Fix Text in firefox!
 

साहित्‍यः- 4मोठे ब्रेड , 1 मोठा चमचा दहि, 2-3 वेलायची बारीक केलेली , 1मोठा चमचा रवा , तळण्‍यासाठी तुप , जलेबी बनवण्‍यासाठी कापड .
कृतिःब्रेडचे किनार काढुन त्‍याला गरम पाण्‍याटाकुन लगेच काढा .व पाणि काढुन टाका. दुसरीकडे दहि, ...

पुढे वाचा

Posted by सोनाली शिरपूरकर on February 08, 2010 11:28 AM · permalink

 

नवी दिल्ली
भारताने पाकिस्तानशी परराष्‍ट्र सचिव पातळीवरील चर्चा करण्‍याची तयारी दर्शविली असून त्यासाठी 18 किंवा 25 फेब्रुवारीची तारीख सुचविली आहे. या घटनेनंतर भारताने पाकशी सर्व मुद्यांवर पुन्‍हा चर्चेची ...

पुढे वाचा

Posted by yuvadunia on February 08, 2010 11:15 AM · permalink

 

लंडन
दहशतवादी संघटना तालिबान आता अफगाणिस्तानात ब्रिटिश सैनिकांवर हल्‍ले करण्‍यासाठी अनेक ठिकाणी बॉम्ब पेरण्‍याचे काम करीत असून त्यासाठी 12 वर्ष वयाच्‍या मुलांची मदत घेतली जात असल्‍याची माहिती समोर आली आहे. ...

पुढे वाचा

Posted by yuvadunia on February 08, 2010 11:12 AM · permalink

 

_______________________________________________

सोकाम्यत बहुस्याम प्रजायेती - त्याने इच्छा केली मी अनेक व्हावे, जन्म घ्यावे ( तैत्तिरीय उपनिषद २.६.४)

"आपही माली, आप बगीचा, आपही कलिया तोडता" - कबीर.

_______________________________________________

read more

Posted by राजेशघासकडवी on February 08, 2010 10:53 AM · permalink

 

असे दुर्मिळ क्षण कॅमे-यात बंदिस्त करता आले की आपल्याकडे कॅमेरा ...

पुढे वाचा

Posted on February 08, 2010 10:29 AM · permalink

 

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडीराज ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) तयार केला आणि तिथेच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला गेला. आज भारतीय चित्रपट सृष्टी/उद्योगात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब यांनी रोवली. त्यांनी निर्माण केलेल्या राजा हरिश्चंद्र ...

पुढे वाचा

Posted by शेखर जोशी on February 08, 2010 09:51 AM · permalink

 

कचेरीत बसुन खुर्चीत सताडसंगणक मी पाहात असतो;कामाचा व्याप डोक्याला तापस्वतालाच मी छळत बसतो,कितीही मनापासुन ठरवल तरीआठ तास काही भरत नाही;काम करता तास सारेवेळ काही सरत नाही,अधुन्-मधून दुरध्वनीमोठ्या ...

पुढे वाचा

Posted by mahi on February 08, 2010 09:38 AM · permalink

 

सचिन रोहेकर -
गुरुवार, २९ ऑक्टोबर २००९

हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत राजापुरातील माडबन पंचक्रोशीत भूसंपादनाच्या झगडय़ाने दृश्यरूप धारण केलेले असेल. या ठिकाणी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प काहीही झाले तरी आणि कसेही करून पुढे रेटण्यासाठी इरेला पेटलेले प्रशासन आणि जमीन देणार नाहीच, उलट प्रकल्पाचीच कोकणातून हकालपट्टी करू, असा ग्रामस्थांचा निग्रह यातून अपरिहार्यपणे ...

पुढे वाचा

Posted by कैलास गांधी on February 08, 2010 09:30 AM · permalink

 

सर्व काही व्यवस्थीत चालू होते, एक दोनदा कंपनीच्या कामासाठी मला गुजरात तथा मध्यप्रदेशला पाठवले गेले होते पण ह्यावेळी मला जवळच जयपुर येथे पाठवले गेले ते सरळ एक महीन्यासाठी. एक सुंदर शहर व एकदम मस्त समाज असे जयपुरचे मी वर्णन करेन, शहरापासून १५ एक कीमी वर आमची कंपनी होती व राहण्याची व जेवणाची सोय तेथेच. ह्या मुळे मी मात्र जाम खुष होतो जेवण बनवण्याची कटकट मीटली होती व संध्याकाळचा वेळ ...

पुढे वाचा

Posted by राज जैन on February 08, 2010 09:28 AM · permalink

 

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

Posted by क्रान्ति on February 07, 2010 10:59 AM · permalink

 

मी कोरले काही क्षण....

थोडे तुझे, थोडे माझे
थोडे उत्कट, थोडे विकल
काही बावरे, काही विफल
काही आतुर, ...

पुढे वाचा

Posted by Anuja Khaire on February 07, 2010 10:54 AM · permalink

 

१ प्रथम त्वचा वि-लनिझिंग मिल्कने स्वच्छ करणे.
२)स्क्रब करणे आवश्यक आहे
३)पिंपल असतांना ब्लीज करु नयेत.काळपटपणा आलेला त्वचेवर ब्लीज करणे आवश्यक आहे.
४)पिंपल असलेला ...

पुढे वाचा

Posted by prajakta patil on February 07, 2010 10:36 AM · permalink

 

इटलीचा राजपुत्र !
परवा राहुल गाँधी मुंबई मध्ये आले ! मराठी बद्दल त्यांच्या वक्तव्या वरून बरेच वाद उठले ! मी मध्यंतरी त्यांचे भाषण ऐकले तेव्हा खुप वाईट वाटले.. कारण राहुल गाँधी असे म्हणतील असे मात्र वाटले नव्हते... !!! वास्तविक मराठी - अमराठी या वादात मला सध्या पडायचे नाही आहे... परन्तु राहुल गांधीनी " मुंबई ही N.S.G. च्या उत्तर भारतीय " जवानानी वाचवली असे ते म्हणाले ! म्हणजे या प्रसंगी ...

पुढे वाचा

Posted by निनाद गायकवाड on February 07, 2010 10:35 AM · permalink

 

नाही! हा लेख पाककृती वर नाहीये. सध्या वांग्याला घेऊन सरकारात जे काही शिजतं आहे त्याबद्दल आहे. बी टी वांगे असे ह्या वांग्याचे नाव. सरकारने monsanto ह्या अमेरिकन कंपनीच्या ...

पुढे वाचा

Posted by निरंजन on February 07, 2010 09:55 AM · permalink

 

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला ...

पुढे वाचा

Posted by क्रान्ति on February 07, 2010 09:03 AM · permalink

 

विळीवर भाजी चिरताना कधी कधी घाईगडबडीत अचानक बोट कापते आणि त्यातून भळाभळा रक्त वाहायला सुरुवात होते, मग आपण रक्त वाहणारा हात/बोट थेट वाहत्या पाण्याखाली धरतो, रक्तस्त्राव थांबविण्यासाठी बोट तोंडात घालतो किंवा हळद चेपून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न करतो. मोठा अपघात झाला किंवा गंभीर भाजण्याच्या घटनेतही मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होतो. अशा वेळी पहिल्यांदा रक्तस्त्राव ...

पुढे वाचा

Posted by शेखर जोशी on February 07, 2010 07:12 AM · permalink

 

ग्लोबल वार्मिंग विषयी आपण जरा जास्तच संवेदनाशील झालो आहोत असं नाही वाटत?

read more

Posted by राजेशघासकडवी on February 07, 2010 06:53 AM · permalink

 

'चला, कणकवली. कणकवलीवाले उतरून घ्या. गाडी दहा मिनिटे थांबेल.'
कंडक्टरच्या आवाजाने तंद्रीतून जागा झालो. घड्याळ पाहिलं-दुपारचे दोन. हात वर करुन एक आळस दिला.
अजून चार तासात कोल्हापूर. तिथून सांगली दोन तास. तिथून औदुंबरला जायला असा किती वेळ लागतो? अंग घामाने भिजलेले होते. कपडे तसेच चिंब भिजून अंगाला चिकटलेले. आधीच कोकण्-त्यात मार्च महिना- त्यातच हा लांबवरचा प्रवास्-दोडामार्ग ते कोल्हापूर- अंगभर घामाचे झरे पाझरणार, नाही तर काय होणार?
बरोबर दहाव्या मिनिटाला कंडक्टरने बेल मारली. बाकी एक मात्र खरं, गोवा डेपोच्या बसेस वेळेबाबत अगदी पंक्चुअल! गाडी कोल्हापूरकडे पळू लागली. आणि मन मात्र दीड वर्ष मागं रिवाइंड होऊ लागलं. बी. एड. झालो तो क्षण....

आयुष्यातल्या परमोच्च आनंदापैकी एक. ग्रुप्मधले सगळेच सुटले. अगदी पहिल्याच अटेंप्टमध्ये. हा आनंद काही औरच होता. पण आनंद सेलिब्रेट करायला कुणालाच वेळ नव्हता. दुसर्‍याच दिवशी सकाळी पेपरमध्ये राज्य शिक्षण संचालयाची हातभर लांब जाहीरात. शिक्षण्-सेवक भरती करणे असणेबाबत.
काही जणानी एम एड किंवा एम एस सी साठी पळापळ सुरु केली. येनकेन प्रकारेण कुठेही नंबर लागणे महत्वाचे होतं.
मुंबईला जाऊन पोस्टिंग ऑर्डर आणेपर्यन्त तसा थोडा वेळच झाला. तिथे पोहोचलो तेंव्हा तळकोकण आणि ठाणे जिल्हा एवढ्याच जागा शिल्लक होत्या...
'विचार कसलाय कराताय गुरुजी? तळकोकणात जा. निसर्ग बघा. समुद्र बघा. आंबे खावा.' खिडकीतून पानाची पिंक टाकत क्लार्क म्हणाला. आणि त्यानं स्वतःहून दोडामार्गवर फुली केली.

******************************

प्राथमिक विद्यामंदीर दोडामार्गला जॉइन झालो आणि तिथं रुळायला फारसा वेळ लागला नाही. दररोज सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत शाळा. वर्गात मुलं अगदी कमी. अगदी बोटावर मोजण्याएवढी-एकदम पेरिफेरीच्या काही वाड्यांसाठी असणारी शाळा. आजूबाजूला माणसं कमी आणि झाडं-झुडपंच जास्त.
शाळेचे मुख्याध्यापक कर्णिकसर आणि इतर स्टाफ कोऑपरेटिव. शाळेच्या कामाव्यतीरिक्त अधून्मधून इतर कामंही असायची. जनगणना करा, लहान मुलांची यादी गोळा करा, पल्सपोलिओ... एक ना दोन.. दर महिन्याला काहीतरी नवीन असतंच.
पण असं असलं तरी कोकणची लाल माती, समुद्र, मासे, नारळीच्या बागा यात मात्र मन रमायला तयार नव्हतं.
इथला अनुभव घेणे आणि परत औदुंबरला जाणं, हेच मनात असायचं. इथल्या एकेका रंगाचा अनुभव तिथल्या फ्रेमवर कसा घेता येईल यातच मन गुंतलेले असायचं.

त्यातच दीड वर्ष हां हां म्हणता निघून गेलं. कामाचे ताण एवढे. त्यातच बदली शिक्षक मिळणं महाकठीण असायच. त्यामुळे रजा मिळणं मुष्किल असायचं.
आणि एक दिवस मित्राकडून अचानक बातमी मिळाली. सांगलवाडीच्या एका शाळेत शिक्षकाची एक जागा रिक्त झाल्याबाबत. तिथल्या एका शिक्षकानी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि ती पोस्ट वेकंट झाली...

बातमी कळताच मन थरारून उठलं. कसंही करून तिथं आपला क्लेम लावायचाच.
साहेबाना गाठलं.
त्यानी थोडे आढेवेढे घेतले खरे, पण वरच्या ऑफिसमधून तसा आदेश आणलाच तर बघता येईल असं म्हणाले.
सांगलवाडी-औदूम्बर तसं फारसं अंतर नाही. आपल्याच भागात राहून कदाचित आणखी मनमोकळेपणानं काम करता येईल.....
शेवटी खास या कामासाठी साहेबानी चार दिवसांची रजा मंजूर केली.

रजा मंजूर करताना साहेब गालातल्या गालात का हसले, ते मात्र कळलं नाही....

*****************************************

घरी पोहोचायला रात्र झाली. पोहोचेपर्यंत सर्वांची जेवणं झालेली होती. आई, दादा, उमेशदादा, उमावहिनी सगळेचजण टीव्ही बघत होते. आईनं पटकन ताट वाढायलाच घेतलं. दादा वहिनी' काय कसा आहेस' वगैरे बोलून निघून गेले. त्यानंतर बोलणार तर कुणाशी? बोलण्यासारखं खूप होतं.
पण ऐकायला सवड कुणाला होती? स्टती रुममध्ये गेलो. टेबलवरचं शो पीस, भिंतीवरचं दिल्वाले दुल्हनियामधलं काजोलचं पोस्टर कधीकाळी लावलेलं... पण कशाचाच पत्ता नव्हता...
खूप दिवसानी घरी आलो. भरतीची एक प्रचंड लाट अंगावर येणार असं वाटलं होतं. प्रत्यक्षात विस्मृतीच्या ओहोटीत एकेक वस्तू- एकेक आठवण खेचली जात होती. बदलीची ऑर्डरसुद्धा त्यातच कुठेतरी वाहून गेली.
ओकाबोका किनारा-
आणि जुन्या पाऊलखुणा शोधू पहाणारा एकटाच मी.....
बदलीचं सांगून सगळ्याना एक सरप्राईज देणार होतो. पण बोलायचं धाडसच झालं नाही. दुसर्‍या दिवशी गावात एक चक्कर मारली. वाटेत पोंक्षेकाका भेटले, माफक हसले, माफकच बोलले.
बस्स!
दीड वर्षापूर्वीचे जे गाव मी सोडले होते ते हे नव्हते.
मी फक्त एक स्वल्पविराम दिला होता, पण माझ्या माघारी काळाच्या ओघात त्याचा पूर्णविराम बनलेला होता..
पुन्हा त्याला फोडून काढणं- महाकठीणच!

******************************************

चार दिवसांची रजा घेऊन गेलो होतो. पण दुसर्‍याच दिवशी परतलो. स्टाफला थोडं आश्चर्य वाटलं.
पण कामाचा सपाटा सुरु झाला आणि सगळं रुटीन नॉर्मलला आलं. दोन दिवसानी कर्णिक्सरानी मंथली मिटिंग बोलावली. पुढच्या महिन्यात परिक्षा सुरु होणार. त्यानंतर लगेचच चौथीच्या मुलांसाठी जादा तास सुरु करायचे होते.
मिटिंग संपली. सगळेजण निघून गेले. सोहनी मात्र साहेबांच्या मागेमागे रेंगाळत होता. असेल काहीतरी त्याचं काम- मी रुमवर जायला निघालो.
तेवढ्यात कुणीतरी पाठीवर हात ठेवला, म्हणून मागं पाहिलं.
मागं सोहनी उभा होता. हातात कागद झेंड्यासारखा फडकावत. मला हाताला धरूनच कँटीनकडे घेऊन गेला.
'एक गुड न्यूज देतोय.' सोहनी सांगत होता.
'साहेबानी चार दिवसांची रजा मंजूर केली आहे!'
'कशासाठी?' म्हणून मी विचारायच्या आत तोच उत्साहाने बोलू लागला.
'तुला माहीतच आहे यार, इथं आपला जीव रमत नाही. इथं येऊन दोन वर्षे झाली. पण सोलापूरजवळच कुठेतरी परत जावंसं नेहमी वाटतं.'
अजून विषय माझ्या ध्यानात येत नव्हता..
'आणि कालच मित्राचा सोलापूरवरून फोन आला...' तो पुढे सांगत होता. 'सोलापूरला गुंडेवाडीतल्या शाळेत शिक्षकाची एक पोस्ट वेकंट आहे....'
त्याच्या आनंदाचं (!) रहस्य माझ्या डोक्यात शिरलं आणि डोकं एकदम गच्च झालं. सोडावॉटरच्या बाटलीसारखा सोहनी फसफसत होता.
पुढं काय काय बोलत होता. माझं लक्षच नव्हतं. त्याच्या उत्साहाला मी बूच घालणं हे योग्य नाही एवढंच त्याक्षणी मला जाणवलं. मी भानावर येत असताना सोहनी मला विचारत होता..

' ए, पण रजा मंजूर करताना साहेब जरा गालातल्या गालात हसले, ते रे कशासाठी?'

**********************************************
उत्तमकथा , मे २००३, कथास्पर्धा प्रथम क्रमांक....

Posted by JAGOMOHANPYARE on February 07, 2010 06:49 AM · permalink

 

***** आजची वात्रटिका *****
**********************

पद्मचे ’कवि’त्त्व

एकाचे पाहून दुसर्‍य़ाच्या
अंगात यायला लागले.
पद्म पुरस्कारांचे कवित्त्व
रंगात यायला ...

पुढे वाचा

Posted by सूर्यकांती on February 07, 2010 06:48 AM · permalink

 

आताच उठलोय, उशीर झाला रविवार आहे ना, आणि एक तर मला रात्रीची सुखाची झोप फक्त शनिवार आणि रविवारीच मिळते. काल मन पण थोडा असवस्था होता..सांगितला ना थोडा केमिकल लोचा झालाय..काळजी करू नका..लोचा ठीक होईल..for Sure :)

तर मी कुठे होतो बर?.. अरे हा फरसाण..तर आज आरामात उठाल्याने आंघोळ करायची पण घाई नाही म्हणून थोडा फ्रेश होऊन चहा आणि नाश्ता उरकला..पोहे आणि सोबत चकणा म्हणून फरसाण. खाउन झाला आणि पीसी ...

पुढे वाचा

Posted by सुहास on February 07, 2010 06:22 AM · permalink

 

***** आजची वात्रटिका *****
**********************

विकासाची तक्रार

विकास म्हणाला योजनेला,
तुझे कसे झकास आहे.
तुझी वाढ होत राहिली
मी मात्र भकास आहे.

पुढे वाचा

Posted by सूर्यकांती on February 07, 2010 06:20 AM · permalink

 

एक अतिशय सुंदर सजलेली व अनेक्विध रेसिपी असलेली साईट-

http://www.kitchensofindia.com/default.asp?re=o

Posted by अमृतांजन on February 07, 2010 06:09 AM · permalink

 

खय्यामला ढोंगीपणाची आणि वैचारिक भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती. पाचवेळा नमाज पढणे आणि त्याचवेळी भ्रष्ट मार्गांचा अवलंब करायचा हे त्याला समजत नसे. ह्या असल्या माणसांपेक्षा दारु पिणारे ( दारु पिणे हे फार मोठे पाप आहे असे त्यावेळी इस्लामी जगतात समजत असत) बरे.

ते निदान स्वत:शी प्रामाणिक असतात म्हणून सुरईसारखे ताठ मानेने उभे राहू शकतात. बाकी सगळे आमच्यासमोर खुजे आहेत ...

पुढे वाचा

Posted by jayantckulkarni on February 07, 2010 06:08 AM · permalink

 

आत्ताच अंगारकी निमित्त, बाप्पाच्या नैवेद्यासाठी रस - शेवया केल्या होत्या. एकदम सोपी सुटसुटीत कृती आहे.

साहित्य
१. तांदळाची पिठी
२. ओले खोबरे
३. गूळ
४. स्वादासाठी वेलची पूड

तांदुळाच्या पिठीची उकड काढून घ्यावी. मुटकुळे करुन घ्यावेत.

उकडीचे गरम मुटकुळे किचनप्रेस मध्ये टाकून शेवया करुन घ्याव्यात. (उकडीचे मुटकुळे गरमच असावेत.)

ओल्या खोबर्‍याचा रस काढून घ्यावा. त्यात बारीक चिरलेला गूळ घालावा. रसात वेलची पूड घालावी.

बाप्पाला नैवेद्य दाखवून नंतर आपणच गरमा गरम शेवया गोड रसा सोबत मनसोक्त खाव्यात.

गणपती त कोकणातल्या घरी हमखास होणारी ही पाककृती बरेच दिवसांनी केली गेली. कोकणात घरी तर एक मोठा लाकडी शेवगा होता. त्यात उकडीचे मोठे गरम गोळे ह्या हातावरुन त्या हातावर करत आजी आई टाकत. मग आम्ही पोरं सोरं शेवग्याचे हँडल फिरवून शेवया पाडण्याची अहमहिका लावायचो.
शेवग्याच्याखाली , शेवया साठवण्यासाठी बांबूची टोपली, केळीची पाने घालून ठेवलेली असे. ती भरेस्तोवर धीर निघायचा नाही. गरम शेवया, टोपलीत पडताक्षणी उचलल्या जायच्या, रसाबरोबर भिजवून चापण्यासाठी !!

