam|
Bangla|
Films:
Bollywood|
Abhi-Ash|
Aamir|
Hritik|
Salman|
Shahrukh|
Music:
ARR|
Sonu|
S.E.L.|
Vishal Shekhar|
Vishal Bharadwaj|
Himesh Reshammiya|
Misc:
FinanceIndia
]
Google Searches that landed here!
क्रान्तिची अजून एक कविता तिच्या नेहमीच्या लौकिकाला साजेल अशी आशयपूर्ण आहे.
अंत
फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरुन जावे,
पाचोळ्यापरी अंत नको
जगणे अवघड झाले तेव्हा
दिला सुरांनी जन्म नवा
जन्मांतरी हे सूर भिनावे,
नुसता कोकिळकंठ नको
रंग-रूप, रस-गंध साठवित
फुलाफुलावर ...
Posted by मी अत्त्यानंद on July 04, 2009 10:08 AM · permalink
दहावीचं 'कोडकौतुक' अजुन आठ-दहा दिवस चालेल. शाळेच्या आवारात तीनही टॉपर्स "डिस्को डान्स" करतानचा पाहून आमचे डोळे विस्फारले.
बोर्डाचा निकाल चार पाच वर्षापूर्वी सत्तर टक्क्यांच्याही आत लागायचा. आता तो ऐंशी टक्क्यांच्याही वर गेला आहे. याचा अर्थ मुले हुशार झाली म्हणण्यापेक्षा शालान्त परिक्शामन्डळच 'हुशार' झाले. अकरावी ओनलाइन प्रवेशाचा पूर्णपणे बोजवारा उडाला. औषधाचे व ...
Posted by S. P. DEO on July 04, 2009 09:25 AM · permalink
नोकिया N97 या नव्या मोबाईल फोनची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. हा मोबाईल गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाला खरा; पण ३५ हजार रुपये किमतीचा टॅग पाहून किती लोक त्याकडे वळतील याबद्दल शंकाच आहे. अर्थात, या मोबाईलची थेट स्पर्धा आयफोनशीच असणार आहे, त्यामुळे याची किंमत ३०-३२ हजारांच्या पुढे असेल, असे वाटत होतेच. कोणताही नवा मोबाईल बाजारात आला की तो घ्यावासा वाटतोच. एक-दोन ...
Posted on July 04, 2009 09:11 AM · permalink
Posted by धोंडोपंत (noreply@blogger.com) on July 04, 2009 07:58 AM · permalink
Posted by धोंडोपंत (noreply@blogger.com) on July 04, 2009 07:56 AM · permalink
Posted by धोंडोपंत (noreply@blogger.com) on July 04, 2009 07:56 AM · permalink
Posted by धोंडोपंत (noreply@blogger.com) on July 04, 2009 07:54 AM · permalink
Posted by धोंडोपंत (noreply@blogger.com) on July 04, 2009 07:53 AM · permalink
Posted by धोंडोपंत (noreply@blogger.com) on July 04, 2009 07:51 AM · permalink
Posted by धोंडोपंत (noreply@blogger.com) on July 04, 2009 07:40 AM · permalink
गोष्ट माझ्या आईची
(पितृ प्रेम मिळेल असे सगळे नशिबवान नसतात )
गोष्ट माझ्या आईची
शंभर रुपये कमवायला ती
आठ आठ km पाई पाई जायची
आज सांगतो गोष्ट
मी माझ्या हिम्मतवान आईची
माझ्या admission साठी तू
convent मध्ये गेली होती
donation ला पैसे नाही
म्हणून अपमानित झाली होती
"माझा मुलगा हुशार आहे
कोणी तरी या सिस्टर ला सांगा"
पाहिल्या आहेत वाहताना रात्र भर
तुझ्या डोळ्यातून ...
Posted by Sunil Jadhav on July 04, 2009 07:27 AM · permalink
अखेर 'लडाख'ची तयारी खऱ्या अर्थाने सुरु झाली. गेले महीने-दोन महीने २०-२५ मेल्स करून सर्व प्रकारची तयारी करण्यात वेळ जात होता. आता मात्र लडाखला बाइक वरुन जाणाऱ्या सर्वच्या-सर्व १३ जणांनी एकत्र राजमाचीला जायचे असे ठरले. सर्व बाइक रायडर्समध्ये ताळमेळ जमून येण्यासाठी १-२ बाइक ट्रिप्स कराव्यात असे आमचे ठरले होते. त्याची सुरवात आम्ही ६-७ जूनला राजमाची पासून केली. शनिवारी दुपारी मी ...
Posted by रोहन चौधरी ... on July 04, 2009 07:21 AM · permalink
४ जुलै १७२९ - सरखेल कान्होजी आंग्रे स्मरणदिन. समाधी स्थळ - ठुकराली नका, अलिबाग.
तुकोजी संकपाळ व बिम्बाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगाऱ्या धूपाऱ्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई / मथुराबाई कडून त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नाव ...
Posted by रोहन चौधरी ... on July 04, 2009 06:06 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 04, 2009 05:08 AM · permalink
परवाचीच गोष्ट. नेहमीप्रमाणे सकाळ वाचत होतो. वाचता वाचता टुडे पुरवणीकडे लक्ष गेलं. वाचून अक्षरश: उडालोच. मिपाकर क्लिंटन लिखित अर्थविषयक मालिका :
'पैशाची कहाणी 'अगदी जशीच्या तशी लिहीलेली!! लेखक जयराज साळगांवकर!! त्यामुळे द्विधावस्थेत सापडलो. क्लिंटन आणि जयराज साळगांवकर दोघेही आपल्यासाठी आदरणीय आहेत, त्यामुळे क्लिंटन व जयराज साळगांवकर एकच आहेत का इतकीच उत्सुकता!!
जाता जाता : मिपावर , कचर्यापासून खतनिर्मिती या चर्चेपासून प्रेरणा घेत, ठाण्यातील श्री कौस्तुभ ताम्हणकर यांच्या कचर्यापासून खतनिर्मिती या धडपडीविषयक माहिती आजच्या सकाळ टुडेत आहे.
Posted by अनंता on July 04, 2009 04:40 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 04, 2009 03:17 AM · permalink
मागील भाग -
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
"मी विचार करून एक-दोन दिवसात सांगते", मर्जिना म्हणाली.
"ठीक आहे पण जरा लवकर. फक्त बारा टेबलं आहेत, सांगितलय ना मी तुला? शेठ त्यापेक्षा जास्त मुलींना ठेवणार नाही", मायाने सूचक इशारा दिला.
"बरं. बघते आणि कळवते लवकरच", मर्जिना उत्तरली.
माया हीदेखिल मर्जिनाच्याच हॉटेलातील एक डान्सर. नृत्य काही फार चांगले करीत होती, असे नाही. दिसायलाही अशीतशीच. पण आवाज मात्र चांगला होता. बर्याच हॉटेलांनी, डान्स बंद झाल्यावर ऑर्केस्ट्रा बार सुरू केले आणि त्यातल्याच एका बारमध्ये माया लागली, गायिका म्हणून!
त्याच हॉटेलने पुढे पुरुष वेटर कमी करून मुलींना वेटर म्हणून ठेवायचा घाट घातला होता. त्यामुळेच डान्सबार बंद होऊन चार महिने झाले तरी घरीच बसणार्या मर्जिनासाठी मायाने हा प्रस्ताव आणला होता.
"लेकिन कोई गलत काम तो नही होता है ना वहां?", मर्जिनाने शंका काढली.
"अग, तसं असतं तर मी तुला सांगितलं असतं का? मला काय माहित नाही तुझ्याबद्दल?"
"बरं मी निघते आता आणि सांगते तुला लवकरच"
"उद्याच सांग. नाहीतर शेठ ठेवेल दुसरीला. एकच तर जागा रिकामी आहे"
"ठीक आहे"
मायाच्या घरून मर्जिना निघाली ती विचार करीतच.
प्रस्तावात काही वाईट दिसत नव्हतं. आणि खरोखरच माया म्हणते तसे गैरप्रकार होत नसतील तर काय हरकत आहे? संध्याकाळी सहाच्या सुमाराला जायचे ते दीड वाजता हॉटेल बंद होई पर्यंत. गिर्हाईकांना दारू आणून द्यायची आणि टेबलाजवळच उभे राहायचे. बील भरताना ते जी टीप ठेवतील ती आपली. रोजचे शंभर रुपये शेठला एन्ट्री फी म्हणून दिले की उरलेले आपलेच. डान्सबारमध्ये शेठ चाळीस टक्के कापून घेत असे, इथे तसे नाही.
विचारांच्या तंद्रीत ती जात होती.
"काजल, काजल"
हाक ऐकू आली तशी मर्जिना थांबली. पलिकडून स्वीटी हाक मारीत होती. रस्ता ओलांडून स्वीटी काजलकडे आली.
"कुठे निघालीस एवढ्या तंद्रीत", स्वीटीने विचारले.
"कुठे म्हणजे काय? घरी. आणि काय गं, आहेस कुठे? बरेच दिवसांनी दिसतेयस?"
"बरेच कुठले, परवाच नाही का तुला हात केला होता वर्तक नगरच्या नाक्यावर? हाच तर सूट घातला होतास तू. नाही का?", स्वीटी काहीशा छ्द्मीपणाने हसत म्हणाली.
"हं. बरं मी जरा घाईत आहे. निघते", असे म्हणून तिला टाळून मर्जिना घरी जाऊ लागली.
खरंच, चार महिन्यात एकही नवा कपडा घेतला नव्हता. ईदला घेतला होता तेव्हढाच. शौक करायला पैसे होतेच कुठे? साठवलेले केव्हाच संपले होते. मोठ्या हौसेने केलेले दागिनेही एक-एक करून मोडले जात होते. स्वीटीचं काय जातयं थट्टा करायला?
तिला गेल्या वर्षीची ३१ डिसेंबरची रात्र आठवली. मुलींची आणि पर्यायाने हॉटेलचीही सर्वात जास्त कमाई करून देणारी रात्र. हॉटेलमधे सर्वात जास्त कमाई - जवळजवळ एक लाख रुपये - मर्जिनाने कमवले होते. शेठनेही एक नेकलेस भेट म्हणून दिला होता तिला त्याबद्दल, जेमतेम पंचवीस हजार कलेक्शन केलेली स्वीटी काय जळफळली होती त्यावेळी.
"बरं बाबा, घाईत असशील तर जा. आणि ऐक तो प्रवीणशेठ विचारत असतो तुझ्याबद्दल", पुन्हा एकदा स्वीटी हसत हसत म्हणाली आणि रस्ता ओलांडून पलीकडे जाऊ लागली.
विचारांच्या तंद्रीतच मर्जिनादेखिल झपाझप पावले टाकीत घराकडे निघाली.
***
"मर्जिना, तुमि कामोन आछो?", धापा टाकत घरी आलेल्या मर्जिनाच्या चेहेर्याकडे पाहात नजमाने विचारले.
"भालो आछी", मर्जिना म्हणाली खरी, पण नजमा मावशीचा त्यावर विश्वास बसणे शक्यच नव्हते.
काहीतरी घडलं होतं खास. तिने पिच्छाच पुरवला तेव्हा मर्जिनाने तिला मायाने सुचवलेल्या कामाबद्दल सांगितले आणि त्याहूनही अधिक म्हणजे स्वीटीच्या छद्मी हसण्याबद्दलही.
"आमि की कोरबो?", शेवटी मर्जिनाने विचारले.
"काय हरकत आहे गं? हातपाय तर हलवायलाच पाहिजेत ना?"
"ठीक आहे मग. मायाला सांगते तसं".
*******
मोठा धीर एकवटून केलेल्या त्या फोनला आता दोन महिने होऊन गेले. तेव्हा तिने ईदचे कारण देत भेटायचे टाळले. तरी पुन्हा एकदा फोन करावा काय?
तो विचार करीत होता.
काय करीत असेल ती आता? का तेव्हा भेटायचं टाळलं तिने? खरेच टाळले का? कारण ईद तर होतीच. आपण ईदनंतर लगेचच फोन केला असता तर कदाचित भेटलीही असती.
पण भेटून करणार काय? काय बोलणार तिच्याशी? तिलाच काय पण आजवर असे कुठल्याच मुलीला भेटलो नाही आणि हिच्याशी तर आपण हॉटेलातदेखिल कधी बोललो नाही. मग आता काय बोलणार?
पण नाही. तिला बघावेसे वाटतेय. तिच्याशी बोलावेसे वाटतेय. हेही तितकेच खरे.
ठीक आहे तर. करून बघू पुन्हा एकदा फोन, असा विचार करून त्याने नंबर फिरवला.
*******
नव्या हॉटेलात येते असे सांगण्यासाठी तिने मायाला फोन केला. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत असताना तिला दुसरा एक फोन येत असल्याचा संकेत मिळाला. कुणाचा बरे फोन, असा विचार करीत तिने पाहिले, तर एक लॅन्डलाईन नंबर - अनोळखी.
वाजू दे, असे म्हणून ती पुन्हा मायाशी गप्पा मारू लागली. मधल्या काळात दोन-तीनदा त्या नंबरवरून फोन येऊन गेले.
मायाशी बोलणे झाले. आता परवापासून नवे हॉटेल आणि मुख्य म्हणजे नवे काम, जे पूर्वी कधीच केले नव्हते! कसे जमेल आपल्याला? जमेल ना नक्की? अगदी डान्सबार एवढे नाही तरी तीन-चारशे रुपये तरी मिळतातच रोजचे, असे माया म्हणत होती. तीन-चारशेही तशी काही कमी रक्कम नव्हतीच.
तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. तोच नंबर.
"हॅलो", मर्जिना फोन घेत म्हणाली.
"हॅलो, काजल?", पलीकडून आवाज आला.
"हां हां काजलही बोल रही हूं? आप कौन?"
"मैं...मैं..वो..तुमको फोन किया था ना ईद के पहिले...तुमने बोला बादमे करो..."
अच्छा! तर तो आहे तर, मर्जिना मनातल्या मनात म्हणाली.
"आप है किधर? कितने दिन के बाद फोन किया?"
"हां थोडं बिझी होतो कामात?"
"अच्छा? मग आता झालास का मोकळा कामातून?"
"हां. थोडं भेटायचं होतं"
"का? काही विशेष?"
"विशेष नाही...सहजच..."
"ठीक आहे", मर्जिना गालातल्या गालात हसत म्हणाली, "कधी भेटायचं मग? आत्ता?"
"आत्ता?" तो गडबडला.
"ठीक आहे, मग उद्या?", मर्जिनाने हसू दाबत विचारले.
"च..चालेल. पण कुठे?"
"मला काय? कुठेही चालेल. तलावपाळीवर?"
"काय? त..तलावपाळी?", तो उडालाच. त्याच्या ओळखीचे किमान पंचवीस लोक तिथे नक्कीच भेटले असते, "नको, तलावपाळी नको".
"ठीक आहे मग आमच्या एरीयात ये", मर्जिनाने सुचवले, "येशील?"
"पण म्हणजे कुठे?", त्याने विचारले.
"लोकमान्य नगर. माहित आहे?"
त्याला लोकमान्य नगर फक्त ऐकून ठाऊक होते!
"मग ठाकुर कॉलेजच्या इथे चालेल?", मर्जिनाने विचारले.
"ठाकुर कॉलेज?", आता हे ठाकुर कॉलेज कुठे आले ह्यच्या विचारात तो पडला.
"मग पासपोर्ट ऑफीस?", तिने सुचवले.
"हां, हां चालेल", त्याला हायसे वाटले. एक तर त्याला पासपोर्ट ऑफीस माहित होते आणि त्यातून रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याभागात त्याच्या ओळखीचे कोणी फिरकण्याची शक्यतादेखिल नव्हती!
"ठीक आहे मग. उद्या संध्याकाळी सहा वाजता"
"नक्की"
*******
"सगळे मिळून हे सात हजार झाले" लालवाणीने एक पाकिट चांदनीच्या हातात देत म्हटले.
"टॅक्सी येईलच आता तुला न्यायला", लालवाणी सांगत होता, "पुढे कधी प्रोग्राम असला तर कळवीनच"
"शुक्रीया साब", चांदनी म्हणाली.
"साब और एक बात कहनी थी...", बोलता बोलता चांदनी किंचित थांबली.
"बोलो क्या बात है?"
"साब. ते जरा माझ्या नवर्याच्या नोकरीचं तुम्ही बघणार होतात ना?"
"अरे हो हो, लक्षात आहे माझ्या. मी फोन करीन तुला बरं का?", तिला जवळ ओढीत लालवाणी म्हणाला.
त्याच्या केसाळ मिशा गालाला टोचल्या तशी ती शहारली. त्याचा तिच्या कमरेकडून नितंबाकडे जाणारा हात ती रोखणार तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला.
"साब टॅक्सी आली, मी जाते", त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली.
"ठीक है मेरी जान. तुझ्या नवर्याचं लक्षात आहे माझ्या. कळवीनच", टॅक्सीचा दरवाजा बंद करीत लालवाणी बोलला.
*******
त्याला पासपोर्ट ऑफिसजवळ येऊन जवळपास पंधरा मिनिटे होऊन गेली होती पण अजून काजलचा पत्ता नव्हता. आपण जे करतोय ते बरोबर की चूक हेही त्याला कळेनासे झाले होते. आजवर कुठल्याही मुलीला तो असा भेटला नव्हताच, त्यातून ही तर बारबाला!
ती आपल्याशी खेळ तर खेळत नाही ना? काय भरवसा असल्या मुलींचा? डान्स बार बंद झाल्यापासून पेपरात काय काय छापून येतय त्यांच्या बद्दल. खरंच असणार ते!
ती कुठेतरी दूर बसून आपली मजा पाहते आहे असे त्याला अनेकदा वाटून गेले! जाणार्या-येणार्या प्रत्येक बस आणि रिक्षातील प्रवासी आपल्याकडे माना वळवून बघत आहेत, असेही त्याला जाणवू लागले! नाक्यावरचा पाणीपूरीवाला तर केव्हापासून आपल्याकडे पाहात गालातल्या गालात हसत आहे, असा भास त्याला होऊ लागला!
तिला फोन करून पहावे का? पण मोबाईलवरून फोन नको. आपला नंबर तिला कळता कामा नये. एकतर नको त्या वेळी तिने फोन केला तर पंचाईत आणि दुसरे म्हणजे, न जाणो, ती कुठल्या लफड्यात असेल आणि पोलीसांनी तिला पकडले तर त्यांना आपला नंबरही मिळेल! नकोच ती भानगड! नाही नाही मोबाईलवरून फोन नाही पण जवळपास कुठे पब्लिक फोनही दिसत नव्हता.
काय करावे बरे? निघून जावे काय? आता साडेसहा वाजले आहेत. अजून पाच-दहा मिनिटे वाट पाहू आणि नंतर निघून जाऊ असा विचार तो करणार तोच एक रिक्षा त्याच्या जवळ येऊन थांबली.
नेहेमी रंगरंगोटी केलेला चेहरा आणि घागरा चोळीत काजलला पहायची सवय असलेल्या त्याला हलकासा मेकअप आणि पंजाबी सूट मध्ये पाहून तो क्षणभर चक्रावलाच. काजलच आहे ना ती? नक्कीच तिचं हसणं तर तेच आहे की!
"सॉरी लेट झाला, रिक्षाच मिळाली नाही आमच्या इथे. पार इंदिरा नगरपर्यंत चालत यावं लागलं रिक्षासाठी"
"ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही", तो तिच्या चेहर्याकडे पाहात म्हणाला.
कोणी काही न ठरवता, दोघेही चेकनाक्याच्या दिशेने चालत जाऊ लागले. नक्की काय बोलायचं हे त्यालाही कळत नव्हत? काय बोलायचं असतं ह्या मुलींशी? बारमध्ये त्यांना जवळ बोलावून पैशाची उधळण करणारे लोक काय बोलत असत त्यांच्याशी? मुली तर खुदूखुदू हसताना दिसत त्यांच्याशी बोलताना! आपण काय बोलणार? खरंतर आजवर एक दहाची नोटही दिली नाही तिला!
"इथेच डावीकडे जाऊ, तलावाकडे", ती म्हणाली.
"तलाव? इथे कुठला तलाव?", त्याला कळेना.
कमानीखालून आत गेल्यावर एक विस्तीर्ण तलाव त्याच्या दृष्टीस पडला. इथेहे एक तलाव आहे हे त्याला ठाऊकच नव्हते!
फारच तुरळक माणसे तिथे उपस्थित होती. एका कठड्यावर ते बसले. तलावात एक बदक तरंगत होते.
त्याच्याकडे बोत दाखवत तो म्हणाला, "वो देखो...ब..ब..", बदकाला हिंदीत काय म्हणतात हे त्याला ठाऊकच नव्हते!
"हमारी बंगालीमें उसको राजहंस बोलते है", ती म्हणाली.
"राजहंस?", त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. नकळत तिचा हात त्याने हातात घेतला!
अगदी हाकेच्या अंतरावर चेकनाक्यावरचा कोलाहल होता पण इथे होती फक्त नि:शब्द, नीरव शांतता!
*******
घरी जाण्यासाठी चांदनीने रिक्षा आपल्या गल्लीत वळवली आणि नाक्यावरच तिला तिचा नवरा दिसला. अशाच दोन-चार उडाणटप्पूंबरोबर चकाट्या पिसताना. तिला प्रचंड संताप आला. ह्याचं माझं पोट भरावं, घरं चालावं म्हणून मी काय काय सहन करते आणि ह्याला साधे हातपाय हलवता येत नाहीत? हॉटेलातील बरेचसे वेटर लगले कुठे कुठे आणि हा मात्र बसलाय रिकामा.
रागाने थरथरच तिने घरचा दरवाजा उघडला.
*******
मर्जिना घरी आली तीच मुळी पिसासारखी हलकी होऊन! असेही कस्टमर असतात? इतके शांत आणि समजूतदार? आपल्या सगळ्या व्यथा, सगळ्या काळज्या, सगळी दु:ख आपल्याला का त्याला सांगाविशी वाटली? तिही अशा पहिल्या भेटीतच?
पण हे सगळं त्याला सांगून मन हलकं झालयं हेही खरंच. त्याच्याकडून पैशाच्या मदतीची अपेक्षा नाहीच पण एक चांगला दोस्त मिळाला, हे काय कमी आहे?
*******
अर्धी रात्र उलटून गेली तरी त्याचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. काय दु:ख असतात जगात विविध माणसांना? डान्स बार बंद झाले, पैशाची आवक कमी झाली म्हणून काय त्रागा करीत होती काजल!
पण तिला हे कसं समजावं की, तारुण्य, सौंदर्य ह्या उतरत्या घसार्याच्या ठेवी आहेत. त्यावर फार काळ अवलंबून कसं राहता येईल? पण हे सगळं तिला समजावून सांगायलाच हवे. चाळीशीला आलेल्या तिच्या मावशीला बारमालकानेच आता येऊ नको म्हणून सांगितले होते, असे तीच सांगत होती ना?
पेपरात बारबालांबद्दल जे जे छापले जाते त्यापेक्षा किती वेगळी होती काजल! कदाचित तो अपवाददेखिल असू शकेल - तळ्यातल्या राजहंसासारखा!
******* ******* *******
(क्रमशः)
Posted by सुनील on July 04, 2009 03:04 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 04, 2009 03:03 AM · permalink
Corn and Potato Tsing Hoi style
Lotus leaf wrapped Rie with Corn Kernal & Almonds.
Wontons
Wontos and crispy veg. in Chilli Plum Sauce
या ब्लॉगर मंडळींनी फार घोटाळा करुन ठेवला आहे,श्री.शंतनु घोषनी सांगावे http://www.shantanughosh.com/ व राजाभाऊंनी ऐकावे. सर्वोत्तम चायनीस जेवायचे असेल ...
Posted by HAREKRISHNAJI on July 04, 2009 02:59 AM · permalink
माझी धडपड... भाग १ http://www.misalpav.com/node/8164
माझी धडपड... भाग २ http://www.misalpav.com/node/8173
माझी धडपड... भाग ३ http://www.misalpav.com/node/8275
त्यामुळे मला संपुर्ण महिन्याचा पगार मिळणे शक्य नव्हते...कार्यालयात पोहचलो आणि माझ्या आयुष्यातला पहिला पगार घेतला..१०० रुपयांच्या आठ नोटा मोजल्या...पगार.रु. ८०० फक्त.
******************************************************************
ही नोकरी करताना सुद्धा दुसरी कडे कुठे नोकरी मिळते आहे का याचा शोध चालु ठेवला होता,आता कामाची सवय झाली होती.माझ्या मॅनेजरनी नाईट शिफ्ट करण्याबद्धल मला विचारले,त्या शिफ्ट साठी मी तयार आहे असे त्यांना कळवले.शिफ्टची वेळ होती रात्री १२:०० ते सकाळी ७:००. प्रथमच माझ्यावर शिफ्ट मधे काम करायची वेळ आली होती.मुंबई-नाशिक महामार्गावरुन मी माझ्या स्कुटर वरुन भिंवंडीला कामावर जात असे,त्या रस्तावर त्यावेळी दिवे नव्हते...काळकुट्ट अंधारात स्कुटर चालवणे हा एक दिव्य अनुभव होता...
आमच्या परिचयातल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा काही दिवसांपुर्वी अपघाती मृत्यु झाला होता,त्यांच्या घरातील मंडळींना भेटण्यासाठी माझे वडिल त्यांच्या घरी गेले होते,तिर्थरुपांनी सर्व विचारणा केली तसेच त्यांनीही विचारले तुमचा मुलगा काय करतो? कुठे कामास आहे? इ. त्यांच्या कुटुंबातील मुलाने वडिलांना लगेच सांगितले की ते जिथे काम करतात त्या कंपनीत सध्या एक जागा (शॉप फ्लोअर इंजि) रिक्त आहे,जमल्यास त्यासाठी अर्ज करावा.मी लगेच त्या जागेसाठी अर्ज पाठवला आणि काही दिवसातच मला इंटरव्ह्यु साठी कॉल आला.
भिवंडीतील कंपनीत नाईट शिफ्ट करुन त्याच दिवशी मी त्या कंपनीत इंटरव्युसाठी गेलो,ही कंपनी एका नामांकित टिव्ही बनवणार्या कंपनीची उप-कंपनी होती,आणि या कंपनीत मोठ्या प्रमाणात speakers बनवले जात होते,कंपनी वसई ला होती.इंटरव्ह्यु व्यवस्थित झाला आणि काही दिवसातच मला कामावर रुजु होण्यास सांगितले,भिवंडीतल्या कंपनीत जेमतेम २ महिनेच काम केले.
नविन कंपनी- नविन लोक -नविन अनुभव.यां कंपनीत कामगार मंडळीत जास्त करुन महिला वर्ग होता,आणि मुलांची संख्या तशी कमीच होती.नवघर,सातिवली इ.ठिकाणचे जवळच राहणारे हे सर्व लोक होते.माझ्यासाठी हा सर्व अनुभव वेगळाच होता...दोन मजली इमारतीत खाली आणि वर अशा दोन्ही ठिकाणी speaker चे उत्पादन केले जाई,माझा जास्त वेळ एक्स्पोर्ट डिव्हीजन मधेच जात असे.
कंपनीतील सर्व माणसे चांगली होती.पहिले ३-४ महिने इथले काम नक्की कसे चालते ते समजण्यातच गेले. या कंपनीत परमनंट होण्यासाठी १ वर्षाचा कालावधी मला देण्यात आला होता.
आता स्कुटर जाउन बाईक आली होती तेव्ह्या रोज ठाणे-वसई असा येउन जाउन ७५ किमीचा माझा रोजचा प्रवास सुरु झाला.मुंबई-अहमदाबाद महामार्गा अतिशय सुंदर आणि वेगवान असा आहे.ताशी ८०-८५ या वेगाने मी जवळपास पाउण-एक तासातच वसईला पोहचत असे.
रोजच्या प्रॉडक्शनला लागणारी सर्व व्यवस्था करण्यातच माझा बराचसा वेळ जाई,त्यातच या कंपनीतल्या डिझाईन ऍड डेव्हलपमेंट या विभागात माझे बरेचसे सहकारी आता चांगले मित्र झाले होते.हे सर्व देखील माझ्या पेक्षा अनुभवाने,वयाने मोठे होते.या विभागात आल्यावर कॉप्युटरवरच वेळ घालवणे मला आवडायचे,ऑटोकॅड थोडे फार येत होते पण त्यावर जास्त काम करायची संधी नाही मिळाली.या विभागातले एक गॄहस्थ बर्याच वेळा मी काय करतोय त्यावर लक्ष ठेउन असत्,,,त्यांना कळले की कॉप्युटर रिलेटेड कामात मला जास्त रस आहे.बर्याच वेळा ते मला भेटत तेव्हा एक वाक्य नेहमी म्हणत:-- तु इथे तुझा वेळ फुकट घालवत आहेस. (नंतर कळले की हे गृहस्थ एम.बी.ए विथ गोल्ड मेडल आहेत.
)
तर असे दिवसा मागुन दिवस गेले...आणि मी या कंपनीत १ वर्ष पुर्ण देखील केल.(१ वर्ष एकाच ठि़काणी मी टिकीन असं त्यावॅळी मला देखील वाटल नव्हतं
)
एक दिवस वेगळेच वळण घेउन आला... ते एम.बी.ए वाले गृहस्थ जे माझ्या बरोबर बर्याच वेळा बोलत त्यांनी त्या दिवशी माझा क्लास घेतला...त्यांनी मला विचारले की तुला कॉप्युटर क्षेत्रात रस आहे तर त्याच्यातच तु तुझे करिअर का करत नाहीस तसाही तुला इथे किती पगार मिळतो फक्त ५ हजार आणि मेहिनत्तीच्या मानाने तो योग्य आहे का ? त्या पेक्षा सरळ नोकरी सोड आणि चांगला कॉप्युटरचा कोर्स कर,इथल्या पेक्षा नक्कीच जास्त पगार मिळेल तुला...मला त्यांच म्हणण पटलं.मी वेगवेगळ्या कोर्सची माहिती जमवली आणि वडिलांना माझा विचार सांगितला,त्यांनी फक्त मला विचारले तुला करायचे आहे ना नक्की ? माझे उत्तर होते :-- हो.
कंपनीत परमनंट होण्याचे लेटर मिळण्याच्या एक अठवड्या आधीच मी माझा राजिनामा दिला...
मदनबाण.....
क्रमशः---
Posted by मदनबाण on July 04, 2009 02:53 AM · permalink
Posted by सखाराम गटणे on July 04, 2009 02:51 AM · permalink
शासनाच्या प्रौढ शिक्षण योजनेचे कसे धिंडवडे निघाले याचे वास्तव उपरोधिक शब्दांत मांडणारी रमेश इंगळे- उत्रादकरांची ‘निशाणी डावा अंगठा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. या कादंबरीवर चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला असून ...
Posted by सखाराम गटणे on July 04, 2009 02:51 AM · permalink
Posted by सखाराम गटणे on July 04, 2009 02:47 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 04, 2009 02:45 AM · permalink
प्रास्ताविक -
गेल्या महिन्यातल्या एका वीकांताची गोष्ट. संध्याकाळची वेळ, हवा छान होती. बरेच लोक फिरायला बाहेर पडले होते. हळूहळू चालत येऊन एक आजोबा हिरवळीवरल्या बाकावर बसले.
कोण? कुठले? चौकशी झाल्यावर समजले की ते मुंबईहून आलेले आहेत. मी मराठी बोलतोय हे ऐकताच ते उत्साहाने म्हणाले "अहो, तुम्हाला वेळ आहे का? थोड्या गप्पा मारुयात."
मलाही आजोबा आवडले होते गप्पांना सहाजिकच रंग भरला. थोड्याच वेळात त्या आजोबांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा अंदाज आल्याशिवाय राहिला नाही.
त्यांची ओळख मिपाकरांनाही व्हावी असं मनात आलं म्हणून हा लेखनप्रपंच.
******************************************************************************************
"पेशवाईचा अस्त झाला त्यासुमारास अकाउंटंट असलेल्या आमच्या पूर्वजांना कोकणातली पंधरा गावे इनाम म्हणून मिळाली, त्या गावांचे आम्ही 'खोत' असं आमचे वडील सांगायचे.
गुहागर तालुक्यातले पाभरा-कुटगिरी हे आमचं वास्तव्याचे गाव", सावरकर आजोबा सांगत होते.
"वडिलांनी सांगितलेलं मला आठवतंय की आम्ही सावरकर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या घराण्यापैकीच, फक्त ती शाखा नाशिकजवळ भगूरला स्थायिक झाली आणी आम्ही कोकणात आलो.
माझे आजोबा भास्करराव सावरकर हे 'पडशीवाले' होते. ते पडशी घेऊन सतत फिरतीवर असायचे. माझ्या आजोबांनी पार्थिव केले होते. 'पार्थिव' म्हणजे सकाळी जिथे असतील तिथे कोणाकडेही स्नान करायचे,
दुपारी १२ वाजायच्या आधी शाडू मातीचं शिवलिंग करून त्याची पूजा करायची, त्याशिवाय अन्नग्रहण नाही. त्यानंतर मिळालं तर जेवण, नाहीतर तसेच पुढे निघायचे. असं त्यांनी सतत २४ वर्ष केलं.
फार देवदेव करताना घराकडे दुर्लक्ष होत असे. त्यामुळे सगळा संसार आजीलाच बघावा लागला. पण आमची आ़जी होती मोठी खंबीर! वडिलांना ५ भाऊ आणि एक बहीण. ही माझी 'मुक्ती' आत्ते.
दुर्दैवाने तिला फार लहान वयातच वैधव्य आलं. सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवलं. त्यावेळच्या रीतीप्रमाणे केशवपन अटळ होते.
एकुलत्या एक मुलीचं आयुष्य नासू नये म्हणून हिंमत करुन आदल्याच रात्री आजीने तिला पुण्याला धाडून दिले! तिला नेऊन सोडणार्या व्यक्तीचेही मला कौतुक वाटते की त्या माणसाने कोठेही बभ्रा केला नाही.
दुसर्या दिवसापासून तिचा पत्ता कोणालाही लागला नाही.
पुढे काही वर्षांनी आमच्या वडिलांनी सांगितले की ते पुण्याला गेले असताना श्री. मराठे ह्यांच्या खानावळीत पोळ्या लाटण्याचे काम करणारी स्त्री त्यांना ओळखीची वाटली, ती 'मुक्ती' होती!
तिने मुद्दाम ओळख दिली नाही पण त्यांनी मात्र बहिणीला ओळखले आणि तिला विश्वास दिला की ते कोणालाही सांगणार नाहीत, तिने निश्चिंत रहावे!".
संगतवार आठवायला आजोबांना थोडा विचार करायला लागत होता. अर्ध्या-एक मिनिटाभरात ते पुन्हा सांगायला लागले -
"माझ्या आत्तेची कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घडली. ती खानावळीत काम करीत असताना तिथे श्री. भावे नावाचे एक गृहस्थ जेवायला येत. त्यांच्याशी तिचा परिचय वाढला. पुढे त्यांनी तिच्याशी विवाह केला.
हे भावे होते खांडव्याचे, तिथे त्यांची बरीच मोठी इस्टेट होती. त्यांची प्रथम पत्नी काही कारणाने त्यांना सोडून गेली होती. अपत्यप्राप्तीच्या ओढीने भाव्यांनी दुसरे लग्न केले ते मुक्तीआत्तेशी. पुढे त्यांना मूल झाले परंतु दुर्दैवाने ते जगले नाही.
ही सगळी कहाणी आम्हाला समजली कशी?..... हाही मोठा आश्चर्यकारक भाग आहे.
माझे मोठे बंधू श्रीराम सावरकर हे मराठा बटालियन मध्ये नोकरी करीत होते. त्यांची बदली सातत्याने आग्रा, ग्वाल्हेर अशा ठिकाणी उत्तर हिंदुस्थानात होत असे. माझ्या वडिलांना मुक्तीआत्तेची खूप आठवण येई.
ते म्हणत असत की ती कुठेतरी आहे, तिला शोधायला हवं, भेटायला हवं. त्यामुळे श्रीरामने ध्यास घेतला की मी तिला शोधून काढीन! दुसरीकडे आत्तेलाही नातेवाईकांची चुणचुण लागलेलीच होती.
"माझे सगळ्यात मोठे काका हे डॉक्टर होते. ते ग्वाल्हेरचे महाराज जिवाजीराव शिंदे यांचेकडे पशुवैद्यकाचे काम करीत असत. (जिवाजीराव शिंदे म्हणजे काँग्रेसचे दिवंगत खासदार कै. माधवराव शिंदे यांचे वडील)
डॉक्टरकाकांची गायकी उत्तम होती ते मैफलीही करीत असत. मोठमोठे गायक, वादक ग्वाल्हेरला येत आणि गाणेबजावणे होत असे. तर सांगायची गोष्ट अशी की, ग्वाल्हेरला असताना ह्या काकांकडे श्रीराम गेला.
तिथे आसपास चौकशी करताना त्याला कुणकुण लागली की खांडव्याला भावे ह्यांचेकडे कोणी सावरकरांच्या नात्यातून आलेले आहे. लगोलग तो तिकडे पोचला. भाव्यांकडे तो गेला तेव्हा आत्ते एकटीच होती, भाव्यांचे निधन होऊन काही काळ गेला होता.
त्याने खात्री करण्यासाठी काही प्रश्न विचारले, तिनेही त्याला काही प्रश्न विचारले. एकमेकांबद्दल दोघांची खात्री पटली आणि त्यांना हर्ष झाला! आत्तेला मुंबईला न्यायचे असे ठरले. श्रीरामच्या नोकरीतून त्याला रजा नसल्याने तिला एकटीलाच गाडीत बसवून दिले.
तिला बघितले नसल्याने ओळखणार कसे म्हणून श्रीरामला तिची बोगी वगैरे सगळ्या गोष्टी विचारुन घेतल्या होत्या. बोरीबंदरला तिला उतरवून घ्यायचे म्हणून मी व माझे मोठे बंधू सदाशिवराव गेलो. लेडीज बोगी शोधत असताना तिनेच मला ओळखले.
"अरे तू गजाननचा मुलगा ना? अगदी त्याच्याचसारखा दिसतोस!" माझ्याशी बोलल्यावर तर तिची खात्रीच पटली "तुझा आवाजही अगदी गजासारखाच आहे!" आम्ही सर्व भावाकडे आलो. पुढे तिला गुहागरला घेऊन जाण्याची जबाबदारी मी घेतली.
वडिलांना भेटायला आम्ही गुहागरला पोचलो. जवळपास २० वर्षांनी बहीण-भावांची भेट होण्याचा प्रसंग होता. वडिलांनी तांब्याच्या घंगाळातल्या पाण्यात तिचे मुखदर्शन केले आणि मग भाऊ-बहीण कडकडून भेटली!