Posted by कपिल काळे on February 07, 2010 05:16 AM · permalink

 

मराठी माणूस स्मृतीत रमणारा 'रम्य भूतकाल' या वृत्तीचा आणि अव्यवहारिक नोस्टाल्जिक आहे का हा प्रश्न मी पूर्वी विचारला होता. (या मराठी माणसांत मीही आणि विशेषेकरुन मीही आलो!) . 'तसे स्मरणरंजक सगळीकडेच असतात' इथपासून ते 'स्मरणरंजनात वाईट काय?' अशा पिळदार मिशांच्या सवालापर्यंत उत्तरे आली. ही चर्चा उदाहरणार्थ विचारस्वातंत्र्याची तथाकथित मुस्कटदाबी होत असलेल्या संकेतस्थळावर झाली. पण स्वातंत्र्याचे मनमोकाट वारे वहात असलेल्या स्थळांवरही फारसे वेगळे चित्र नाही, असेच दिसते आहे. मिसळपावचे मुखपृष्ठही पुलं, लता, गदिमा, राजाभाऊ आणि हादग्याच्या खिरापतीच्या धर्तीवरचे कसलेकसले आण्णा, कसलेकसले बापू, कसलेकसले दादा आणि अगदी कडेलोट म्हणजे कसलेकसले खांसाहेब यांनाच पट्टराणी करुन राहिले आहे. म्हणूनच पाडगावकरांच्या (बघा, पुन्हा नोस्टाल्जिया!) 'ही रांग कोठे जाते? ' किंवा 'अमक्याला बिर्याणीचे वावडे आहे काय? या धर्तीवर पुन्हा तेच विचारावेसे वाटते. मराठी माणसाची मनमोरी भूतकाळातील स्मरणाने तुंबली आहे काय?

Posted by सन्जोप राव on February 07, 2010 01:15 AM · permalink

  <br /><p>&#8220;मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.&#8221;</p> <p>&#8220;मला नेहमी असं वाटतं की जीवनात आनंदी-आनंद अगदी साध्या साध्या गोष्टीतून मिळतो.एखादं रानटी रंगीबेरंगी फूल पहाण्यात, आवाज करीत जाणारा एखादा ओहळ पहाण्यात,नुसतं जरी कुणी सकाळी नमस्ते म्हणण्यात,एखादं सुंदर हस्त-चित्र पहाण्यात,एकांतात, एखाद्या पक्षाचं सुंदर गाणं ऐकण्यात,खूप धावून आल्यानंतर एखादं थंडगार दूधाचं ग्लास पिण्यात,आणि अशा लहानसहान किती गोष्टी सांगता येतील.<br /> जेव्हा आमची छोटीशी मुलगी एखादं सुंदर फूल आम्हाला आणून द्यायची तेव्हा मला आणि माझ्या पत्नीला खूप उमेद यायची.किंवा आमच्या दोन्ही मुलांबरोबर जेव्हा आम्ही सूर्यास्त पहायला जायचो तेव्हा ही खूप आनंद व्हायचा.&#8221;<br /> मला विजय अणावकर आवर्जून हे सांगत होता.</p> <p>विजय मनःशांतीसाठी हे सांगत असला तरी त्याला आतून खूपच त्रास होत होता.त्याच्या मुलाच्या अपघाती निधनानंतर मी त्याला भेटत होतो. हाता-तोंडाला आलेलं मुल असं अचानक गेल्याने मुलाच्या आईवडीलांना काय होत असेल याची कल्पना फक्त ते भोगत असलेल्याच जाणवतं.<br /> विजयचा मुलगा सोळ वर्षाचा होणार होता.आपल्या मित्राच्या स्कुटरवर मागच्या सीटवर बसला होता.एक अगदी शार्प वळण घेत असताना त्याचा तोल गेला आणि मागच्या मागे तो पडला.डोक्यावर हेल्मेट नसल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता.आणि जागच्या जागीच तो गेला.<br /> मी ज्यावेळी विजयला भेटायला गेलो होतो तेव्हा बोलायला सुरवात कशी करूं असा प्रश्न पडला होता.</p> <p>मी विजयच्याच बालपणाची आठवण काढून त्याला बोलता केला.<br /> मी त्याला म्हणालो,<br /> &#8220;कोकणात तुझं बालपण गेलं.तू लहान असतानाच तुझे वडील गेले.आठवतात का तुला तुझे ते दिवस?&#8221;</p> <p>मला विजय म्हणाला,<br /> &#8220;अगदी लहानपणाचे दिवस जरी आठवले नाहीत तरी काही वेळा सांगून ऐकलेले आणि काही स्मरणात राहिलेले दिवस नक्कीच आठवतात.<br /> मी तीनएक वर्षाचा असेन जेव्हा माझे बाबा मला सोडून गेले.आणि त्यांच्या जाण्यानंतर आमच्या आईने आमच्यासाठी जे कष्ट घेतले त्याला सीमाच नाही.आमचं घर साधं असायचं आणि स्वच्छ आणि आकर्षक असायचं. शाळेतून किंवा कामावरून जेव्हा आम्ही घरी यायचो तेव्हा आमची आई आमच्यासाठी सदैव असायची.खूप थकलेली किंवा खूप व्यस्त असलेली कधीही वाटायची नाही.शनिवार हा विशेष लक्षात ठेवण्यासारखा दिवस असायचा.त्यादिवशी आमच्या घरात, खाण्याची विशेष डीश असायची.मग ती झुणका-भाकरी असो,चपाती-शिखरण असो वा एखादी केळं घालून शीर्‍याची डीश असो.&#8221;</p> <p>मी विजयला म्हणालो,<br /> &#8220;मला आठवतं तुझ्या मोठ्या भावाच्या आग्रहास्तव मी कैक वेळा तुमच्याकडे जेवायला राहिलो आहे.तुझी आई आपल्या सर्वांना आग्रह करून वाढल्यानंतर आपल्याला जेवताना पाहून तुझ्या आईच्या चेहर्‍यावरची तृप्ती पाहून मला तीच्या विषयी खूप आदर वाटायचा.बरं तू काय सांगतोस ते सांग&#8221;</p> <p>मला म्हणाला,<br /> &#8220;माझा पण एखादा मित्र आमच्या बरोबर जेवायला असायाचा. त्या दिवशी आम्ही मारूतीच्या मंदीरात न चूकता जायचो.<br /> मारूतीचं मंदीर आमच्या रहात्या घरापासून बरचसं दूर असल्याने बरीच शेतं ओलांडून जायला लागायचं.वाटेत रानटी फूलं,केवड्याची बनं दिसायची आणि वेणीचा सर करण्यासाठी ओवळीची फुलं नविसरतां वेचून घरी आणायचो.देवाला वहाण्यात किंवा बायकानी डोक्यात माळण्यात त्या वेणीच्या सरांचा चांगलाच उपयोग व्हायचा.<br /> मी शिकत असतानाच आईला मदत होण्यासाठी काही परचूटण कामं करायचो.चांगल्या लोकांच्या सानीध्यात मला काम करायला संधी मिळायची.मला नेहमीच वाटतं की कुठचही काम करताना ते चांगल्या तर्‍हेने करण्यात खरा अर्थ आहे. मग त्या कामासाठी मिळणार्‍या मोबदल्यापेक्षा त्यासाठी घेतलेली मेहनत जास्ती का असेना.मी असंही पाहिलंय एखाद्या कामासाठी पराकाष्टा केल्यास ते जास्त सोपं जातं, आणि दुसरं म्हणजे कुठचंही कठीण काम सोडून देण्यात हाशील नाही.तसंच कुठच्याही कामाची टाळाटाळ केल्यास ते जास्तच कठीण जातं.ही सर्व शिकवण आम्हाला आमच्या आईकडून मिळाली.&#8221;</p> <p>मी विजयला म्हणालो,<br /> &#8220;आणि आता तू आणि तुझी पत्नी मिळून कामं करीत असता.किती लोकाना मदत करीत असता.मला बर्‍याच जणानी तुझ्याबद्दल असं सांगीतलं आहे.&#8221;<br /> विजयला त्याच्या विषयी असं लोक बोलतात हे माझ्या तोंडून ऐकून खूप आनंद झालेला दिसला.<br /> मला लागलीच म्हणाला,<br /> &#8220;मला आणि माझ्या पत्नीला एकत्र काम करायला खूप मजा येते. आमच्या हाताने,आमच्या डोक्याने आणि आमच्या ह्रुदयापासून ही कामं होतात. सृजनशील कामाचं शांतीदायक महत्व,सत्यशोध,आणि नव्या व जून्या मित्रांकडून मिळणारी प्रेरणा हे सर्व अनमोल आहे. मला वाटतं सर्वात जास्त समाधान जीवनात मिळतं जेव्हा आपण मदतीचा हात पुढे करतो आणि तो सुद्धा त्याना जे स्वतःहून वर येण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा.माझ्या दृष्टीने जास्तीत जास्त लोक जे काही मला माहित आहेत ते दयाशील,उदार आणि सहयोगशील असतात.&#8221;</p> <p>आता मात्र विजयला आपल्या मुलाबद्दल विषय काढ्ण्यापासून राहावलं नाही.कारण त्याचा मुलगापण त्याच्या कामात त्याला मदत करायचा.त्याची आठवण येऊन विजय मला म्हणाला,<br /> &#8220;सोळावं लागण्याच्या बारा दिवस अगोदर माझा एकच एक मुलगा अपघातात निधन पावला.ह्या अपघातातून तो वाचू शकला असता.पण आमचं कमनशीब म्हणावं लागेल.माझ्या स्वपनातलं आणि माझ्या आशेतलं सर्व काही त्याच्याकडे होतं.माझं सर्व जग त्याच्या जाण्याने संपूष्टात आलं.इतरा प्रमाणे मी ही त्या अघोर धक्क्यातून जगायला शिकलो.एका वेळी एक मिनीट,एक तास,एक दिवस.त्यापूढे सांगण्यात अर्थच नाही.<br /> ह्या अपघातानंतर मी मनात कडवटपणा ठेवला नाही.उलट माझा देवावारचा विश्वास द्वीगुणीत झाला.मी बरेच वेळा अपयशी ठरलो,खूप ठोकरी खाल्ल्या,पण असं होऊन सुद्धा मला वाटतं मुर्खता,क्लेश आणि दयनीयता जरी आजुबाजूला असली तरी हे जग चांगलं आहे.&#8221;</p> <p>आलेल्या दुःखातून सावरून,समजूतदारपणा ठेवून विजय स्वतःला संभाळून घेत आहे हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.मी त्याला जवळ घेत म्हणालो,<br /> &#8220;विजय,हे ही दिवस जातील.&#8221;</p> <p>श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)<br /> shrikrishnas@gmail.com</p> <a rel="nofollow" href="http://feeds.wordpress.com/1.0/gocomments/shrikrishnasamant.wordpress.com/1077/"><img alt="" border="0" src="http://feeds.wordpress.com/1.0/comments/shrikrishnasamant.wordpress.com/1077/" /></a> <a rel="nofollow" href="http://feeds.wordpress.com/1.0/godelicious/shrikrishnasamant.wordpress.com/1077/"><img alt="" border="0" src="http://feeds.wordpress.com/1.0/delicious/shrikrishnasamant.wordpress.com/1077/" /></a> <a rel="nofollow" href="http://feeds.wordpress.com/1.0/gostumble/shrikrishnasamant.wordpress.com/1077/"><img alt="" border="0" src="http://feeds.wordpress.com/1.0/stumble/shrikrishnasamant.wordpress.com/1077/" /></a> <a rel="nofollow" href="http://feeds.wordpress.com/1.0/godigg/shrikrishnasamant.wordpress.com/1077/"><img alt="" border="0" src="http://feeds.wordpress.com/1.0/digg/shrikrishnasamant.wordpress.com/1077/" /></a> <a rel="nofollow" href="http://feeds.wordpress.com/1.0/goreddit/shrikrishnasamant.wordpress.com/1077/"><img alt="" border="0" src="http://feeds.wordpress.com/1.0/reddit/shrikrishnasamant.wordpress.com/1077/" /></a> <img alt="" border="0" src="http://stats.wordpress.com/b.gif?host=shrikrishnasamant.wordpress.com&blog=665223&post=1077&subd=shrikrishnasamant&ref=&feed=1" />

Posted by shrikrishnasamant on February 07, 2010 12:59 AM · permalink

 

"दुर्गा सप्तशती" मला अत्यंत आवडणारं भलं मोठं ७०० श्लोकांचं स्तोत्र. यामध्येही आपली partiality दुसर्‍या अध्यायाला. बाकी अध्यायांमध्ये घनघोर युद्ध, देवी-स्तुती वगैरी खूप छान गोष्टी आहेत पण द्वितिय अध्यायात देवीच्या जन्माचे अद्भुत्-रम्य अतिशय मनोहर वर्णन केलेले आढळते. ते वर्णन वाचता वाचता अंग अक्षरक्षः रोमांचीत होऊन जाते.
लहानपणापासून आपण एवढच ऐकलेलं असतं की - महिषासुर माजला आणि देवसभा भरली. या सभेत देवांच्या तेजामधून दुर्गा देवीची उत्पत्ती झाली.
पण "दुर्गा सप्तशती" च्या द्वितिय अध्यायामध्ये कोणत्या प्रकारच्या तेजोरुपापासून देवीचं कोणतं अंग बनलं याचं इतकं सुरेख वर्णन केलेलं आहे की ज्याचं नाव ते.
उदाहरणार्थ - देवीचे मुख शंकराच्या तेजापसून बनले तर यमाच्या तेजापासून केस उत्पन्न झाले. विष्णूच्या तेजापासून बाहू बनले तर चंद्राच्या तेजापासून स्तनांची उत्पत्ती झाली. पृथ्वीच्या तेजापासून नितंब तर ब्रम्हाच्या तेजापसून तिचे पाय निर्माण झाले. प्रजापतीच्या तेजापसून दात तर कुबेराच्या तेजापासून नासिका निर्माण झाली, आदि सुरेख वर्णन आढळून येते. भुवया संध्येच्या तेजापसून तर कान वार्‍याच्या तेजापासून उत्पन्न झाले. आणि हे सगळं अद्भुत रसातील काव्य आपण मन्त्रमुग्ध होऊन वाचत असताना आपल्याला जाणवतं की अरे खरच प्रत्येक अंगाचं एक वैशिष्ट्य आहे एक धर्म आहे आणि तेच वैशिष्ट्य त्या त्या देवतेचेही आहे. हे जेव्हा लक्षात येतं ना खरच अंग पुलकीत होतं.
यानंतर च्या श्लोकांमध्येही कोणत्या देवातेनी कोणते अस्त्र, शस्त्र, आभूषणे देवील बहाल केली ते आहे. उदाहरणार्थ - शंकराने शूल, कृष्णाने चक्र, वरुणाने शन्ख, अग्नीने शक्ती, ब्रम्हाने कमंडलू, सूर्याने प्रकाश, इंद्राने वज्र, विश्वकर्म्याने परशु , कधीही न सुकणार्‍या कुसुमांची माला वगैरे वगैरे.
वर्णन वाचून आस्वाद भक्तीने नाही तर नाही , रसिकतेने घेण्याजोगा हा अध्याय आहे.

Posted by शुचि on February 06, 2010 08:18 PM · permalink

 