तिथे काही दिवस राहून मग मुंबई आणि परत एकदा खांडवा असा प्रवास तिने केला. तब्बेत बिघडू लागल्यावर मग खांडव्याची प्रॉपर्टी विकायचा निर्णय झाला.
तिथली प्रॉपर्टी विकून जे पैसे आले त्यातले जवळपास रु.५०,०००/- पुणे 'अनाथ विद्यार्थी गृहाला' तिने देणगी म्हणून दिले, साल होतं १९४५! पुढे ती वृद्धापकाळाने गेली.
एखाद्या प्रसंगाने आयुष्याला वळण कसे मिळते हे इथे समजून घेण्यासारखे आहे."
"त्यानंतरचे माझे क्रमांक दोनचे काका हे नागपूरला स्थायिक झालेले. त्यांचं स्वतःचं हॉटेल होतं. भावंडात माझ्या वडिलांचा क्रमांक तिसरा. शेतीची आवड असल्याने दर वर्षी ऊसाचे भरपूर पीक ते घेत आणि त्यापासून उत्तम प्रतीची काकवी व गूळ बनवीत.
गुहागरात आम्ही 'रसवाले सावरकर' ह्या नावानेच ओळखले जायचो. त्यामानाने माझे धाकटे काका फारसे शिकले नाहीत. ते पाभर्यालाच जाऊन रहात असत."
"माझा जन्म २८ ऑगस्ट १९२४ सालचा. गुहागरला आम्हा मुलांच्या शिक्षणासाठी वडील आले तेव्हा 'सच्चिदानंद गजानन सावरकर', म्हणजे मी, दोन महिन्यांचा होतो. त्यावेळी आमच्या वडिलांना आम्ही एकूण सहा अपत्ये होतो," आजोबा सांगत होते.
आता वडिलांना शेती करणे जमत नव्हते. चरितार्थाचे साधन काय? असा प्रश्न वडिलांना पडला नाही. ते बुंदीचे लाडू उत्तम करीत म्हणून त्यांना आसपासच्या गावांमधून कार्याचे लाडू करायला बोलावणे येई. इतर स्वयंपाकही ते चांगला करीत.
घरची परिस्थिती बेताची. सगळ्यात मोठ्या भावाने रस्त्यात पडलेल्या वर्तमानपत्राच्या तुकड्यावर पुण्याच्या 'अनाथ विद्यार्थी गृहाची' जाहिरात बघितली आणि तिथेच जायचा हट्ट धरला. कसेबसे पैसे जमवून आई-वडिलांनी त्याला शिक्षणासाठी पुण्यास धाडले.
तिथे मॅट्रिक झाल्यावर प्रभाकर पाध्यांचे 'लोकमान्य' नावाचे वर्तमानपत्र टाकणे आणि आणखी एक छोटी नोकरी असे तो करीत असे. ह्याचे महिना रु.३५ मिळत. त्यापैकी रु.१५ आई-वडिलांना पाठवावे लागायचे."
"त्याकाळची अजून एक महत्त्वाची आठवण सांगायलाच हवी. गुहागरला वरच्या पाटात आमच्या घराजवळ श्री. नारायण खरे म्हणून वडिलांचे स्नेही होते त्यांचा जमीनजुमला होता. खरे ह्यांचे वास्तव्य मुंबईस असे.
त्यांच्या जमीनजुमल्याची देखभाल केली तर अर्धेली मिळत असे. खर्यांनी आम्हाला इस्टेट सांभाळायला देऊ नये म्हणून गावातल्या लोकांनी बराच प्रयत्न केला परंतु वडिलांच्या सचोटीवर विश्वास असल्याने खर्यांनी ते मानले नाही.
पुढे १२ वर्षे आम्ही ती प्रॉपर्टी सांभाळली."
"एकीकडे आम्हा भावंडांची शिक्षणे सुरु होती. माझ्या वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत गुहागरात सातवी यत्ता झाली होती. तोपर्यंत मोठ्या भावाने, सदाशिवने, मॅट्रिक केले आणि त्यानंतर जास्त पैसे मिळविण्यासाठी तो भिवंडीला आला.
तिथे एका इलेक्ट्रिक कंपनीत त्याला नोकरीही मिळाली. मलाही पुढे शिकायचे होते. मुंबईला शिक्षणासाठी पाठवायचा खर्च वडिलांना झेपणे शक्यच नव्हते. हो ना करता करता पुढच्या शिक्षणासाठी मला मुंबईला गिरगावात श्री. हर्डीकर ह्यांच्याकडे ठेवले,
ते याच अटीवर की त्यांच्या भावाला सदाशिवने इलेक्ट्रिक कंपनीत नोकरी मिळवून द्यावी. मी हर्डीकर यांचेकडे राहून माझे पुढचे शिक्षण सुरु केले. मुंबईतले वाढते खर्च भागवण्यासाठी मला कोणावर अवलंबून रहाणे पटेना.
काहीतरी नोकरी शोधायलाच हवी असे माझ्या मनाने घेतले. माझ्यासारख्या नवख्या मुलाला कोण नोकरी देणार? लटपटी, खटपटी करुन मी ई.डी. ससून ह्या कापडगिरणीत कामाला लागलो. मला 'कार्डिंग'चे काम मिळाले.
गुहागरचे मावळणकर, हे कापडव्यापारी म्हणून मुंबईत बस्तान बसवून होते; त्यांच्या ओळखीने ई.डी. ससून ह्याच कापडगिरणीत माझ्या मोठ्या भावाला, सदाशिवला त्यांनी आणले. तो तिथे अकाऊंट्स क्लार्क म्हणून लागला.
पुढे त्याने कौशल्याच्या बळावर टेक्स्टाईल एक्स्पर्ट म्हणून मॅनेजरपदापर्यंत बढती मिळवली. हे १९४२ साल होते हे पक्के आठवते कारण त्याच वर्षी मुंबई गोदीत स्फोट झाला होता. ते असो.
गिरण्या सकाळी ८ वाजता सुरु होत. ८ ते संध्याकाळी ६ ह्या वेळेत काम करुन मला लालबाग ते गिरगाव असा पायी प्रवास करुन धावत पळत रात्रशाळा गाठायची असे. बर्याचदा माझा पहिला वर्ग बुडे.
गिरगावातले 'हिंद विद्यालय हायस्कूल' जे होते त्याच इमारतीत 'ब्रॅडले नाईट स्कूल' ह्या नावाने रात्रशाळा चालत असे. पुढे नामवंत लेखक, अर्थतज्ञ म्हणून नावारुपाला आलेले कै. गंगाधर गाडगीळ हे त्या शळेत मला शिक्षक म्हणून लाभले.
चतुरंग
Posted by चतुरंग on July 03, 2009 05:02 PM · permalink
Posted by Guru (noreply@blogger.com) on July 03, 2009 03:37 PM · permalink
नव्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडलेल्या या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पाने मुंबईकरांची घोर निराशा केली आहे.प्रवासी भाड्यात कुठलिही भाडेवाढ न होणे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
मात्र सामान्य मुंबईकर लोकल प्रवाशांच्या खुप अपेक्षा ( १२ -१५ डब्यांच्या लोकल, लोकलच्या संख्येत वाढ, ठाणे- पनवेल लोकल, हार्बर लाईनचा गोरेगाव पर्यंत विस्तार इत्यादी) असताना आणि रेल्वेला सगळ्यात जास्त महसूल मुंबईतून मिळत असताना यातील एका ही मागणीचा विचार न केला जाणे यासारखी वाईट गोष्ट नाही.
आता गरज आहे ती महाराष्ट्रातील / मुंबईतील सर्व खासदारांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी/ मुंबईसाठी आवश्यक असणार्या सर्व मागण्या मान्य करुन घेण्यासाठी दबावतंत्र/ आंदोलन याचा मार्ग अवलंबण्याची. ( राज साहेबांनी बरोबर म्हणले होते आता महाराष्ट्राचा आवाज लोकसभेत कोण उठवणार? )
दरवर्षी प्रमाणे रेल्वे मंत्र्यांच्या राज्यातून मुंबईत एक तरी नवी गाडी चालू होणे आणि परप्रांतीयाची लोकसंख्या अबाधीत ठेवणे ही प्रथा या वर्षीदेखील नवीन रेल्वे मंत्र्यांनी मोडीत न काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन !!
किंबहूना आपल्या लोकांना मुंबईत जलद पोहोचता यावे म्हणून हावडा- मुंबई विना थांबा रेल्वेची घोषणा करुन पाटणा - मुंबई एक्स्प्रेसवर मात केली आहे.
( यापुढे ही प्रथा बंद होण्यासाठी मा. पवार साहेबांनी रेल्वे खाते आपल्याकडे पर्यायाने महाराष्ट्राकडे घ्यावे. आणि दरवर्षी नवीन गाडी चालू करण्या एवजी मुंबईहून पटणा, हावडा येथे जाणार्या अगणित गाड्यांपैकी एकेक गाडी रद्द करावी )
चला इथेच थांबतो. ५.१२ ची नऊ डब्यांची वाशी लोकल पकडायला पळायला पाहि़जे.
(आपला लोकल )अमोल
Posted by अमोल केळकर on July 03, 2009 11:33 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 03, 2009 11:06 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 03, 2009 11:03 AM · permalink
गेले कित्येक दिवस तुझ्या येण्याकडे नजर लावून बसले होते मी... अगदी चातकाच्या आतुरतेने..
उदास आणि कासाविस मनाने रोज देवाला साकडं घालायचे, की देवा तो आता तरी येउदे..
अख्खं एक वर्ष उलटून गेलं होतं त्याला पाहून, भेटून आणि अनुभवून.
त्याचा तो स्पर्श...
कधी मायेचा..हळुवार असा..
कधी आवेगाचा...धसमुसळा.. तर
कधी उत्कट प्रेमाचा..
क्षणात जवळ घेणारा...क्षणात बोचणारा..
त्याचा माझा ...
Posted by मुक्तछंद on July 03, 2009 10:26 AM · permalink
आज सकाळच्या द हिंदु पेपर च्या पहिल्या पानावरच “loving isnt a crime” हे दर्शविणार्या तरुणाचा फोटो आलाय…आणि खरंच प्रेम करणं हा गुन्हा नव्हेच…
समलिंगी संबंधांना मान्यता देऊन हायकोर्टाने मानवी अधिकारांप्रती आपले कर्तव्य चोख बजावले आहे…ह्या निर्णयाने समाजाला घाबरुन वागणार्या गे ,लेस्बिअन, ट्रान्सजेंडर लोकांना आता मोकळेपणाने वावरण्याची संधी दिली ...
Posted by mugdhamani on July 03, 2009 10:23 AM · permalink
मुंबई तील ऑनलाइन परीक्षेचा गोंधळ याची चर्चा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रात चालू आहे । पण हा गोंधळफक्त मुंबई तील विद्यार्थ्रायाना त्रास झाला म्हणुन चर्चा चालू आहे, हे कटु सत्य आहे . आज नोकरी पासून ते, शाला कॉलेज प्रवेश ऑनलाइन झाले। ग्रामीण भागातील विद्यार्थी हा त्रास गेल्या वर्षा पासून सहन करत आहेत, त्यानी पेपरवाल्या कड़े अनेक तक्रारी केल्या , पण आपल्या स्थानिक ...
Posted by THANTHANPAL on July 03, 2009 09:18 AM · permalink
मायबापहो,
१० जुन पासुन मी दैनिक बोम्बाबोम्ब मधला प्रशिक्षणार्थी पत्रकार प्रमोद भोंडे (पम्या) याची डायरी मिसळपावमार्फत आपल्यापर्यंत घेवून आलो. जरी मराठी माणुस असलो अन वाचन हे माझे व्यसन असले तरी अशाप्रकारचे लिखाण मी करण्याची ही पहिलीच वेळ. अर्थातच त्यात अनेक त्रुटी होत्या. पण आपण माझा हा वानवळा गोड मानुन घेतला, रोज मी जे वेडेवाकडे लिहिले ते वाचले, माझे उदंड कौतुक केले, प्रतिसाद दिले अन प्रोत्साहनही यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत.
ही डायरी लिहीत असताना अनेक जणांनी मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, काहींनी अचुक अंदाज बांधले तर काहींनी मला तसे विचारलेही. प्रत्येकाला मी एकच उत्तर दिले, योग्य वेळ आल्यावर मी नक्की सांगेन. आता ती वेळ आली आहे.
मी कोण, मी काय करतोय! तसे पाहिले तर साधा सरळ प्रश्न पण हाच प्रश्न काही वेळा एव्हढा गहन होतो की त्यावर दार्शनिकांमधे वाद होतात! प्रत्येकजण या प्रश्नाला सामोरा जातो, अगदी जन्मापासुन म्हणुन तर नवजातच्या टॅहॅ च्या आवाजात दार्शनिकांना कोहं चा प्रश्न ऐकु येतो. मग प्रत्येकजण आपल्यापुरती त्याची उत्तरे शोधतो. हा शोधप्रवास म्हणजेच तर आयुष्य असते ना? माझाही हा प्रवास सुरुच आहे.
साध्या सरळ भाषेत सांगायचे तर मी एक पत्रकार... पुण्यनगरीतल्या एका इंग्रजी दैनिकात काम करणारा, अठरा-एकोणिस वर्षांचा या व्यवसायातला अनुभव गाठीशी जोडून मधल्या फळीत खेळणारा खेळाडू. पत्रकारीतेच्या अफाट सागरातला एक छोटासा बिंदु. मला खूप काही कळते असा माझा दावाही नाही अन समजही!
एव्हढे दिवस सगळ्यांची मापे काढत डायरी लिहिल्यावर मी जेव्हा म्हणतो की मी पत्रकार आहे तेव्हा ती वेळ असते माझ्या व्यवसायाच्या अन व्यवसायबंधुंच्या समर्थनार्थ उभे रहाण्याची. मला माझे ते कर्तव्य पार पाडलेच पाहीजे. या डायरीचा कथानायक प्रमोद भोंडे (पम्या) हे पात्र पुर्णपणे काल्पनिक आहे. या नावाचा कुठलाही पत्रकार मला माहिती नाही. डायरीत आलेल्या ईतर पात्रांबाबत आणि दैनिक बोम्बाबोम्ब बाबत ही असेच.
या डायरीत लिहिलेले किस्से खरे आहेत का? माझी मनोमनी इच्छा आहे की ते खरे नसावेत. पण अशा प्रकारचे अनेक किस्से मी माझ्या व्यवसायबंधुंकडुन अन काही वरिष्ठांकडुन पण ऐकले आहेत. प्रत्येकवेळी या किश्श्यांसंदर्भात मी व्यवसायात कार्यरत असलेल्या लोकांची नावे ऐकली आहेत अन ते खरे असल्याबद्दलचे निर्वाळेसुद्धा. काही किस्से तर मी स्वतः अनुभवलेले, पाहीलेले आहेत.
आता उरतो सर्वात महत्वाचा प्रश्न: मी स्वतः पत्रकार आहे, मला मी जे करतो त्याचा गर्व म्हणावा एवढा अभिमान आहे तर मी ही डायरी का लिहिली? कारण सरळ आहे, मी स्वतःला नीतीमान पत्रकार समजतो. माझा वाचक हा माझा देव अन मी रोज करतो ते काम ही त्या देवाची पूजा बांधण्याचे माझे उपचार आहेत. पण जेव्हा हा देव रुसतो, नाराज होतो तेव्हा माझ्यासारखा भक्त व्यथित होतो, त्यालाही देवाला काही सांगावे असे वाटते त्यासाठीच ही डायरी.
पत्रकार म्हणुन काम करताना रोज अनेक लोकांशी संबंध येतात, अन त्यांची मते ते व्यक्त करतात. अशा अनेक चर्चांमधे मला जाणवला तो पत्रकारितेचा दर्जा खालावलाय, पत्रकारांची अन वृत्तपत्रांची विश्वासार्हता संपली आहे हा सुर. प्रथम मी या सुराकडे नसती कुरकुर, असंतुष्टांची पोटदुखी म्हणुन दुर्लक्ष केले पण जसजशी व्यावसायीक उन्नती होत गेली, जबाबदार्या वाढत गेल्या, तसतसा माझा दृष्टीकोणही बदलत गेला. त्याबरोबरच आली प्रचंड अस्वस्थता. मला वाटले आपण प्रस्थापित झालोय अन त्यामुळे माझी समाजाशी नाळ तुटत चाललीय त्यामुळे असे होत असेल. मग एक दिवस मी निर्णय घेतला चांगली सुरु असलेली नोकरी सोडून स्वतः विस्थापित होण्याचा. तरी अस्वस्थता तशीच राहीली, अन कारणे शोधताना मला लक्षात आले, फक्त माझीच नव्हे तर समाजातील अनेक घटकांची, अन त्यात पत्रकारितातील अनेक लोक पण आलेच, समाजाशी नाळ तुटत चालली आहे. हा समाज एकसंध न रहाता अनेक न्युक्लीअर घटकांचा विस्कळीत समुदाय होत चालला आहे. अन त्याचा परिणाम माझ्या व्यवसायावर प्रकर्षाने होणे साहजिकच आहे.
प्रत्येक अळी सुरवंट नसते, प्रत्येक सुरवंटाचे फुलपाखरु होत नाही तर त्यातली काही अकालीच नष्ट होतात अन प्रत्येक फुलपाखरु सुंदर दिसावे असे कितीही वाटले तरी तसे होत नाही हा तर जगाचा न्याय आहे. मग पत्रकारीता त्याला कसा अपवाद ठरेल? पत्रकारिता या व्यवसायात सामान्यता अनेक प्रकारचे लोक येतात. सामाजिक बांधिलकी वगैरे ध्येयवादी विचार बाळगणारे काही थोडे, पत्रकारीतेच्या ग्लॅमरला भुललेले काही अन कधीच काही करता येणार नाही असे ज्यांच्याबाबत सगळ्यांना वाटत असे बरेच टगे....
यातल्या बर्याचजणांना या व्यवसायात येताना त्याबाबत पुर्ण माहीतीदेखील नसते. पण एकदा व्यवसायात ते शिरले की हळुहळु ती होत जाते, व्यावसायीक कौशल्ये विकसीत होत जातात अन हळुहळु ते सामावले जातात. अशा वेळी कोणी समर्थ अन चांगला मार्गदर्शक भेटला तर तो पत्रकार चांगलाच होतो. पण ही प्रक्रिया सुरु असताना इतर अनेक घटक तीवर परिणाम करीत असतात.
सर्वात मोठे दोन घटक म्हणजे पत्रकारांना मिळणारे वेतन अन त्यांची जीवनशैली. बहुतेक वृत्तपत्रे पत्रकारांना कंत्राट पद्धतीने घेतात अन त्यांना कुठल्याच कायद्याचे संरक्षण नसल्याने पत्रकारांच्या आयुष्यात कायम असुरक्षितता रहाते. साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या सर्व आयुष्यावर होतो. पत्रकारांची जीवनशैली देखील कमालीची विस्कळीत असते. केव्हा कुठली माहिती मिळेल अन काम सुरु करावे लागेल याचा भरवसा नसतो. बहुतेक पत्रकार दिवसाचे बारा-पंधरा तास काम करतात. व्यावसायिक संबंधांखेरीज अन्य अनेक गोष्टी, ज्या सामान्य माणुस त्याच्या खाजगी, सार्वजनिक आयुष्यात करतो, त्या त्यांना कधीच अनुभवता येत नाहीत. वेतन अन भत्ते अपुरे असल्याने अन खर्च भरमसाठ असल्याने पत्रकार आयुष्यभर भणंग रहाण्याचीच शक्यता अधीक. यामुळे अनेकदा पत्रकाराच्या मनात कायम द्वंद्व सुरु असते. बरे हा व्यवसाय नोबेल प्रोफेशन वगैरे असल्याने हे प्रश्न कुणाच्याच प्रायॉरिटी लिस्ट वर (खरे तर गिनतीत) नसतात.
असा हा पत्रकार पण गरीब बिचारा कधीच नसतो. खरेतर भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्याने मुक्त पत्रकारिता फोफावायला हवी पण या स्वातंत्र्याचा घास घेणारे अनेक फॅक्टर असतात अन त्याचा परिणामही होत असतोच. पत्रकारांवर अनेकदा आरोप होतो की ते प्रशासनावर पुरेसा अंकुश ठेवत नाहीत. पण अनेकदा पत्रकारांना भीती असते की सत्ताधारी, पैसेवाले बडे नोकरशहा इत्यादी मातब्बर अन निरंकुश कारभार करणार्यांवर जास्त टीका केली तर हे लोक त्यांच्या अधिकारांचा वापर करुन त्या पत्रकाराची कोंडी करतील, त्याला बातम्या मिळणार नाही अशी व्यवस्था करतील.
दुसरा मोठा मुद्दा येतो तो पत्रकाराच्या सामर्थ्याचा. वस्तुत: पत्रकाराला सामान्य माणसापेक्षा अधिक असे कोणतेही अधिकार नसतात. परंतु त्याच्या व्यवसायामुळे तो ज्यांच्याकडे जबरदस्त अधिकार असतो त्यांच्या खूपच जवळपास वावरत असतो अन त्या जवळीकीमुळे अनेकदा त्याला अप्रत्यक्ष अधिकार गाजवता येवू शकतात जसे क्राईम रिपोर्टरव्या एखाद्या मित्राला सिग्नल मोडल्याकरता पोलिसाने थांबवले अन दंड भरायला सांगितला तर तो मित्र पत्रकाराच्या एखाद्या फोननंतर दंड न भरता सुटतो. यामुळे अनेकदा गुर्मी येते अन असे करणे आपला अधिकारच असल्याच्या अविर्भावात पत्रकार वावरु लागतो. ही अर्थातच त्या पत्रकाराची चूक आहे पण त्याच्या जागी स्वतःला कल्पा अन पहा हे प्रलोभन टाळणे किती अवघड आहे ते!
हे सर्व ज्ञान (किंवा अज्ञान) मांडुन तुमचा छळ का? ही एका पत्रकाराची कैफियत आहे का? या प्रश्नांना माझे उत्तर सरळ आहे. आम्ही पत्रकार कारु-नारु जे काही करतो ते कश्यासाठी तर वृत्तपत्रात बातम्या छापुन माहिती तुमच्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग आम्ही जे काही करतो ते तुम्हाला आवडत नसेल, पटत नसेल तर तुमचे प्रश्न, तुमच्या आवडी आमच्यापर्यंत तुम्हीच पोहोचवायला हव्यात. हा विचार माझा स्वतःचा नाही किंवा नविनही नाही. याच कारणाकरता बहुतेक सर्व वृत्तपत्रे अन मीडीया गेली कित्येक वर्षे सिटीझन जर्नॅलिस्ट सारखे प्रयोग करत आहेत. पण त्याची फलनिष्पत्ती काय, काही लोक त्याचा वापर स्वतःची पोळी भाजुन घेण्याकरता करतात तर अनेकदा लोक त्यांचे अगदी वैय्यक्तिक प्रश्न सोडवण्याकरता, किंवा कुणालातरी "अद्दल घडवून सरळ करण्याकरता" अश्या व्यासपीठांचा वापर करतात. पण समाजाचे प्रश्न वगैरेचा विचार करण्याची कुवत असलेला विचारवंत, जो बहुधा मध्यमवर्गीय वगैरे असतो, तो या सगळ्यापासुन स्वतःला अलिप्त ठेवतो. जोवर हा समाजात बहुसंख्य असलेला वर्ग कार्यरत होत नाही तोवर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता मला स्वतःला वाटत नाही. हा जो विचार मी करतोय तसाच विचार करणारे अनेक पत्रकार मला माहीती आहेत.
मायबापहो, जरा स्वतःच स्वतःभोवती विणलेल्या कोशातुन बाहेर या! जरा आम्हा पत्रकारांनापण तुमच्या भावविश्वात सामील करुन घ्या. शेवटी आम्ही पण तुमच्यातलेच आहोत अन आमचे अस्तित्वही तुमच्याचसाठी आहे. अरे या मीडीयाला कुणीतरी समजवा रे असा फक्त ओरडा करण्याऐवजी तुमचे प्रश्न काय आहेत हे आम्हाला कळवा अन ते एकत्र मिळुन सोडवायला मदत करा. आपण सर्व जर एकत्र आलो तर खूप फरक पडु शकेल. हेच सांगण्यासाठी केलाय हा सगळा अट्टाहास!
आपलाच,
पुणेरी पत्रकार मित्र!
प्रसन्नकुमार केसकर
Posted by पुनेरी on July 03, 2009 09:08 AM · permalink
तुम्ही पाहिलंय कधी मुलांना
दुडूदुडू धावतांना?
ऐकलाय का कधी पाऊस
भुईवर टप् -टप कोसळतांना?
धावलाय कधी गिरक्या घेत
फुलपाखरांच्या संगे?
पाहिलाय सूर्य लपतांना
झाकोळत्या ढगांमागे?
सकाळपासून रात्रीपर्यंत
तुम्ही सुसाट जाता का?
'काय, कसं काय' विचारतांना
उत्तर येईपर्यंत थांबता का?
लेकराला कधी म्हणत असाल
'आपण हे उद्या करू'
गडबडीत तेव्हा पहातही नसाल
त्याच्या डोळ्यातले अश्रू
आता संपर्क राहिला नसेल
मित्र - मित्र दुरावलेला
कारण तुम्हाला वेळ नसेल
साधं 'क्षेम' पुसायला
कुठेतरी पोहोचण्यासाठी
धावता तुम्ही जोरात
हरवून बसता सगळी गंमत
वेगाने धावण्याच्या नादात
आयुष्य म्हणजे शर्यत नव्हे
अंधारात दीपस्तंभ व्हावे
गीत संपून जाण्याआधी
त्यातले संगीत ऐकायला हवे!
Posted by अनंता on July 03, 2009 08:42 AM · permalink
मास्तरने आजवर महाभारताबद्दल पुस्तकात वाचलेले आणि मोठ्यानी (बी. आर. चोप्रा) सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता. मिपावर आल्यानंतर त्याच्या भोळ्या मनाल तडा गेला. मिपा वरच्या काही सद्स्यानी त्याने ५० वर्ष बाळगलेल्या कल्पनांचा चुराडा केला. 'साडी सप्लाय", करुन गेला गाव आणि देवांचे नाव (पांडव जन्म) व इतर कल्पनांच्या मिपावरच्या खुलाशांनी मास्तरखंतावला.
___________________________________________________________
शेवटी अर्जुन कुरकुर करत एकदाचा युद्धाला तयार झाला.कृष्ण घाम पुसत आत्ता येतो म्हणून रथ आणायला गेला.अर्जुनानी धार लावायचा
दगड घेऊन बाणांना टोकं काढायला सुरुवात केली. बाण घासता घासता त्याच्या लक्षात आलं की धनुष्याची दोरी लावायची राहीली. मग त्यानी दोरी घेऊन पिळायला सुरुवात केली .आणि मागून हाक आली "मग करायची का सुरुवात"?
अर्जुन दचकला.टँव असा आवाज करत मास्तर त्याच्या पुढे उभे राहीले.
स्साला एक स्मुपदेशक पिळून गेला तो दुसरा हजर.
मास्तर म्हणले माझं स्मुपदेशन ऐकशील का?
फुकट आहे.
त्याची जाहीरात पण मी फुकटात करतो.
कपाळला हात लावत अर्जुन म्हणाला "बोंबला ".
मास्तरानी धनुष्य त्याच्या हातातून काढून घेतलं.
टँवकन आवाज काढत म्हणाले नाही ब्वॉ, पिळ थोडसं अजून
तुला माहीती आहे का?लांबडा इज इक्वल टु .. हीअर लांबडा= फ्रीक्वेन्सी
अर्जुन मॅडच झाला म्हणाला "ए मास्तरा मला काय अॅडमिशन नाय घ्यायची"
लवकर कायते बोल ब्बाबा.
तु कोणासाठी लढतोयस रे बाबा.
घरी जा .
का म्हणून ?
आताच भगवंत म्हणाले
काय म्हणाले ..मास्तर बेल वाजवणारच होते
ज्यानी तुझं समुपदेशन केलं ना त्याला सांग आधी तुझ्या यादंवाना शिकवं अक्कल नाहीतर पुढच्या युगात फक्त पार्लमेंटात युद्ध करतील किंवा अपहरणाचा खेळ करत राहतील.
हे बघ
(मास्तरानी बाणाच्या टोकानी दात कोरत एक चिकनचा तुकडा लांब उडवला.)
अर्जुनानी मान डोलावली.
काय बघू
एक तर तुमच्या घरातला हा गोंधळ तुम्हीच निस्तरायचा सोडून बाहेरच्या ओंबड्समनला तुम्ही आणलच कशाला ?
आधी तो समुपदेशक आणि त्यातून ओंबड्स्मन ...म्हणजे करेला और नीम चढा.
काय रे ही इस्टेट काय तुमच्या बापानी बनवली होती का रे ?
बाबानो भांडाल तर पुढचा जन्म खाडीची जमीन विकण्यात वाया जाईल. "त्या ब्रिटीशाला विचार" असं म्हणत मास्तर ब्रिटीशाला बोलावणार तेव्हढ्यात अर्जुन म्हणाला जाउ द्या ना मास्तर
एकदा तुमच्या हातात माईक दिला की तुम्ही सोडतच नाही
अरे आम्ही काय लहान मुलं आहोत का ?पण समोरची पार्टी ऐकतच नाही त्या आपण काय करणार ?
आता त्याला आंधळ्याची पोरे आंधळी म्हणुन उंगली करायचे काम होते का तुम्हाला?
पाण्यात पडल्यावर पहील्या माळ्यावरुन फिदिफिदी हसल्यामुळे हा राडा पुढे वाढला. मास्तर म्हणाला,
अरे मांडवली करायची .आतापासून तयारी करा पुढच्या जन्मात इलेक्षनच्या सीट ,मतदारसंघ वाटून घ्यायचे आहेत .लक्षात आहे ना ?
बाबा रे तो तुझा समुपदेशक म्हणजे मोहल्ला कमीटीचा अध्यक्ष आहे. मतदान झालं की हात झटकून मोकळा.
पण समोरची पार्टी ...
अरे पार्टी गेली ...
हे बघ आत्ता नाही मांडवली केली तर पुढच्या जन्मात तू मलेशीयाला आणि समोरची पार्टी दुबईला आणि तुमची एरीआ भलत्याकडे जाईल. तुला ना मला घाल कुत्र्याला.
अर्जुनानी गच्च बांधलेली दोरी परत मोकळी केली आणि म्हणाला मग मी करू तरी काय ?
हांगाशी आत्ता कसा बोललास मास्तर म्हणाला.
हे बघ ह्या युद्धाच्या भानगडी कशासाठी ?
जमीनीसाठी आणि काय ?
आता तू कोणाच्या भरवशावर काम करणार हे ?
आमचे बंधू आहेत ?
मास्तर खवळलाच.
म्हणजे तुझा दादा ना ?
मुर्खा... एक नंबरचा जुगारी तो.आता तू करणार युध्द .क्रेडीट त्याला .परत जुगार खेळून गावभर उधार्या करायला तो मोकळा.
नाही तसं नाही आमचा दुसरा भाऊ आहे ना ?
कोण तो पैलवान ?तो तर रेम्याडोक्याचा आहे.वरचा मजला रीकामा .त्याला अजून माहीती नाही की द्रौपदीचा पहीला चोईस अर्जून आहे.
त्याला कळलं ना तर गदा घेऊन चेचून काढेल तुझ्या.....मास्तर मॉडेस्टीखातर थांबलाच.
अर्जून मात्र मुद्दा पटल्यासारखा मान डोलवत होता.
आता राहीले ते दोन धाकटे ?
त्यांना मॉडेलींग खेरीज आणखी काही जॉब नाही .दिसायला बरे आहेत म्हणून नाहीतर पुढच्या जन्मात किशन कुमार झाले असते.
तु कंपनीचा तसा बघायला एकच शार्प शुटर, बाकी सगळे नावाचेच.
आता मात्र अर्जुन कान देऊन ऐकायला लागला.
त्याचं काय आहे मास्तर द्रौपदी आणि मी युध्द संपल्यावर वेगळच बिर्हाड करणार आहोत.
मास्तरानी वैतागून एक बाण मोडला आणि मातीत काहीतरी गणित मांडायला लागले .
हे बघ , ज्या बायलीच्या नादाला तू लागतो आहे ती आहे शेअर्ड फॅसीलीटी .तुझा मोनोपली आयटम नाहीय्ये तो.
त्यापेक्षा बाकीच्या बायका घे साउथमध्ये जा जमीनीत भराव टाक. नविन लाईन टाक.
अर्जुनानी बाण भात्यात भरायला सुरवात केली.
मास्तर खूश झाला .बघ तुला बाणात वगैरे इंटरेस्ट आहे ना ?
तू शिवकाशीला जा आणि बाणांची फ्याक्टरी टाक.
पण आईला काय सांगू ?
आईला काय सांगायचं .आता ती म्हातारी राहील आळीपाळीनी तुमच्या पाच भावाकडे.
आणि लक्षात ठेवा एक गोष्ट.जिथे द्रौपदी असेल तिथे म्हातारी नसेल हे करा. नाहीतर सासूसुनेच्या भानगडीत अॅलोटेड स्लॉट वाया जाईल.
नाही मास्तर तुम्ही म्हणता आहे ते ठिकच आहे.पण आईला नाही आवडणार नाही.
काय नाही आवडणार .एक तर तिच्या लग्नाआधीच्या प्रतापामुळे ह्या सगळ्या भानगडी झाल्या.
'संकट विमोचन केंद्रात' जायची सोय होती की.
तुमचा बाप झूरून मेला.म्हणून तुम्ही पाच च
नाहीतर तुमच्या चुलत्याकडे बघ.
तो बिचारा आंधळा पण बायकोनी पट्टी बांधून घेतली आहे.दिवसरात्रीतला काही फरक तो कळतच नाही झाली की नाही फटाफट शंभर पोरं ?
अर्जुनानी आता पायातल्या बुटाच्या नाड्या सोडायला सुरुवात केली .
पण मास्तर मामाला काय सांगू ?
मामाची चिंता सोड मी आहे तोपर्यंत तो इकडे फिरकायचा नाही.एक समुपदेशक असताना दुसरा तिकडे फिरकत नाही.प्रोफेशनल कर्टसी आही बाबा .
मास्तर सिगरेटच्या चटक्यानी जागा झाला.च्यायला आजकाल दुसर्या पेगातच गाडी उलाल व्हायला लागली आपली.
साहेब बील .वेटर नम्रपणे उभा होता.
मास्तरेनी खिसे चाचपले .कार्ड चालेल का ?
चालेल ना .
कार्ड देता देता मास्तरनी वेटरला विचारलं काय रे तुझं कोणी समुपदेशन केलं की नाय ?
वेटर लाजला .गेल्या महीन्यातच केलं मास्तर.ठाण्याला मुक्ती लॉजमध्ये .पण आता थोड चालायला त्रास होतोय.
मास्तरची नशा एकदम उतरली ,वा.वा. चल आता तुला मी प्रतिबंधकाच्या उपकरणाबद्द्ल समुपदेशन करतो.
आधी नाव काय ते सांग .
अर्जुन पांडूरंग.....
मास्तरची नशा खाली उतरली.
Posted by विनायक प्रभू on July 03, 2009 07:11 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 03, 2009 07:01 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 03, 2009 06:56 AM · permalink
डॉ. शशिकांत तांबेचे घर. मु,पो. इंन्दोर. श्री.राहुल देशपांडे यांचे गाणे.
राहुल देशपांडे इंन्दोर मधे रविंद्र सभागृहात दिवाळी, पाडवा पहाट कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले.
एक दोन दिवस आधी डॉँ. शशिकांत तांबेंच्या घरी संध्याकाळी राहुल ...
Posted by HAREKRISHNAJI on July 03, 2009 06:56 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 03, 2009 06:34 AM · permalink
राम राम मंडळी
आज आषाढ शु ११ अर्थात आषाढी एकादशी !
विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन घ्यायला आज लाखो वारकरी जमले असतील. ज्यांना प्रत्यक्ष जायला जमत नाही ते आपल्या गावातील विठ्ठलाच्या मंदिरात जावुन मनोभावे प्रार्थना करतात.
खरेतर आषाढी एकादशी म्हणजे पावसाळ्याचे दिवस. धो धो आषाढ बरसत असतो.. टाळमृदुंगाच्या नादात, ऐहिक जगातील सुखदुःखांना विसरुन पाउले चालती पंढरीची वाट असे म्हणत केवळ विठ्ठलाच्या कळसाचे का होईना दर्शन व्हावेच या ध्यासाने लाखो लोक चिखल पाउसाची तमा न करता मैलोन मैल चालत असतात.
पण यावर्षी मात्र काही विपरीतच घडले... पाउस अजुन आलाच नाही !!!
त्यामुळे आज सकाळी सकाळी (भारतीय वेळे नुसार बर का) आमच्या काही मित्रांना आम्ही खरड केली
एक गंभीर प्रश्न:
पाउस कसा पडतो? का पडतो? पावसाचे पडणे कशावर अवलंबुन असते?
यावर आलेली उत्तरे येणेप्रमाणे - (ठळक ठशात नाव, सरळ टायपात त्यांचे उत्तर, तिरप्या टायपात मी दिलेले उत्तर)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मज्यशि मयत रि कर्न्र्न क?
उपवास धरल्याने, देव प्रसन्न होतो. आणि इंद्रदेव पाऊस पाडतो.
पाऊस कसा पडतो...पाहा 
विनायक प्रभू
एकदम गंभीर. ढगाला कळ लागते. पाणीग्रहण केलेल्यांचे पाणी थेंब थेंब सांडते. कधी फवारे उडता.
सहज
पर्जन्यराजा नावाचा एक राजा असतो. त्याच्याकडे इंद्रदेवाने एक खाते दिले आहे. जर इहलोकी जन चांगले वागले तर पाउस पाड नाहीतर नको. असा काहीसा मामला आहे असे ऐकले आहे बॉ.
बाकी असेही ऐकले आहे. - http://en.wikipedia.org/wiki/Rain
कृत्रीम पाउस पाडायचा असल्यास.
आता जरा हा प्रश्न तुम्हाला का पडला ते सांगा की.
धन्यु. पाउस अजुन पडत नाही म्हणुन प्रश्न मनात आला
आपडीया. म्हणलं सक्काळसक्काळ सगळीकडे गगन गगन घिर घिर आये बदरा का आळवायला लागलात 
बिपिन कार्यकर्ते
च्यायला... या नानाला नक्की काय विचारायचे आहे?
(थोर मिपामहापुरुषांच्या संगतीने बिघडलेला) बिपिन.