नयना

एका लाखाच्या त्या छोट्याशा गाडीने टि.व्ही.चा छोटा पडदा अगदी दिवसभर व्यापून टाकला होता.ती कशी असेल ? कशी दिसेल ? तिचा रंग काय असेल ? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार आणि त्यांची उत्तरे यांनी हा छोटा पडदा व्यापून गेला होता.आणि त्याही पेक्षा, कित्येक पटीने आँफिसमधल्या माझ्या सारख्या अनेकांच्या मनाचे पडदे तिने काबीज केले होते.दिवसभर लोकल मध्ये लोंबकळणारे,बसच्या रांगेत तासनतास उभे राहून प्रवास करणारे , गळ्याला टिफिन अडकवून आँफिसला पळणारे माझ्यासारखे अनेकजण ,त्यांची अनेक वर्षे उराशी असणारी स्वप्नं या गाडीने पुन्हा जिवंत केली होती.बाकी आम्ही मध्यमवर्गीय... ! स्वप्नांवर जगणारे ,स्वप्नातच रममाण होणारे !
स्वप्नात आम्ही कधी तेंडूलकर होतो आणि सामना जिंकून देतो. कधी आम्ही अमिताभ होतो आणि ‘आज भी मै फेके हुए पैसे नही उठाता ’असे म्हणत स्वाभिमानी होतो.एखादी सुंदर तरूणी आमच्या प्रेमात पडते तिला आम्ही ताज मध्ये जेवायला.स्वप्नात !.नाहीतर माँरिशीसच्या एका रमणीय बेटावर निवांत झोपून ज्यूस पितो हे देखिल स्वप्नातच ! पण आम्हा मध्यमवर्गीयांना स्वप्नपूर्तीचा आनंद मिळवून देणाचं काम केलं ते नितीन छ्ड्डाने ! छोट्या का होईना पण,स्वत:च्या कारमध्ये आपल्या पत्नीमुलांसह बसण्याचं भाग्य मिळणार होतं.खरंतर ही कल्पनाही पुढील काही दिवस सुखात जगण्यासाठी आम्हाला पुरेशी होती.तसा माझा संबंध लहानपणीच काय तो गाड्यांशी आला होता.काका मामांनी आणून दिलेल्या जत्रेतील त्या छोट्या गाड्या फिरवता-फिरवता मी लहानाचा मोठा झालो.अगदी माझ्यासारख्या इतर मध्यमवर्गीयांसारखा !.पण ,टि.व्ही वर अनेक दिवस दिसणार्‍या त्या छोट्याशा गाडीने लहानपणीची आवड पुन्हा मनात निर्माण केली होती.तिच नावही अगदी सुंदर होतं ‘ नयना ’
खरंच !नितीन छ्ड्डाने आम्हा मध्यमवर्गीयांना गाडीत बसविण्याचा विचार जर केला नसता तर आँफिस बाहेर उभ्या असलेल्या रंगीबेरंगी गाड्या पाहण्यात आमचं उभं आयुष्य गेलं असतं.!
गेले दोन दिवस टि.व्ही वरच्या त्या बातम्या मीही पहात होतो.एकदाची पिवळ्या रंगाची नयना मला दिसली.पहिल्या नजरेतच मी तिच्या प्रेमात पडलो आणि मनाशी पक्का निश्चय झाला , नयनाला घरी आणायची .गाडी अगदी रोडवर येईपर्यंत दिडलाख गेले तरी चालतील पण, नयना दारात उभी राहिलीच पाहीजे ! गाडीत बसण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे !
तसं लहाणपणापासूनच मला गाड्यांचं खूप आकर्षण. माझ्या एका मित्राच्या वडिलांची त्या काळी गाडी होती.त्या गाडीतून मित्राबरोबर शाळेत जाण्याचा योग कधी - कधी यायचा.सुट्टीत त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या बंद गाडीत आम्ही खेळतही असू.माझ्या वह्यांमध्येही गाड्यांचे फोटो असायचेत्या वेळी गाड्या कमी होत्या. पण काँलेजला गेल्यावर ही आवड वाढली.मी चारचाकी चालवायला शिकलो.आयुष्यात एकदा तरी गाडी घ्यायची,त्यातून मनसोक्त फिरायचं आणि वाटलं तर नंतर विकून टाकायची.पण,गाडी घ्यायचीच ! गाडी घेण्याची इच्छा अजूनही कायम होती.परिस्थिमुळे शिक्षण अर्धवट राहिले.सुदैवाने मुंबईत चांगली नोकरी मिळाली.माझ्या कार्यालयात माझ्या सारखे अनेक जण होते नी ते सुद्धा ही लाखाची गाडी घेण्यासाठी उत्सुक होते.
आमच्या कार्यालयात ही नयना एक चर्चेचा विषय झाली होती.
देसाई म्हणाला "बापट,बायकोला कालच बजावलय आपल्याला कुठलंही व्यसन नाही,आता तु विघ्न आणू नकोस ,मी गाडी घेणार आहे."
तर सुर्वे कार्यालयामध्ये पहिली गाडी आपली असणार हा निश्चयच करून आला होता.
"पण,त्याने प्रदुषण हूणार आहे .पार्किंगची समस्या निर्माण होणार आहे " गोडबोले मँडम फाईलमध्ये डोकावत म्हणाल्या.त्यांच्या या वाक्यावर माझा पारा चढला.
" कसलं आलयं प्रदुषण ? बाकीच्या गाड्यांनी काय प्रदुषण होत नाही.गरीबांची गाडी आली ना, मग पार्किंग काय , प्रदुषण काय ? सारं काही दिसेल .हे श्रीमंतांचे शोध , त्यांनीच फक्त गाड्या चालवायच्या काय ?"माझा राग पाहून सारे थोडावेळ गप्प राहिले.
" हे अगदी बरोबर बोललात आण्णा " शिंदे शिपाई ओरडला.
आँफिस,ट्रेन, बस, सोसायटीमध्ये या एक लाखाच्या गाडीची चर्चा रंगत होती.घरीही माझ्या डोक्यातून हा विषय जाईना.
"हे बघ काय लिहिलयं पेपरात,म्हणे या गाडीचा आवाज मोठा आहे" एवढ्या मोठ्या पेपरात माझं लक्ष त्याच बातमीकडे गेलं.
"काय झालं मोठा आवाज असेल तर ? ट्रक ,डंपरच्या नसतो मोठा आवाज "माझ्या या बडबडीकडे बायको शांतपणे पहात होती.माझा त्रागा पाहून ती म्हणाली "तो गाडीचा विषय सोडून इतर विषयांवर बोलाल का तुम्ही.घर नाही ,आँफिस नाही बघावं तेव्हा गाडी गाडीन गाडी.थोडं मन शांत ठेवा ."
बायकोचा आवाज ऐकून मी थोडा शांत बसलो .थोड्यावेळानं मी तिच्या जवळ बसलो.
" तुला काय वाटतं आपण नयना घ्यावी ?माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं स्वत:च्या गाडीत बसायचं " माझा चेहरा पाहून बायको हसली."कैवल्य पण करत नव्हता कधी असा हट्ट.तसं तुम्ही इतके वर्षात स्वत:साठी काहीच केलं नाहीत. तुम्हाला आवडली आहे ना, घ्या गाडी. पण,पैशाचं काय?"
"आहेत पैसे. रिमाचं लग्न झालयं , ती जबाबदारी आता नाही ,ब्लाँकचे हप्ते संपलेत .रिमाच्या लग्नाला अपेक्षेपेक्षा कमी खर्च आला. मी पैसे काढून ठेवलेत बाजूला ,आपली ओढाताण होणार नाही."माझ्या बोलण्यावर ती सुखावली.माझ्या मनाची तळमळ तिला कळली होती.
" हे बघा, आता गाडी घ्यायची नक्की झालयं.यापुढे घरी ,बाहेर ,टि.व्ही वर गाडीचा विषय बंद.बुकिंग सुरू होईल तेव्हाच या विषयावर बोलायचं,समजलं ?"बायकोने हसतहसतच मला दम दिला.
त्यानंतर गाडीचा विषय आमच्या घरी क्वचितच निघे.दरम्यान गाडीसाठी लागणारे दीड लाख रुपये मी वेगळे काढून ठेवले. माझी नोकरी ,त्यात ब्लाँकचा हप्ता मुलांची शिक्षण ,प्रपंचाच्या या रगाड्यात गाडी घेण्याचा विषय कधिच मागे पडला होता..पण आता सारं स्थिरावलं होतं मुलगा इंजिनिअर झाल्यावर अंधेरीच्या एका कंपनीमध्ये नोकरीला लागला होता.भावाची मुले स्थिरावल्याने गावीही पैसे पाठविण्याची चिंता नव्हती.कैवल्य नोकरीला लागल्याने माझाही प्रापंचिक भार कमी झाला होता.त्याच्या इतर मित्रांप्रमाणे तोही अमेरिकेला जाण्याच्या मन:स्थितीत होता.आम्ही गावाहून तालुक्याला ,तालुक्याहून मुंबईत आलो.आताची पिढी मुंबईतून अमेरिकेला जाण्याआठी उत्सुक आहे.नेटवर बसून कैवल्यचे काहीनकाही सुरू असायचे.परदेशी नोकरीसाठी नेटवरून तो बायोडेटा पाठवित असे.त्यांने घरी न सांगताच पासपोर्टही काढला होता. पासपोर्ट आल्यानंतर आम्हाला कळलं आमचे चिरंजिव परदेश गमनाची तयारी करत आहेत ! एक दिवस आपला मुलगा सातासमुद्रा पलिकडे जाणार हे मी माझ्या मनाला समजावलं होतं.आँफिसमधील सहकारी म्हणायचेही "बापट ,रिटार्यमेंट्नंतर अमेरिकेत जाण्याचा योग आहे तुझ्या नशिबात." आणि माझी मान अभिमानाने उंचावायची.
बरेच दिवस मागे पडलेला नयनाचा विषय पुन्हा अचनक चर्चेत आला तो नयना शोरुमला आल्याने ! ‘नयना शोरुमला दाखल ’ अशा बातम्या वृत्तपत्रात झळकल्या आणि गाड्यांची शोरुम गर्दी खेचू लागली.फक्त एक लाख लोकांनाच नयना मिळणार म्हणून माझ्या सारखे अनेक जण हिरमूसले.शेवटी इथेही नशिबाचा भाग होताच.बायकोला नेऊन नयना दाखविली.तिला गाडी आवडली.चांगला गुरुवार पाहून ३ हजार रुपये भरून नयना बुक केली.माझ्या आयुष्यातील तो एक आनंदाचा क्षण होता.पण त्या बरोबर एक काळजीही होती एक लाख लोकांत आपला नंबर लागेल ना ?.
पण , बायकोने दिलासा दिला ".इतकी वर्षे गाडीच स्वप्न पाहताय, आपल्याला गाडी नक्की मिळेल."
बुकिंगनंतर काही दिवस पिवळ्या रंगाची ती इवलिशी नयना मला डोळ्यासमोर सारखी दिसत असे.सहा महिन्यात नयना आपल्याला खरेदी करावी लागेल याचा अंदाज बांधून मी पैशाचे नियोजन केले होते .
पावसाळ्यातील चार महिने बघताबघता निघून गेले आम्ही गाडी बुकिंग केल्याची बातमी सर्व नातेवाईकांत वार्‍यासारखी पसरली होती.
अन एक दिवस कैवल्यने घरी बाँम्ब्च टाकला."पप्पा ,मला जाँब मिळतोय यु.एसला ,काय करू ?"त्याच्या या वाक्यावर मी आणि पत्नी त्याच्याकडे पहातच बसलो.
" सकाळी सकाळी गंमत करू नको कैवल्य" त्याच्या आईने त्याला सुनावलं.
"गंमत नाही करत मी खरंच मला जाँब मिळतोय ."
त्याच्या वाक्याने आमचे चेहरे आनंदाने फुलले.या आनंदामागे थोडं दु:खही दाटलेले होते.
" काय करू काय विचारतोस ?जायचं ."
"पप्पा, जास्त नाही तीन-चार वर्षे तिकडे जाँब करून इकडे येईन." आमची मन:स्थिती कैवल्यला कळली असावी म्हणूनच तो असं बोलला. त्याच्या बोलण्यानं मला दिलासा मिळाला.
" काय जाँब आहे ?"
"पप्पा, उद्या इंटरव्ह्यू आहे फोर्टला,मोठी कंपनी आहे.त्यानंतर सर्व काही ठरेल."
" बेस्ट लक ,तू जा.फक्त सर्व माहिती नीट घेऊन ठेव."
" त्याची काळजी करू नका ,फक्त मम्मीला समजावा."
" नक्की ,ते तू माझ्यावर सोड "मी आत्मविश्वासानं सांगितलं.
कैवल्यला परदेशात नोकरी मिळणार या कल्पनेने माझी छाती अभिमानाने फुलून आली होती.त्याच्या आईला मात्र वाईट वाटलं होतं.आत्तापर्यंत शेजारीपाजारी आपला नातेवाईक अमेरिकेत असल्याच्या फुशारक्या मारायचे.आता मीही फुशारक्या मारायला तयार झालो होतो.
कैवल्यचा इंटरव्ह्यू अतिशय सुंदर झाला.आणि आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला यु.एस.मध्ये जाँब निश्चित झाला.पगारही भलाभक्कम होता.इतर सोयी सवलतींची तर सरबत्ती होती.परंतु तरिही कैवल्य नाराज होता.मोठ्या उत्साहासाने इंटरव्ह्यूला गेलेल्या कैवल्यचा उत्साह मावळलेला दिसत होता.शेवटी न राहवून मी त्याला विचारलं.
" का रे नाराज तू ? एवढा चांगला जाँब आहे ना ?"
"पप्पा, जाँब चांगला आहे.तिकडे गेल्यावर पैसेही खूप मिळतील पण तिथे जाण्यासाठी कमीतकमी दोन लाख रूपयांची गरज आहे.आणि एवढे पैसे म्हणजे ?...."हताश झालेला कैवल्य पुढे काहीच बोलला नाही.शेवटी मी त्याची समजूत काढली.
"अरे, पैसे लागणारच ,पेरल्या शिवाय थोडंच उगवणार.आणि पैसे काय फुकट जाणार आहेत.हे बघ पैशांची तू काळजी करु नकोस.तयारीला लाग ."
"पण ,पप्पा...."
" आता म्हटलं ना तयारीला लाग ." त्याच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो. आणि कैवल्यचा चेहरा हास्याने उजळला.
कैवल्य परदेशी जाणार म्हणून ही थोडी दु:खीच होती.परंतु मी तिला समजावलं. ‘ मुलाच्या भवितव्याच्या आड भावना आणू नकोस ’असं सांगितल्यावर ती थोडी सावरली होती.एक दिवस तिने मला अचानक विचारलं " पैशाचं काय करणार आहात तुम्ही ?"
तिच्या वाक्यावर मी हसलो.
"हसून प्रश्न सुटत नाहीत." ती म्हणाली.
’ अगं ,तू असं विचारतेस की सगळे पैसे संपले."
"तसं नाही पण तयारी तर करायली हवी."
"बँन्केत आहेत ,काही एफ़.डी.मोडायला लागतील.आज उद्या त्या मोडीन ." माझ्या वाक्यावर तिला थोडं बर वाटलं.
" आणि गाडीचं काय करणार ?समजा नंबर लागला तर ?"तिने माझ्या वर्मावरच बोट ठेवलं.जो विषय मी टाळतं होतो तो तिनं अचूक काढला.
"गाडीचं काय ?नंतर बघू.रिटायर्ड झाल्यावर घेऊ."
" अहो, पण तुमचं स्वप्न ?"
" मुलांच्या स्वप्नांपुढे आपली स्वप्ने काय महत्वाची ?तसं त्या गाडीचा विषयही मागे पडलाय.मी गाडीसाठी ठेवलेली दिड लाख काढतो.थोडी भर करू. कैवल्यला चांगली संधी आलेय.ती वाया जाता कामा नये."
बायको माझ्याकडे बघतच बसली.
"बघतेस काय अशी, आपण मध्यमवर्गीय , आपल प्रपंच हेच आपलं सुख, मुलांच्या स्वप्नांपुढे माझी स्वप्ने महत्वाची असतील ,तर मी स्वार्थी नाही का? " माझ्या मनातल्या भावना तिला कळल्या होत्या.
आठ-दहा दिवसातच मी पैशाचा बंदोबस्त केला.नयनासाठी ठेवलेले पैसे आणि एफ़.डी.मोडून मी सर्व पैसे घरी आणले.आणि कैवल्यची जाण्याची सर्व तयारी पूर्ण झाली.एफ़.डी.मोडताना एक लाखाची ती देखणी पिवळी गाडी माझ्या डोळ्यासमोर येत होती.गेले चाळीस वर्षे पाहात आलेलं स्वप्न हवेत विरून गेलं .ते पूर्ण होईल की नाही हे सांगता येणंही कठीण होतं.
पण , त्याचवेळी एक नवीन स्वप्न डोळ्यात आकार घेत होतं...माझ्या मुलाच्या २५ लाखाच्या गाडीत बसण्याचं !
.......................................................समाप्त..................................................................

Posted by सुनिल पाटकर on February 06, 2010 04:38 PM · permalink

 

मुंबई म्हणजे आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखी वेठीस धरणार्‍या ठाकरे कुटुंबियांचे वर्चस्व संपायच्या मार्गाला आले आहे का?

read more

Posted by वसंत सुधाकर लिमये on February 06, 2010 04:07 PM · permalink

 

कोकणातील माणसे मोठी उत्सव प्रेमी आणि खूपच भाविक त्यामुळे प्रत्येक उत्सव आनंदात साजरा करणे ही त्यांची जुनी परंपरा. सध्या कोकणात अंगणेवाडीची जत्रा मोठ्या उत्सवात सुरु आहे. अनेक कोकणी मंडळी या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात. कोकणात सध्या याचा जत्रेची मोठी चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पाहुण्याच्या पाहुणच्यारात आणि चाकरमान्यांच्या स्वागतात रमला असतानाच रत्नागिरी ...

पुढे वाचा

Posted by Shrikant Sawant on February 06, 2010 10:43 AM · permalink

 

आणखी किती सतिश शेट्टी? हा लोकशाही उत्सवांतर्गत पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात २९ जाने २०१० रोजी एक परिसंवाद झाला. परिसंवाद लोकशाही उत्सव समितीने आयोजित केला होता व सतिश शेट्टींना समर्पित केला होता.

read more

Posted by प्रकाश घाटपांडे on February 06, 2010 10:40 AM · permalink

 

आणखी किती सतिश शेट्टी? हा लोकशाही उत्सवांतर्गत पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात २९ जाने २०१० रोजी एक परिसंवाद झाला. परिसंवाद लोकशाही उत्सव समितीने आयोजित केला होता व सतिश शेट्टींना समर्पित केला होता.

परिसंवादात माहिती अधिकार क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मारुती भापकर नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा,सिमप्रितसिंग टाटा इन्स्टिट्युट ऒफ सोशल सायन्सेस यांची मुलाखत मुक्तपत्रकार व आपले मिपाकर श्रावण मोडक व नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र यांनी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चव्हाण यांनी केल.
माहिती अधिकार कायद्याच्या अनेक बाजु यात उकलल्या गेल्या. आपण या माहिती अधिकाराच्या चळ्वळीत कसे पडलो याचे विवेचन प्रत्येकाने केले. सामाजिक जाणीवा जागृत करण्याचे काम नेमके कोणाचे? हा कायदा तुमचा माझा सर्वांचा अधिकार आहे ही जाणी जागृत करण्यासाठी काय केले पाहिजे? माहिती अधिकाराचा वापर पर्याप्त आहे का? माहिती
अधिकाराच्या मर्यादा कोणत्या? भारताच्या सामाजिक राजकीय इतिहासा माहिती अधिकाराचे महत्व किती? अशा अनेक बाबतीत खुलेपणाने चर्चा झाली. श्रावण मोडकांनी वक्त्यांना नियंत्रित न करता अधिक बोलु दिले. विवेक वेलणकरांनी वीज पाणी रस्ते या मुद्द्यांवर पुणे मनपाकडुन भरपुर माहिती मिळवली. नुकतेच पुणे महापालिकेचे उपायुक्त यांचेच
बेकायदेशीर बांधकाम त्यांनी माहिती अधिकाराद्वारे उघडकीस आणले होते.
सिमप्रितसिंग यांनी मेधा पाटकर यांच्या समाजकार्यातुन प्रेरणा घेउन समाजविज्ञानाच्या अभ्यासासाठी माहिती अधिकाराचा वापर करुन मुंबईतील बिल्डरांचे बांधकामाची माहिती मुंबई पालिकेकडुन घेतली. त्या आधारे बिल्डरला २००० कोटी रुपयांचा दंड आकारला गेला.
मारुती भापकर हे पिंपरी चिंचवड भागात नगरसेवक नसतानाही माहिती अधिकाराद्वारे अनेक अल्पभुधारकांच्या जमीनी हडप करण्याचा डाव हाणुन पाडला.
ज्या मध्यमवर्गाने पुर्वी वॊचडॊग म्हणुन काम केल तोच आता कोषात गुंतला आहे या विवेक वेलणकरांच्या महत्वाच्या प्रतिपादनाचे विश्लेषण परिसंवादात झाल्याचे दिसते. माहिती अधिकार हे दुसरे स्वातंत्र्य आहे. त्याचा वापर केला पाहिजे.त्याच्या वापराने सतिश शेट्टीचा खुन झाला. पण हा धोका पत्करुन देखील लढा चालुच राहणार. मारुती भापकरांनी
भ्रष्टाचार जो पर्यंत आहे तो पर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा पुर्वी घेतल्याने अनवाणीच फिरतात. कदाचित त्यांना आयुष्यभर अनवाणीच फिरावे लागेल
कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला इथे टिचकी सरशी ऐकता येईल.

<embed bgcolor="#000" flashvars="theTheme=blue&amp;autoPlay=no&amp;theFile=http://www.esnips.com//nsdoc/64fe1440-8d0f-4f61-8acf-a9beee426c3c&amp;theName=Anakhi Satish Shetty&amp;thePlayerURL=http://www.esnips.com//escentral/images/widgets/flash/mp3WidgetPlayer.swf" height="94" pluginspage="http://www.macromedia.com/go/getflashplayer" quality="high" src="http://www.esnips.com//escentral/images/widgets/flash/esnips_player.swf" type="application/x-shockwave-flash" width="328"></embed>
Get this widget | Track details | eSnips Social DNA

Posted by प्रकाश घाटपांडे on February 06, 2010 10:22 AM · permalink

 

विकासकीविनाश?

सचिन रोहेकर,
लोकसत्ता
.सोमवार, २५ जानेवारी २०१०

कोंकण म्हटले की आपल्याला सहज सुन्दर किनारयांची आठवणखळाळत्या लाटा, स्वच्छ-शुभ्र वाळूचा किनारा, सुरूच्या झाडांचे गर्दबन, स्वच्छ आणि आल्हाददायक वारा हे कोकणच्या समुद्र किनाऱ्यांचे निसर्गसुंदर वैशिष्टय़. या कोकण किनाऱ्याने महाराष्ट्राच्याच काय देशाच्या राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक ...

पुढे वाचा

Posted by कैलास गांधी on February 06, 2010 09:42 AM · permalink

 

अरे हो, खरच! सैफ अली खान आणि करीना कपूर ने गुपचूप पद्धतीने साखरपुडा केला आहे. दुबई मधील एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी पाटौदी पैलेस मध्ये एका घराच्या कार्यक्रमात एकमेकाना अंगठी घातली आहे. आता पर्यंत सैफिना चे प्रेमाचे, साखरपुड्याचे आणि लग्नाचे फक्त भारताच्या मेडिया ...

पुढे वाचा

Posted by चैतन्य on February 06, 2010 08:58 AM · permalink

 

सुधीर गाडगीळ यांचा मोजून मापून कोकणस्थ हा लेख ...

पुढे वाचा

Posted by गजानन on February 06, 2010 08:14 AM · permalink

 

॥ श्री स्वामी समर्थ ॥
लोकहो,

श्री. अभिनव फडके यांच्याशी नुकत्याच गप्पा सुरू होत्या. ज्यांच्याशी आमच्या गप्पा रंगतात त्यातले हे फडके एक. कारण त्यांचे आणि आमचे रुलिंग प्लॅनेट्स एकच आहेत. 

बोलता बोलता विषय सद्गुरूकृपेवर गेला. वाचकांसाठी त्या संभाषणाचा काही भाग.

fromअभिनव फडकेtodhondopant@gmail.comdate6 February 2010 12:56subjectChat with अभिनव फडकेmailed-bygmail.com

hide ...

पुढे वाचा

Posted by धोंडोपंत on February 06, 2010 07:44 AM · permalink

 

ब्लॉग बनवण्याच्या खूप पध्दती आहेत. जो तो आपल्या आवडत्या साईटवर जाऊन ब्लॉग बनवतो. परंतु मला सर्वात जास्त सोईस्कर म्हणजे टेम्प्लेट्सच्या बाबतीत blogger वर काम करायला फ़ार आवडले. कारण यात टेम्प्लेट्मध्ये आपल्याला हवे ते बदल अगदी सहज करता येतात. टेम्प्लेट हे classic किंवा xml प्रकारचे असते. परंतु या ब्लॉगवरील टेम्प्लेट डाऊनलोड केल्यानंतर ते सर्वात आधी extract करायला विसरु नका. कारण extract ...

पुढे वाचा

Posted by BEAUTIFUL BLOG TEMPLATES on February 06, 2010 07:37 AM · permalink

 

सुवासिक साबण, अगरबत्ती, टाल्कम पावडर, परफ्युम या गोष्टी रोजच्या जीवनक्रमात इतक्या आवश्यक आहेत की सुगंध आपल्या आयुष्यातून अगदी हद्दपार करायचा म्हटला तरी ते शक्य नाहीये. काही लोकांना तर या सुवासाचं इतकं वेड असतं की त्यांच्या घरात पाच ते आठ निरनिराळे सुगंध असलेल्या अत्तराच्या आकर्षक बाटल्या तुम्हाला सापडतील. बाजारातही असे निरनिराळे सुगंध प्रचंड प्रमाणात विकले जातात. तुम्ही ...