Nile
खालील अनेक उत्तरे वाचुन आपल्याला 'योग्य' उत्तर मिळालेच असेल अशी आशा करतो.
आणि नसेल तर तुमचा प्रश्न नेमका कोणालाही कळला नाही आहे हे तुम्हाला कळलेच असेल अशी आशा करतो.
वरील कोणतीही आशा बरोबर असली तरी, बॉल इस इन युवर कोर्ट. 
तुम्ही 'विचारवंत' आहात असे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. 
तुम्ही प्रमाणपत्र देउन बॉल टोलवायच्या ऐवजी 'आउट' होताय की आम्हाला खरच प्रमाणपत्र देताय हे न कळल्याने आम्ही थर्ड अंपायर च्या निर्णयाची वाट पाहतो. 
सखाराम_गटणे
धार्मिक कारण: समाजाच्या नितिमत्ता
वैज्ञानिक कारणः वातावरण, पर्यावरण
घाशीराम कोतवाल १.२
तुमच्या प्रमाणेच उत्तर पास दिले बाकि
ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ जर जोरात लागली तर पाणी बदा बदा गळ 
छोटा डॉन
एक गंभीर स्पष्टीकरण :
काल रात्री इकडे जरासा पाऊस पडला व आमची अतिप्रिय पांढर्या रंगाची पँट त्यामुळे जराशी खराब झाली ...
सबब, आम्ही आज सकाळीसकाली पर्जन्यदेवाकडे उर्फ इंद्राकडे निषेध खलिता आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ...
त्या नोटिशीच्या उत्तरात आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे मला वाटते, ते आले की लगेच फॉरवर्ड करेन ...
आमच्या खव मधे धर्ममार्तंड धमालरावांचे उत्तर बघा आणि सुधरा थोडे... इंद्रदेवाला खलिता धाडताय... हुडुत !
श्रद्धा असु द्यात ,सर्व काही ठिक होईल ..!!!
धमाल मुलगा
>>पाउस कसा पडतो?
१.वातावरणातील उष्णता, सुर्याची प्रखरता आणि उन्हाळ्यातील तप्तता ह्यामुळे भुतलावरील पाण्याचे बाष्पीभवन होते.
२. ह्या बाष्पाचे ढग बनतात. उन्हाळा संपू लागताच वातावरणातील तप्तता कमी होऊ लागते. ह्याला मदत करणारी वृक्षसंपदा, डोंगर-टेकड्या येथील थंडावा आणि सुर्याची कमी झालेली प्रखरता ही वातावरणात गारवा निर्माण करते.
३.ह्या गारव्यामुळे बाष्पीभूत असलेले ढगांमधील पाण्याचे सांद्रीकरण होते.
४.हे ढग अडून त्यातील पाण्याचा निचरा होऊ लागतो ह्यालाच पाऊस असे म्हणतात.
>>का पडतो?
ॠतुचक्र आहे ते.
>>पावसाचे पडणे कशावर अवलंबुन असते?
बाष्पीभवनाकरता पाण्याची उपलब्धता, थंडाव्याकरता वनसंपदा आणि तापमान थंड राखणारे इतर घटक, प्रदुषण, औद्योगिक उर्जा-उत्सर्जन हे घटक पावसाच्या पडण्यावर बरा-वाईट परिणाम घडवतात.
वा ! मालक जियो!! धर्ममार्तंड असुन विज्ञानाची कास धरणारे आधुनिक शिलेदार असल्याची आम्हाला खात्री होतीच, आज पुरावा सुद्धा मिळाला !
>>वा ! मालक जियो!!
_/\_ (विनम्र अभिवादन!)
>>धर्ममार्तंड असुन विज्ञानाची कास धरणारे आधुनिक शिलेदार असल्याची आम्हाला खात्री होतीच, आज पुरावा सुद्धा मिळाला !
ह्म्म...अर्ध्या हळकुंडात पिवळंधम्मक होऊन धर्माला नावं ठेवली की उपर्यांच्या गल्लीत सम्राट होता येत असेल, धर्माला जाणून घेण्यासाठी अंमळ कष्ट पडतात...सध्या इन्स्टंट पीठांचा जमाना आहे, वेळ कुणाकडे आहे धर्म समजावून घ्यायला?
ह्याच पर्जन्यराजाने वेळेवर, योग्य प्रकारे हजेरी लावावी म्हणुन धर्माने निरनिराळी कर्मकांडे(!) समाविष्ट केली की ज्यायोगे वनसंपदेचे संवर्धन होईल...उपजत हावेपोटी केल्या जाणार्या मानवनिर्मित सुधारणांपासून निसर्गाचा र्हास होण्यापासून वाचेल. परंतू ती कर्मकांडं असल्यामुळे आणि काही गाढवांनी त्यात स्वतःची अक्कल पाजळून मुर्खपणा आणल्याने ती करण्यापासून दूर गेलेल्या वैचारिक(!) समाजाला आता दर एक दिवसाआड पाणी मिळायची वेळ आली आहे.
असो, जो जे वांछिल तो ते लाहो.....
सच्चिदानंद! सच्चिदानंद!!
टारझन
ह्म्म्म !!! ह्यावर गंभिर पणं विचार केला नाय 
विजुभाऊ
पाऊस प्लूटो नेपच्यून आणि उर्टच्या ढगाच्या युतीमुळे पडतो हा शोध अजूनतरी लागला नाहिये.
निखिल देशपांडे
तुमच्या प्रश्नातला गर्भित अर्थ फार भयानक आहे. सबब आम्ही प्रश्नाचे उत्तर 'पास' असे देत आहोत.
मंडळी, येवढी विविध प्रकारची उत्तरे मिळाल्याने आम्ही गोंधळुन गेलो आहे.
तेव्हा कृपया मार्गदर्शन करा आणि सांगा ....
पाउस कसा पडतो? का पडतो? पावसाचे पडणे कशावर अवलंबुन असते?
Posted by अवलिया on July 03, 2009 06:34 AM · permalink
इ.स. 1713 मधे छत्रपति शाहू महाराजांनी, बाळाजी विश्वनाथ भट यांची पंतप्रधान पेशवा म्हणून नियुक्ती केली व श्रीवर्धनाच्या भट घराण्याकडे, छत्रपति शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या, हिंदवी स्वराज्याची सूत्रे आली. भट किंवा पेशवा घराण्याच्या पांच पिढ्यांनी हे राज्य वाढावे म्हणून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जे प्रयत्न केले तो इतिहास आपणा सर्वांस ज्ञात आहेच. या ...
Posted by chandrashekhara on July 03, 2009 06:24 AM · permalink
स्वातंत्र्य् प्राप्तीच्या वेळी 'मेघालय' राज्य म्हणजे आसाम राज्यातील दोन जिल्हे होते. १९४७ साली त्या दोन जिल्ह्यात् केवळ १७% ख्रिश्चन् होते.
Posted by पुर्वान्चल on July 03, 2009 06:08 AM · permalink
स.पा. महाविद्यालय. सभागृह तुडुंब, खच्चुन भरलेले, जणु मुंबईतील लोकलच्या डब्यात सकाळची वेळ. मुंगीला सुद्ध्या आत जायला जागा नसावी. बाहेर ही वऱांड्यांत रसीक उभे, उभ्याने तरी का होईना, स्वर्गीय गाणे ऐकण्यासाठी. सर्वांना प्रतिक्षा होती केव्हा एकदा मुकुल ...
Posted by HAREKRISHNAJI on July 03, 2009 06:04 AM · permalink
आयत्या वेळी गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलणारी रेल्वे व पुलांवरील गदीर्तील धक्काबुक्कीचा अनुभव घेण्यापेक्षा रूळ ओलांडण्याचा धोका अनेक जण पत्कारतात.महीलाही यात मागे नसतात.वाढते रेल्वे प्रवासी व बहुसंख्य रेल्वे स्टेशनांवरील पुलांचा आकार पुर्वी सारखा पुरेसा वाटत नाही.रूळ ओलांडण्यामागे पूल चढण्याचा त्रास वाचवणे. घड्याळाची कट्यावर घावणार्या मुंबईत नेहमीच सर्वच ...
Posted by वि वे क on July 03, 2009 05:41 AM · permalink
आठवणी.....
सरी पावसाच्या नभी दाटलेल्या
ऊरी आठवांच्या लडी साठलेल्या !
तशा मावल्या ना तुझ्या आवडी ही
सदाच्याच अमुच्या झोळ्या.....फाटलेल्या !
कफल्लक कवीच्या न वाट्यास नट्टा,
तरी शृंगार भरल्या.....गझल थाटलेल्या !
अवचित् कधी शेपटा त्या वेणीचा
जरा स्पर्शताही .....मुठी.. चाटलेल्या !
सखे राहिले ना वसंतास भान
बघुनी तुला त्या.....यौवनी घाटलेल्या !
अता एकदा हा मोगरा माळू दे ना
तुझ्या मोकळ्या केसांत्.....काटलेल्या !
करपून गेला बहर बघ कधीचा
अता कृष्ण म्लान .....गौळणी बाटलेल्या !
Posted by उदय सप्रे on July 03, 2009 04:20 AM · permalink
दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने समलिंगी संबंध ठेवू इच्छिणार्या लोकांना नवे बळ मिळाले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा बातमीचा दुवा:
http://www.loksatta.com/daily/20090703/mp02.htm
Posted by मेघना भुस्कुटे on July 03, 2009 04:17 AM · permalink
"एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं."
आज प्रो.देसाई जरा खुशीत दिसले.बरेच दिवस ते आपल्या मुलाकडे राहायला होते.मधून मधून माझ्याशी फोनवर बोलायचे.पण आज त्यांची तळ्यावर भेट झाल्यावर मी त्यांच्या आनंदी चेहर्याकडे बघून म्हणालो,
"भाऊसाहेब,चेहर्यावरच्या छटा इतक्या बोलक्या असतात की मनातलं शब्दात येण्यापूर्वी चेहर्यावरच्या छटा शब्दापेक्षा बोलक्या होतात.
तुम्ही मला आज कसलं तरी लेक्चर देणार आहात हे निश्चितच आहे.तुमच्या मुलाच्या लायब्ररीत फक्त कायद्याची पुस्तकं असतात.वकिलाला त्याची जरूरी असते. पण कायदेकानूवर तुम्ही चर्चा करणार नाही हे नक्कीच.तुमचा विषय काही तरी वेगळाच असणार."
हे माझं बोलणं निमुट ऐकून घेऊन झाल्यावर प्रोफेसर हंसत हंसत मला म्हणाले,
"आमच्या मुलाच्या शेजारच्या घरात प्रिन्सिपॉल वैद्य म्हणून एका गृहस्थाची भेट झाली.हे विद्वान गृहस्थ मला बौद्धिक व्यायाम द्यायला माझ्या मुलाकडच्या मुक्कामात साहाय्य करायला उपयोगी झाले.त्यामुळे मला पुस्तकं ह्यावेळी वाचावी लागली नाहीत."
मी म्हणालो,
"मग आम्हाला तुम्ही बौद्धिक व्यायाम आज देणार हे नक्कीच"
"तुम्ही जर का काही पुस्तकं अलीकडे वाचली नसतील तर आजची आपली चर्चा तुम्हाला नक्कीच बौद्धिक व्यायाम देईल."
असं बोलून झाल्यावर भाऊसाहेब, प्रि.वैद्यांबरोबर सुरवात कशी केली ते सांगायला लागले.भाऊसाहेब प्रि.वैद्याना म्हणाले,
"ज्यावर आपलं अत्यंत प्रेम असतं आणि जे अविचल राहावसं वाटतं त्याचा विध्वंस करण्यासाठी अस्त्रांची निर्मिती एखाद्या विचारातून झाली असावी.पर्यावरणाचा नाश करणं,गरिबीचं कालचक्र चालूच ठेवण्याचा प्रयास करणं,विषयुक्त केमिकल्स आपल्या शरिरात आणि ह्या पारितंत्रात मिलावट करण्याची कामं ह्या असल्याच विचारातून झाली असावीत.आपल्याला कसं वाटतं.?"
वैद्य म्हणाले,
"मला वाटतं कुठल्याही गोष्टीचं नुसतं मनन करून चालत नाही.मनन करणं हे विचारमग्नतेतून निर्माण होतं.मानव जातिचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या असल्या विचारमग्नतेच्या पुढे आपल्याला गेलं पाहिजे.
आपल्याला बुद्धिमत्तेची जरूरी आहे.ढोबळ अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजेच जीवनाच्या मूल्यांची असलेली जागरूकता.ही बुद्धिमत्ता शिकण्यासाठी विचारमग्नतेचं आणि अनुभूतिचं म्हणजेच संवेदनाचं,मन आणि शरिराचं,विज्ञान आणि आत्म्याचं,ज्ञान आणि मूल्यांचं, मेंदु आणि ह्रुदयाचं एकीकरण व्हायला हवं.बुद्धिमत्ता आत्मसात करण्यासाठी विद्येची जास्त आणि प्रशिक्षणाची कमी जरूरी आहे.असं मला वाटतं."
मधेच प्रो.देसायाना अडवून मी म्हणालो,
"भाऊसाहेब हे प्रि.वैद्यांचं म्हणणं मला पटतं.पण प्राचिन काळात विद्या प्राप्त करताना किंवा अध्ययन करताना अनुभूति आणि विचारमग्नता संयोजित केली जाऊन अंतर्ज्ञानाच्या उसळण्याने बुद्धिची वृद्धि होत होती. असं तुम्हाला नाही का वाटत?"
"वैद्यानी एक सुंदर उदाहरण दिलं आहे ते मी तुम्हाला ओघाओघाने सांगणारच आहे.तुम्ही बुद्धिच्या वृद्धिबद्दल जे काही म्हणत आहात त्यासाठी ते उदाहरण ऐकून तुमची समाधानी होईल असं मला वाटतं."
असं सांगून झाल्यावर भाऊसाहेब आपला विचार सांगू लागले,
"एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं.परंतु,हा ज्ञान मिळवण्याचा प्रकार मात्र आश्चर्याने भरलेला वाटतो आणि ही एक अलौकिक वयक्तिक उपलब्धि वाटते. ही उपलब्धि शालेय शिक्षणापेक्षा अगदी निराळीच वाटते. पुर्वीच्या त्या विद्या प्राप्तीतल्या अनुभवात सहायता असायची, आव्हानं असायची,प्रेम आणि आस्था असायची.
आता अगदी बालपणापासून ही विद्या मिळवण्याची प्रक्रिया समयपरत्वे हरवली जात आहे. आणि जसं शालेय शिक्षण मिळत आहे त्यामधे विचार करणार्याला, मनन करणार्याला फक्त पुरस्कार दिला जातो,पण अनुभूतिबाबत सर्वच निराशा आहे."
प्रि.वैद्यांचं काय म्हणणं आहे पहा.ते म्हणतात,
"मनोभाव किंवा आवेश गाडले जात आहेत आणि कधी कधी घातक कारणाला ते विस्फोटीत करायला वापरले जात आहेत. त्या आवेशांचा उपयोग सुसंगत ज्ञानासाठी केल्याने कुशल अनुभूतिला चालना मिळेल असा विचार फार क्वचित केला जातो."
लहान वयातला सुसंगत ज्ञानोपयोग आणि वयस्क असतानाचा असुसंगत ज्ञानोपयोग ह्यातला फरक समजण्यासाठी वैद्यानी असं हे उदाहरण दिलं.
ते म्हणतात,
"एखाद्या बाल वयातल्या तरूण व्यक्तिने क्षितीज्यावरचा सूर्योदय कधीच पाहिला नसावा अशी कल्पना करूया.अशा वेळी सूर्योदय पाहाण्याच्या त्या बाल तरूणाच्या पहिल्याच सामन्यात तो समुद्रातल्या खोल पाण्यात सतत बद्लणार्या पाण्याचा रंग पाहिल, सकाळच्या उगवत्या सूर्याचं ते तेजोमय बिंब पाण्यात परावर्तीत होऊन दूरवरच्या लाटांच्या शिखरावर नृत्य करताना पाहिल.त्या अफाट समुद्राची तेजस्विता उभारली जात असलेली पाहिल.त्या समुद्राच्या महातरंगाच्या होणार्या गर्जना ऐकील आणि त्या एका मागून एक येणार्या लाटातली महाशक्ति किनार्यावर येऊन आपटल्यावर त्या शक्तिचा परित्याग होत असताना तो पाहिल. अशावेळी किनार्यावर उभ्या असलेल्या त्याला त्याच्या चेहर्यावर पाण्याचे शिंतोडे उडलेले दिसतील. ते शिंतोडे सुकून जाता जाता चेहर्यावर राहून गेलेले मिठाचे पटल त्याला दिसतील.
अशा क्षणी ज्ञानप्राप्ती होत असताना ते बालमन विचारील,
" हे विस्मित करणारं स्मारक ह्या धरतीवर कुणी बरं निर्माण केलं असेल?"
कदाचीत अश्या क्षणी तो तरूण इश्वरावर भरवंसा ठेवील.
आणि नंतर ह्याच तरूणाला आपण समुद्रापासून अति दूरवर शाळेत पाठवून महासागराची फिझिक्स, केमिस्ट्री,आणि बायालॉजी शिकू दिली की त्या तरूणाच्या पहिल्या सामन्यात त्याला मिळालेल्या ज्ञानाच्या जागेचं हळू हळू हे तथ्यपूर्ण ज्ञान स्थान घेणार."
हे वैद्यांनी दिलेलं उदाहरण भाऊसाहेबांकडून ऐकून मला त्यांना विचारल्या शिवाय राहवलं नाही.
मी म्हणालो भाऊसाहेब,
"प्रि.वैद्यानी दिलेलं सुंदर उदाहरण ऐकून मला वाटतं,खरं तर शिक्षणाच्या सहाय्याने मनुष्यजातिच्या समस्यांच्या रहस्यांचं उलघडण करण्याचा मार्ग धुंडाळाला जात असला तरी,ज्या ज्ञानाची आपल्याला जरूरी असते त्या ज्ञानापासून हे असंतुलीत शाळकरी शिक्षण आपल्याला वंचीत करत आहे. असं तुम्हाला नाही का वाटत?"
"मला खात्री होती की तुम्ही असंच काही तरी मला विचारल्या शिवाय राहणार नाही."
असा शेरा देत प्रो.देसाई मला म्हणाले,
"खरं म्हणजे जे शिक्षण विस्मयतेला प्रोत्साहित करून सख्त बौद्धिक क्षमता देऊन आपल्याला सक्रिय करतं अशा शिक्षणाची आपल्याला जरूरी आहे.
अशा तर्हेचं ज्ञान विकसित होईल अशा वातावरणाचं ध्यान ठेवणारा समाज जेव्हा मनन आणि अनुभूति किंवा संवेदना म्हणा ह्या दोन्हींचा गौरव करतो आणि सुखशांती,आरोग्य,मैत्री,प्रेम,न्याय,स्वातंत्र्य,उत्तरदायित्व,लोकतंत्र आणि लाभकारी कामं ही सर्व मूल्यं सुनिश्चित ठेवण्याच्या प्रयत्नात असतो त्या समाजात अपेक्षीत फळ मिळणारच."
मी म्हणालो,
"म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ असा की, अशा तर्हेच्या ज्ञानासाठी मननाची जरूरी आहेच आहे, मात्र फक्त मनन अपुरं आहे.
आज खूप दिवसानी आपण दोघे तळ्यावर भेटलो आणि बौद्धिक व्यायामाला मिळालेला आराम आज भरून काढला."