पुढे वाचा

Posted on February 06, 2010 07:32 AM · permalink

 

प्रिय नाना पाटेकर,
नमस्कार

आता पत्राची सुरुवात जय महाराष्ट्र म्हणून की जय भारत म्हणून करु, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. खऱे तर कोणत्याही भाषणाचा समारोप हा कोणीही सर्वसामान्य मराठी व्यक्ती किंवा मान्यवर हे अगोदर जय महाराष्ट्र आणि नंतर जय भारत म्हणून करत असतात. आजपर्यंत आमच्या मनात तुमच्याबद्दल प्रखर मराठीप्रेमी आणि धर्माभिमानी अशी ओळख होती. सार्वजनिक ...

पुढे वाचा

Posted by शेखर जोशी on February 06, 2010 07:12 AM · permalink

 

उतारवयात सहेलीआपल्याला सोडून गेलीतर लग्नाचा विचार जसा कर्ता येत नाहीतसच प्रतिभा मनातूनजर का उडून गेली तर--आशाढात मेघांनीजगाला घट्ट गवसणीघतल्यावर प्रकाशाचीतिरिप दिसण्याची आशानसते तशीच मनाला ...

पुढे वाचा

Posted by baba on February 06, 2010 06:59 AM · permalink

 

एक दिवस रात्री ९ वाजता बाहेर फाटक वाजले, मी घरातुनच आवाज दिला. बाबानी दार उघड मी आहे असं म्हटल्यावर अगदी धावत धावत जाऊन दार उघडलो. त्या दिवशी बाबा आठवडी बाजारातुन खरेदी करण्यासाठी एटापल्लीला गेले होते. घरचा कुणी माणुस हाटाला गेला कि घरातिल बच्चा कंपनी त्याची आतुरतेने वाट पाहात असते. कारण हाटाला गेलेली माणसं आमच्या साठी खाऊ आणायचे. आज बाबांची पण मी खुप वाट बघत ...

पुढे वाचा

Posted by एम. डी. रामटेके on February 06, 2010 06:41 AM · permalink

 

आमची प्रेरणा :
सूचना: या लेखनातील परा याचा अर्थ पळूनजाणारा राजकुमार असा घ्यावा.
कोणत्याही हयात असलेल्या नसलेल्या डुप्लीकेट/अडुप्लीकेट सदस्याचा काही संबन्ध लावू नये.



कोण आहेस तु?
जीमेल वर असतोस्?
लॉग इन आयडी काय तुझे?
पिंग पण करणार नाही ?
माझ्याशी पण नाही ?
मी तुला परा म्हणेन !
चालेल?
तू ब्लॉक द सेंडर चे बटण दाबणार ?
नको रे... नाही करणार पिंग सारखे सारखे ... परा!

*
परा !
ये !
ये ना ! मी नेट उघडून बसलोय.
कर पिंग कर !
कनेक्ट हो ना !
असा का करकरतोस?
शनीवारातून सदाशिवात का जातोस !
विंडोवरून लिनक्स वर गेल्यासारखा
ये !
परा ! ये!

*

परा!
बोल ना माझ्याशी !
आज किती छान स्क्रीन सेव्हर आहे !
कधी घेतलास अपलोड केलास ?
मला सांगितले पण नाही!
परा ! तु कायमचा का नाही लॉग्ड इन रहात?
सारखा आलास की बीझी स्टेटस करतोस ?
कशात बिझी असतोस इतका इतका
प्रोजेक्टवर ?
सपोर्ट च्या की इंपइंप्लेमेंटेशनच्या ?
की मग डॉक्युमेन्टेशनच्या!
मी पण येईन !
नेशील मला?
सांग ना तुझ्या पी एम ला ?
परा?
बोल ना !
तु बोलत का नाहिस?
जी टॉक बॅन आहे का तुझ्या हापिसात?

*

बोल काय म्हणतोस परा?
काल का नाही लॉग इन झालास?
मी होते लॉग्ड इन दिवसभर !
हो .. गूगल टॉकवर , याहू चॅटवर , क्युपीड बे वर....
बेंचवरचे लोक दुसरे काय करणार !
आपले ठरले होते ना?
ऑफीस कम्युनिकेटरवर नाही पिंग करायचे म्हणून.
मग इथे कशाला पिंग केलस?
फॉल्स कॉल झाला?
बर बर केले आहेस पिंग तर जरा वेळ लॉग्ड इन रहा !
बोलत बसु..
आजपी एम नाहीये हापिसात...
फक्त तु आणि मी !

*

हो रे परा!
मी काल खुप कामात होतो!
बहुतेक प्रोजेक्ट मिळील असे वाटतेय.
किती दिवस बेंचवर बसणार
तु वाट पाहिलीस?
अरे खरेच ...
मी विसरलो नाही तुला !
कसा विसरेन बाबा !
मागच्या प्रोजेक्ट वरचे तू पी एम ला खुळे बनवून अर्धवट केलेले काम माझ्याच गळ्यात पडले होते...
क्लायंट इंटरव्ह्यू होता ना म्हणुन नाही आलो..
आपल्याला एक संस्थळ बनवायचे ना ? की ब्लॉग?
तिथे फक्त तु आणि मी?
दोघेच संपादक !
हो ना?
मग डुप्लिकेट आयडी नको घ्यायला?
आपल्या लेखावर प्रतिसाद कोण देणार
वेडा कुठला !

*

नको ना !
परा नको लॉग ऑट करूस...
मी पण करतो ...
हो ...
मी पण लॉग ऑट करतो तुझ्याबरोबर ...
जावु आपण तिकडे फेसबूक वर असलेल्या शेतात ...
स्ट्रॉबेरीचे घोस तोडत बसूया
थांब !
परा ! थांब !!
मला तिकडे लॉग इन होउ दे...
आलो मी ... परा... मी आलो...आलो ....आलो... पिंग !
पराऽऽऽ !!!
पराऽऽ !!
पराऽ !

*

'डॉक्टर.ऽऽऽ'

'बोला सिस्टर !'

'तो ५ नंबरच्या क्यूबीकलमधला लॅपटॉप सिरियस झाला आहे..'

'आलोच ऽऽ'

.
.
.

'सिस्टर, सर्टिफिकेट तयार करा ! एस एम पी एस फेल्यूअर.... हार्ड डिस्कवर अतिरिक्त ताण. '

'इथे नाही पण त्या जगात तरी त्याला नेटवर्क कनेक्षन मिळो

Posted by विजुभाऊ on February 06, 2010 06:30 AM · permalink

 

नारोशंकराची घंटा

ह्या खेपेस मात्र नक्की रविवार पेठेतल्या जुन्या गल्ल्यांमधून हिंडायचे, गोदावरीच्या घाटावर फ़िरत वेगवेगळ्या मंदिरात जायचे. द्रोणामधे भरपूर कांदे, कोथींबीर टाकलेला नाशीकचा चिवडा हाणायचा. मग हुळहुळ्या झालेल्या जीभेवर तिखटामिठाची पेरण असलेल्या कोवळ्या काकड्या ठेवून तिला आणखी डिचवायचे. शेवटी अमृतासारखा भासणारा उसाच्या रसाचा ग्लास रिता करून पोटोबाची शांती करायची. धनंजय न जाणे कितव्यांदा हा प्लॅन सुमित्राला ऐकवत होता. जुन्या नाशिकमधे, गोदावरी घाटावर पंचेचाळीस वर्षांपुर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे घालवलेले ते मस्त दिवस अशा प्रकारे परत मिळतील अशी त्याची भाबडी समजूत होती. ह्या वेळेस सुमित्राने धनंजयच्या प्लॅनला काही हरकत घेण्याचा प्रयत्नही केला नाही.

मागच्या ट्रीपला नाशिकला जाणे तर झाले होते. पण नेहमीच्याच अडचणी, म्हणजे अपुरा वेळ आणि त्यात सतरा नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेटणे. ह्यात जुन्या गल्लीबोळात, मंदिरात हिंडण्याचा वेडेपणा करायला वेळ कुठे होता? आज जाउ, उद्या जाऊ करता करता ते दोन तीन दिवस भुरकन उडून गेले होते. नंतर परत नाशिकचा नंबर यायला आणखी बारा वर्षे गेली. आता धनंजयने आधीपासूनच आखणी करून भरपूर वेळ जुन्या नाशिकसाठी ठेवला होता. फ़क्त तो आणि सुमित्रा त्याच्या बालपणातील उरल्या सुरल्या खुणा शोधत भटकणार होते!

सुमित्राच्या वहिनी्कडे ब्रेकफ़ास्ट घेतला. तिचे घर नविन नाशकात जरा विरळ वस्तीत असल्याने तिथे ऑटो मिळायचा नाही. म्हणून तिने फ़ोनवर ऑटो बोलावून दिला. जेवणासाठी आमची वाट पाहु नका. आम्ही आरामात परत येऊ असे वहिनीला सांगून दोघेही बाहेर पडले. रविवार कारंजा जवळ येताच तो परिचित गजबजलेला भाग दिसताच धनंजय एकदम खुष. पुर्वी टांग्यांची गर्दी असायची, आता ऑटोंची. माणसे तशीच लगबग लगबग चारीकडे पळत होती. कारंज्यापासून पाचच मिनटे चालायचे, मग लोणार गल्ली. लोणार गल्लीत धनंजयची आजी रहात असलेला जुना फ़डके वाडा होता. त्या वाड्यात दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायला ही भावंडे आईबरोबर आजोळी यायची. आईला माहेरची ओढ म्हणून, तर मुलांना नागपूरच्या उन्हाळ्यापासून सुटका, आणि दिवसभर उनाडक्या करीत बाहेर हुंदडायचे परमीट मिळणार म्हणून ह्या दरवर्षाच्या वाऱ्या ठरलेल्या होत्या. नागपूरच्या भाजून काढणाऱ्या दिवसांत घराबाहेर पडणेही दुरापास्त होते.

रविवारपेठेचा तो मेन रोड. त्य़ाला लागून असलेल्या शनी गल्ली, तेली गल्ली, लोणार गल्ली अशा आडव्या बोळी. ती किराणा मालाची, लाकडाची खेळणी, तांब्यापितळ्याची खेळणी, विविध वस्तुंनी खचाखच भरलेली दुकाने, रायआवळे, द्राक्षे ह्यांनी भरलेल्या पाट्या घेऊन बसलेल्या फ़ेरीवाल्या. चालणारी, पळणारी बायामाणसे, धान्याचे ट्रक, दोन्ही बाजूने चाल करून येणाऱ्या ऑटोंच्या झुंडी, रणगाड्याप्रमाणे रस्त्यावर मालकी प्रस्थापीत करत जाणाऱ्या बसेस. ह्या सगळ्या गोंधळात निर्विकारपणे रवंथ करत मधोमध ठाण मारून बसलेल्या एकदोन चुकार गायी. सगळा माहोल अंगावर घेत धनंजय आणि सुमित्रा लोणार गल्लीत पोहोचले. ती गल्ली तर जणू पंचेचाळीस वर्षे काळात गोठवून ठेवल्या सारखी जागच्या जागी होती. फ़क्त गल्लीच्या तोंडाशी मेन रोडला लागून नवीन झालेल्या दोन इमारती सोडल्यास तसेच चित्र! ते जुनाट वाडे, कुठे पिंपळाचे खोड कलणाऱ्या भिंतींना आधार देत पालवले आहे, शतकानुशतके जुनी भासणारी लाकडी प्रवेशदारे, त्यावरील पितळेच्या गोल कड्या. नदिच्या पुराने गल्ली भरली की आधारासाठी म्हणून प्रत्येक वाड्याच्या बाह्य भिंतींवर अशा कड्या असायच्या.

फ़डके वाड्यात आठवणींची पुंजी मनसोक्त वाटणे झाल्यानंतर धनंजयने सुमित्राला घाटावर नेले. तोच सुट्टीतील पायाखालचा रस्ता. चौकातले टकले बंधु ज्युवेलर्सचे दुकान. पाटी तेवढी नवीन आणि ठळक होती. पडझड झालेला सरकारवाडा. तीच पितळी बंबांची, भांड्यांची आणि खेळण्यांची दुकानओळ. नंतर घाटावरची मंदिरे. काळाराम, गोराराम, एकमुखी दत्त. वसंत व्याख्यानमालेचे पटांगण, रामकुंड, घंटाघर. काळाचे पडदे अचानक उघडून जणू बालपणात प्रवेश केल्यासारखे झाले. तटावरच्या म्हाताऱ्या भेळभत्ता वाल्याकडून कागदी पुडीत भेळ बांधून घेतांना धनंजयने त्याला उगाचच सांगीतले. “मी ईथे पंचेचाळीस वर्षांनंतर येत आहे काका!” तशी भेळवाला म्हणाला, “त्यावेळेस कदाचित तू माझ्याकडचीच भेळ खात असशील. माझ्या वडीलांच्या वेळेपासून आमचा हाच स्टॉल इथे आहे!” स्टॉलमागे असणारा उभा मारुती पुर्वीसारखाच उभा राहून म्हाताऱ्याच्या बोलण्याला जणू दुजोराच देत होता.

तटावरील भाजीबाजारात तिखटमिठ लावलेल्या काकड्या खाऊन झाल्यावर पाय आपसुकच नारोशंकराच्या देवळाकडे वळले. सुमित्रा थकून मंदिराच्या पायऱ्यांवर बसली. वयाच्या चौपन वर्षी आजची धावपळ तिला अंमळ जास्त वाटत होती. बालपणात प्रवेश केलेल्या धनंजयचा उत्साह ती कौतुकाने पहात राहीली.

“ही प्रवेशदारावरील अजस्त्र घंटा पहा. हिला नारोशंकराची घंटा म्हणतात. नदिच्या पुराचे पाणी जेव्हा घंटेच्या टोल्यापर्यंत पोहोचायचे तेव्हा ती घंटा लाटांमुळे आपोआपच वाजायची आणि गावाला धोक्याचा ईशारा मिळायचा. अशी आख्यायिका आमची आजी नेहमी सांगायची”. त्याने किंवा त्यावेळेस ईतर कोणीही पुराने ती घंटा वाजलेली पाहीली नव्हती. येवढा भारी लोलक पुराने हलेल कसा, हा प्रश्न देखील अनुत्तरीतच राहीला होता. आजीने तरी पाण्याने वाजलेली घंटा कधी ऐकली असेल की नाही कोण जाणे! पण ती आख्यायिका अजूनही जिवंत असावी!

धनंजयने मंदिराच्या प्रवेशदाराचा घंटेसहीत मस्त फ़ोटो घेतला.

“अच्छा! हीच कां ती नारोशंकराची घंटा”! धनंजयच्या नेहमी टणाटणा बोलणाऱ्या लहान बहिणीला आजीने “नारोशंकराची घंटा” असे नाव दिले होते. ते आठवून सुमित्रा गालात हसली.
“हो नां! त्यावेळेस नारोशंकराच्या घंटेचा आवाज आम्ही कोणी ऐकला नव्हता, तरी शोभी्चा दणदणीत आवाज ऐकून आम्ही ती कल्पना करत असु!” मंदिराच्या प्रवेश दारातून सुमित्राच्या हातात हात घालून आत जातांना धनंजयने आठवण काढली.

डोक्यावर स्टाईलीश कोरीयन कॅप, बेफ़िकीर जीन्स आणि टी शर्ट, गळ्यात लटकणारा कॅमेरा घेउन धनंजय, त्याच्या हातात हात घालून आत येणारी थकलेली सुमित्रा ही जोडगोळी पाहून, कोठून कोण जाणे दोन मस्तवाल राकट सन्यासी अचानक त्यांच्या समोर उभे ठाकले. इतर मंदिरांसारखा भाविकांचा सतत वावर नारोशंकराच्या मंदिरात सहसा नसतो. सुट्टीत नदीवर येतांना आजी बजाऊन सांगायची “नदीवर उगाच आंबट चिंबट खाउ नका. ईकडे तिकडे भटकू नका रे. नारोशंकराचे दर्शन बाहेरूनच घ्या बरे.” त्यावेळेस आजीचे बाकी आदेश मुले धाब्यावर बसवायची. पण कां कोण जाणे, नारोशंकराच्या पायऱ्या चढून आत जाण्याचे धैर्य काही त्यांनी केले नव्हते. तिथले गुढ वातावरण पाहून दूरूनच रेंगाळत ती काढता पाय घेत. कदाचित लहानपणची राहीलेली ईच्छा पुर्ण करायला धनंजयने आज मंदिरात प्रवेश केला असावा. दुपारचे साडेबारा वाजलेले, आणि अचानक समोर काळ्या कफ़न्या घातलेले दोन राकट सन्याशी वाट अडवून उभे!

“बेटा रोटीके लिये कुछ दो” त्यातला म्होरक्याप्रमाणे वाटणारा म्हणाला. भरघोस काळी दाढी, डोक्यावर नीटपणे बांधलेल्या जटा, बघता क्षणी समोरच्याला आत खेचून नेऊ पहाणारे काळेशार भेदक डोळे, अंगभर काळा अंगरखा, एकदोन ठिकाणी फ़ाटलेला, पण टाके घातलेला. एका हातात लांबरुंद चिमटा, दुसऱ्या हातात कमंडलू. खांद्यावर काळीच झोळी. पायात सपाता. दुसरा बहुदा पहिल्याचा शिष्य असावा. त्याचाही एकूण अवतार तसाच. तो नुसताच म्होरक्या जे बोलेल त्याचा मुकाभिनय करीत सावली सारखा त्याच्या मागेमागे होता.

त्याच्याकडे दुर्लक्ष करून धनंजय ईकडे तिकडे फ़ोटो योग्य जागा शोधू लागला. सुमित्रा हातातली पिशवी बाजुला ठेवून जरा कट्ट्यावर टेकली. हे दोघे सन्याशी धनंजयची पाठ सोडीनात.
“क्यों बेटा, नाराज हो क्यां हमसे?”
ह्याची ब्याद टळावी म्हणून धनंजय म्हणाला “नही महाराज, नाराजी कैसी? हम बस जरा जल्दीमें है!”
“बडी जल्दी हैं तुझे जानेकी! उसका बुलावा आयेगा तभी जाना पडेंगा. उसके पहले नही” सन्याशी जरा जास्तच धीट होत चालला.
“हां भैय्या! आपकी बात तो सही है. लेकीन अभी हमे मांफ़ करो. हमे पहलेही बडी देर हुई है.” त्याच्या चिकण्याचोपड्या बातांपासून सोडवणूक कशी करावी तेच कळत नव्हते.
“अच्छा बेटा पिनेका पानी तो होंगा थैलीमे. जरा देखू तो.” अचानक त्याचा रोख सुमित्राच्या बाजुला ठेवलेल्या पिशवीकडे वळला, तशी ती पिशवी घेऊन ताडकन उठली आणि बाहेर जाणाऱ्या पायरीकडे वळली.

“लगता है मांजी भी नाराज है. बेटा बस रोटीके लिये कुछ दो.” सन्याशी पालूपद सोडत नव्ह्ता. त्याची ब्याद टाळायला धनंजयने पाकीटातले थोडे पैसे काढून त्याच्या हातावर ठेवले.
“ईसमें रोटी आयेंगी?” धनंजयच्या डोळ्यात डोळे जखडवून सन्याशाने विचारले.
धनंजयची खात्रीच पटली, बोलण्यात उस्ताद असले, तरी हे दोघे केवळ भिकारीच आहेत. सन्याशाच्या नजरेला नजर देत त्याने विचारले “यदि आप असली सन्यासी हों तो जादा़ पानेकी आंस क्यो रखते हों? जोंभी मिला उसीमे संतुष्ट क्यो नही रहते?”
धनंजयच्या टोकदार प्रश्नाने सन्याशी जराही विचलीत झाला नाही. “बेटा, हम तो ठैरे सन्यासी! हमे कुछ मिले ना मिले, हम बस घुमते रहते है. हमने सिर्फ़ तुझे सवाल किया, ईसमे रोटी आयेंगी?”

हे जरा जास्तच होत होते. धनंजयने तडकावून म्हटले “ईसमे रोटी जरूर आयेंगी.” गरकन फ़िरून तो सुमित्राकडे जाउ लागला.
“अच्छा? चलो देखते है” खोल खोल गुहेतून यावे तसे सन्याशाचे शब्द धनंजयच्या कानावर आले. ह्याच्या आवाजाला अचानक काय झाले? सुमित्राचा हात धरून त्याने सन्याशाकडे वळून पाहीले. दोघेही खूप दूर उभे असावेत असे भासत होते. ते हात पसरून धनंजय, सुमित्राला बोलावत होते. “बेटा आओ, दोनो और नजीक आओ.” भारावल्या सारखे धनंजय, सुमित्रा त्यांच्या दिशेने जाऊ लागले. पण त्यांच्यातील अंतर कमी होत नव्हते. “बेटा और नजीक और नजीक, जरा फ़टाफ़ट पाव बढाना. वऱना देर हो जायेगी”

आता धनंजय आणि सुमित्रा एखादी गाडी पकडायला धावावे तसे धावू लागली. शेवटी सन्याशांनी दोघांनाही हात देऊन गाडीच्या डब्ब्यात चढवावे तसे चढवले. डब्बा असा काही दिसत नव्हताच. फ़क्त प्रचंड वेग जाणवत होता. समोरून वेगात धावणारी क्षणचित्रे पडद्यावरून चित्रफ़ीत सरकावी तशी सरकत होती. तीच रविवार पेठ, लोणार गल्ली, कारंजा, दुकान ओळी आणि गोदावरीचा घाट. मात्र सकाळी पाहीलेल्या स्मरणयात्रेत आणि ह्या सरकपटावरून वेगात जाणाऱ्या यात्रेत एक फ़रक जाणवू लागला. वाड्य़ांच्या जागी बांधकामे सुरू होत होती. बाजुची दुकाने पाडून रस्ते रूंद होऊ घातले होते. रविवार कारंजाच्या चौकात मोठा सुशोभित उलटा फ़व्वारा बांधल्या जाउ लागला. सरकारवाड्याच्या जागी पहाता पहाता दहा मजली वातानुकुलीत ऑफ़ीस कॉम्प्लेक्स उभे राहीले. रस्त्यावरच्या ऑटोरिक्षा हळूहळू गायब झाल्यात आणि टॅक्सी, एलेव्हेटेड पुलांवरून भुरकन सरकणाऱ्या मोनोरेल्स जा ये करू लागल्या.

कसे कोण जाणे, ईतका वेळ वरून बघता बघता, अचानक सन्याशी आणि धनंजय, सुमित्रा रस्त्यावरूनच चालू लागले. रस्त्यांवरून चालणाऱ्या लोकांचे पोषाख विचित्र वाटू लागले. त्यातले दोघे वाट अडवून धनंजयला विचारत होते “रोटी के लिये कुछ दे दो भाई” धनंजयने पाकीटातल्या सगळ्या नोटा त्याला दिल्या.
“ईसमे दोनोंकी रोटी आयेगी?”
धनंजयने सुमित्राची पर्स घेऊन त्यातल्या नोटा देखील दिल्या.
“भगवान आपका भला करे. आज कुछ खा सकेंगे” म्हणत ते दोघे दुवा देत गेले.

असे कुठे कुठे भटकून ही गाडी नारोशंकराच्या मंदिराच्या प्रवेशदारापाशी परत आली. “बेटा रोटी तो मिली. अब तुझे क्या चाहीये बोल.” सन्याशाने विचारले. अचानक धनंजयला जाणीव झाली. ह्या अजब प्रवासात धनंजय सुमित्रा ईतके भारावून गेले होते, की फ़ोटो काढायचे भानच उरले नव्हते. “बाबा फ़ोटो खिचना रही गया.”

“काल कभी किसी फ़ोटो के लिये रुकता नही. लेकीन मंदीर का फ़ोटो खिचना है, तो जरूर लेले बेटा.”
धनंजयने कॅमेरा सरसावून प्रवेशदाराचा फ़ोटो घेतला, आणि सुमित्रासह तो पायऱ्यांवर जरा टेकला. त्यानंतर ते सन्याशीही जसे अचानक आले होते तसे अचानक नाहीसे झाले.
****************************

“आई गं” डोक काय भयानक दुखतं आहे!” नारोशंकराच्या मंदीराच्या पायऱ्यांवर बसलेली सुमित्रा म्हणाली.
“हो नां. आता थोडा वेळा पुर्वी सन्याशा बरोबर बोलत होतो, आणि आता माझे पण डोके ठणठण दुखतं आहे.”
“मला वाटते आपण येवढे उन्हात जुन्या नाशकात फ़िरायला नको होते. तुमचा आपला नेहमीच अधाशीपणा असतो. थोडेसे सॅम्पल म्हणून पहायचे नां? हे काय वय आहे असला आततायीपणा करायचे” सुमित्रा धनंजयवर वैतागली.
“जाउदे गं. थोडा काळ बालपणात सहल केली. चल मस्त उसाचा रस पिऊ.”

उसाच्या गुऱ्हाळात रस प्यायल्यावर पैसे देण्यासाठी पाकीट उघडल्यावर ते पूर्ण रिकामे पाहून धनंजयच्या ठणठणाऱ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला. त्य़ाने पटकन सुमित्राला पर्स पहायला सांगीतली. दोघांकडचे जवळ जवळ सगळे पैसे गायब होते. नशीब, त्यांचा कॅमेरा आणि सुमित्राचे मंगळसुत्र व बांगड्या शाबूत होत्या. आपल्याला त्या दोघांनी ठकवले हे सत्य एका क्षणात आतवर खुपले.

सुमित्राच्या भाउ-वहिनीच्या घरी आल्यावर साहजीकच सगळे कशी झाली ट्रीप म्हणून विचारू लागले. त्य़ावेळेस पैसे गेल्याचे वगळून बाकी सर्व सविस्तर वर्णन सांगून त्यांनी गप्पांमधे रंगत आणली. “धनंजय, तुम्ही नारोशंकराच्या मंदिरात जायला नको होते.” सुमित्राचा भाउ- प्रकाश म्हणाला.
धनंजय सुमित्रांनी एकमेकांकडे दचकून पाहीले.
“कां बरे?” दोघांनी एकदम विचारले.
“अरे, तिथे कोणीच सहसा जात नाहीत. गर्द घेणारे तिथे पडून असतात असे म्हणतात.”
“हो कां? आम्हाला काही तसले जाणवले नाही.” सुमित्रा कडे पहात धनंजय म्हणाला.
“अहो नुसते सांगत काय बसलात, फ़ोटो दाखवा नां” सुमित्राने पटकन विषय बदलला. धनंजयने टीव्हीला कॅमेरा जोडून जुन्या नाशकातले सगळे फ़ोटो दाखवले.

शेवटच्या फ़ोटोत फ़ुलाफ़ुलांचे नवीन शिल्पकाम कोरलेल्या रंगीत भिंती, कलाकुसर केलेल्या कमानी आणि चकाकणारी रुपेरी घंटा पाहून धनंजय आणि सुमित्रा एकदम चमकले. नारोशंकराचे मंदीर रिनोव्हेशन केल्यासारखे चकाचक नवे दिसत होते. हे जुनाट मंदिर असे कोरे करकरीत कसे काय? पितळेची गंज चढलेली घंटा चांदीची कशी?

धनंजयने चोरुन प्रकाशकडे पाहीले. प्रकाश आणि वहिनी ह्यांच्या चेहऱ्यावर काही वेगळे पाहीले अशी जाणीव नव्हती. धनंजयने घाईघाईने टी व्ही स्क्रीनवर त्याआधीचा फ़ोटो आणला. तेच सध्याचे जुनाट मंदीर दिसत होते. कोणी काही बोलायच्या आत “संपले फ़ोटो” म्हणत धनंजयने घाईघाईने कॅमेरा बंद करुन टाकला.

नंतर एकांत मिळाल्याबरोबर धनंजयने शेवटचे दोन्ही फ़ोटो पुन्हा बघीतले. दोन्ही फ़ोटोत सध्याचेच जुनाट मंदीर होते.

“काल कभी किसी फ़ोटो के लिये रुकता नही बेटा.” सन्याशाचे वाक्य धनंजयच्या कानात घुमत होते.

*******************

Posted by अरुण मनोहर on February 06, 2010 04:45 AM · permalink

  * १) त्यांना खरोखरच रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन ममतादिदींना सांगायच्या होत्या * २) हा एक पब्लिसिटी स्टंट होता. * ३) शिवसेनेच्या निदर्शनाला घाबरुन त्यांनी आपला मार्ग बदलला * ४) लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे व आपण उधळलेल्या मुक्ताफळांचा मराठी लोकांना विसर पडावा हा हेतू होता * ५) आपण इतरांपेक्षा वेगळे राजकारणी आहोत आणि यापुढे आपण जनतेत मिसळुन त्यांच्या समस्या जाणून घेऊ हा संदेश द्यायचा होता

Posted by अमोल केळकर on February 06, 2010 04:24 AM · permalink

 

मी, मनोज आणि त्याची पत्नी मधु अश्या तिघांनी भटकायला जायचे ठरवले (अर्थातच बाकीच्या मित्रांना वेळ नव्ह्ता). ताम्हिणी घाटात जायचा बेत ठरला.३ ऑक्टोबर ०९ ला आम्ही तिघांनीही सकाळी १०.३० वाजता पुणे सोडले तेही अर्थातच मनोजच्या स्विफ्ट गाडीने. आकाश अंशत: ढगाळ होते. पिरंगुट, पौड मागे टाकून आम्ही दीड तासात मुळशी ला पोहोचलो.सर्व परिसर तेरड्याच्या जांभळ्या आणि सोनकीच्या पिवळ्या सोनेरी फुलांनी भरून गेला होता. पळसे, वारक, ताम्हिणी, दावडी, निवे अशी गावे पार करत आम्ही ताम्हिणी घाटाच्या तोंडावर जाऊन पोहोचलो.

आजूबाजूला गर्द हिरवाई पसरली होती. आणि त्यात फुलांच्या सोनेरी, जांभळ्या रंगांमुळे परिसर सुरेख नटला होता.
आता वर आभाळ गच्च दाटले होते. खग्रास सुर्यग्रहणात जसा अचानक अंधार दाटुन येतो तसेच आम्ही अचानक ढगांमधे शिरलो. आता २/३ फुटांवरचेही काहीही दिसत नव्हते. मनोज सावधगीरीने गाडी हाकत होता. दरीच्या अलीकडे आम्ही गाडी लावली आणि आम्हि ढगांमधे उतरलो. हळुहळु जाउन आम्ही दरीचा काठ शोधून काढ्ला. तिथेच ३ महिन्यांपुर्वि आम्ही होतो.

आता मनोजने वाइल्ड ऑर्किड ची झाडावरील रोपे गोळा केली तसेच मॉस पण घेतली. तेवढ्यात जोराच्या पावसाल सुरुवात झाली व आम्ही गाडीत आलो. आता आम्ही घाट उतरायला सुरुवात केली. १५, २० मिनिटातच आम्ही जसे अचानक ढगांमधे शिरलो तसेच अचानक ढगांतुन बाहेर पड्लो. आता सर्व काहि स्वछ दिसत होते. आणि मागे सर्व ढग होते. काही वेळातच आम्ही घाट उतरुन कोकणात माणगावला पोहोचलो.

पाउस आता सर्वत्र पडत होता. माणगावला जेवण करुन आम्ही रोहा, वाकण फाट्यामार्गे पालीजवळ पोहोचलो. तिथे. जवळच उन्हेरे गावी गरम पाण्याची कुंडे आहेत. तिथे गेलो. एकुण ४/५ कुंडे आहेत. गरम पाणी हे गंधक मिश्रित असल्याने काळे होते. तसेच त्याला उग्र वासहि होता. आम्ही थोडावेळ तिथे हात, पाय बुडवून बसलो. पाणी चांगलेच गरम होते. मग आम्ही तिथून देवाचे दर्शन घेउन निघालो ते १० मिनिटाच पाली गावात पोहोचलो. अष्ट विनायकांपैकी एक असलेला बल्ल्लाळेश्वराचे दर्शन आम्ही घेतले. गजाननाची मुर्ती मोठी छान व प्रसन्न आहे. पाउस असल्याने गर्दी नव्हती. मग आम्ही तिथुन निघालो. आता धुवाधार पाउस सुरु झाला होता. तिथून पाऊण तासात खोपोली गाठून द्रुतगती महामार्गाद्वारे आम्ही तिघेही ९.३० च्या सुमारास पुण्यात पोहोचलो.

Posted by वल्ली on February 06, 2010 04:23 AM · permalink

 

मायमराठी ह्या संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी ह्या उद्देशाने इथे देत आहे.

ठाणे पोलीस दलात शिपाई पदाच्या ६७० जागा
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती अंतर्गत ठाणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई (६६८ जागा), बँडसमन (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती दि. ८ मार्च २०१० रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे शहर येथे होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भंडारा जिल्हा न्यायालयात १३० जागा

भंडारा जिल्हा न्यायालयात बेलिफ (३० जागा), शिपाई (२५ जागा), कनिष्ठ लिपिक (७५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये ४२ जागा
बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा सल्लागार (१ जागा), तांत्रिक अधिकारी (२ जागा), फायनान्स एक्झिक्युटिव्ह (३९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑन लाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती

www.bankofindia.co.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत ३२ जागा

ठाणे जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष शिक्षक -कर्णबधिर (५ जागा), विशेष शिक्षक -मतिमंद (२२ जागा), विशेष शिक्षक-दृष्टिदोष (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. ६ फेब्रुवारी २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अपंगांसाठी २ जागा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अपंग अनुशेष भरती मोहिमेअंतर्गत पर्यवेक्षक (१ जागा), लिपिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयात ३३० जागा

नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई येथे लिपिक टंकलेखक (२२८ जागा), हमाल (१०२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई मुख्यमहानगर दंडाधिकारी कार्यालयात १६६ जागा

मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई या कार्यालयात लिपिक-टंकलेखक (७४ जागा) लघुलेखक-उच्च श्रेणी (१४ जागा), लघुलेखक-निम्न श्रेणी (२० जागा),शिपाई (५८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात ८० जागा

औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात स्टेनोग्राफर -निम्नश्रेणी (३० जागा), शिपाई (५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ६२ जागांसाठी परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील अधिव्याख्याता (६२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भंडारा जिल्हा न्यायालयात १५५ जागा
भंडारा जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२५ जागा), कनिष्ठ लिपिक (७५ जागा), शिपाई (२५ जागा), बेलिफ (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नाशिक जिल्हा न्यायालयात २२० जागा
नाशिक जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२२ जागा), कनिष्ठ लिपिक (५४ जागा), शिपाई (१८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमत आवृत्तीत दि. २५ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पुणे येथील सी डॅक केंद्रात २३ जागा

पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र (सीडॅक) येथे प्लेसमेंट एक्झिक्युटिव्ह (१ जागा), प्लेसमेंट असिस्टंट (२ जागा), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (२ जागा), कॉन्सुलर (२ जागा), सेक्रेटरी (५ जागा), अकाउंट असिस्टंट (१ जागा), हिंदी ऑफिसर (१ जागा), रिसेप्शनिस्ट (३ जागा), मल्टिफंक्शनल स्टाफ (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.cdac.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये प्रशिक्षणार्थी तारतंत्रीच्या ३३ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) प्रशिक्षणार्थी तारतंत्री (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत १९ जागा
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत प्रकल्प सहायक (१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.nplindia.org

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय तटरक्षक दलात यांत्रिक, नाविक भरती
भारतीय तटरक्षक दलात यांत्रिक, नाविक, कुक व स्टुअर्डची पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

ठाणे जिल्हा रुग्णालयात १ जागा
महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ठाणे जिल्हा रुग्णालयात डाटा मॅनेजर (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सातारा जिल्हा न्यायालयात २२० जागा
सातारा जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (२४ जागा), कनिष्ठ लिपिक (१०४ जागा), शिपाई (९२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. ऐक्यच्या सातारा आवृत्तीत दि. २५ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञाच्या ११ जागा
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.nplindia.org

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमाडंटंची भरती
भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमाडंटची पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

अहमदनगर जिल्हा न्यायालयात २३० जागा

अहमदनगर जिल्हा न्यायालयात लघुलेखक-निम्न श्रेणी (१८ जागा), कनिष्ठ लिपिक (१२२ जागा), शिपाई (९० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवी मुंबई महापालिकेत १ जागा

नवी मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. ११ फेब्रुवारी २०१० रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता व सामनामध्ये दि. २६ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी व लिपिकाच्या १२५५ जागा

पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी- स्थापत्य अभियंता (४ जागा), अधिकारी- इलेक्ट्रिकल अभियंता (३ जागा), अधिकारी-आर्किक्टेक्चर (२ जागा), लिपिक (१२४६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://pnbindia.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी १४२ जागा
सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल-पुरुष (१४० जागा), कॉन्स्टेबल-स्त्री (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. अर्ज व अधिक माहिती http://www.ssb.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेत २ जागा
मध्य रेल्वेमध्ये सांस्कृतिक कोट्याअंतर्गत ग्रुप सी मध्ये २ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १६-२२ जानेवारीच्या अंकात आली आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशनध्ये बॉयलर ऑपरेशन अभियंत्याच्या ३ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये बॉयलर ऑपरेशन अभियंता (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.iocl.com/

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशनध्ये अपंगांसाठी ४ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये अपंगांसाठीच्या विशेष भरती मोहिमेअतंर्गत लॅब अनॉलिस्ट (१ जागा), मटेरियल असिस्टंट (२ जागा), असिस्टंट केमिस्ट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.iocl.com/

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रिज कमिशनमध्ये ३१ जागा
केंद्र शासनाच्या खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रिज कमिशनमध्ये इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेटर (३ जागा), कनिष्ठ उपसंपादक (१ जागा), ऑडिटर (३ जागा),सहायक विकास अधिकारी (४ जागा), सुपरिडेंट (५ जागा), स्टेनो (५ जागा), कनिष्ठ स्तर लिपिक (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १६-२२ जानेवारीच्या अंकात आली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेडमध्ये १३३ जागा
नॅशनल थर्मल पॉवर लिमिटेडमध्ये सिव्हिल कंन्स्ट्रक्शन (७० जागा), सेफ्टी (९ जागा), इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (४ जागा), वैद्यकीय अधिकारी (३१ जागा), कंपनी सेक्रेटरी (४ जागा), फॅकल्टी फॉर ट्रेनिंग (४ जागा), जिओलॉजी /जिओग्राफिक/ड्रिलिंग /फिल्ड ऑपरेशन (४ जागा), इन्व्हॉर्नमेंट (१ जागा), रिसर्च अलायन्स (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहितीhttp://ntpc.timesjobs.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये सुरक्षा रक्षकाच्या ३१९ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात सुरक्षा रक्षक (३१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात दै. लोकमत व सामनामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सशस्त्र सीमा बलमध्ये १० जागा
सशस्त्र सीमा बलमध्ये व्हेटर्नरी असिस्टंट सर्जन (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१० आहे. अर्ज व अधिक माहिती http://www.ssb.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत अधिकार्‍यांच्या ५६५ जागा
पंजाब अँड सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (५०० जागा), तांत्रिक अधिकारी (५ जागा), चार्टर्ड अकाउंटंट (२५ जागा), ईडीपी ऑफिसर (३५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.psbindia.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात १ जागा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुलसचिव (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत लिपिका -नि- रोखपालच्या २५० जागा
पंजाब अँड सिंध बँकेत लिपिक-नि-रोखपाल (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.psbindia.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात ९० जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात सीटी/टेक्निकल/ट्रेडसमन (९० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. अर्ज व अधिक माहिती http://www.crpf.nic.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ।

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये ३३ जागा
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये शास्त्रज्ञ (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०१० आहे. अधिक माहिती http://www.iictindia.org/

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ३१ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंता (३१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. २७ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०१० या कालावधीत होणार आहेत. अधिक माहिती http://www.bhel.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय सैन्य दलात विधी पदवीधरांसाठी १३ जागा
भारतीय सैन्य दलात विधी पदवीधरांसाठी पुरुषांच्या ६ जागा व महिलांच्या ७ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज २० फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती www.indianarmy.gov.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

भारतीय सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्री स्किम अंतर्गत ५९ जागा
भारतीय सैन्य दलात एनसीसी विशेष भरती अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशनमार्फत पुरुषांच्या ५० जागा व महिलांच्या ९ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज १० फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

खडकीच्या इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत ३८१ जागा
इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी खडकी (पुणे) येथे अर्धकुशल कारागिर (३८१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

दामोदर व्हॅली कार्पोरेशनमध्ये ५९ जागा
दामोदर व्हॅली कार्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक (२३ जागा), वरिष्ठ प्रशिक्षणार्थी औषधनिर्माता (२५ जागा), सुरक्षा अधिकारी (८ जागा), सहायकनि कनिष्ठ भाषांतरकार (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहितीwww.dvc.gov.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

अणू ऊर्जा विभागात २४ जागा
अणू ऊर्जा विभागाच्या सामान्य सेवा संस्थेत सायंटिफिक ऑफिसर (९ जागा), नर्स (७ जागा), सायंटिफिक असिस्टंट (५ जागा), फार्मासिस्ट (२ जागा),ट्रेडसमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१० आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये ५२ जागा
पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये राजशिष्टाचार अधिकारी (३५ जागा), संशोधन अधिकारी (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी २०१० जागा आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीत ४ जागा
देहूरोड (पुणे) येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत वरिष्ठ नर्स (१ जागा), मेडिकल असिस्टंट (१ जागा), वॉर्ड सहायक (१ जागा), फार्मासिस्ट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