सुरवातीला भेटल्यावर त्यांच्या चेहर्यावर दिसलेल्या बोलक्या छटा उठतां उठतां बरचसं बोलून गेल्या.
श्रीकृष्ण सामंत
Posted by श्रीकृष्ण सामंत on July 03, 2009 04:12 AM · permalink
Posted by shrikrishnasamant on July 03, 2009 03:40 AM · permalink
“एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं.”
आज प्रो.देसाई जरा खुशीत दिसले.बरेच दिवस ते आपल्या मुलाकडे राहायला होते.मधून मधून माझ्याशी फोनवर बोलायचे.पण आज त्यांची तळ्यावर भेट झाल्यावर मी त्यांच्या आनंदी चेहर्याकडे बघून म्हणालो,
Posted on July 03, 2009 03:40 AM · permalink
मुंबई - फिलाडेल्फियातील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात 'मराठमोळ्या' अमेरिकावासीयांच्या वेशभूषेतूनही मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक वेगळेपण ठसविणाऱ्या या महोत्सवात कोल्हापुरी, पेशवाई आणि नागपुरी मेजवानीचा थाट आणि शालू-पैठणी, नथ, कोल्हापुरी साज आणि 'इरकली' साड्यांनी 'मराठी संस्कृतीरंगां'ची उधळण फिलाडेल्फियाच्या कन्व्हेन्शन सेंटरला ...
Posted by DINESH GUNE on July 03, 2009 03:08 AM · permalink
Posted by DINESH GUNE (noreply@blogger.com) on July 03, 2009 03:05 AM · permalink
मी अगदी लहान असताना नुकतीच जेव्हा बाराखडीची ओळख झाली होती तेव्हा जाड ठश्यातील ज्योत्स्ना प्रकाशनाची "जोडाक्षर विरहित" गोष्टींची पुस्तके वाचल्याचे आठवते.
Posted by सृष्टीलावण्या on July 03, 2009 03:04 AM · permalink
आधुनिक जगात उपवास साबुदाणा आणि बटाटा ह्यांच्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. हे दोन "मुळ"पदार्थ उपवासाच्या मान्यताप्राप्त यादीत कसे आले ते जाणकारांकडून ऐकण्याची खूप उत्सुकता आहे.
साबुदाणा असा बनवतात: http://www.sabuindia.com/sago2.htm
साबुदाण्याविषयी अधिक माहीती: http://en.wikipedia.org/wiki/Sago
बटाटा: http://en.wikipedia.org/wiki/Potato
Posted by अमृतांजन on July 03, 2009 02:31 AM · permalink
Posted by सखाराम गटणे on July 03, 2009 02:27 AM · permalink
उपक्रमवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांवर मालकी हक्क (कॉपीराईट) कोणाचा असतो? तसेच त्या लेखात बदल किंवा तो लेख परत घेण्याचे हक्क लेखकाला असतात किंवा नाही यासंबंधी कोणी मार्गदर्शन करू शकेल का?
Posted by चंद्रशेखर on July 03, 2009 01:26 AM · permalink
Posted by ashishchandorkar (ashishchandorkar@rediffmail.com) on July 02, 2009 04:41 PM · permalink
फोर्थ डायमेन्शन - 14
पती, पत्नी और 'वह'
Posted by प्रभाकर नानावटी on July 02, 2009 03:38 PM · permalink
“तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो”
श्री महाराज (सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज)
Posted by सदानंद् ठाकूर on July 02, 2009 02:21 PM · permalink
Posted by Abhijit Galgalikar (noreply@blogger.com) on July 02, 2009 01:13 PM · permalink
Posted by खोडसाळ (noreply@blogger.com) on July 02, 2009 11:32 AM · permalink
#################################################################################################
सदंर्भ ::: दिपालीताईंची झणझणीत पाककृती...
http://www.misalpav.com/node/8382
#################################################################################################
दिन: कालचा
स्थळ : दुपारी १ ते रात्री १० "हक्का (नुडल्स)ची" टवाळकी करण्याची आणी झोपण्याचा जागा....म्हणजेच 'हमार आफिसवा" व माझे घर्स
प्रेरणावाक्य : जो खाई मटण,त्यालाच देव भेटन्...जो खाई वरण तो पटकन मरन(काय फालतुपणा आहे हा..)
#################################################################################################
बरोबर १ च्या ठेक्याल्या(सुरेखाताई पुणेकर धरतात तसा) आम्ही लॉग-ईन--- लॉग-ईन खेळायला सुरुवात केली .टास्क तर नव्हतेच.ऑफिशियल ई-मेल आणी ऑफीसातल्या एक दोन फि-मेल
चेक केल्यानतंर आमचे हात आय.ई. कडून मिपाकडे वळले...धन्स..कोणाचा,पुण्यात पाणी-कपात असताना, "बा॑ध फुटला" होता...तर कोणाला बढती मिळाली होती...एक-दोन जण वांद्रा-वरळी सेतु ला "नावे ठेवण्याच्या" कार्यक्रमात गु॑तले होते.देवकाका॑नी, बर्याच दिवसा॑ने,ध्रुवतार्याच्या निमीत्ताने,संगणकीय आणि महाजालीय उपद्व्याप करित आम्हा नवोदित मिपाकरा॑स दर्शन-सुख दिले होते(बाकी देवकाका॑चे लेखन म्हणजे ऑसमच) .डानरावा॑नी "धर्म-स॑स्कृती-श्रध्दा-स॑स्कार" शिबीर ऊघडेले होते.त्या शिबीरात आपणही थोडा वेळ आसनस्थ व्हावे असा आमचा विचार झाला. मग मनातल्या मनात वाक्ये जुळवत होतो..
धर्म म्हणजे "मानव योनीत जीवन जगण्याचे लिखीत शास्त्र"
संस्कृती म्हणजे " मानव योनीत जीवन जगण्याचे त॑त्र"
स॑स्कार म्हणजे " धर्म आणी स॑स्कृतीची योग्य सा॑गड घालुन केलेले आचरण"
आणी श्रध्दा म्हणजे भडके सरांची सु॑दर बाला.
अचानक आमचे लक्ष गेले ते खादाडीत.
झ ण झ णी त सु क॑ म ट ण....
दिपाली ताई॑ची शेव-भाजी, आधी,कट्ट्याच्या निमीत्ताने का होईना पण खाउशान झाली होती.बाकी खानदेशी भाजीची आन बोलीची गॉडी अवीटच...धागा ऊघडला...नजर गेली ती फोटोवर...कलिजा खल्लास...काय फोटो...मेलो.नजरच हटेना..तोडांला पानी सुटल...ईतक की पुण्यातली पाणी -टचा॑ई भरुन निघाली असती.हालत काय विचारु नका...पाककृतीत काय लिव्हलय ते देखील वाचल नाही ,नुसता वेड्यासारखा बघत सुटलो..खाई-खाई सुटली...अरे काय "मुखोशनल अत्याचार" आहे हा.
काही नाही ,आज काही ही झाल तरी असच मटण खायचच. अगांत बाजीप्रभु सारखे स्फुरण चढले...बास्..आईने दिलेला डबा ऊघडला...डब्यात, माझ्या मुळावर ऊठलेला मुळा..तो मुळा मी आमच्या बॉस ला खायला घातला..म्हटल चला कॅ॑टीनमध्ये अशा प्रकारच मटण आहे का बघुया..पोपट..आता काय...
स॑ध्याकाळचे सात..मन आणी जीभ एखाद्या पशुसारखी चवताळुन ऊठलेली...फोटो काही केल्या नजरे समोरुन सरकेना...
अशात फोन वाजला..
तो:हे शुहाश...
मी:हाय डॅनी..हाऊ आर यु..
तो:गुड ..सो व्हाट्स हॅपनी॑ग
मी:झॅणझॅणीत शुक्या म्यट्यन..
तो: व्हाट...
मी : सॉरी...रि -स्टार्टींग रिपिलीकेशन
तो: ओकी..बाय..
काही खर नाही, मला "मटणेरिया" झाला होता.जोपर्य॑त खात नाही तो पर्य॑त तो बरा होणार नव्हता...
मन सैराभैरा फोटोतल्या वाटीभोवती धावत होते.दहाच्या ठोक्याला ऑफीसमधुन कलटी मारली...जाताना "पुनम" मध्ये था॑बलो. हा, ईथे जरुर खायला मिळेल.आत गेलो..वेटर ला मराठी त बोलताना पाहुन आन॑द झाला. आपली अतृप्तता सपंणार होती.
"काय रे मटण आहे ना"
"हाय की.."
"सुक॑"
"हा"
"एक प्लेट बनव आणी सोबत बाजरीची भाकर घेऊन ये"
"हा"
"आणी चा॑गल झणझणीत झाल पाहिजे बर का?"
"कोल्हापुरी स्टाईल का ?"
"येस्स"
थोडावेळ मन शांत झाल.माझी नजर आणी वेटर ईकडे-तिकडे होत होती .लवकर आण रे बाबा (मनातल्या मनात..)..दोन-चार गाववाले मोठ-मोठ्याने बोबंलत होते..समजुन गेलो की मदिरापानाचा कार्यक्रम ऊरकलेला दिसतोय.शेवटी एकदाची माझी डिश येताना दिसली.ऊन्हाच्या झळा बसताना अचानक एखाद्या झाडाची सावली अंगावर पडली की कस बर वाटत तसे मला वाटले..
मस्त डिश मधुन काढुन प्लेट मध्ये घेतल..अधासासारखा पहिला घास घेतला.ठसका लागला.पाणी पिलो..दुसर्या घासाला नाकातुन धबधबा...मरणाच तिखट बनवल होत..कसे-मसे चार-पाच घास घेतले..तो॑डाच अग्नीमुख झाल..तोंड,घसा,जीभ जाळणार्या मटणाचे आणी यथेच्छ वापरलेल्या पेपर नॅपकीनचे बिल देऊन तिथुन सटकलो..पण "चवचाल"जीभ त्यामुळे अजुनच खवळली..
आता काय्..मन शांत होईना..पोटोबा काय विठोबा म्हणायला तयार नव्हते..ह्या सगळ्या गडबडीत ११ वाजले ...शेवटपर्य॑त लढा देऊ म्हटल.थेट गाडी " नागपुरचाळीत".रफीकभाईला ऊठवल. अर्ध्या रात्री मला बघुन तो चमकलाच.घिसाडघाईत मटण घेतल(पांऊड, किलोमध्ये कसे काय कन्व्हर्ट करायचे...).गाडी परत घरी.."हरी ग॑गा"..माझ्या चावीने दरवाजा ऊघडला.थेट किचन मध्ये..
पाककृती प्रत्यक्षात ऊतरावयला सुरुवात केली...
सर्वात पहिले लॅपटॉप किचन मध्ये लावला.नेट कनेक्ट केल.मिपावरचा पाककृती चा धागा ऊघडला...काम चालु रस्ता बंद...ईकडे बनविताना मला किचन मधल्या वस्तु आणी ईतर बनवायला लागणार्या कोथमीर कडीपत्ता वगैरै लवकर सापडत नव्हत्..काय ते पेरिफिरल का टनेल व्हिजन काय माहीत..शेवटी एकदाच, सगळ काही कृती नुसार करुन, शिट्या वाजायची वाट बघत बसलो..
दरम्यान. हॉल मध्ये बसुन टि.व्ही.ऑन केला.टी.व्ही वर"आशीर्वाद नाही दिला तरी चालेल पण 'माहेरची साडी' हवी" म्हणुत अलका कुबल रड-रड रडत होती..
शेवटची शिटी झाली..मी ही शिटी वाजवत किचन मध्ये शिरलो..गॅस ब॑द केला..थोडावेळ कुकर शांत होऊ दिला..आता कुठे पळुन जाशील रे "झणझणीत सुक्या मटणा"..वास तर छान येत होता..
शेवटी एकदाचा कुकर थंड झाला.झाकण ऊघडले.ईकडे मम्मीची ही त्या वासाने झोप ऊडाली..
"काय करतोयस रे किचन मध्ये"
" काही नाही"
"बघु काय बनवलय ते"जवळ येत मम्मी ने विचारले.आमच्या मम्मीला आमच्या मुडी स्वभावाची जाण आहे.त्यामुळे मम्मीला मी केलेले ऊपदव्याप पचविण्याची सवय झाली आहे.
"हम्म" मम्मीने ,मी बनविलेले मटण,पळीने हाताच्या तळव्यावर घेतले. चव चाखुन बघीतली..
"एकदम झणझणीत झालय"
मी एकदम खुश्..खरतर मम्मीचा स्वयंपाक म्हणजे ऊच्च दर्जाचा .
हे म्हणजे ब्रॅड पिटने किशनकुमार ला "तु आज फार हॅण्डसम दिसतोय" असे म्हणण्यासारखे होते..
सटदिशी मटण प्लेटमध्ये घेतल..
"अरे तु कसा काय खातोस" मम्मी.
"का"मी
" अरे, आता गुरुवार सुरु झाला म्हणजे तुझा ऊपास नाही का सुरु झाला, ते बघ सव्वाबारा झाले"
झाल, माझा गुरुवारच्या ऊपासात सात वर्ष खंड पडु दिला नाही...
"अरे देवाचे आशीर्वाद घे,कशाला ऊपास मोडतोस"
माझी अवस्था "अलका कुबल" सारखीच झाली " एक वेळ आशीर्वाद नाही दिला तरी चालेल पण 'झणझणीत सुके मटण' हवे..
शेवटी मम्मी ने खिचडी बनवुन दिली आणी .मी ती पोटात ढकलली आणी लोहगाव च्या रुम वर गप झोपायला गेलो..
आज आता आल्यान॑तर मिपा ऊघडले तर पुन्हा आजच्या खादाडीत " झणझणीत सुकं मटण" आणी " चवचाल" जीभ चवताळलेली...
Posted by सूहास on July 02, 2009 11:20 AM · permalink
"तात्यासेठ, अभि ये महिनेमे मेरे बँकमे रख्खे हुए ३०००० रुपये मिलेंगे ना?"
"हा. क्यू नही मिलेंगे? जरूर मिलेंगे. डबल ढक्कनको बोल दुंगा!"
शबनम मला विचारत असते. तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे असतात, ती चाहेल तो खाऊ द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची असते.
शबनम..!
मुंबैच्या कॉग्रेस हाऊस मधली एक मुजरेवाली, एक डान्सर. १९९०-९१ च्या सुमारास मी फोरास रोडवरच्या बारमध्ये जो नौकरीला लागलो त्या नौकरीतून एकाच्या ओळखीने दुसरा, दुसर्याच्या ओळखीने कुणी तिसरी या पद्धतीने त्या विभागातले स्त्रीपुरुष माझ्या संपर्कात आले, आजही येत आहेत. माझा धंदा विम्याचा आणि शेअरबाजार सल्लागाराचा, आणि योग असा की सभ्य सुशिक्षित पांढरपेशा समाजासोबतच मुंबैच्या रेडलाईट एरियातली काही मंडळी, काही बार डान्सर मुली, काही बारमालक शेट्टी, ही मंडळी आज माझे अशील आहेत. मी या सर्व लोकात भरपूर वावरलो, ह्यांची दुनिया जवळून पाहिली, आजही पाहतो. परंतु आपला मतलब धंद्याशी. अशील कुणी का असेना! सुदैवाने अभिजात संगीत या एकाच गोष्टीचे मनमुराद व्यसन असल्यामुळे आजतागायत कधी पाय घसरला नाही, कधी वाहवत गेलो नाही. असो..!
दोन तीन वर्षांपूर्वी बनारसी चाळीतल्या शकीलभाय या बाजेवाल्याने माझी आणि शबनमची ओळख करून दिली होती. काँग्रेस हाऊस आणि फोरासरोडवरच्या बनारसी चाळीत जिथे मुजरा होतो तिथे शकील भाय हार्मोनियम वाजवतो, चांगली वाजवतो. शकीलभाय हा शबनमचा मामू, की असाच कुणी सगेवाला.
"तात्याभाय, ये शबनम. इसको अच्छा पैसा मिलता है, अच्छा नाचती है. इसकू जरा कुछ पैसा बचानेला तरिका बताओ!"
त्या दिवशी प्रथमच मी शबनमचा मुजरा पाहिला. छान दिसत होती, नाचतही छान होती. त्या बैठकीत दोनचार अय्याश लोक बसले होते, ते पैसे उडवत होते! ती मंडळी निघून गेल्यानंतर शबनमने माझ्याकरता आणि शकीलकरता चहा मागवला. मग मी पैसा वाचवणं कसं महत्वाचं आहे, मी काय मदत करू शकतो, पैसा कुठे अन् कसा वाचवता येईल, विमा म्हणजे काय, इत्यादी सर्व सर्व गोष्टींवर तिचं भरपूर बौद्धिक घेतलं. समुपदेशनच म्हणा ना! 
शबनम तशी अशिक्षितच. ज्या समाजात, ज्या वस्तीत, ज्या लोकात वाढली तो समाजही अशिक्षितच. तिला माझं बोलणं समजत होतं आणि नव्हतंही! शेवटी मी तिला त्या एरियाच्या, खास बंबिय्या-हिंदीत समजाऊन सांगितल्यावर तिला माझं म्हणणं पटलं असावं!
"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश भडवे तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"
इतक्या कडक आणि हेटाळणीभरल्या शब्दात सुनावल्यावर शबनम भानावर आली. तिच्या डोळ्यात पाणी आलं! त्यानंतर तिला मी विम्याच्या, पोस्टाच्या मासिक बचत योजनेच्या काही स्कीम्स समजावून सांगितल्या.
आयूर्विमा महामंडळाची न्यू जनरक्षा पॉलिसी तिला दिली. डबल ढक्कनला सांगून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेली रिकरींगच्या बचत योजनेत तिला पैसे गुंतवायला लावले. डबल ढक्कन हा प्राणी त्या बँकेचा दलाल आहे. हा इसम पूर्वी दिवसरात्र गांजा पिऊन फोरासरोडवर, फॉकलंडरोडवर पडलेला असायचा. मीच त्याला त्या बँकेचा दलाल बनवला. डबल ढक्कन तसा वल्ली माणूस. त्याचे व्यक्तिचित्र पुन्हा केव्हातरी! 
दरम्यानच्या काळात विम्याच्या वगैरे कामानिमित्त माझी आणि शबनमची काही वेळा भेट झाली. एकदोन वेळेला मी तिला बाकायदा दिल्ली दरबार हाटेलात बिर्याणी खायलाही घेऊन गेलो आहे. 'हा माणूस मादरचोद नाही आणि याला आपल्यासोबत गेम वाजवण्यात काहीही इंटरेस्ट नाही!' असा कुठेतरी एक विश्वास, एक खात्री तिला होती/आहे! कारण ती ज्या दुनियेत वावरते त्या दुनियेत बाहेरच्या सभ्य, सुशिक्षित, पांढरपेशा समाजातले लोक तोंडं लपवून, कुठे काही चान्स मारायला मिळतो का, या एकाच हेतूने येतात. हो, तोंडं लपवून! घरच्या बायकोवर भडव्यांचं समाधान होत नाही. 'अमर प्रेम' मधली किशोरदाने गायलेली, 'हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!' ही ओळ मी तिथे येणार्या काही पांढरपेशा पब्लिकच्या बाबतीत अनुभवली आहे! 
अवांतर - आपल्या मिपाचाच एक सभासद. नाव घेत नाही. परंतु त्याचा चक्क मला एकदा फोन. "तात्या कुठे आहात? मी 'बंबई संगीत कलाकार मंडली!' अशी पाटी लिहिलेल्या इमारतीच्या बाहेर उभा आहे. इमारतीमध्ये काही टंच, उफाड्याच्या मुलींचा वावर दिसतो आहे. काय करू?"