बिहार क्षेत्रीय ग्रामीण बँकेत ८६ जागा
बिहार क्षेत्रीय ग्रामीण बँकेत लिपिक-नि-रोखपाल (८६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

ईआरएनईटीमध्ये १५ जागा
ईआरएनईटी इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), व्यवस्थापक (१ जागा), ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (१ जागा), तांत्रिक सहायक (२ जागा),खासगी सचिव (२ जागा), सहायक (३ जागा), स्टेनोग्राफर (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. अधिक माहिती www.eis.ernet.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत १४ जागा
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत सहायक संचालक -राजभाषा (१ जागा), कार्यक्रम सहायक (१ जागा), तांत्रिक सहायक (७ जागा), चालक (१ जागा),कनिष्ठस्तर लिपिक (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांत करावे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. अधिक माहिती www.cicr.org.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

भारतीय अन्न महामंडळात अधिका-यांच्या १५ जागा
भारतीय अन्न महामंडळात उपसरव्यवस्थापक -लेखा (९ जागा), उपसरव्यवस्थापक - सामान्य प्रशासन (१ जागा), उप सरव्यवस्थापक - इले/यांत्रिक (१ जागा), सहायक सरव्यवस्थापक - विधी (२ जागा), सहायक सरव्यवस्थापक - तांत्रिक (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://specialtest.in/fci

यासंकेतस्थळावर मिळेल. या संबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. ९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

अंबरनाथच्या मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत १ जागा
संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत मशिनिस्ट सेमी स्किल्ड (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ओनएनजीसीमध्ये २४ जागा
ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये उपमहाव्यवस्थापक (१ जागा), वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (१४ जागा), वैद्यकीय अधिकारी (७ जागा), कंपनीसेक्रेटरी/व्यवस्थापक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहितीhttp://www.ongcindia.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत ११ जागा
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.nplindia.org

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बेस्टमध्ये मागासवर्गीय भरती अंतर्गत ३७६ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) मागासवर्गीय विशेष भरती अंतर्गत दुय्यम निबंधक (१ जागा), महाकार्यदेशक -यांत्रिकी (२ जागा), कार्यदेशक-यांत्रिकी ( ३ जागा), कार्यदेशक-सांगाडा (१ जागा), सहायक कार्यदेशक -यांत्रिकी (३२ जागा), सहायक कार्यदेशक- विद्युत (७ जागा),सहायक कार्यदेशक - व्हल्कनायझिंग (१ जागा), सहायक कार्यदेशक- सांगाडा (३ जागा), कनिष्ठ यांत्रिकी -मोटार वाहन (७१ जागा), कनिष्ठ विजतंत्री (१४जागा), कनिष्ठ स्वच्छक (२४१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१० आहे. अधिक तपशीलwww.bestundertaking.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये १२ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सल्लागार-कार्डियालॉजी (१ जागा), विशेषज्ञ (४ जागा), वैद्यकीय अधिकारी (४ जागा), कनिष्ठ तांत्रिक (१ जागा), कनिष्ठ औषध निर्माता (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत ५ फेब्रुवारी २०१० रोजी होणार आहे. अधिक माहितीwww.sail.co.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ६ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

पुण्याच्या एफटीआयआयमध्ये ९ जागा
पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रोफेसर साऊंड इंजिनिअर (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर टिव्ही ग्राफिक (१ जागा),लेक्चरर टिव्ही ग्राफिक (१ जागा), लेक्चरर आर्ट डायरेक्टर (१ जागा), लेक्चरर साऊंड इंजिनिअर (१ जागा), ग्रंथपाल (१ जागा), सहायक सुरक्षा अधिकारी (१ जागा), डेमोस्ट्रेटर-साऊंड रेकॉर्डिंग (१ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.ftiindia.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी १२ जागा
मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ग्रुप सी मध्ये १२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे.

अंबरनाथच्या इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत ४ जागा
इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबरनाथ येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा), वैद्यकीय सहायक-पुरुष (२ जागा), वैद्यकीय सहायक-महिला (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ जानेवारी २०१० - ८ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.

आयआरसीटीसी मध्ये ३९५ जागा
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये सहायक व्यवस्थापक - केटरिंग (१७ जागा), सहायक व्यवस्थापक - पर्यटन (१३ जागा),सहायक व्यवस्थापक - आयटी (४ जागा), सहायक व्यवस्थापक - मनुष्यबळ विकास (९ जागा), सहायक व्यवस्थापक - फायनान्स (१५ जागा),एक्झिक्युटिव्ह - केटरिंग (१७० जागा), एक्झिक्युटिव्ह - पर्यटन (२१ जागा), एक्झिक्युटिव्ह - आयटी (१४ जागा), एक्झिक्युटिव्ह - मनुष्यबळ विकास (१० जागा), एक्झिक्युटिव्ह - फायनान्स (२० जागा), सिनिअर सुपरवायझर - टुरिझम (१० जागा), असिस्टंट सुपरवायझर - आयटी (४० जागा),असिस्टंट सुपरवायझर - मनुष्यबळ विकास (२२ जागा), असिस्टंट सुपरवायझर - फायनान्स (३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.irctc.com

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये १ जागा
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये सहायक संचालक - जनसंपर्क (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेअंतर्गत ११० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१० ची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत तालुका निरीक्षक- भूमी अभिलेख (१८ जागा), नायब तहसीलदार (९२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटी तारीख ९ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहितीwww.mpsc.gov.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे

Posted by प्रमोद देव on February 06, 2010 03:17 AM · permalink

 

छायाचित्र जालावरून साभार

Posted by सुनील on February 06, 2010 02:22 AM · permalink

 

गुरू : एक कोडे. भाग २ . मला वाटते...

read more

Posted by शरद on February 06, 2010 01:19 AM · permalink

 

कधी कधी नभालाही वाटत असेल
घ्यावे धरतीला मिठीत
कधी कधी ढगांनाही वाटत असेल
शिरावे ह्या दरीच्या कुशीत

कधी कधी शिखरालाही वाटत असेल
खोल खोल दरीत उतरावे
अन कधी कधी दरीलाही वाटत असेल
उंचावरून जग पहावे

कधी कधी पावसालाही वाटत असेल
ओलेचिंब भिजावे
अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल
उबदार गोधडीत शिरावे

कधी कधी उन्हालाही वाटत असेल
सर्वस्व सावलीला द्याव
अन सावल्यांनाही वाटत असेल
सोनसळी उन्हात नहाव ..

कधी कधी शब्दानांही वाटत असेल
कवितेला सजवावे
कधी कधी कवितेलाही वाटत असेल
शब्दांचेच होऊन जावे..

Posted by फ्रॅक्चर बंड्या on February 05, 2010 10:31 AM · permalink

 

फारच वेगवान आणि तितकाच सुंदर चित्रपट. विनोदाच्या अंगाने जात असल्यामुळे मला खूपच आवडला.
सगळ्या कलाकारांनी कामं अतिशय समरसून केलेत.
मला आवडलेला(सर्वदृष्टीने) बहुदा हा पहिलाच चित्रपट असावा. Smile

अवांतरः दादासाहेब फाळके ह्यांच्या जीवनावरचा हा चित्रपट पाहिल्यावर असा ग्रह होतो की हे सगळं अतिशय सुलभतेने घडलं. कुठेही फार मोठा संघर्ष नाही किंवा खूप मोठ्या अडचणी नाहीत.(असं आहे म्हणून कुठेच बिघडत नाही, तरी शंका येतेच.)
खरंच असं असेल का?

Posted by प्रमोद देव on February 05, 2010 10:24 AM · permalink

 

नमस्कार मंडळी,
फार फार काळानंतर मिपावर यायला फुरसत झाली. हाटेलं जोरात चालु आहे हे दिसतच आहे.

आता थोड कामाच. मागच्या वर्षात मंदाबाईनी सगळ्यांनाच काहीना काही धडे दिले. त्यामुळे सध्या आम्ही नवी नोकरी शोधत आहोत.
तर आम्हाला पुण्यातल्या एका कंपनीने PEGA नावाच्या सिस्टीमवर काम करण्याची ऑफर दिली आहे. PEGA हे Business  Process Managementसाठीचे एक टूल आहे. नेटवरपण याची फारशी माहिती नाही. मला सापडलेले २ दुवे खाली दिले आहेत.

आपल्या मिपाकरांपैकी कोणी मला PEGA विषयी माहिती देउ शकतील काय? विशेषकरुन खालील २ प्रश्नांची उत्तरे मी शोधत आहे.
१. आजनंतर ४-५ वर्षांनी PEGA चे भविष्य काय?
२. PEGA ही C,C++,Java,。NET या पारंपारीक Languages पेक्षा कशा रोतीने वेगळी आहे.

धन्यवाद,
आपला गणा मास्तर,
(भोकरवाडी बुद्रुक)

Posted by गणा मास्तर on February 05, 2010 10:01 AM · permalink

 

एक रागाने भडकलेला तरुण (An Angry Young Man)

(या लेखातील सर्व मतें लेव्ही व स्कॉट-क्लार्क या लेखकद्वयीची आहेत)

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तोंच्या कार्यालयात ते पत्र कुठल्याही कंपनीतून आलेले नव्हते तर "७१ ऍमस्टेल स्ट्रीट, त्स्वानेनबुर्ग" या फारशा ’पॉश’ नसलेल्या खासगी पत्त्यावरून आलेले होते. ’शिफॉल’ या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेल्या या घरावरून सतत विमानांची ये-जा असायची व त्यामुळे त्यांच्या आवाजाचा सतत त्रास असायचा. भुत्तो यांच्या मंत्रीमंडळातील ज्या मंत्र्याने ते पत्र सर्वप्रथम पाहिले त्याच्या सांगण्यानुसार भुत्तोंच्या पाकिस्तानातील कार्यालयात ते पत्र १९७४ साली येऊन पोचेपर्यंत त्या पत्राला अनेक घड्या पडल्या होत्या आणि अनेकांनी हाताळलेले असल्यामुळे ते पत्र मळलेही होते. ते पत्र पाकिस्तानच्या ब्रुसेल्स येथील राजदूतावासामार्फत (embassy) पाठविले गेले होते व ISI च्या गुप्तहेरांनी तसेच भुत्तोंच्या सुरक्षादलाने ते तपासलेही होते.

भुत्तोंना ते पत्र दाखवावे कीं नाहीं या पेचात त्यांचे मदतनीस पडले होते कारण ते पत्र लिहिणार्‍या डॉ. खान या तरुणाने स्वत:ची ओळख एका युरोपियन परमाणूविषयक संघटनेत काम करणारा एक वैज्ञानिक अशी करून दिली होती.
त्या आधी दोनच महिने-१९७४ साली-भारताने पोखरण येथे आपली पहिली अनधिकृत अण्वस्त्र चांचणी केली होती. भारताने जगातील प्रस्थापित अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडून केवळ उर्जानिर्मितीसाठी म्हणून मिळविलेले तंत्रज्ञान वापरून गुप्तपणे आपल्या पहिल्या अण्वस्त्राचा आरखडा (design) बनविला व त्याचे उत्पादनही केले. एक तर्‍हेने हा त्या राष्ट्रांशी केलेला मित्रद्रोहच होता. आपल्याला एकटे पाडून, बुद्धिचातुर्याने आपल्यावर मात करून आणि आपल्याला शर्मिंदा करून आपला ’मामा’ बनविण्यात आला आहे व त्याद्वारा भारताने स्वत:चे विभागीय श्रेष्ठत्व प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे असे भुत्तोंना वाटले. यापुढे दक्षिण आशियात अण्वस्त्रें मिळविण्याबद्दल शर्यत सुरू होईल या काळजीत संयुक्त राष्ट्र संघटना पडेल व अनुषंगाने अण्वस्त्रांवर देखरेख करणारी त्यांची यंत्रणा (IAEA) आता पाकिस्तानच्या हालचालींवर जास्त कडक लक्ष देईल व जरूर पडेल तसे निर्बंधही घालेल व त्यामुळे आपली अण्वस्त्रे मिळविण्याची योजना जास्तच अवघड होईल अशी भीतीही पाकिस्तानला वाटू लागली.

त्याआधी १९४७ साली झालेल्या फाळणीत हिंदूंनी मुसलमानांच्या व मुसलमानांनी हिंदूंच्या कत्तली केल्या व त्यात लाखों कुटुंबे विभक्त झाली, लाखों गावे बेचीराख झाली व एके काळी मित्र असलेली व शेजारी रहाणारी माणसे एकमेकांच्या जिवावर उठली. लाखो लोक शेकडो आगगाड्यात चढून पूर्वेकडून पश्चिमेला व पश्चिमेकडून पूर्वेला दोन भागांत नव्याने बनलेल्या पूर्व व पश्चिम पाकिस्तान या मुस्लिम गणराज्यात अनिश्चित भविष्याला तोंड देण्यासाठी जाऊ लागले. पूर्व पाकिस्तान व जम्मू-काश्मीर संस्थान यांच्या स्थापनेबद्दल खूप वादविवाद निर्माण झाला कारण पूर्व पाकिस्तानच्या लोकांना तेंव्हापासूनच स्वातंत्र्य हवे होते व जम्मू-काश्मीरचे राजे हरी सिंग यांनी त्या राज्यातील मुस्लिम नागरिकांच्या मनाविरुद्ध भारतात आपल्या संस्थानाचे विलीनीकरण केले. यावरून पाकिस्तान व भारत यांच्यात अनेक युद्धें झाली त्यातल्या १९७१ सालच्या निर्णायक युद्धात इंदिरा गांधींनी आपल्या सैन्यासह पूर्व पाकिस्तानवर चढाई केली होती व केवळ दोन आठवडे चाललेल्या या युद्धात पाकिस्तानी सैन्याला डाक्याच्या रेसकोर्सवर अतीशय लाजिरवाणी अशी शरणागती पत्करावी लागली होती.

भुत्तोंनी अमेरिकेकडून राजनैतिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने त्यांनी अमेरिकेकडून स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्राविरुद्ध संरक्षक कवचाची (Nuclear Umbrella) मदत मागितली. यासाठी त्यांनी पाकिस्तानचे अमेरिकेतील तेंव्हाचे राजदूत साहबजादा याकूब खान याला त्यांनी किसिंजर यांच्याकडे धाडले. जर भारताने पाकिस्तानविरुद्ध अण्वस्त्र वापरले तर अमेरिकेने संरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी होती. पण भुत्तोंना त्यात फारशी आशा वाटत नव्हती. पाकिस्तानने अमेरिकेबरोबर अनेक संरक्षणविषयक करार केले होते व या करारांन्वये पाकिस्तानला आपले सैन्य व त्यांची शस्त्रास्त्रे अद्ययावत ठेवायला मदत झाली होती व भारताबरोबरचे वैरही चालू ठेवता आले होते. असे असले तरी अमेरिकेला पाकिस्तानच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका वाटू लागली होती. पाकिस्तानने टाकलेली कांहीं पावले अमेरिकेच्या हिताविरुद्ध होती अशी तक्रार CIA या संघटनेने पाकिस्तानकडे केली होती. अमेरिकेला अशीही शंका येऊ लागली होती कीं पाकिस्तानने १९६३ व १९६४ साली चीनच्या चाऊ एन-लायबरोबर कांहीं तरी गुप्त करार केला होता.

भुत्तोंची भीती खरी ठरली. किसिंजर यांनी पाकिस्तानच्या तोंडाला पाने पुसली. अशी संरक्षणाची जबाबदारी घ्यायला अमेरिका तयार नव्ह्ती कारण मग असे संरक्षक कवच इतर कांहीं राष्ट्रांनीही मागितली असती! शेवटी किसिंजर यांनी याकूब खान यांना सांगितले कीं आता भारताने केलेली अण्वस्त्राची चाचणी पाकिस्तानने "fait accompli" म्हणून स्वीकारावी व त्याप्रमाणे वागावे. अशा तर्‍हेने याकूब खान हात हलवत परत आले व भुत्तोंचा तिळपापड झाला.

भुत्तोंच्या अमेरिकेवरील रागाचे पहिले कारण होते कीं बांगलादेशच्या युद्धात अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला वेळेवर धावून आली नव्हती. अमेरिकेचे सातवे आरमार (Seventh Fleet) बंगालच्या उपसागरात पोचायच्या आधीच बांगलादेशचे युद्ध भारताने संपविले होते. त्याआधी अमेरिकेने भारताविरुद्ध वापरायला बंदी असलेली युद्धसामग्री पाकिस्तानने १९६५ सालच्या युद्धात भारताविरुद्ध वापरल्यामुळे अमेरिकेने त्या देशाला द्यायच्या मदतीवर बंदी (ban) घातली होती. रागाचे दुसरे कारण झाले ते यावेळीही अमेरिकेने पाकिस्तानला अण्वस्त्रांच्या बाबतीत मदत केली नाहीं, भारताला धारेवर धरले नाहीं हे! म्हणून भुत्तोंना वाटले कीं आता अमेरिकेच्या पलीकडे जाऊन कांहीं नवीन व्युहरचना करायला हवी. पाकिस्तानला वाचविण्यासाठी अण्वस्त्रसज्ज बनणे मग अपरिहार्य होऊन बसले.

त्यावेळी पाकिस्तानचा परमाणुविज्ञान कार्यक्रम फारच डळमळीत परिस्थितीत होता. १९६५ साली भुत्तो परराष्ट्रमंत्री असतांना कॅनडाबरोबर केलेल्या करारान्वये "कराची अणुभट्टी वीजनिर्मिती केंद्रा"साठी मिळालेली (कानुप-KANUPP) या नावाची एक अणुभट्टी पाकिस्तानकडे होती. ती १ ऑगस्ट १९७१ साली कार्यरत झाली. ती अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रकल्पासाठी राबविता येण्यासारखी होती. त्या भट्टीतून वापरून झालेल्या (irradiated) रूपात मिळालेल्या इंधनाच्या कांब्यांमध्ये प्लुटोनियम-२३९ हे मूलद्रव्य भरपूर प्रमाणात असायचे. 'हान' या जर्मन शास्त्रज्ञाने हेच मूलद्रव्य वापरून सुरुवातीचे प्रयोग केले होते व 'फॅट मॅन' या नावाने ओळखला जाणारा व नागासाकी या शहरावर टाकलेला बाँब हेच मूलद्रव्य वापरून बनविला गेला होता. प्लुटोनियम-२३९ पासून अण्वस्त्रात वापरण्यालायक लागणारे "प्लुटोनियम-२३५" बनविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान पाकिस्तानकडे नव्हते व ते मिळवणेही दुरापास्त होते. अशा परिस्थितीत सुदैवाने एका संतप्त पाकिस्तानी शास्त्रज्ञाकडून भुत्तोंना वर उल्लेखलेले आत्मविश्वासपूर्ण पत्र आले कीं अशुद्ध युरेनियममधून अण्वस्त्रांच्यालायक 'शुद्ध युरेनियम' बनविण्याच्या युरोपमध्ये विकसित होत असलेल्या ’सेंट्रीफ्यूज’ (centrifuge) या एका नव्या क्रांन्तिकारक प्रक्रियेच्या तत्रज्ञानाबद्दल त्याला माहिती झालेली होती. ती नवी पद्धत तो पाकिस्तानमध्ये यशस्वी करून दाखवू इच्छित होता व या पद्धतीने बाँब बनविण्यासाठी लागणार्‍या शुद्ध युरेनियमचे उत्पादन करता येईल याची त्याला खात्री होती.

हे पत्र वाचले गेले तेंव्हा कौसर नियाज़ी हे पाकिस्तानचे माहिती मंत्री भुत्तोसमवेत होते. नियाज़ींच्या आठवणीप्रमाणे त्या पत्रातील माहिती वाचल्यावर भुत्तोंच्या शरीरातून जणू वीजच सळसळली. भुत्तोंनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आगा शाही यांना बोलावून घेतले व ते पत्र त्यांना दाखविले. डॉ. अब्दुल कादीर खान हा शास्त्रज्ञ म्हणतोय् कीं ’सेंट्रीफ्यूज’ पद्धतीने तो अण्वस्त्राला लागणारे मूलद्रव्य वेगळे करू शकेल असे भुत्तो त्याना म्हणाल्याचे आगा शाही यांना आजही आठवते आहे. आगा शाहींना याबद्दल खात्री नव्हती तरीही ते म्हणाले की "त्या शास्त्रज्ञाला एक संधी द्यायला हरकत नाहीं".
डॉ. खान यांना धातुशास्त्रातली डॉक्टरेट पदवी असूनही व त्यांनी अनेक लेख व एक जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलेले असूनही कराचीतल्या "पीपल्स स्टील मिल" इथे त्यांना नोकरी दिली गेली नव्हती व त्यांना दुर्लक्षले गेले होते व याचे त्यांना वैषम्य वाटत होते. म्हणून ते आपली सेवा पाकिस्तानला या नव्या प्रकल्पात देऊ इच्छित होते.