मला बसल्या जागी दरदरून घाम फुटला! "अरे बाबा, तू काँग्रेस हाऊस समोर उभा आहेस. पहिला माघारी फिर. वाट्टेल तसे पैसे घालवायचे असतील तरच आत जा..!"
या नव्यानवख्या तरूणाला आतल्या पोरी साफ धुवून काढतील ही मला खात्री आणि म्हणूनच भितीही!
"नाही तात्या. मी आत जात नाहीये. जस्ट इथे आलो होतो म्हणून तुम्हाला फोन केला. एकदा ही सगळी दुनिया तुमच्यासोबत पाहयची आहे. माझी आत्ता ट्रेन आहे, टाईम झाला आहे, मी चाललोच आहे पुण्याला परत! घाबरू नका!" 
असो..! 
तर काय सांगत होतो?
आमची शब्बो तशी हुशार, व्यवहारचतूर परंतु अत्यंत अबोल. बोलेल तेही अगदी हळू आवाजात. स्वभावाने तशी खरच खूप चांगली आहे. पण नशीबाने तिला त्या बाजारात बसवली. तिची आई याच धंद्यातली. बनारसला कोठेवाली होती. काही वर्षांपूर्वी ती लहानग्या शबनमला घेऊन मुंबैत आली. शबनम १५-१६ वर्षाची झाली, जवानीत आली आणि आपसूकच या धंद्यात आली!
अहमदाबादचा पन्नाशीतला कुणी करोडपती जगनसेठ एकदा काँग्रेस हाऊस मध्ये मुजरा ऐकायला आला होता. सोळा-सतरा वर्षाच्या शब्बोरानीवर नजर गेली त्याची. पैसे उडवू लागला तिच्यावर. अडनिड्या वयातली शबनमही भाळली त्याच्यावर. आणि एकेदिवशी बाकायदा नथ-उतरणीचा कार्यक्रम ठरला. शबनमला चुरगाळण्याचे एक लाख रुपये ठरले. खुद्द आईनेच सौदा ठरवला आणि पैसे घेतले. आता बोला..!
एकदा चव घेतल्यावर तो जगनसेठ येईनासा झाला! पन्नाशीतला जगनसेठ मुलीच्या वयाला शोभेल अश्या मुलीला भोगून दुसरीकडे हुंगेगिरी करायला चालता झाला! शबनमला दिवस राहिले. नथ-उतरणीच्या संबंधातून जर दिवस राहिले तर होणारं मुल फारच मुबारक! त्यातून मुलगी झाली तर फारच छान. कारण ती जवान होऊन पुढे घराणं चालवेल अशी मुजरेवाल्या/कोठेवाल्या दुनियेची धारणा!
आता बोला मंडळी! तुम्हाला काय नी किती सांगू त्या दुनियेबद्दल?!
शबनमला मुलगी झाली. जगनसेठने दिलेले पैसे संपले. शबनम पुन्हा कोठ्यावर हजर! आता तिची मुलगी मोठी होते आहे. आईचं म्हारातपण आहे, औषधपाणी आहे. जिंदगी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे..!
काहीच दिवसांपूर्वी शबनमच्या त्या 'मुबारक ' (?) औलादीचा जनमदिन होता म्हणून तिने मला जेवायला बोलावलं होतं. मटणकुर्मा-पराठे असा बेत होता. दोन पेगही झाले तिथे. तिची आईही होती तिथे. जनरली कुठल्याही वडिलधार्या माणसाला प्रथम भेटलं की वाकून नमस्कार करायची सवय आहे मला. परंतु मुलीच्या नथ-उतरणीचे लाख रुपये घेतलेल्या त्या बाईला बघितल्यावर नमस्कार तर सोडाच, उलट घृणा आली मला तिची! पण कुणाला दोष देणारा मी कोण? काय अधिकार मला? 'शबनमके मेहमान!' म्हणून त्या बाईने पाहिलं मला आणि लाचारपणे हसली. घृणेची जागा किवेने घेतली!
शबनमची पोरगी गोड आहे! कधी कधी विचार केला की वाटतं की त्या जगनसेठला का दोष द्यावा? त्याने सौदा केला होता, लाख रुपये मोजले होते! तरीही मनातल्या मनात त्या जगनसेठला शिव्याशाप देत मी त्या निष्पाप चिमुरडीच्या हातात शंभराची नोट ठेवली!

आता लौकरच शबनमचं डेली रिकरींग डिपॉझिट मॅच्युअर होणार आहे. तिला ३०००० रुपये मिळणार आहेत. मी तिला पुन्हा तशीच गुंतवणूक सुरू ठेवायला सांगणार आहे. पण सध्या नाही. कारण तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे आहेत, ती चाहेल तो खाऊ घ्यायचा आहे, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची आहे!
करू देत..!
-- तात्या अभ्यंकर.
Posted by विसोबा खेचर on July 02, 2009 10:00 AM · permalink
मागच्या तिन रात्री पासुन तो प्रचन्ड मोठा डोंगर चढण्याचा प्रयत्न करत आहे, पण यश काहि त्याच्या वाटेला नसावे. चालुन चालुन पायाला फोड येउन प्रत्र्येक पावलावर त्याची सत्त्वपरिक्षा घेत होते. फोडामुळे तो पायाच्या कडावर चालण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे बेढब शरिर अजुनच बेढब वाटत होते. त्याच्या खांद्यावर अड्कवलेल्या पोतडीमधुन त्याची खोदकामाची हत्यारे डोकावत होती.
Posted by Innocent Warrior on July 02, 2009 09:36 AM · permalink
Posted by Ajit (noreply@blogger.com) on July 02, 2009 09:32 AM · permalink
अडवाणीजींनी भेट दिलेल्या आपल्या (१९९२ सालच्या, किरकिरत्या टोयोटा) अग्निरथातून स्वा. सावरकर चालले होते. सकाळी अडवाणींसोबत "रामसेतूचे सांस्कृतिक महत्त्व आणि चिंतन" ही चर्चा चांगलीच रंगली होती, तेच विचार अजून त्यांच्या मनात घोळत होते. तेवढ्यात वरळी नाक्याच्या ट्रॅफिकच्या कोलाहलामुळे ते एकदम बिचकले -
"काय हो चालक - स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षं झाली ना? अजूनही चळवळी चालूच? एवढी ...
Posted by Ajit on July 02, 2009 09:32 AM · permalink
पहिल्या पावसाच्या सरी
अंगप्रत्यांगाच्या वरी
मनमोर नाच करी
आले अमृत माझ्या दारी
आला मातीचा सुवास
नभी विजेची आरास
ढोल ढगातून वाजे
वारा झोकावे ...
Posted by नरेन्द्र प्रभू (Narendra Prabhu) on July 02, 2009 08:57 AM · permalink
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)
आधीचे भाग येथे वाचा :
भाग एक - http://misalpav.com/node/8127
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
भाग आठ - http://misalpav.com/node/8233
भाग नऊ - http://misalpav.com/node/8251
भाग दहा - http://misalpav.com/node/8282
भाग अकरा - http://www.misalpav.com/node/8295
भाग बारा - http://misalpav.com/node/8309
भाग तेरा - http://misalpav.com/node/8326
भाग चौदा - http://misalpav.com/node/8349
भाग पंधरा - http://www.misalpav.com/node/8367
भाग सोळा - http://www.misalpav.com/node/8383
भाग सतरा - http://www.misalpav.com/node/8400
१२ मार्च
आज कोर्टात आरक्षण घोटाळ्याबाबत आम्ही दाखल केलेल्या बदनामीच्या केसची तारीख होती. माझी आणि आगलावेंच्या साक्षी झाल्या. चीफ घेताना आम्हाला काय प्रश्न विचारणार हे फायदे वकिलाने आधीच सांगितले होते अन आमच्याकडून सगळी उत्तरे घोटुन घेतली होती. गेले दोन दिवस मी अन आगलावे आमची साक्ष घोकत बसलो होतो - अगदी प्राथमिक शाळेतली मुलं पाढे घोकतात तसे. या सगळ्या पाठांतरामुळे चीफ देताना फारसा त्रास नाही झाला. फायदे वकिलाने सांगितल्याप्रमाणे मी पार्टनरशीप रजिस्ट्रार, नगरसचिव कार्यालय, शहर अभियंता कार्यालय, रजिस्ट्रार ऑफिस असे सगळीकडुन मिळवलेल्या कागदपत्रांच्या प्रति काढुन नेल्या होत्या. साक्ष देताना पुरावा म्हणुन मी सगळी कागदपत्रे कोर्टाला दाखवली सुद्धा बिनचुक.
पालिकेच्या वकिलाने उलटतपासणी घेतली तेव्हा पण फारसा त्रास नाही झाला. पण त्या लोचे कॉर्पोरेटरच्या चिरफाडे वकिलाने मात्र उलटेपालटे केले आम्हाला. पार घाम काढला त्या चिवट अन खवट म्हातार्यानं. कॉलेजात असताना एकदा युआर च्या निवडणुकीत मारामारी केली म्हणुन माझ्यावर गुन्हा दाखल केला होता ते उकरुन काढले त्याने अन त्याशिवाय काय काय गुन्हे माझ्याविरुद्ध दाखल झालेत असे विचारले. मी सरळ सांगितले त्या मारामारीच्या प्रकरणात मला उगीचच लटकावले होते पडलेल्या उमेदवाराने अन त्याचे आरोप खोटे निघाले म्हणुन पोलिसांनी त्याच्यावर नंतर वेगळा गुन्हा पण दाखल केला होता. नंतर त्या चिरफाडेनं मला माझ्या किती मित्रांवर गुन्हे दाखल आहेत असे पण विचारले. शेवटी न्यायाधीशच आले माझ्या मदतीला. त्यांनी चिरफाडे वकीलांना सुनावले, "अहो काहीही प्रश्न विचारताय तुम्ही. या प्रश्नांचा केसशी काय संबंध? त्यांनी जी बातमी दिली होती ती सत्य आहे हे दाखवणारे पुरावे आधीच दिलेत. त्या बाबत विचारा हवे तर. एखादा गुन्हा झाला आहे हा आरोप जर खरा असेल तर तो करणार्याच्या पुर्वचारित्र्याचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही." हे ऐकुन एकदम छातीवरचे ओझे उतरल्यासारखे झाले. त्या जज्जचा मुका घ्यावासा वाटला एकदम!
पण चिरफाडे नाही शहाणा झाला. त्याने आगलावेंना पण चांगले सोलटले त्यांच्या उलटतपासणीत. सरळ विचारले तुमचा पेपर खोट्या अन सनसनाटी बातम्या छापतो हे खरे आहे का असे. आगलावे नाही म्हणाले तर सांगितले तुमच्या पेपरवर पंधरा वर्षांपुर्वी एका बिझिनेसमनने बदनामीचा दावा केला होता अन तुमचा पेपर ती केस हरला म्हणुन त्याला १० लाखाची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. आगलावेनी सांगितले त्या केसमधे आमच्या पेपरने केलेले अपील अजुन पेंडिंग आहे अन ती बातमी आली तेव्हा ते संपादक नव्हते म्हणुन. वाईट पेटले होते आगलावे, रागाने लालबुंद झाले होते. त्यांनी पण शहाणपणा केला अन चिरफाडेला सुनावले की तुमच्या अशीलाचा भ्रष्टाचार आमच्या पेपरने उघडकीला आणला म्हणुन चिडुन तुम्ही आमच्या पेपरची अन बातमीदाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणुन.
***
१७ मार्च
आज आठवड्याचे बाजारभाव घ्यायला गेलो तर अचानक चांगली बातमी मिळाली. त्या लढ्ढा कमिशन एजंटला सहज विचारले की गेले दोन आठवडे साखरेचे भाव का वाढत आहेत तर तो म्हणाला, "तेचा काय आहे परमोदशेट, आता उन्हाळा आला म्हनुन साखरेची डिमांड वधारली. तेनी भाव पन एकदम तेजीत गेला. आता तीन महिने असाच तेजी होत रहाणार साखरेत. पावस पडले ना, कि मंग येईल मंदी!"
च्यायला हे लफडे काही माझ्या लक्षात नाही आले. उन्हाळ्याचा अन साखरेच्या भावाचा काय संबंध? तसे विचारले तर लढ्ढा म्हणाला, "असा बघा परमोद्शेट, गरमीच्या दिवसात लोक लई आईसक्रीम, कुल्फी खाते. परत सरबत, लस्सी, कोल्ड्रींक पन पीते. त्यामुळे आईस्क्रीमवाले, सरबतवाले कंपनी एकदम बल्क मंदी साखर खरेदी करते. परत हा शादी मुंजीचा सीझन असते त्याने लोक गोडाचा जेवन पन जादा करते त्यासाठी हलवाई खरेदी करते. समदी खरेदी एकाच टायमाला झाली का बाजारात साखरेला मंदी येते. आमच्यात तर या सीझनमधी आमी साखर खरेदी करतच नाय. थंडीच्या दिवसात वद्धा स्टॉक घेऊन ठेवते आमच्या घरी."
एकदम लख्ख झाले डोक्यात आयला असा विचार किती लोक करत असतील. मुळात उन्हाळ्यात साखर हमखास महागते हेच लोकांच्या लक्षात येत नसेल तर आधीच स्टॉक कसा करतील? मग लढ्ढालान परत विचारले किती वाढू शकतील साखरेचे भाव तर तो म्हणाला, "असा हाय आत्ता साखर चालली २२०० ने म्हनजी रिटेलात भाव पडतो २५ रुपिये. मे महिन्यात तो कमित कमी ३० वर जाएल."
परत ऑफिसात आलो तर हेच विचार डोक्यात होते. मग काढली बातमी लिहुन, "आला उन्हाळा, साखर आधीच खरेदी करा म्हणुन" अन दिली सोडुन. अपेक्षेप्रमाणे ऑफिसात कुणाच्याच डोक्यात आजपर्यंत असा विचार आला नव्हता. सगळे चाट पडले बातमी वाचुन. माजिरेने तर आगलावे साहेबांना सरळ सांगितले ही बातमी पान एकवर घ्यायला हवी म्हणुन. आगलावे आधी कुरकुर करत होते कोण वाचणार असली थर्ड वल्ड कंट्री स्टोरी म्हणुन पण मग त्यांनी पण माजिरेचे म्हणणे मान्य केले.
***
२५ एप्रिल
आज आरक्षण घोटाळ्याबाबत आम्ही दाखल केलेल्या बदनामीच्या केसचा निकाल लागला. आम्ही जिंकलो. कोर्टाने प्रतिवादींनी पेपरला नुकसान भरपाईपोटी २५ लाख द्यावेत, माझी अन पेपरची लेखी माफी द्यावी असे आदेश दिले. लोचे अन कंपनीचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. हायकोर्टात अपिल करु म्हणत होता. पण फायदे वकिल मात्र खुष झाले. म्हणाले त्यांचे अपिल काही टिकणार नाही. शिवाय ते म्हणाले आता हायकोर्टात पण आम्हीच जिंकणार हे स्पष्ट झालेय. ऑफिसात तर मी एकदम हीरो झालोय. आगलावेंनी पण शाब्बासकी दिलि. निकालाची बातमी पान एक वर मोठ्ठी छापणार आहेत. शिवाय अग्रलेख पण लिहिलाय, "देर हैं! अंधेर नही!!" हेडिंग देवुन.
***
४ मे
हायकोर्टातल्या आमच्या दोन्ही रिटची आज एकत्रित सुनावणी झाली. हायकोर्टाने पण आमच्याच बाजुने निकाल दिलाय. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घातला म्हणुन हायकोर्टाने पालिकेला समज दिलीय अन असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यायला सांगितलेय. "आधी गुन्हा करायवा अन तो कुणी उघडकीला आणला तर त्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करायचा यातुन आरोपींचा निर्ढावलेपणाच सिद्ध होतो," असे म्हणलंय आदेशात. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करुन कोर्टापुढे अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिलाय. जी बेकायदा बांधकामे झालीत त्यांच्यावर जबर दंड ठोठावण्याचे अन जिथे बांधकामे अजुन सुरु झालेली नाहीत त्या जागा परत ताब्यात घेण्याचे अन तिथे बागा अन क्रिडांगणे करण्याचे आदेश पण दिलेत. जिंकलो शेवटी. बराच मनस्ताप झाला पण चलता है! एक चांगले काम तर झाले ना?
***
३१ मे
आज ट्रेनिंगचा काळ संपला. सकाळी ऑफिसात गेलो तर आधीच आगलावे अन बाराथे साहेब येवुन बसले होते अन ऑफिसबॉय दत्तुला सांगुन ठेवले होते की मी आलो की लगेच मला केबिनमधे पाठव म्हणुन. गेलो तर आगलावे साहेबांनी हातात डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट ठेवले. रिपोर्टर म्हणुन महिना दहा हजार पगारावर घेतले आहे. खरेतर ट्रेनिंग संपल्यावर सहा महिने प्रोबेशन देण्याचे ठरले होते पण आगलावे म्हणाले की मी एव्ह्डे चांगले काम वर्षभर केले आहे की मला प्रोबेशनवर ठेवण्याची गरज नाही हे मालकांना पटले अन डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करण्याला त्यांनी संमती दिली. तसा मी हळवा वगैरे नाही पण एकदम भरुन आल्यासारखे झाले. ही सगळी बाराथे साहेबांची कृपा. त्यांनी संधी दिली म्हणुन लाईफ लाईनला लागले. नाहीतर बसलो असतो मी अजुन पण कट्ट्यावर टगेगिरी करत. पटकन खाली वाकलो अन त्यांचे पाय धरले. त्यांना एकदम कसेनुसे झाले. त्यांनी खांद्याला धरुन उठवले तेव्हा त्यांचे पण डोळे भरुन आलेले वाटले.
ऑफिसात तोवर सगळ्यांनाच बातमी कळली होती. सगळे केबिनबाहेर जमा झाले अन एकच गिल्ला केला, "पार्टी! पार्टी!!" बाराथे साहेबच मग म्हणाले, "अरे तो तर आत्तापर्यंत ट्रेनी होता, सगळ्यात कमी पगारावर. पण पार्टी करु आपण. आज दुपारचे जेवण माझ्याकडून सगळ्यांना." पण माझे तिकडे फारसे लक्षच नव्हते. डोळ्यासमोर येत होते फक्त आई-बाबा..... किती बरे वाटेल त्यांना! अन निमा.... तिला पण किती अभिमान वाटेल माझा!
Posted by पुनेरी on July 02, 2009 08:50 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 02, 2009 08:08 AM · permalink
"मेघमल्हार." , नेहरु सेंटर आयोजीत फार प्रतिष्ठीत, दर्जेदार संगीत महोत्सव, गेली १९ वर्षे नेहरु सेंटर तो सातत्याने सादर करत आले आहे.
महफील संपल्यानंतर मीता पंडीत परत गौड मल्हार ची विलंबीत बंदीष गायला बसल्या तेव्हाच पुढचे कलाकार , जयतिर्थ मेवुडी आलेले नसावेत हे ध्यानी आले. ट्रफिक मधे अडकले असतील येतील लवकरच वाटु लागले.
पण त्यांचा पत्ता नाही.
नेहरु सेंटरच्या डौ. ...