नियाज़ींनी डॉ. खान यांची 'केस' हातात घेतली. त्यांनी ISI करवी बारीक चौकशी करवली. प्रयत्नाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा एवढे नक्की होते की १९४५ साली हिरोशिमावर टाकलेल्या 'लिटल बॉय' या बॉम्बमध्ये वापरलेले शुद्ध युरेनियम बनविण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल डॉ. खान यांना माहिती मिळू शकली होती. ISI नेही कौल दिला कीं एक संधी द्यायला हरकत नाहीं.

युरेनियमचा शोध १७८९ साली जर्मन शास्त्रज्ञ क्लॅपरॉथ यांनी लावला. युरेनियम हे मूलद्रव्य शिसाच्या दुप्पट जड असून जगाच्या पाठीवर सापडणार्‍या सर्वात जड समजल्या जाणार्‍या मूलद्रव्यातील एक मूलद्रव्य समजले जाते. ते प्लुटोनियम या मूलद्रव्याचा एक विकल्प (alternative) समजले जाते. युरेनियम विभक्त करणे जास्त अवघड पण जास्त सुरक्षित समजले जाते. त्यासाठी युरेनियमचे खनिज दळले जाते व त्याची भुकटी पाण्यात मिसळली जाते व हे युरेनियम ऑक्साईड (ज्याला त्याच्या रंग-रूपावरून "पिवळा केक"-Yellow Cake-म्हटले जाते). त्याच्या १००० परमाणूंमध्ये ७ परमाणू ज्याचा बाँब बनविण्यात उपयोग होऊ शकतो अशा "युरेनियम-२३५" चे असतात. बाकीले ९९३ परमाणू जड व निरुपयोगी युरेनियम-२३८चे असतात. अण्वस्त्रें बनविण्यासाठी या ७ परमाणूंना वेगळे करावे लागते व हे करण्याची पद्धती खर्चिक व खूप गुंतागुंतीची असते. युरेनियम-२३५ची शुद्धता संपन्नतावृद्धीची प्रक्रिया (enrichment process) वापरून कमीतकमी ९३ टक्क्यापर्यंत वाढवावी लागते. जगातले कित्येक देश या प्रक्रियापद्धतीवर ताबा मिळविण्यासाठी झगडत होते.

डॉ. खान भुत्तोंना म्हणाले कीं ५० सालच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिश, जर्मन व डच सरकारांनी एकत्र येऊन 'युरेंको उद्योगसमूहा'ची (URENCO consortiumची) प्रस्थापना केली. या कंपनीने तीन चांचणी प्रयोगशाळा स्वस्त व सुरक्षित युरेनियम व्यापारी तत्वावर शुद्ध करण्यासाठी स्थापल्या. चेशायर मधील 'केपेनहर्स्ट', पूर्व हॉलंडमधील 'आल्मेलो' व पश्चिम जर्मनीतील 'ग्रोनाऊ' येथील या तीन युरेंको प्रयोगशाळांतील शास्त्रज्ञ 'उभ्या दिशेतील शुद्धीकरण' (vertical separation) करण्यासाठी केंद्रापसारी शक्ती (centrifugal force) वापरून युरेनियम-२३८च्या परमाणूंतून युरेनियम-२३५चे परमाणू विभक्त करण्याच्या प्रयत्नावर प्रयोग करत होते. त्यासाठी त्यांनी चिरूट ठेवण्याच्या नळ्यांसारखी दिसणारी अल्युमिनियमच्या नळकांड्यांची प्रचंड सहा-फुटी सेंट्रीफ्यूज यंत्रे उभारली होती. ही नळकांडी स्वत:भोवती मिनिटास ७०,००० वेळा इतक्या प्रचंड वेगाने फिरत असताना त्यांत युरेनियम हेक्झाफ्लुराईड हा 'यलो केक'पासून बनविलेला वायू सोडला जाई. फिरण्याच्या उच्च वेगामुळे जड असलेले युरेनियम-२३८ बाहेरच्या बाजूला फेकले जाई व या नळकांड्यांच्या बाजूने खाली सरकून खली बसविलेल्या तोंडातून बाहेर फेकले जाई. याच वेळी हलके असलेले व बाँब बनविण्यास लागणारे युरेनियम-२३५ या नळकांड्यांच्या उभ्या आसाकडे खेचले जाई व वरच्या दिशेने शोषले जाई.

इंग्लिश, जर्मन व डच या तीन भाषा अस्खलितपणे येत असल्याने डॉ. खान यांना अशी अत्यंत गोपनीय अशा तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकेल अशा जागी नोकरी मिळाली होती. ही माहिती पाकिस्तानला उपयोगी पडणार हे समजल्यावर भुत्तोंची कळी खुलली व ते या पाकिस्तानी शास्त्रज्ञाचे एका गुप्तहेरात रूपांतर करण्याच्या कल्पनेत रमून गेले.

ज़ुल्फिकार अली भुत्तो हे पाकिस्तानचे निर्माते जिन्ना यांच्या खास मदतनीसांचे सुपुत्र. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडला झाले. भुत्तोंची १९५८ पासूनच खात्री होती कीं पाकिस्तानला अणुतंत्रज्ञान मिळवावेच लागेल. त्यावर्षी भुत्तो इंधनें, वीज व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या (natural resources) खात्याचे मंत्री झाले होते व तेंव्हा त्यांना कळले कीं जन्माला जेमतेम दहाच वर्षें झालेल्या पाकिस्तानात एक मुलकी अणुतंत्रज्ञानाचा कार्यक्रम कार्यरत होता. अमेरिकेच्या पुढाकाराने १९५६ सालापासून प्रायोजलेला "शांततेसाठी परमाणू" हा कार्यक्रम अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी त्यांचे अणुतंत्रातील ज्ञान अप्रगत राष्ट्रांना देण्यासाठी आखलेला होता. पाकिस्तानातील हा प्रकल्प "पाकिस्तान परमाणू संशोधन केंद्र (PAEC)" या भव्य व रुबाबदार नावाने ओळखला जाई व त्याचे प्रमुख होते पूर्वी कापसाच्या उद्योगात काम केलेले शास्त्रज्ञ डॉ. नज़ीर अहमद. पण डॉ. अहमदना शोधायला भुत्तोनाही जरा वेळ लागला. कारण त्याच्या कार्याची व्याप्ती त्यांच्या कराचीतील पोस्टाच्या इमारतीत सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या छोट्याशा कार्यालयापेक्षा जास्त नव्हती. "फक्त एक नाव आहे एवढेच!" भुत्तो म्हणाले.

१९६१ साली लाहोर येथे एक परमाणू संशोधन केंद्र सुरू झाले. १९६५ सालच्या काश्मीर प्रश्नावरून झालेल्या भारत-पाक युद्धानंतर तक्रारीच्या सुरात भुत्तो म्हणाले होते कीं जर भारताने अणूबाँब बनवला तर आम्ही पाकिस्तानी लोक वेळ पडल्यास घास-पत्ती खाऊ, भुकेले राहू, पण आम्हीही आमचा अणूबाँब बनवूच. त्याशिवाय आम्हाला पर्यायच नाहीं....भारताच्या अणूबाँबला उत्तर म्हणून पाकिस्तानचा अणूबाँब!
२० जानेवारी १९७२ला भारताकडून झालेल्या पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर व डाक्याला पत्करलेल्या शरणागतीनंतर भुत्तोंनी पाकिस्तानच्या सर्व ख्यातनाम व उच्चपदस्थ शास्त्रज्ञांची मुलतान येथे नवाब सादीक हुसेन कुरेशी यांच्या घरी गुप्त बैठक बोलावली.

निमंत्रितांत श्री. समर मुबारकमंद नावाचे एक कनिष्ठ शास्त्रज्ञही होते. २६ वर्षांनंतर (१९९८ साली) पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या चांचणीत ते एक महत्वाची भूमिका निभावणार होते. पाकिस्तानला पुन्हा गौरव प्राप्त करून देण्याबद्दलच्या पंतप्रधानांच्या प्रत्येक शब्दांकडे एकग्रतेने ऐकत बसल्याचे त्यांना आजही आठवते. भुत्तोंनी शास्त्रज्ञांना सांगितले कीं पाकिस्तानला अण्वस्त्रयुगात नेण्याचे व अण्वस्त्रशर्यतीत भाग घेण्याबाबतचे निर्णय घेऊ शकतील अशा पदावर नियतीनेच त्यांना (भुत्तोंना) बसवले आहे. "असा अणूबाँब तुम्ही पाकिस्तानला देऊ शकाल कां?" असे त्यांनी सर्व शास्त्रज्ञांना विचारला. त्याबरोबर टांचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता तिथे पसरली अशी आठवण मुबारकमंद यांना आजही आहे. "त्यांच्या या प्रश्नाने आम्ही अगदी पार गोंधळून गेलो". सर्व शास्त्रज्ञांच्या मतें पाकिस्तान भारताच्या कमीतकमी २० वर्षें मागे होता. PAECचे प्रमुख डॉ. इश्रत उस्मानी यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले कीं अणूबाँब बनविण्यासाठी लागणार्‍या पायाभूत गोष्टी व पायाभूत व्यवस्थाच (infrastructure) पाकिस्तानात अस्तित्वात नाहींत. ते पुढे म्हणाले कीं ते १० किलो प्लुटोनियमबद्दल बोलत नव्हते तर खरोखर लागणार्‍या पायाभूत गोष्टींबद्दल बोलत होते. उदा. धातूनिर्मितीचे कारखाने. हे ऐकल्यावर भुत्तोंच्या कपाळावर आठ्या पडल्या. या बैठकीत अमेरिकेत पाच महिन्याचे प्रशिक्षण घेतलेले व "आंतरराष्ट्रीय परमाणू उर्जा संस्था" (IAEA) येथे अनेक वर्षें काम केलेले मुनीर अहमद खानही होते. मुनीर खान यांची लगेच डॉ. इश्रत उस्मानींच्या जागी नेमणूक झाली. त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय तपासणीबद्दलची माहिती "घरून" मिळण्याची सोय झाली. मुनीर खान हे हाडाचे सनदी नोकर होते, पण त्यांच्या तंत्रज्ञानाची पातळी तशी यथा-तथाच होती.

आपल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांची बोजड उत्तरे ऐकून वैतागलेले कांहीं तरुण शास्त्रज्ञ ताडकन उभे राहिले. बशीरुद्दिन पुटपुटला,"पाचेक वर्षें लागतील". त्यावर लगेच भुत्तोंनी आपली तीन बोटे वर केली व एक स्मित हास्य केले. जरूर ती साधन-सामग्री व सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या तर पकिस्तान बाँब बनवू शकेल असं हजर असलेल्या सर्वांचे एकमत झाले. मुबारकमंद यांना आजही आठवतंय् कीं त्या बैठकीनंतर सर्वांनी शपथ घेतली कीं आपण अण्वस्त्रे बनवूच! भुत्तोंनी बैठकीचा समारोप केला.

या बैठकीनंतर कांहीं तासातच भुत्तो ज्या मुसलमान राष्ट्रांशी संधान बांधू इच्छित होते अशा देशांच्या झंजावाती दौर्‍यावर गेले. त्यात इराण, सौदी अरेबियालिबिया या राष्ट्रांचाही समावेश होता. भुत्तो पाश्चात्य महासत्तांना "शिकारी महासत्ता" म्हणत. अशा महासत्तांनी आपल्याला (पाकिस्तानला) ’शिकार’ म्हणून खाऊन टाकू नये म्हणून या महासतांपासून त्यांना दूरच रहायचं होतं. म्हणून ते या मुस्लिम राष्ट्रांकडे आर्थिक मदत मागण्यासाठी हातात 'कटोरी' घेऊनच गेले होते असे म्हटले तरी चालेल! सर्वप्रथम ते त्रिपोलीला गेले व कर्नल गद्दाफींना भेटले. गद्दाफींनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रकल्पासाठी भुत्तोंना जरूर ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ते मध्य-पूर्वेतील इतर देशांत गेले जिथे त्यांना आणखी कांही प्रायोजक (sponsors) मिळाले. या दौर्‍यात प्रस्थापित झालेली मैत्री पुढे फारच महत्वाची ठरली कारण या मैत्रीवर पाकिस्तानची भावी व्यूहात्मक धोरणें ठरली. आणि याच मैत्रीतून अण्वस्त्रनिर्मितीत पाकिस्तानला प्रयोजकच नव्हेत तर तयार बाजारपेठही मिळाली.

ऑगस्ट १९७४मध्ये भुत्तोंनी डॉ. खान यांना भेटीचे निमंत्रण पाठविले. हे निमंत्रण पाकिस्तानचे हॉलंड येथील राजदूत श्री. खरास यांच्या हस्ते वैयक्तिक रीत्या डॉ. खान यांना त्यांच्या ७१ ऍमस्टेल स्ट्रीट, त्स्वानेनबुर्ग या पत्त्यावर देण्यात आले. एकीकडे डॉ. खान प्रवासाच्या तयारीला लागले तर दुसरीकडे ISI अधिकारी त्यांची पार्श्वभूमी तपासून पहाण्यात गढून गेले.
ISI अधिकार्‍यांच्या ल़क्षात आले कीं डॉ. खान यांनी अनेक लोकांना स्वत:च्या वंशाबद्दल आगा-पीछा नसलेल्या "स्वरचित कहाण्या" ऐकविल्या होत्या. एक कहाणी होती कीं ते जनरल मलिकच्या वंशात जन्मलेले होते. जनरल मलिक सुलतान घौरी या १२व्या शतकातील अफगाण राजाचा सेनापती होता व त्याच्या सैन्याने पृथ्वीराज चौहानच्या हिंदू सैन्याला पराजित केले होते. हा संदर्भ जरी नामांकित असला तरी ISI अधिकार्‍यांना तो अशक्य वाटला. डॉ. खान यांनी आपल्या कुटुंबाचे भोपाळच्या राजघराण्याशी असलेले तथाकथित 'नात्या'ची थाप त्यांच्या जन्माच्या एप्रिल १९३६ पर्यंत हट्टाने चालू ठेवली होती. पण ISI अधिकार्‍यांच्या मते त्यांच्या आई-वडिलांच्या चाळिशीत जन्मलेल्या या सातव्या मुलाचे बालपणी फाजील लाड करण्यात आले असावेत व त्यामुळे ते कधी प्रौढत्वाला पोचलेच नाहींत.

१५ ऑगस्ट १९४७ च्या फाळणीनंतर हिंदू बहुसंख्य असलेल्या व भोपाळच्या आसपास असलेल्या भागांतून मुसलमान लोक मोठ्या संख्येने भोपाळला येऊ लागले. डॉ. खान यांचे सर्वात वडील दोन भाऊ सर्वप्रथम कराचीला त्याच वर्षी हिवाळ्यात गेले. आणि तीन वर्षांनंतर जेंव्हा भोपाळच्या नवाबांना सिहासनत्याग करायला भाग पाडले गेले तेंव्हा त्यांचा तिसरा भाऊ व मोठी बहीणही पाकिस्तानला पळाली. डॉ. खान यांना ऑगस्ट १९५२ साली पाकिस्तानला जायची संधी मिळाली. डॉ. खान लिहितात, "एका पत्र्याच्या ट्रंकेत कांहीं पुस्तकें व कपडे घालून मी माझा प्रवास अजमेर, लोणी, चित्तूर, बारमेर व शेवटी मोनाबव या मार्गे केला." भारतीय पोलीस व रेल्वे कर्मचारी पळून जाणार्‍या मुस्लिम प्रवाशांकडून सर्व माल चोरत असत. डॉ. खान यांचे पेनही चोरीला गेले. आयुष्यात नंतर डॉ. खान यांनी "भारतातून गेलेली शेवटची रेलगाडी" असे शीर्षक असलेले एक तैलचित्र पाकिस्तानच्या प्रतिनिधीगृहात लावण्यासाठी बनवून घेतले.
भारत-पाकिस्तान सीमेवर डॉ. खान तसे एकटेच होते. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात डोक्यावर ट्रंक व हातात बूट असे ते अनवाणी चालत गेले. ते त्यांच्या तीन भावांबरोबर व एका बहिणीबरोबर कराचीतल्या एका कोंदट फ्लॅटमध्ये रहात. पण जीवनात प्रगती करण्याचा त्यांचा निश्चय होता.

ते लिहितात की पाकिस्तानात आल्यावर त्यांना पिंजर्‍यातल्या पक्षाला मोकळा केल्यावर जसे वाटते तसे वाटले. कांहीं महिन्यांनंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती आयसेनहॉवर यांनी शांततेसाठी परमाणू (Atoms for Peace) हे त्यांचे व्याख्यान संयुक्त राष्ट्रात दिले. त्याने प्रोत्साहित होऊन डॉ. खान यांनी स्वत:चे नाव डी. जे. सिंध गवर्मेंट सायन्स कॉलेजमध्ये घातले. त्यांना ज्याला छंद म्हणता येईल अशी एकच आवड होती. ते त्यांच्या खिशात एक काळी डायरी ठेवत व त्यात त्यांच्या आवडत्या कविता व कुराणातल्या आवडत्या पंक्ती लिहीत. दुसरी हौस म्हणजे युरोपमध्ये शिक्षणाला जाण्याच्या उद्देशाने ते जर्मन भाषा शिकू लागले. ISI अधिकार्‍यांनी त्यांचा CV अभ्यासला. त्यात त्यांनी कराची विद्यापीठातून १९६० साली शास्त्रशाखेत पदवी घेतल्याचा उल्लेख होता. पण खोलात गेल्यावर ISI अधिकार्‍यांना समजले कीं त्या काळात डॉ. खान यांनी कमी पगाराच्या अनेक नोकर्‍या केल्या होत्या त्यातलीच एक होती कराची पोस्टात वजनांचा पर्यवेक्षक म्हणून असलेली नोकरी. पण तिथे पगार इतका कमी होता कीं ते नेहमी कांहीं काम केल्यास बक्षीस उपटत असत.

शेवटी १९६१ साली डॉ. खान यांना कांहीं तरी त्यांना आवडणारी गोष्ट मिळाली. ते रेल्वेने लाहोरला गेले व तिथे त्यांनी आयसेनहॉवर यांच्या "शांततेसाठी परमाणू" च्या संदर्भात भरविलेले एक प्रदर्शन बघितले. तिथे त्यांना कळले कीं परमाणू कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी धातुशास्त्राचा अभ्यास फार जरूरीचा आहे. पण पाकिस्तानात धातुशास्त्रावर आधारित कुठलेच कारखाने नव्हते. मग युरोपला जायचा विचार आला. भावांकडून जर्मनीला जायच्या तिकिटासाठी उसनवारी केली व ड्युसेलडॉर्फला (Düsseldorf ) प्रयाण केले. त्या आधी त्यांनी आपला हात एका हस्तसामुद्रिकाला दाखविला. (ही त्यांची संवय आयुष्यभर चालू राहिली.) "तुला गोरी बायको मिळेल व पाकिस्तानी लोक तुझा खूप आदर करतील" असे भविष्य त्यांना हस्तसामुद्रिकाने सांगितले.

युरोपला गेल्यावर डॉ. खान बरेच दिवस त्यांच्या दूरच्या भावाकडे (cousin) राहिले. सारखी नकाराची पत्रे येत होती. मग ते एक दिवशी हॉलंडला हेग येथे गेले. तिथे १९६२ सालच्या जानेवारीत एका पोस्टाच्या रांगेत उभे असताना त्यांची हेंद्रीना डॉन्कर्स (हेनी) या दक्षिण आफ्रिकेच्या मुलीशी नजरा-नजर झाली. तिच्या आठवणीप्रमाणे तिचा भावी पती पाकिस्तानला पोस्टकार्ड पाठवायला काय पडते हे विचारत होता. ती माहिती तिला होती व तिने ती डॉ. खानना पुरवली. हेनीचे बालपण झांबियात गेले होते व ती नुकतीच युरोपला मानसशास्त्राचे शिक्षण घ्यायला आली होती. डॉ. खानमध्ये तिला तिच्यासारखाच एक "हरवलेला आत्मा" सापडला. दोघांनी एकमेकांना पत्रव्यवहार करायचे वचन दिले.

१९६२च्या सप्टेंबरमध्ये शेवटी डॉ. खान यांना वेस्ट बर्लिन टेक्निशे युनिवेर्सिटॅट (West Berlin Technische Universitat) येथे धातुशास्त्राच्या परिचयस्वरूप व्याख्यानांना हजर रहाण्याची संधी मिळाली. हेनीने त्यांच्याबरोबर जायचे मान्य केले. तिचे आई-वडील तसे उदारमतवादी होते. पुढे १९६३ च्या सप्टेंबरमध्ये डॉ. खान व हेनी तिच्या आई-वडिलांच्याजवळ असावे म्हणून हॉलंडला गेले. डॉ. खान यांनीही त्यांच्या शिक्षणक्रमाची Delft Technological University येथे बदली करून घेतली. मग डॉ. खान यांनी हेनीशी विवाह करण्यासाठी तिच्या आई-वडिलांची परवानगी मागितली व १९६४च्या सुरुवातीला २१ वर्षाची हेनी व २७ वर्षाचे डॉ. खान यांचा पाकिस्तानच्या हेग येथील राजदूतावासात विवाह झाला. त्यांचे लग्न लावले First Secretary जमालुद्दिन हसनने व राजदूत कुद्रतुल्ला शाहाब खान हे साक्षीदार झाले. त्या लग्नाला डॉ. खान यांचे आई-वडील किंवा त्यांचा लंडनस्थित जवळचा मित्रही येऊ शकला नव्हता. फक्त डॉ. खान यांचा Delft Technological University मधील धातुशास्त्राच्या वर्गातील एक मित्र स्लेबॉस आला होता. स्लेबॉसच्या मते डॉ. खान एक गंभीर प्रवृत्तीचा विद्यार्थी होता.

खान दांपत्याचे जीवन तसे नीरसच होते. हेनी म्हणे कीं डॉ. खान यांना त्यांच्या कामाशिवाय दुसरा कुठलाही छंदच नव्हता. विद्यार्थी असतांनाची त्यांची जमीनीवर पुस्तकांच्या ढिगार्‍यात बसून दररोज संध्याकाळी खूप विचार करण्याची संवय तशीच होती. त्याकाळच्या त्यांच्या छायाचित्रात डोक्यावरचे बरेचसे पांढरे झालेले केस, नीट कोरलेल्या मिशा, कोटाच्या आतल्या बाजूला खोचलेले पेन अशा अवतारात उभे असलेले डॉ. खान तसे अकाली प्रौढ झाल्यासारखेच वाटत. एक हात आपल्या पत्नीच्या, हेनीच्या, खांद्याभोवती ऐटीत टाकलेला, तिचा चारचौघांसारखा दिसणारा चेहरा जाड फ्रेमच्या मागे दडलेला व अंगावर केवळ कानातल्या लाल रंगाच्या प्लॅस्टिकच्या कुड्या असायच्या. आपल्या पाश्चात्य मित्रांना लिहिलेल्या पत्रांत ते हेनीचा उल्लेख नेहमी ’माझा मध’ (my honey) असा करत.

१९६५ मध्ये डॉ. खान यांना पहिले यश मिळाले. डेल्फ्टमध्ये त्यांना धातुशास्त्रात मास्टर्स अभ्यासक्रमात त्यांना प्रवेश मिळाला. प्रा. बर्गर्स हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती व आदर प्राप्त परमाणूक्षेत्रातले शास्त्रज्ञ होते व ते डॉ. खान यांचे ट्यूटर म्हणून आले. त्यांच्या आशिर्वादाने डॉ. खान यांनी अनेक छोटे-छोटे प्रकल्प हाती घेतले व यातला प्रत्येक प्रकल्प ISI अधिकार्‍यांनी "खरे डॉ. खान" शोधण्यासाठी सखोलपणे अभ्यासला. ते चमकले नाहींत, पण नापासही झाले नाहींत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ते सगळ्याना मोहून टाकण्यात यशस्वी झाले.

ते नेहमी पाकिस्तानची तरफदारी करायचे. युरोपीय वृत्तपत्रांना पाठविलेली अनेक पत्रें ISI अधिकार्‍यांना मिळाली. या पत्रांत त्यांनी या वृत्तपत्रांना पाकिस्तानवर अयोग्य टीका केल्याबद्दल जबाबदार धरले होते. १९६५ साली ते पाकिस्तानात कराचीतल्या पोलाद कारखान्यात नोकरी शोधायला आले होते. हेनीला त्यांनी त्यांच्या आईकडे सोडले. "माझ्या सासूबाईंचे माझ्याबद्दलचे मत काय होते ते कळले नाहीं पण गोरी सून मिळाल्याच्या आनंदात त्या होत्या" असे हेनी म्हणते.

कराचीतल्या नोकरीबद्दलचा त्यांचा अर्ज नाकारला गेला. मग ते युगुल परत युरोपला आले. १९६८ साली त्यांना लॉयवनच्या (Leuven) कॅथॉलिक विश्वविद्यालयात संशोधक या नात्याने शिष्यवृत्ती मिळाली. इथले विद्यार्थी खूप नामांकित होते. इथे डॉ. खान रमले. त्यात हेनीला दिवस गेले व त्या प्रसूत झाल्या. डॉ. खान यांची स्लेबॉस, लर्क, मेबस, मिग्यूल टिनर व गुनेस चिरे अशा कांहीं मित्रांबरोबर गट्टी जमली. या सर्वांची डॉ. खान यांना नंतर मदत झाली व त्यातले कांहीं लोक त्यांच्या बेकायदेशीर वर्तणुकीमुळे पुढे तुरुंगातही गेले. ती माहिती नंतरच्या प्रकरणांत येईल.

डॉ. खान यांचे सल्लागार प्रा. ब्रेबर्स यांच्या लक्षात आले कीं डॉ. खान यांनी कितीही पाश्चात्य दिसण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या निष्ठा पाकिस्तानशीच राहिल्या. प्रा. ब्रेबर्सना आठवत होते कीं १९७१ सालच्या युद्धाबद्दल ते खूप अस्वस्थ होते. ते युद्ध त्यांनी चित्रवाणीवरील बातम्यातून नीटपणे ध्यास लागल्यासारखे पाहिले होते.

१९७२च्या मार्चमध्ये त्यांच्या नशीबात सुधारणा झाल. अ‍ॅम्स्टरडॅमस्थित डच इंजिनियरिंग कंपनी FDO ने प्रा. ब्रेबस यांच्याशी संपर्क साधून त्यांना एक धातुशास्त्रज्ञ व भाषांतरकार हवा होता. यावेळी त्यांनी खान यांचे नाव सुचवले. या कामासाठी वरवरचे तांत्रिक ज्ञान असलेला पण बहुभाषिक असलेला माणूस हवा होता व या कामात खान फिट्ट् बसले. हेनीनेही खान यांना हे काम घेण्याचा आग्रह धरला. खरे तर FDO ने अल्ट्रा सेंट्रीफ्यूज नेदरलॅंड (UCN) या युरेंकोतील डच कंपनीला उपकरणाचे भाग व त्यामागची विद्या असे दोन्ही प्रदान केले होते. जरी BVD या डच गुप्तचर विभागाने त्यांच्याबद्दल बारीक चौकशी केली असली तरी त्यांना हेनीच्या डच नागरिक असल्याच्या दाव्याबाबतची चूक लक्षात BVDच्या आली नव्हती. त्यात FDO ने BVD ला खात्रीलायक सांगितले कीं खान यांना अ‍ॅम्स्टरडॅमच्या मुख्य कार्यालयात अगदी कमी सुरक्षिततेची अनुमती लागणारे काम दिले जाईल, आल्मेलो येथील अति गोपनीय अशा सेंट्रीफ्यूज प्रकल्पात त्यांना काम दिले जाणार नाहीं. या तत्वावर त्यांना तिथे काम करायला परवानगी मिळाली. मग खान कुटुंब बधुफेडॉर्प या अ‍ॅम्स्टरडॅमच्या नैऋत्य भागातल्या उपनगरात रहायला आले.

खान यांना तेथील शास्त्रज्ञ फारच मुक्त वातावरणात काम करत होते याचे आश्चर्य वाटले.

पण एकाच आठवड्यात FDO ने या अनुमतीबाबत ढिलाई केली व त्यांना आल्मेलोतल्या प्रथांचा (procedures) अभ्यास करण्यासाठी दोन दिवसांच्या भेटीवर पाठविले. तिथला सेंट्रीफ्यूज हॉल व प्रसाधनगृहे तसेच कॉफीशॉप एकाच इमारतीत होती. या दोन दिवसात खान यांनी तिथे काय चालते याची बारीक माहिती चौकशा करून मिळविली.

तोपर्यंत फक्त चारच देश, चीन, रशिया, फ्रान्स व अमेरिका, युरेनियमचे शुद्धीकरण करून त्याची संपन्नता/शुद्धता वाढवू शकत होते. हे शुद्धीकरण ते परमाणूंच्या फैलावाने (diffusion) साध्य करत असत. ही पद्धत फार खर्चिक व गुंतागुंतीची होती. कारण ज्या युरेनियमचे शुद्धीकरण करायचे तो पदार्थ फारच गंजवणारा पदार्थ आहे व शुद्धीकरणाला लागणार्‍या सुविधा/उपकरणे खूप अत्याधुनिक व गुंतागुंतीची असावी लागत. सर्व नळ्या (पाईप) आणि पंप निकेल किंवा अल्युमिनियमच्या मिश्रधातूचे असावे लागत अन् संपूर्ण मांडणी ग्रीज किंवा तेलापासून मुक्त असावी लागे. कारण ग्रीज किंवा तेलामुळे अनिष्ट रासायनिक प्रक्रिया व्हायचा धोका असे. पण जिथे डॉ. खान काम करायचे त्या आल्मेलो कंपनीत शास्त्रज्ञांनी सेंट्रीफ्यूज पद्धतीने युरेनियमच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया शोधून काढली होती. सी.एन.ओ.आर. या नावाने ओळखली जाणारी ही प्रक्रिया युरेनियमचे ३ टक्क्यापर्यंत शुद्धीकरण करू शकत असे व या शुद्धीकृत युरेनियमवर परमाणू उर्जा कारखाना चालवता येऊ शके. हे कानावर पडल्यावर डॉ. खान यांचा विश्वासच बसेना. अ‍ॅम्स्टरडॅमला FDO च्या ऑफीसमध्ये आल्यावर डॉ. खान यांनी आल्मेलोच्या शास्त्रज्ञांबरोबर पत्रव्यवहार सुरू केला. ही पत्रें ते दर आठवड्याला लिहीत व त्यांचा सूर गप्पा मारल्यासारखा असे व परस्परांना आवडणार्‍या गोष्टींवर भर दिलेला असायचा. लवकरच हे शास्त्रज्ञ त्यांना येणार्‍या अडचणींबाबत डॉ खान यांच्याशी चर्चा करू लागले. सगळ्यात मोठी डोकेदुखी होती कीं सेंट्रीफ्यूजचा वेग वाढताच त्याचा धातूने बनलेला हात (metallic arm) वाकायचा, त्याच्या नळकांडीला भोक पाडायचा व या भोकातून धातूचे अनेक तुकडे इकडे-तिकडे उडत व त्यांच्या मार्गात येणार्‍या सर्व गोष्टींचा नाश करत. डॉ. खान त्यांना म्हणाले की लॉयवन (Leuven ) येथे शिकत असताना हार्डन केलेले पोलाद (hardened steel) किती दबाव शोषू शकते याविषयावर त्यांनी केलेले संशोधन त्यांना ही अडचण दूर करण्यात मदत करेल. त्यांनी असा आव आणला कीं ते करत असलेले सहाय्य/योगदान उच्च मोलाचे होते व परिणामत: लवकरच ते डच प्रतिकृतीवर धातुशास्त्रीय संशोधन करू लागले. खरे तर असे संशोधन करण्यासाठी लागणारी पात्रता/शिक्षणही त्यांच्याकडे नव्हते. आल्मेलोचे शास्त्रज्ञ त्यांना अत्यंत गोपनीय असलेली डिझाइन्स पाठवू लागले व त्यात लागणारी साधनसामग्री पुरविणार्‍या कंपन्यांची नांवेही पाठवू लागले. अशा तर्‍हेने डॉ. खान हळूच या अत्यंत गोपनीय अशा संशोधनक्षेत्रात "पाय न वाजवता" शिरले.

पुढे १९७२ साली त्यांनी पाकिस्तानी सरकारला याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. दोन पाकिस्तानी शास्त्रज्ञ "विंड टनेल" विकत घेण्याच्या मिषाने आले होते त्यांना एकटे गाठून ही माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ते शास्त्रज्ञ प्लुटोनियमवाले निघाले. त्यामुळे त्यांना युरेनियममध्ये रस नव्हता. पुन्हा डॉ. खान विचारात पडले. पण त्यांनी माहिती गोळा करायचे आपले काम चालूच ठेवले. पुढे १९७४ साली जेंव्हा भारताने त्याच्या अण्वस्त्राची चांचणी केली त्यावेळी पाश्चात्य राष्ट्रांची पाकिस्तानला मदत करण्याबद्दलची उदासीनता पाहून ते चिडले व त्या तिरमिरीत त्यांनी भुत्तोंना पत्र लिहिले. त्यांना बोलावणे आले तरीही उत्तेजित न होता ते नाताळापर्यंत थांबले व इतरांच्या बरोबरच सुटी घेऊन ते पाकिस्तानला गेले. दरम्यान जर्मन शास्त्रज्ञांनी सेंट्रीफ्यूजची जी-२ या नावाची एक नवीन प्रतिकृती बनविली होती त्यामुळे युरेंकोचे सर्व शास्त्रज्ञ अतीशय उत्साहित झाले होते. जी-२ हे मॉडेल जुन्या CNOR च्या सेंट्रीफ्यूजच्या जागी येणार होते कारण जी-२ ने CNOR च्या सर्व अडचणी सोडवल्या होत्या. डॉ. खान यांनी या प्रतिकृतीबद्दल माहिती मिळविण्याचा निश्चय केला.

जर्मन, डच व इंग्लिश भाषांचे एक भाषांतरकार म्हणून खान यांनी आपणहून ही सेवा अर्पण केली. त्यांना सर्वात कमी महत्वाच्या विभागाचे "G-2 working instructions" चे भाषांतर करण्याचे काम देण्यात आले.

खान यांनी आपल्या बरोबरच्या अधिकार्‍यांचे मन वळविले कीं त्यांना आल्मेलोला पाठवण्यात यावे म्हणजे जे समजणार नाही त्याबद्दल ते लगेच चौकशी करू शकतील. जरी जागेची कमतरता असली तरी त्यांना आल्मेलोच्या अंतिम योजना व डिझाईन (planning and design) या विभागात एक टेबल देण्यात आले. ही जागा सेंट्रीफ्यूज असलेल्या भागापासून वेगळी काढली होती. UCN च्या शास्त्रज्ञांत या विभागाला "brain-box" म्हणत व तिथे काम करणार्‍याला अतीशय गुप्त अनुमती (Top-Secret Clearance) असणारच अशी गैरसमजूत होती. बाहेर जातांना दारे, ड्रॉवर्स वगैरेंना कुलुपे लावली पाहिजेत असे नियम होते पण तिथे एक तर्‍हेचे खुले वातावरण निर्माण झाले होते. शिवाय प्रत्येकाचे काम एकमेकांवर अवलंबून होते. त्यामुळे हे नियम तसे अनावश्यक वाटत. डॉ. खान यांच्या शेजारी बसणार अधिकारी कैक वेळा कागद, ड्रॉइंग्स वगैरे टेबलावर पसरलेल्या अवस्थेत तासंतास गेलेला असायचा त्यामुळे डॉ. खान यांना बर्‍याचदा मोकळे रान मिळायचे.
डॉ. खान यांनी सर्व गोपनीय माहिती आपल्या छोट्या काळ्या डायरीत कॉपी करायचा सपाटा चालूच ठेवला. पण असे करायची त्यांना गरज नव्हती. कारण जेंव्हा डॉ. खान यांना अशी माहिती मिळाली कीं आल्मेलो येथील ’ब्रेन-बॉक्स’मध्ये एकच टंकलेखिका होती व तिला हे टंकन करायला वेळ नव्हता म्हणून हे सर्व कागद FDO च्या अ‍ॅम्स्टरडॅम ऑफीसला पाठवायचे ठरले. डॉ. खान यांनी अ‍ॅम्स्टरडॅम ऑफीसमधल्या पोरींना आधीच चॉकलेट्स, केक्स व इतर ’च्याव-माव’ देवून खुष करून ठेवले होते. मग डॉ. खान परत अ‍ॅम्स्टरडॅमला गेले व या पोरींना पटवून त्यांनी तो संपूर्ण टंकन केलेला रिपोर्ट त्यांच्याकडून मिळविला व त्याची प्रत बनविली.

१९७४च्या डिसेंबरमध्ये (नाताळ) डॉ. खान, हेनी व त्यांच्या दोन मुली साळसूदपणे FDO इतर अधिकार्‍यांसारखे कराचीला ’सुटी’ला म्हणून गेले. तसे त्यांनी पाकिस्तानी सरकारला सूचितही केले होते. कराचीच्या विमानतळावर उतरताच ब्रिगेडियर इम्तियाज अहमद यांनी त्यांना थेट इस्लामाबादला नेले.

शेवटी डॉ. खान यांचे स्वप्न साकार झाले. त्यांना पाकिस्तानात हवी तशी नोकरी मिळाली. त्यांनी भुत्तोंना पटवून दिले कीं सेंट्रीफ्यूज पद्धतीने पाकिस्तानला बाँब अर्ध्या वेळात बनवता येईल व व एका सेंट्रीफ्यूजमधून बाहेर आलेले व अंशत: शुद्धीकृत झालेले (partially enriched) युरेनियम दुसर्‍या, दुसर्‍यातून आलेले तिसर्‍यात अशा तर्‍हेने ६५ ते ७० सेंट्रीफ्यूजमधून बाहेर काढलेले युरेनियम ९० टक्क्यापेक्षा जास्त शुद्ध असेल व त्याला फक्त १५ दिवस लागतील. UF6 हे वायुरूपातले युरेमियम अशा तर्‍हेने शुद्ध करण्यात जर्मन शास्त्रज्ञ यशस्वी झालेले होते व त्यासाठी वापरलेल्या G-2 प्रकारच्या सेंट्रीफ्यूजची सर्व ड्रॉइंग्ज ते घेऊन आले होते. त्यांनी झटपट हिशेब करून भुत्तोंना सांगितले कीं एक बाँब बनवायला फक्त ६०,००० डॉलर्स खर्च येईल.

सगळ्यात खुषीची गोष्ट ही होती कीं खालिद अस्लाम या भूगर्भशास्त्रज्ञाने आधीच युरेनियम खाणीचा शोध लावला होता. थोडक्यात काय कीं कच्च्या मालाची क्षिती नव्हती. युरेनियम भरपूर प्रमाणात उपलब्ध होते व त्यासाठी IAEA च्या ’पहार्‍या’ची कटकट नव्हती!

भुत्तोंना डॉ. खान यांची योजना खूप पसंत पडली. पण तरीही त्यांनी आपल्या तंत्रज्ञानासंबंधातील सल्लागारांना डॉ. खान यांच्या दाव्यांची सत्यासत्यता पडताळून पहायला सांगितले. कारण आधीच्या ISI च्या अहवालानुसार डॉ. खान यांना अतिशयोक्ती करण्याचे वावडे नव्हते. त्यांनी डॉ. मुनीर अहमद खान यांना डॉ. खान यांची मुलाखत घ्यायला सांगितले. डॉ. खान यांनी उलट डॉ मुनीर यांनाच परमाणूविद्या कशी मिळवावी यावर ’भाषण’ दिले. ही भेट फारच अनिष्टपणे गेली कारण डॉ मुनीर यांना कुणाकडून 'ऐकून घ्यायची' संवय नव्हती व तेही एका शास्त्र विषयात कांहींच पात्रता नसलेल्या व परदेशी राहून आलेल्या ४० वर्षीय माणसाकडून!

डॉ. खान यांनी डॉ मुनीर यांना प्रिय असलेली प्लुटोनियम रीप्रोसेसिंगची पद्धत कशी वेळकाढू आहे, कशी खर्चिक आहे व त्यात IAEC कडून कशा सदैव कटकटी होतील हे सांगून या पद्धतीला "सफेत हत्ती" (white elephant) अशी संज्ञा दिली. याउलट सेंट्रीफ्यूज पद्ध्तीतील उपकरणे कशी गुपचुप बसवता येतील, तिचे सर्व वैयक्तिक भाग (individual components) कसे खुल्या बाजारात विकत घेता येण्यासारखे असल्यामुळे ती पद्धती कशी कुणाला कळणार नाही हे सांगितले व जाता-जाता मुनीर व त्यांचे लोक कसे थापाडे आहेत व कसे खोट्या गोष्टी सांगताहेत हेही ठासून सांगितले.

भुत्तोंनी मनात ठरविले कीं ते डॉ. खान यांच्या महत्वाकांक्षी स्वभाव व आक्रमक स्वभावाला काबूत ठेवू शकतील व शेवटी त्यांनी निर्णय घेतला कीं डॉ. खान हेच त्यांच्या पाकिस्तानला परमाणूशक्ती बनविण्याच्या स्वप्नाला पूर्णत्वाला नेऊ शकतील!

Posted by सुधीर काळे on February 05, 2010 09:33 AM · permalink