Posted by HAREKRISHNAJI on July 02, 2009 08:08 AM · permalink
करायला व खायला सोपा प्रकार
साहित्य :- १ वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी खिसलेला गुळ, १/४ वाटी साजुक तूप
क्रूती :- प्रथम ४-५ चमचे तूप गरम करुन त्यात गव्हाचे पीठ घाला. बारीक ग्यासवर लालसर भाजा. खाली उतरवून गुळ व उरलेले तूप मिसळा व खायला घ्या.
Posted by Dipa Patil on July 02, 2009 08:04 AM · permalink
Posted by HAREKRISHNAJI (harekrishnaji@gmail.com) on July 02, 2009 07:50 AM · permalink
नेहरु सेंटर आयोजीत "मेघ मल्हार " ला जातांना छत्री न घेता जाणे व वाटेत पावसानी भिजवले तर दोष पावसाचा नाही, संयोजकांचा नाही, कलाकारांचा तर नाहीच नाही आणि "मल्हार " रागांचा तर अजीबात नाही. असलाच तर तो राजाभाऊंचाच आहे.
एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नसेल , ती होवुन गेलेली असेल. तुम्ही ती घडत असतांना त्या स्थळी उशीरा पोहोचता आणि तुमच्या हाती फारसे काही लागलेले नसते.
पण
Posted by HAREKRISHNAJI on July 02, 2009 07:50 AM · permalink
नुकतेच माझे 'देवाच्या डाव्या हाती' हे पुस्तक प्रकाशित झाले. काही महिन्यांपूर्वी माझ्या योगविषयक वेब साईटवर माझ्या कुंडलिनी जागृतीच्या अनुभवांवर आधारीत लेखमाला लिहित होतो. तीचेच रुपांतर या ...
Posted on July 02, 2009 07:40 AM · permalink
वांद्रे-वरळी सागरी सेतुचे उदघाटन नुकतेच झाले आणि आता या सेतुच्या नामकरणावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सेतुला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, असा सूचनावजा आदेश दिला आणि मम म्हणत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. पुलाच्या घाईगर्दीत झालेल्या या नामकरणास शिवसेना-भाजपने विरोध केला असून या ...
Posted by शेखर जोशी on July 02, 2009 07:13 AM · permalink
Posted by माझी दुनिया on July 02, 2009 06:56 AM · permalink
समाजातील अनेकांना शिक्षणाची आवड असूनही केवळ कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे एका ठराविक टप्प्यानंतर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ त्यांच्यावर येते. बहुतेकांना वह्या- पुस्तकांचा खर्चही पेलेनासा होतो अशा ...
Posted on July 02, 2009 06:56 AM · permalink
मला आवडलेल्या एका अफलातून चित्रपटाचं परीक्षण मी लिहायला घेतलंय खरं, पण त्याची वातावरणनिर्मिती होण्यासाठी कारणीभूत असलेल्या माझ्या आयुष्यातील दोन घटनांविषयी आधी लिहिणार आहे, थोडं लांबलचकच लिहिणार आहे, त्यामुळे आधीच क्रमशः चा disclaimer! Actual परीक्षण पुढच्या भागात. तोपर्यंत चित्रपट कोणता ते इथल्या सुज्ञ रसिकांनी ओळखलं तर आनंदच होईल.
***********
सप्टेंबर ११, २००१.
मला स्पष्ट आठवतंय सकाळी साडेसात वाजता मी कुठे होतो ते. आठ वाजता सुरू होणार्या एका मीटींग साठी लवकर गाडी बाहेर काढली होती, लॉस एंजेलिस मधल्या एका प्रशस्त चार लेन च्या रस्त्यावरून revival series ची लताच्या गाण्यांची CD ऐकत, गाडी चालवत होतो. एरवी मी NPR चं लोकल पब्लिक रेडिओ स्टेशन लावलं असतं, पण आज जरा मीटींगचे विचार डोक्यात होते म्हणून diversion म्हणून गाडी सुरू करतांनाच CD लावली होती. माझा सेल फोन नेहेमीप्रमाणे कप-होल्डर मध्ये ठेवलेला होता. माझ्या शेजारची लेन पूर्णपणे मोकळी होती. त्या लेन मधून मागे असलेली एक चंदेरी ब्युईक माझ्या समांतर येत असलेली मला आधी आरश्यातून, आणि मग उजवीकडे, दिसली. काय होतंय ते कळायच्या आत त्या गाडीच्या चालक गोर्या महिलेने खिडकीतून हात बाहेर काढला, मला मधलं बोट दाखवलं आणि किंचाळली "Go back, you bastards! We HATE you!!" इतकंच नव्हे, तर तिची लेन पूर्ण मोकळी असतांनाही कसलीही पूर्वसूचना न देता तिची गाडी जेमतेम चार-सहा फूट अंतर ठेवून पुढे जाऊन माझ्या लेनमध्ये घुसली. मी करकचून ब्रेक दाबले, पण ती वेग वाढवून निघून गेली. माझं नशिब म्हणून माझ्या मागे कोणतीही गाडी नव्हती. मी "च्या मारी, काय बया आहे" असं स्वतःशी म्हणेपर्यंत माझा सेल फोन वाजला. पत्नीचा आवाज, "अरे, टी व्ही पहातोय आम्ही, तुला माहितीये का काय झालंय न्यूयॉर्क ला ते?..." कधीही सकाळी टी व्ही न लावणार्या आमच्या घरात तिने शेजार्यांनी फोन केला म्हणून टी व्ही लावला होता, आणि अतिरेक्यांनी केलेल्या त्या भयानक विमानहल्ल्याची ती मला माहिती देत होती...दिवस जस-जसा पुढे सरकला तशी त्या अमानुष हल्ल्याची भीषणता समोर येत होती, नव्वद देशांचे रहिवासी असलेले न्यू यॉर्क मधले जवळजवळ तीन हजार लोक त्या हल्ल्यात मरण पावले. आतापर्यंत इतर देशांच्या भूमीवर होत असलेल्या हत्याकांडांविषयी अभावानेच बोलणारे अमेरिकन नागरिक हा घरच्या भूमीवर झालेल्या हल्ल्याने नखशिखांत हादरलेले होते. मला मात्र राहून राहून ती सकाळची "Go back, .... We HATE you!!" म्हणणारी स्त्री डोळ्यांपुढे येत होती....
*****************
सप्टेंबर २००५
रात्रीचे आठ वाजले होते.
दोन रस्ते पलिकडच्या काँप्लेक्स मध्ये रहाणार्या गीताचा फोन आला. "भय्या, आप बिझी हो क्या?" रडक्या आवाजात खूप भीती.
"नही तो, क्या बात है? मानसी ठीक है?" तिची जेमतेम वर्षाची मुलगी घेऊन ती नुकतीच सहा महिन्यांपूर्वी कर्नाटकातून आलेली होती, मला वाटलं मुलीला बरं नसेल म्हणून फोन केला असेल.
"नही भय्या, मानसी ठीक है, लेकिन मंजू अभी तक आया नही है|" मला आठवलं, पोस्ट-डॉक्टोरल फेलो असलेला मंजूनाथ कुठल्याशा कॉन्फरन्ससाठी मेक्सिकोमध्ये कॅनकून ला गेला होता. "दोपहरमे दो बजे आनेवाली फ्लाईट थी, गाडी लेकर अबतक तो कभीका आ जाना चाहिये था|" वडील भारतीय प्रशासकीय सेवेत असल्याने देशभर फिरलेली गीता हिंदी उत्तम बोलते.
म्हंटलं मी घरी येतो, काळजी करू नको, फ्लाईट लेट झाली असेल, चुकली असेल...तुझ्याकडे त्याच्या ऑफीसच्या कलीग्जचे काही काँटॅक्ट्स असतील तर काढून ठेव.
गेल्यावर त्याच्या दोन अमेरिकन कलीग्जच्या घरी फोन केला तर कळलं की ते दोघेही आधीच्या दिवशीच्या फ्लाईटने पुढे निघून आले होते, फोटोग्राफीची आवड असलेला मंजू मायन संस्कृतीचे भग्नावशेष पाहून एकटाच मागून येणार होता. त्याची itinerary पाहून mexicana ची फ्लाईट गीता म्हणाली तीच होती, आणि ती एअरपोर्टला वेळेत दोन वाजताच पोहोचली होती. त्याच्या सेल फोन वर केलेल्या कॉल्स पैकी एकाचंही उत्तर मिळत नव्हतं. आता मात्र गीताचा (आणि खरं तर माझाही) धीर सुटायला लागला होता. mexicana च्या एअरपोर्ट ऑफिसला केलेला फोन उचललाच जात नव्हता, दोनदा व्हॉईस मेसेज ठेवला. आतापर्यंत घरून पत्नीचे तीन-चार फोन झाले, आणि तिचं ऐकून शेवटी गीताला आणि मानसीला गाडीत घालून मी घरी घेऊन आलो, गीताचं (आणि तिला पा।ऊन मानसीचं) रडणं थांबेना "भय्या, मेक्सिको मे क्या क्या होता है, चोरी, किडनॅपिंग, उसको कुछ हुआ तो नही होगा ना?" मी म्हंटलं "कुछ नही होगा, don't worry." म्हंटलं, त्याचं सामान जरी गेलं असतं तरी त्याने कलेक्ट कॉल नक्की केला असता.
पत्नी म्हणाली "मी या दोघांना जेवायला घालते, तू रणजितला घेऊन एअरपोर्ट वर जा आणि mexicana च्या ऑफिस मध्ये personally जाऊन चौकशी कर."
शेजारच्या रणजितला काढलं आणि दोघे गेलो एअरपोर्ट वर. तिथेही mexicana च्या counter वर आधी टोलवाटोलव, आणि मग मॅनेजर ला भेटा म्हणून सांगितलं. परिस्थिती explain केल्यावर त्या बाईंनी अनिच्छेनेच पॅसेंजर लिस्ट पाहून ही व्यक्ती दोन च्या फ्लाईटने आली आहे असं सांगितलं. आतापर्यंत दहा वाजत आले होते. निदान तो लॉस अॅंजेलिसपर्यंत तर पोहोचला आहे हे कळल्यावर आम्हाला दोघांना हायसं वाटलं, लगेच घरी फोन केला आणि हे कळवलं. झाssलं, गीताने पुन्हा गळा काढला, "मतलब उसकी कारका अॅक्सिडेंट हुआ है क्या? अबतक क्युं नही पहुंचा?"
म्हंटलं "नही, गीता, somebody would have called by now looking at his ID, हम लोग फिर भी पुलिस मे रिपोर्ट कर देते हैं|"
एअरपोर्टच्या बाहेर येताच तिथल्या कॅलिफोर्निया हायवे पॅट्रोल पोलिस ऑफिसरला गाठून मी काय करता येईल ते विचारलं, त्याने विचारलेली माहिती पुरवल्यावर त्याने रेडिओ वर काही चौकशी केली आणि आम्हाला सांगितलं की प्रथमदर्शनी तरी अशा वर्णनाची व्यक्ती एअरपोर्ट ते पॅसाडिना (आमच्या घराच्या आसपासचा भाग) या दरम्यान काही अॅक्सिडेंट मध्ये सापडलेली नाही. त्याने सांगितलं की आधिक माहितीसाठी दुसरे पोलिस ऑफिसर गीताला भेटायला आणि लेखी तक्रार घेण्यासाठी घरी जातील, तोपर्यंत मी आणि रणजितने एअरपोर्ट पार्किंग मध्ये मंजूची गाडी सापडते का ते पहावं. त्यानंतर कमीत कमी तासभर आम्ही सर्व आठ पार्किंग स्ट्रक्चर्स वरपासून खालपर्यंत पालथे घातले. शेवटच्या आठव्या स्ट्रक्चर मध्ये छपरावर चढत असतांना गीताचा फोन आला, पोलिस घरी येऊन कंप्लेंट लिहून घेऊन तिला धीर देऊन गेले होते, परत दहा मिनिटांत परत येतो असं म्हणून परत गेले होते. तोपर्यंत Murphy's Law प्रमाणे शेवटच्या स्ट्रक्चर मध्ये छपरावर शेवटच्या रांगेत रणजितला मंजूची गाडी दिसली. पुन्हा घरी फोन. आता आणखी गोची. म्हणजे हा प्राणी एअरपोर्टला तर पोहोचला, पण for some reason गाडी घ्यायला गेला नाही. काय लफडं असेल?
पुन्हा आम्ही mexicana च्या ऑफीस मध्ये गेलो. एव्हाना तिथला duty officer बदललेला होता. आताच्या ऑफिसर ने आम्हाला घेऊन सरळ immigration office गाठलं. आम्हाला बाहेर उभे करून तो आत गेला आणि पाच मिनिटांत बाहेर आला, त्याच्याबरोबर एक महिला आधिकारी, तिने आम्हा दोघांचे IDs पाहिले आणि आम्हाला सांगितलं "I cannot discuss this case with you, you can leave!" mexicana च्या ऑफिसर कडे पाहून तिने त्याला सांगितलं "You stay out of this, please return to your position." आम्ही त्याच्या मागे वळतोय हे पाहिल्यावर तिने थांबून त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला, तो समजून घेऊन गायब! मग आमच्याकडे पाहून ती म्हणाली "Sir, I asked you to leave!" मी म्हंटलं "Listen, Officer, he is a close friend, and his wife and a year old baby are waiting at home to know what happened to him! Can you at least tell us what the problem is?" तिने खांदे उडवले, म्हणाली, "I understand, someone will call her soon. You should leave."
आम्ही हताशपणे बाहेर आलो. घरी जावं की काय करावं याची चर्चा करीत एअरपोर्ट च्या पार्किंग लॉट मध्ये माझ्या गाडीजवळ पोहोचलो. इतक्यात माझ्या पत्नीचा फोन आला. तिने सांगितलं की मंजूचा गीताला इमिग्रेशन ऑफिसच्या detention room मधून एका मिनिटाचा फोन आला होता, त्याने सांगितलं की त्याच्या व्हिसामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला ते अडकवून ठेवत आहेत. काय प्रॉब्लेम आहे ते गीताने विचारेपर्यंत इमिग्रेशन ऑफिसरने "Your time is up! We need to confiscate that phone" असं म्हणत सेल फोन ओढून घेतला. गीताला म्हणे हार्ट अॅटॅकच यायचा बाकी होता, माझी पत्नी म्हणाली "अरे बघवत नाही किती रडतेय ते, तुझ्या कुणीतरी ओळखीची होती ना त्यांच्या Universityत?"
मला आठवलं, दोन वर्षांपूर्वी त्या University शी संबंधित काही कामानिमित्त मी गेलो असता एकदा त्यांच्या Immigration specialist शी ओळख झाली होती, आणि नंतर बरेचदा त्या बाईंना मी Indo-American Cultural Exchangeच्या संदर्भातल्या या ना त्या कारणाने भेटत राहिलो होतो. पण मध्यंतरी सहा महिन्यांत काहीच संपर्क नव्हता. मी माझा सेल फोन काढून पाहिलं, त्यांचा नंबर होता माझ्याकडे. "अगं पण रात्रीचे ११ वाजलेत! ही काय वेळ आहे का?" "हे बघ, ती करील मदत, मला खात्री आहे, कर फोन तू. आणि काय होईल फार तर? चार शिव्या देईल इतकंच ना, असू देत, our friends are worth it."
मी Cecilia Melendres ला फोन केला. पहिल्याच मिनिटात त्यांनी मला समजावून घेतलं, म्हणाल्या "You did the right thing, as the University Immigration Officer, I consider these researchers and their families my responsibility. Obviously, they won't speak to me over the phone if I called the airport immigration folks, stay there, I am coming in person." रात्रीच्या सव्वाअकरा वाजता Irvine मधून निघून या बाई बारा वाजता एअरपोर्टला पोहोचल्या!
आल्यावर त्या immigration officer ने त्यांना सांगितलं ते असं: single entry J1 visa असलेला मंजूनाथ मेक्सिकोला गेला तेंव्हा त्याचं I-94 card mexicana airline च्या लोकांनी काढून घेतलं, त्यामुळे त्याच्या अमेरिकेत re-entry करण्यासाठी लीगल डॉक्यूमेंट नव्हतं. कायद्यानुसार त्या immigration च्या लोकांनी त्याला detain करून पुढच्या पहिल्या available फ्लाईटने भारतात पाठवणार आहोत असं सांगितलं. Cecilia ने "या शास्त्रज्ञाला हा कायदा माहित नव्हता, त्याला पुरेशी माहिती दिली नाही ही आमची चूक आहे, माझ्या युनिव्हर्सिटीच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे, मी सकाळी ९ वाजता Chief immigration officer आले की त्यांच्याकडून लेखी explanation लिहून देते, तोपर्यंत थांबा!" अशा बर्याच विनवण्या केल्या. पण ते immigration आधिकारी ऐकेनात, ते म्हणाले की "We can only wait until the first available flight to deport him." ही पहिली फ्लाईट होती पहाटे ५ वाजता निघणारी Lufthansa. आणि कायद्याप्रमाणे या deportation चा खर्च मंजूच्याच गळ्यात पडणार होता. अखेर ते ऐकतच नाहीत हे पाहिल्यावर, आयत्यावेळी काढलेल्या Lufthansa च्या तिकिटाचा अव्वाच्या सव्वा खर्च Ceciliaने आग्रहाने स्वतः भरला, आणि पाच वाजता मंजू, आम्हाला शेवटपर्यंत न दिसता, भारतात रवाना झाला.
हे सगळं होईपर्यंत कायम घरी फोनाफोनी चालू होती. माझ्या पत्नीने गीताला सांगितलं "ऐसे भी तुम लोग छे महिनोंमे जाने वाले ही थे, समझ लो मंजूको जल्दी जाने मिल रहा है|" गीताचं रडणं खळेना, तिच्या डोळ्यांपुढे बहुतेक ती एकटी कशी राहील हाच प्रश्न असणार. पण हळूहळू ती सावरली. दुसर्या दिवशी मंजूच्या गाडीची duplicate किल्ली घेऊन ती गाडी घेऊन आलो.
मंजूला पुन्हा व्हिसा मिळून तो परतेपर्यंत दोन महिने गेले, तोपर्यंत गीता आणि मानसी आमच्याकडे आणि रणजितकडे आलटून-पालटून राहिले. मानसीच्या बाललीलांकडे पहाता-पहाता दिवस कसे गेले ते कळलंच नाही. मात्र "I consider these researchers and their families my responsibility" असं म्हणणारी, रात्री बारा ते पाच वेळ एअरपोर्टवर काढणारी Cecilia Melendres माझ्या कायम स्मरणात राहील.
***********
Posted by बहुगुणी on July 02, 2009 06:08 AM · permalink
माझ्या आणि स्नेहाच्या स्नेहात सिनेमांचा खूप मोठा वाटा होता. मी चार वर्षाची असताना माधुरी दीक्षित नावाचं दैवत आमच्या आयुष्यात आलं. मग सुट्टीनंतरचे दहा महिने आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे आमचा सिनेमा व्यासंग वाढवत असू. त्यातही माधुरी आम्हाला खूप आवडायची. तिचे नाच बारकाईने पाहून तसेच्या तसे करायचा आम्ही प्रयत्न करायचो. मला पुण्यात तितके सिनेमे बघायला मिळायचे ...
Posted by Saee on July 02, 2009 05:11 AM · permalink
From lavasa" alt="" />
From lavasa" alt="" />
From Kenjalgad to Raireshwar" alt="" />
From Kenjalgad to Raireshwar" alt="" />
From Kenjalgad to Raireshwar" alt="" />
From mahabaleshwar to kaas" alt="" />
Posted by विमुक्त on July 02, 2009 04:51 AM · permalink